Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 189 articles
Browse latest View live

पारदर्शकता हवी कृतीत

$
0
0

पारदर्शकता हा शब्द गेल्या काही दिवसांत चर्चेत राहिला. पारदर्शक कारभाराच्या मुद्द्यावरुन निवडणुका लढवल्या गेल्या. म्हणूनच, पारदर्शकता म्हणजे काय? असं युवा कट्टावर विचारल्यावर तरुण मंडळींच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला. पारदर्शकता हा शब्द राजकारण्यांनी केवळ भाषणांमध्ये न ठेवता कृतीतही आणायला हवा. नागरिकांना त्यांच्या तक्रारी मांडायला एक भक्कम व्यासपीठ हवंय जे पारदर्शकतेमुळे शक्य होऊ शकेल. आपल्या देशातली भ्रष्टाचाराची कीड नष्ट होण्यासही त्यामुळे मदत होईल, असं आग्रही मत तरुणाईने युवा कट्टावर मांडलं आहे.

यावेळच्या युवा कट्टात सहभागी झालेलं मुंबई विद्यापीठ आणि संलग्न कॉलेजेस
•झेविअर्स कॉलेज (फोर्ट)
•गर्व्हमेंट लॉ कॉलेज (चर्चगेट)
•एच. आर. कॉलेज (चर्चगेट)
•गर्व्हमेंट पॉलिटेकनिक (वांद्रे)
•तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स (अंधेरी)
•भवन्स कॉलेज (अंधेरी)
•एस.एन.डी.टी महिलासंघ कॉलेज (विलेपार्ले)
•डहाणूकर कॉलेज (विलेपार्ले)
•विवेक कॉलेज (गोरेगाव)
•पाटकर कॉलेज (गोरेगाव)
•गोखले कॉलेज (बोरिवली)
•एल्फिनस्टन कॉलेज (परळ)
•महात्मा फुले कॉलेज (परळ)
•एन.एस.एस कॉलेज (ताडदेव)
•रचना संसद अकादमी ऑफ आर्किटेक्चर (दादर)
•गुरू नानक खालसा कॉलेज (माटुंगा)
•रुईया कॉलेज (माटुंगा)
•पोदार कॉलेज (माटुंगा)
•विवा कॉलेज (विरार)
•विकास रात्र कॉलेज (विक्रोळी)
•आचार्य मराठे कॉलेज (चेंबुर)
•विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (वडाळा)
•वझे-केळकर कॉलेज (मुलुंड)
•पिल्लाई कॉलेज (रसायनी)
•सीएचएम कॉलेज (उल्हासनगर)
•सुयश कॉलेज (मुरबाड)
•साठ्ये कॉलेज (विलेपार्ले)
•विल्सन कॉलेज (गिरगाव)
•बिर्ला कॉलेज (कल्याण)

कृतीत दिसू द्या
पारदर्शक कारभार हा नुसताच आश्वासन देऊन पाळला जाणार नाही त्यासाठी तो कृतीत उतरवला पाहिजे. जेव्हा सगळे व्यवहार मग ते एखाद सरकारी काम असो वा महाविद्यालयीन काम असो जेव्हा बिना घोटाळ्याने पार पडतील तेव्हा खरा पारदर्शकतेला अर्थ प्राप्त होईल. अपारदर्शक कारभाराचे प्रकार आपल्याला प्रत्येक सरकारी खात्यामध्ये आणि आता इतकेच नाही तर महाविद्यालयीन कामकाजामध्येसुद्धा आढळून येते. यासाठी सामान्य जनतेनीच पुढाकार घेतला पाहिजे. जर कुठून विरोध होत असेल तर याची थेट तक्रार उच्च अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवून जनतेसमोर उघड केली पाहिजे. पारदर्शक कारभार करताना स्वतः जनतेनी भ्रष्टाचार कसा टाळता येईल वा तो समोरच्याकडून होत असेल तर तो कसा रोखता येईल याकडे जास्त प्राधान्य दिलं पहिजे, तरच सगळे कारभार पारदर्शकतेने पार पाडण्यात यश येईल.
पूजा कोर्लेकर, एच. आर कॉलेज

