आई-बाबा आणि मुलांमधील नात्यात विश्वास, आदर, मित्रत्वाचे नाते टिकवून ठेवणं आज गरजेचं आहे. घरात हा दुरावा निर्माण होऊ नये म्हणून हे महत्त्वाचं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये समोर आलेल्या दुर्दैवी घटनांनी या नात्यातही आता दुरावा वाढत असल्याचं समोर आलंय. अशावेळी कसा मनमोकळा साधावा याबाबत...
•कुटुंबासाठी दिवसातील काही तास राखून ठेवा.
•परिवारातील सदस्यांशी मनमोकळा, दिलखुलास संवाद साधा.
•पाल्यांचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्या मृदू भाषेत समजावून सांगा.
•संपूर्ण परिवार एकत्र असताना अनुभव आणि अनुभूतीची देवाणघेवाण होईल, याची काळजी घ्या.
•कुटुंबामध्ये एकमेकांशी सुसंवाद साधणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच एकमेकांची स्पेस जपणंही महत्त्वाचं आहे.
•सोशल मीडिया काळाची गरज असली तरी काही काळ यापासून लांब राहून कुटुंबाला वेळ द्या.
•प्रोत्साहन मिळणं हे विकासासाठी अत्यंत गरजेचं आहे. वेळोवेळी आपल्या पाल्याला चांगल्या कामासाठी प्रोत्साहन द्या.
•चुकांमधून खूप काही शिकण्यासारखं असतं. आपल्या पाल्याचं काही चुकल्यास आक्रमक पवित्रा न घेता त्याला त्याची चूक समजावून सांगा.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट