Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 189

यु क आणखी एक तीन

$
0
0

आपण अधिक जबाबदार

आज मुंबईची जी दयनीय स्थिती झाली आहे, तिला जबाबदार आपणच आहोत. प्रशासनाची ही जितकी जबाबदारी आहे तितकीच, किंबहुना त्याहून जास्त जबाबदारी आपली आहे. मुंबईला स्वच्छ, सुंदर ठेवण्यात आपली भूमिका महत्त्वाची आहे. आपणच जर जबाबदारीने वागलो नाही तर इतरांना काय बोलणार? आपण साधे वाहतुकीचे नियम देखील पाळत नाही. कुठेही वाहनं उभी न करणं, रस्त्यांवर वाहतूक कोंडी होईल असं न वागणं ही आपलीच जबाबदारी आहे. मुंबईला खूप मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. पण त्याची योग्य काळजी घेतली जात नाही. पूर्ण चौपाटीवर कचरा, घाण पडलेली दिसते. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कचरा हा कचराकुंडीत कमी आणि तिच्या आजूबाजूलाच जास्त दिसतो. स्मार्टसिटीबरोबरच तिथे राहणारा नागरिक देखील स्मार्ट असायला हवा. त्या दिशेने योग्य पावले उचलली गेली पाहिजेत. यंत्रणा त्यांचं काम करतीलच पण म्हणून आपण शांत बसून चालणार नाही. मुंबईकरांनी देखील त्यांना आपल्यापरीनं मदत करायला पाहिजे. एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे, की आज आपण योग्य ती कडक पावलं उचलली तर आणि तरच उद्याच्या आपल्या मुंबईचं भविष्य सुधारेल आणि मग आपली मुंबई खऱ्या अर्थाने होईल स्मार्टसिटी.

मयुरेश जोशी, जोशी-बेडेकर कॉलेज

0000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 189

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>