काळाची गरज
प्रत्येक नात्यामध्ये, व्यवहारामध्ये आणि व्यवसायामध्ये पारदर्शकता हवीच. विश्वासार्ह्यतेसाठी पारदर्शकता अत्यंत आवश्यक आहे. जर पारदर्शकता नसेल तर आपण भरलेला कर कुठे जातो, त्याचा वापर कसा होतो, रस्त्याची आणि पुलाची रखडलेली कामं अजून पूर्ण का होत नाही या प्रश्नांचं आणि शंकांचे निरसन कसं होणार? पारदर्शकता असेल तर सरकारी कारभाराबद्दल आणि कर्मचारी वर्गाबद्दल गैरसमज उद्भवणारच नाही. भ्रष्टाचार कमी होण्यास याचा नक्कीच उपयोग होईल. २००५ साली अमलात आणलेला माहितीचा अधिकार (RTI) हा पारदर्शकतेचं उत्कृष्ट उदाहरण आहे. अशाप्रकारचे अनेक उपक्रम राबवले तर जनतेला पडलेल्या प्रश्नांचं योग्यप्रकारे निरसन होईल.
श्रेया जाधव, पोदार कॉलेज

पुढची पायरी...भ्रष्टाचार
माझ्या मते, पारदर्शकता म्हणजे कोणत्याही कामाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणाच्या आयुष्यावर फरक पडणार असेल त्यांना त्याविषयी सर्व माहिती असणं. अशा या पारदर्शकतेचा विषय फक्त सरकारपर्यंत सीमित राहत नाही. सामान्य जीवनातही पारदर्शकता असणं महत्त्वाचं आहे. संशय, गैरसमज यासारख्या गोष्टी पारदर्शकता असेल तर नाहीशा होतात. या सर्वाची पुढची पायरी म्हणजे भ्रष्टाचार. पारदर्शकता आणण्यासाठी आर.टी.आयसारखे अनेक अधिकार देण्यात आले. अशा प्रकारे जास्तीत जास्त माहिती जनतेसाठी उपलब्ध करुन दिली पाहिजे.
राहुल हाटे, पोदार कॉलेज

जनतेचा सहभाग महत्त्वाचा
पारदर्शकता म्हणजे स्वच्छ प्रशासन. स्वच्छ प्रशासन म्हणजे केवळ लाच न घेणं नव्हे तर सार्वजनिक निधीचा सर्वोत्तम आणि पूर्ण क्षमतेने वापर करणं. माझं असं मत आहे की, आपल्या प्रशासनात अपारदर्शकता आहे. राजकारण म्हटलं की लगेच डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे भ्रष्टाचार! यामधील मुख्य त्रुटी म्हणजे नागरिकांचा असहभाग होय. म्हणूनच प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी जनतेचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे.
कांचन गावस्कर, एच. आर कॉलेज

फक्त आश्वासनांमध्येच
सामान्य जनतेची होणारी पिळवणूक आणि त्यांची सरकारी कामात होणारे हाल याला कारण म्हणजे आपला सरकारी व्यवस्थेचा म्हणा किंवा सरकारी अधिकाऱ्याचा भोंगळ कारभार. पारदर्शी कारभार नुसता आश्वासनात उरला आहे, असं मला वाटतं. आम्ही हे करू ते करू अशा आश्वासनांना आताचे तरुण मतदार भुलणार नाहीत. म्हणून आम्ही पारदर्शी कारभार करू अशी उगाच न पेलणारी आश्वासनं देऊन निवडणूक जिंकता येते. पण त्यानंतर काय? पारदर्शकता ही स्वतःच्या कामात आणि स्वतःच्या वर्तनात असेल तरच ती सामान्यांच्या डोळी दिसेल. पारदर्शकतेची घोषणा करताना एकदा तरी जनतेला विचारात घ्यावं.
प्रथमेश मयेकर, पाटकर कॉलेज

सुस्पष्टता असणं आवश्यक
प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे महत्त्वाच्या बाबी आणि माहिती जनतेसमोर मांडणं म्हणजे पारदर्शकता होय. जनतेकडून विविध कर आकारले जातात. या करांचा वापर कसा केला जातो याबाबतची माहिती ही संबंधित यंत्रणेने जनतेला द्यायला हवी. पारदर्शक कारभारासाठी लोकांनीसुद्धा जागरुक असणं आवश्यक आहे. एखाद्या गोष्टीची माहिती हवी असेल तर त्यासाठी संबंधित विषयाची प्राथमिक माहिती अथवा त्याचं ज्ञान लोकांना असायला हवं. त्याचप्रमाणे यंत्रणेकडून योग्य सहकार्य केलं जात नसेल तर अशावेळेस त्या यंत्रणेच्या विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी सक्षम अशी व्यवस्था हवी. सरकारी यंत्रणांनी जनतेला सहकार्य केलं पाहिजे. त्याचप्रमाणे जनता आणि संबंधित यंत्रणेत दृढ संबंध निर्माण व्हावेत यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत.
वैभव पुरव, डहाणूकर कॉलेज

अयोग्य गोष्टींना चालना
लोकांबरोबर जोडलेल्या प्रत्येक कामात पारदर्शकता असावी. प्रत्येकाने प्रत्येकाचं मत स्वीकारून त्यानुसार कामं केली पाहिजेत. राजकीय पक्षांबरोबरच शिक्षण व्यवस्थेतदेखील पारदर्शकता दिसून आली पाहिजे. गुणांनुसार प्रत्येकाला प्रवेश मिळावा. पारदर्शकतेच्या अभावामुळे काळाबाजार, फसवणूक यासारख्या अयोग्य गोष्टींना चालना मिळते. ही अपारदर्शकता घालून टाकण्यासाठी प्रत्येकाने विविध सामाजिक-राजकीय उपक्रमांमधे भाग घेतला पाहिजे. देशाला प्रगतीपथावर आणण्यासाठी लोकांमध्ये, कामामध्ये, पक्षामध्ये पारदर्शकतेची गरज आहे.
श्वेता सकपाळ, डहाणूकर कॉलेज

सगळाच घोळ
सध्या निवडणूक जिंकायची असेल तर आपलं काम आणि आपल्या व्यक्तिमत्व हे स्वछ तसंच पारदर्शीसुद्धा असणं गरजेचं आहे, असा सगळ्यांचाच समज आहे. पण मुळात राजकारणी लोकांनी पारदर्शी या शब्दाच्या अर्थाचा घोळ घातलाय, असं वाटतं. सर्वच गोष्टीचा लेखाजोखो तसंच सर्वसामान्य जनतेकडून घेतला जाणारा टॅक्स नक्की जातो कुठे? याची माहिती लोकांना देणं आवश्यक आहे. निवडणुकीत होणारा खर्च हा नेमका कुठून आणि कसा येतो त्याचबरोबर कोणाचा आहे हेही जनतेला टाऊक असायला हवं.
अभिजित कानिंदे, पाटकर कॉलेज

आपणही जबाबदार
राजकीय दृष्टीने पारदर्शकतेचा विचार केला तर तो म्हणजे एकप्रकारे एखाद्या राजकीय पक्षाची, नेत्याची चांगली बाजू मांडणं, असं मला वाटतं. निवडणूक आल्या रे आल्या की, सगळ्या राजकीय पक्षांची माणुसकी, कर्तव्य, हे सगळं जागं होतं. काही गोष्टी जनतेसमोर कधीच येत नाहीत. म्हणून मित्रांनो, जशी प्रत्येक गोष्टीत पारदर्शकता असते तशीच अपारदर्शकता ही असते. ज्याचा वापर हे राजकीय पक्ष राजकारणात करतात. त्यामुळे मित्रांनो या राजकीय पक्षांची काही काळापुरती पारदर्शकता पाहून आपण नेत्यांना निवडुन देतो खरं. पण पुढे येणाऱ्या अपारदर्शकतेचा आपण का नाही विचार करत? जेवढे अपारदर्शकतेला हे राजकीय नेते जबाबदार आहेत तेवढेच आपणही जबाबदार आहेत.
अक्षय अनभवणे, विवा कॉलेज

आरटीआयचा वापर व्हावा
सर्वप्रथम आपली किचकट निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हायला हवी. मुळात जर ही नेते मंडळी सुशिक्षित नाहीत तर ते विकास कसे साधणार? रोज नवनवीन कर लावले जातात, घोषणा केल्या जातात. पण त्या अमलात येत नाहीत. त्या अमलात आणाव्या लागतील. आम्हाला सुशोभित फुटपाथ बनवून नकोय, तर शैक्षणिक, आर्थिक आणि नागरी विकासही हवाय. पारदर्शकता हवी असेल तर प्रत्येकाने माहितीच्या अधिकाराचा वापर करायला हवा.
नागेश सुतार, मुंबई विद्यापीठ


विविध माध्यमांचा वापर व्हावा
पारदर्शक कारभार म्हणजे स्वच्छ, अंशाचा सुद्धा संशय किंवा भ्रष्टाचार नसलेला कारभार. सरकारी कारभार होताना व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी जनतेला विश्वासात घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. त्यांच्यासोबतच जनतेला केलेल्या आश्वासनाची जाणीव ठेवून त्याप्रमाणे केलेली कृती ही तितकीच आवश्यक आहे. ती कृती करताना केलेलं पारदर्शक म्हणजेच स्वच्छ, भ्रष्टाचार न करता केलेलं काम आणि नागरिकांना त्या कामाची पोचपावती देणं, हे होय. जिथं पारदर्शक काम होत नसेल त्यासंबंधी तक्रार करण्यासाठी यंत्रणेने स्वत:ची वेबसाइट बनवून जिथं इंटरनेट किंवा इतर सोयीस्कर माध्यमांनी तक्रार नोंदणी होईल, जातीने लक्ष घालून कारवाई करण्यात येईल याची सोय करावी.
सायली शिंदे, भवन्स कॉलेज

सुरुवात स्वत:पासूनच
माझ्या मते, पारदर्शकता म्हणजे देशात घडणाऱ्या व्यवहारात स्पष्टता, सहजता या गोष्टींचा सुरेख संबंध होय. ट्रॅफिक हवालदारपासून ते रेशनच्या दुकानांपर्यत आणि शाळा, महाविद्यालयापर्यंत सगळीकडेच अपारदर्शक कारभाराचा अनुभव येतो. मला वाटतं जर देशाच्या कारभारात पारदर्शकता आणायची असेल तर स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. छोट्या-छोट्या गोष्टींचा जर पाठपुरावा योग्य प्रकारे केला तर नक्कीच कुठेतरी पारदर्शकतेचा उदय होईल. तरीही जर पारदर्शकता येत नसेल तर त्या व्यक्ती आणि प्रवृत्तीविषयी तक्रार नोंदवण्यासाठी तीन अंकी टोल फ्री क्रमांक असावा, एस.एम.एस, ई-मेलसारख्या सहज आणि सोप्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
भक्ती पालांडे, तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स

एकच भाबडी अपेक्षा
अलीकडे झालेल्या मुंबईसह राज्यातल्या दहा महापालिकांच्या निवडणूक प्रचारा दरम्यान पारदर्शकता हा शब्द भाव खाऊन गेला. विकास कामांसाठी लोकप्रतिनिधींना मंजूर केलेला निधी हा बहुतांश वेळेला विकास कामांवर कमी आणि स्वविकासावर जास्त खर्च केला जातो. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आणि प्रकल्पसुध्दा राबवले जातात. त्यासाठी अतिरिक्त निधी मिळतो. त्या निधीचा वापर कुठे आणि कसा होतो हे ही पारदर्शकपणे सामन्यांसमोर मांडलं गेलं पाहिजे. राज्यकारभारात पारदर्शकता आण्यासाठी प्रयत्न हे दोन्ही बाजूंनी होणं अपेक्षित आहे. जर लोकांनी साथ दिली तर प्रचारादरम्यान जितके वेळा पारदर्शक हा शब्द कानी पडला, निदान तितके वेळा तरी सरकारच्या कारभारात पारदर्शकता दिसून यावी हीच भाबडी अपेक्षा.
प्रतिक्षा पाटील, डहाणूकर कॉलेज

पारदर्शकता फक्त चर्चेपुरतीच
भ्रष्टाचारमुक्त आणि निययोजनबद्ध कारभार म्हणजे पारदर्शकता. यंदाच्या निवडणुकीत चर्चिले गेलेला हा शब्द आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषद, तालुकापातळीवर पारदर्शक कारभार असणं हे देशासाठी आवश्यक आहे. आजच्या डिजिटल युगात अनेक गोष्टींमध्ये निययोजनबद्ध कारभाराची गरज आहे. पारदर्शकता ही अनेक प्रकारच्या कामातून आणि प्रगतीतून दिसून येते. अपारदर्शक कारभाराचा अनुभव हा प्रत्येकाला येत असतो. पण त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी सरकारी पातळीवर तशी व्यवस्था नाही. त्यामुळे ही गोष्ट लक्षात येऊनसुद्धा नंतर दुर्लक्षित होते. मुंबई विद्यापीठात अनेक गोष्टींमध्ये पारदर्शक गोष्टींचा अभाव जाणवतो. सामान पातळीवर सर्वांना सामान संधी आणि योग्य गोष्टी मिळाल्या तर पारदर्शक कारभार हा खऱ्या अर्थाने दिसून येईल.
निखिल मालवणकर, डहाणूकर कॉलेज

बेगडी मुखवटा
पारदर्शकतेचा जो काही फुगा राजकारण्यांनी निवडणुकीच्या कालखंडात
फुगवला, तो आता निकालानंतर सपशेल फुटलेला आहे. पारदर्शकतेचा बेगडी मुखवटा जनतेसमोर गळून पडलेला आहे. राजकारण्यांचं सोयीचं राजकारण मुंबईकर मतदात्याला कळलं आहे. मुंबईकरांना महापालिकेचं पारदर्शक कारभारात परिवर्तन करायचं होतं म्हणून बहुसंख्येने जनेतेने त्यांना निवडून दिलं. पण एकदा काय निवडून आल्यावर कोण मतदार आणि कसली पारदर्शकता असा पवित्रा राजकारणी घेतात. यामुळे नक्कीच मुंबईकरांचा भ्रमनिरास झालेला आहे. त्यामुळे मनात एकच प्रश्न सलतो की, आणखीन किती दिवस राजकारणी पारदर्शकतेची गाजरं दाखवून निवडणूका लढवणार?
लीना घेगडमल, मुंबई विद्यापीठ

नवीन फॉर्म्युला
पारदर्शकता हे आता निवडणुका लढवण्याचा आणि जिंकवण्याचा जणू नवीन फॉर्म्युला आहे. पण ती पारदर्शकता मला आज ही फक्त भाषण आणि आश्वासनापालीकडे फारशी कुठे आढळत नाही. आजच्या काळाची गरज आहे की, ही पारदर्शकता सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यात इमानेइतबारे दिसो. जर का आपल्याला भारताचा विकास व्हावा असं वाटत असेल तर आपल्याला लवकरात-लवकर हा पारदर्शक कारभार आणि पारदर्शक विचारसरणी एका शब्दकीय अनुसरातून वास्तविक जीवनात आणली पाहिजे, असं माझं ठाम मत आहे.
अथर्व अणेराव, पोदार कॉलेज

केवळ ढोंगीपणा
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत एक मुद्दा प्रामुख्याने ऐकायला मिळला तो म्हणजे ‘पारदर्शक कारभार’. म्हणजे अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर स्वच्छ कारभार, स्वच्छ प्रशासन. स्वच्छ कारभार म्हणजे केवळ लाच न घेणं नव्हे तर सार्वजनिक निधीचा सर्वोत्तम आणि पूर्ण क्षमतेने वापर करणं होय. पण सद्यस्थितीत पारदर्शकतेच्या नावाखाली केवळ ढोंगीपणा चालू आहे. पारदर्शकता हा शब्द नुसताच शब्द न रहाता त्या वर काहीतरी ठोस अशी अमलबजावणी व्हावी एवढीच अपेक्षा आहे.
रमण जगताप, मुंबई विद्यापीठ

...तर इतरही अनुकरण करतील
भारतामध्ये एका शब्दावरुन केवढा कल्लोळ होऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सध्याचे महाराष्ट्रातील 'पारदर्शकतेचे' राजकारण. सरकारच्या सर्व कारभाराचा आणि एक अन् एक रुपयाचा लेखाजोखा जनतेच्या डोळ्यांदेखत असणं म्हणजे पारदर्शकता असा अर्थ आम्हाला अभिप्रेत आहे. प्रशासनामध्ये खुलेपणा हवाच पण त्याचबरोबर सरकारचे उत्तरदायित्वसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जनतेच्या पैशातून जनतेची कामं करुन घेण्यास जेवढा कमी वेळ लागेल तेव्हाच सुशासनाची खरी संकल्पना उदयास येईल. महापालिकेचं अथवा इतर कोणत्याही सरकारी कामकाज एवढं स्वच्छ असलं पाहिजे की, इतरही त्याचे अनुकरण करतील. त्यामुळे दिलेल्या सत्तेचा मान राखावा आणि थोडीशी लाजही ठेवावी एवढंच आमचं म्हणणं आहे.
अक्षय नाईकधुरे, गोखले कॉलेज

देशाचा विकास साधण्यासाठी...
कामे करताना
ठेवा भान
पारदर्शकतेला द्यावा मान
तरच होईल देश महान
वरील उक्तीप्रमाणे जर सर्वच सरकारी क्षेत्रात पारदर्शकपणे कारभार होऊ लागले तर नक्कीच देशाचा विकास होईल. माझ्यामते जर खरोखर सरकारी कामांमध्ये पारदर्शकता आणायची असल्यास असं एखादं माध्यम निर्माण करावं की जे सरकारी योजनेत आणि सामान्य नागरिकात दुवा असलं पाहिजे. जेणेकरुन सामान्य नागिकांची नजर योजनेच्या कार्यप्रणालीवर राहील. यामुळे भ्रष्टाचारला तर आळा बसेलच शिवाय आपल्याला प्रगतीही साधता येईल.
आकाश पाखरे, विकास रात्र कॉलेज

जनहित की स्वहित?
केवळ आम्ही पारदर्शक कारभार करतो, असं म्हणणाऱ्यांना नंतर विसर पडतो पारदर्शकांच्या बाबतीत. एखादे विकास काम करताना त्याचे काय फायदे अन् तोटे आहेत? हे जनहितासाठी योग्य आहे का? हे पटवून देणं म्हणजे पारदर्शक होय. स्वहित न साधता जनहित म्हणजेच पारदर्शकता होय. भ्रष्टाचाराला आळा बसेल तेव्हा कारभार स्वच्छ होईल. नेतेमंडळी केवळ आपल्या मतदारसंघाचा विचार न करता संपूर्ण राज्याच्या विकासाच्या दृष्टीने विचार करतील, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, बेरोजगारांना नोकरीची संधी मिळतील आणि देशातील प्रत्येक स्त्री सुरक्षित होईल तेव्हाच खऱ्या पारदर्शक कारभाराची प्रचिती येईल.
अनिरुद्ध गायकवाड, सेंट झेविअर्स कॉलेज

लेखी नोंदी असाव्यात
पारदर्शक कारभाराची खरी गरज ही सरकारी कार्यलयांमध्ये आहे असं मला वाटतं. कारण आजकाल कोणतंही सरकारी काम करायचं असल्यास आपल्याकडून पैसे घेतले जातात. हे पैसे का घेतले जातात? याची रितसर लेखी नोंदही कुठेही केली जात नाही. यामुळेच भ्रष्टाचार वाढतं. माझ्या मते पारदर्शकता म्हणजेच प्रामाणिकपणा आणि योग्य व्यवहारीपणा. कारण काच जरी पारदर्शक असली तरी त्यावर धूळ बसली की तिचा पारदर्शकपणा काहीच कामाचा राहत नाही.
अक्षय पुळास्कर, गुरू नानक खालसा कॉलेज

भ्रष्टाचार बोकाळलाय!
राज्यात पारदर्शक कारभार व्हावा, असं मुख्यमंत्री म्हणतात. पण कोणत्याच शासकीय कारभारात अद्याप पारदर्शकता आलेली नाही. यामुळे भ्रष्टाचार सर्वत्र बोकाळलाय हे निश्चित. हे मी अनुभवलंय. यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर तोडगा काढावा. सामान्य जनतेकडून कर गोळा केला जातो. पण पुढे त्याचं होतं काय? त्याचा खरंच वापर होतो की, ते सगळे पैसे कोणाच्या खिशात जातात? याची सगळी माहिती जनसामान्यांना मिळाली पाहिजे. पण कारभारात पारदर्शकता आली तरच हे शक्य आहे. त्यादृष्टीने मार्गक्रमण करावं, एवढंच मी सांगू इच्छीतो.
प्रथमेश मराठे, बिर्ला कॉलेज

लोकशाहीचा पाया
आपल्याकडे माहितीचा अधिकार आहे. त्याद्वारे आपण आपल्याला हवी असलेली माहिती मागू शकतो. पण देशातील निरक्षर जनतेला या कायद्याबद्दल माहिती नाही. दुर्गम भागात या अधिकाराबद्दल जागरूकता नाही. लोकशाहीत पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची आहे. लोकशाही आणि जनता यातील एक दुवा म्हणजे पारदर्शकता. जर यंत्रणेने स्वतःहून प्रत्येक योजनेचा अहवाल जनतेमोर मांडला तर जनतेला माहितीच्या अधिकाराची गरजच भासणार नाही. यामुळे काळा पैसा, भ्रष्टाचार या विकृतींना आळा बसेल. जनतेचा कर स्वरूपातील पैसा त्यांच्या सुविधांसाठी वापरला जाईल. पारदर्शकतेमुळे लोकांचा लोकशाहीवरील विश्वास टिकून राहील. जर पारदर्शकता असेल तर प्रत्येक काम हे वेळेत पूर्ण होईल. मग खऱ्या अर्थाने लोकशाहीत लोकांनी, लोकांसाठी, लोकांचे असे राज्य अस्तित्वात येईल.
आदिती भोसले, विवेक कॉलेज

दोष कुणाचा?
माझ्या मते, तरी पारदर्शकता म्हणजे 'भ्रष्टाचार विरहित कारभार' किंवा 'स्वच्छ व निट-नेटका कारभार' होय. सामान्य माणसाला त्याच्या कुठल्याही सरकारी कामकाजात अडथळा न येता काम होणं म्हणजे पारदर्शकता होय. अपारदर्शक कारभाराचा अनुभव अनेक सरकारी कार्यालायांमध्ये अगदी सहजपणे बघायला मिळतो. हा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी अशी यंत्रणा हवी की सामान्य माणसाच्या तक्रारी कोणत्याही दुव्यांमार्फत नाही तर प्रत्यक्षपणे संपूर्ण व्यवस्थेसमोर मांडल्या जायला हव्या. संपूर्ण दोष सरकारवर देऊन चालणार नाही. कारण या अपादरर्शक कारभाराला अप्रत्यक्षपणे का होईना त्यात आपणही जबाबदार आहोत. ही व्यवस्था नीट होण्यासाठी आपणच सर्वप्रथम पुढाकार घ्यायला हवा. तरच कुठेतरी पारदर्शक कारभाराचं स्वप्न पूर्ण होण्यास हातभार लागेल.
निखिल अहिरे, सीएचएम कॉलेज

सापेक्ष संकल्पना
पारदर्शकता ही गोष्ट व्यक्ती सापेक्ष आहे. वास्तविक पारदर्शता ही गोष्ट फक्त दुसऱ्याच्या आचरणात आपण पाहतो. त्याची सुरुवात आपणापासून का करत नाही? कारभारातील अपारदर्शता म्हणजे भ्रष्टाचार ना? मग याचा अनुभव गल्लीपासून दिल्लीपर्यंत येतो. मग या अनुभवी आचाराला देशद्रोह का म्हणू नये. देशद्रोही व्यक्तींची फक्त तक्रार करणं योग्य नाही तर शिक्षा असायला हवी. विनोबा भावे यांनी म्हटल्यानुसार ‘स्व’रूप पहा, 'विश्व’रूप नको
संदीप नामदेव, सेंट झेविअर्स कॉलेज

तरुण मंडळींकडून अपेक्षा
सामान्य जनतेला दिलेली भरमसाठ आश्वासने, दुसऱ्या पक्षांवर केलेले आरोप-प्रत्यारोपण, भ्रष्टाचार, केलेले घोटाळे हे सगळे दृश्य नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत पाहायला मिळालं. सामान्य जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणे तर दूरच पण पक्षांमधील नेत्यांमध्ये होणारा वैचारिक वाद मिटवला गेला तर नशीबच म्हणावं लागेल. पण या सर्वांमध्ये उल्लेखनीय मुद्दा राजकीय नेत्यांनी उचलून धरला तो पारदर्शकतेचा. खरंच केंद्रापासून ते अगदी स्थानिक प्रशासकीय कामांमध्ये पारदर्शकता हवी. पण जोपर्यंत भ्रष्टाचार कमी होत नाही तोपर्यंत पारदर्शकता येणं कठीणच. आज आपल्या देशात ६५% तरुण वर्ग आहे. भ्रष्टाचार कमी करण्याचा छोटासा प्रयत्न सर्व तरुण वर्गाने केला तर भ्रष्टाचार थोड्या प्रमाणात नक्की कमी होईल आणि कामकाजात पारदर्शकता नक्कीच येईल.
वेदांगी काण्णव, वझे-केळकर कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बोर्डाचा दर्जा घसरतोय!

$
0
0

बोर्डाच्या परीक्षांना आलेलं अतिमहत्त्व... मेहनतीपेक्षा झटपट यश मिळवण्याची विद्यार्थ्यांची वृत्ती...पालकांचा विद्यार्थ्यांवरील दबाव आणि तुटत चाललेला संवाद... परीक्षा मंडळांकडे नसलेली पारदर्शक यंत्रणा... या सगळ्यातून होणारा प्रकार म्हणजे पेपरफुटी. पण यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. अभ्यासापेक्षा या इतर गोष्टींचाच ताण विद्यार्थ्यांना येत असल्याची प्रतिक्रिया युवा कट्टावर व्यक्त झाली. हे गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा एक पाऊल पुढे असायला हव्यात. तंत्रज्ञान, पारदर्शकता या मुद्यांवर परीक्षा मंडळ नापास झाल्याचा शेराच विद्यार्थ्यांनी त्यांना गुण देणाऱ्या बोर्डावर मारला आहे.

यावेळच्या युवा कट्टात सहभागी झालेलं मुंबई विद्यापीठ आणि संलग्न कॉलेजेस
• सेंट झेविअर्स कॉलेज (फोर्ट)
•एच. आर कॉलेज (चर्चगेट)
•विल्सन कॉलेज (गिरगाव)
•तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स (अंधेरी)
•भवन्स कॉलेज (अंधेरी)
•विवेक कॉलेज (गोरेगाव)
•एम. डी कॉलेज (परळ)
•व्हीजेटीआय (माटुंगा)
•पोदार कॉलेज (माटुंगा)
•वेलिंगकर इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट (माटुंगा)
•सीएचएम कॉलेज (उल्हासनगर)
•पद्मभूषण वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (सायन)
•श्रीराम पॉलिटेक्निक (ऐरोली)
•तेरणा इंजिनीअरिंग कॉलेज (नेरुळ)
•भारती विद्यापीठ कॉलेज (खारघर)
•जे. एस. एम. कॉलेज (शिवळे)
•बिर्ला कॉलेज (कल्याण)
•जीवनदीप कॉलेज (गोवेली)

मेहनती विद्यार्थ्यांवर अन्याय
पेपरफुटीचा सर्वाधिक फटका मात्र अभ्यासू आणि स्वतःच्या मेहनतीवरच विश्वास ठेवणाऱ्या मुलांना बसतो. असे प्रकार मोजक्याच किंवा बऱ्याचदा एखाद्याच केंद्रावर घडतात. पण भरडले जातात सर्वच विद्यार्थी. पेपरफुटी झाल्यावर परीक्षा रद्द होणं, पुढे ढकलल्या जाणं, नंतर निकालसुद्धा उशिरा लागणं या सर्व गोष्टींना विद्यार्थ्यांना तोंड द्यावं लागतं. मुळात सध्या स्पर्धा प्रचंड वाढल्यामुळे विद्यार्थी अत्यंत तणावाखाली असतो. वरून पालकांचाही दबाव असतो आणि मग अशावेळी पेपर परीक्षेआगोदरच मिळवण्याचा प्रयत्न काही ठिकाणी होतो. अशावेळी मुलांना गैरप्रकारापासून दूर ठेवणं पालकांचंही कर्तव्य आहे. शिक्षकांनी असे प्रकार घडत असल्याचं लक्षात आल्यास त्या विद्यार्थ्यांवर योग्य कारवाई करावी. खरोखर मेहनती विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय मिळावा, असं मला वाटतं.
चिन्मयी वझे, व्हीजेटीआय

विद्यार्थ्यांचं भवितव्य अवलंबून
विद्यार्थ्यांची मानसिक क्षमता तसंच शैक्षणिक व इतर कौशल्य जाणून घेण्यासाठी परीक्षा घेतल्या जातात. प्रश्नपत्रिका शाळा आणि कॉलेजात येण्याआधी आणि आल्यानंतर त्याची अफरातफरी करण्यामुळे पेपरफुटीचे प्रकार घडतात. पण या सर्व प्रकरणामुळे पेपर रद्द, अथवा आधीपेक्षा कठीण पेपर येणार अशा शंकांमुळे आमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचं निर्माण होते. पेपरफुटी होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांपासून ते शिक्षकांपर्यंत तसंच शाळा-महाविद्यालयांना पेपर पुरवणाऱ्या प्रत्येकाने प्रामाणिक असणं गरजेचं आहे. शेवटी याच पेपरांवर प्रत्येक विद्यार्थ्यांचं भवितव्य अवलंबून असते.
भक्ती पालांडे, तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स

मनस्ताप वाढतो
ज्याप्रमाणे नाण्याच्या दोन बाजू असतात. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाच्यासुध्दा काही चांगल्या आणि वाईट बाजू आहेत. वाढत्या तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे पेपरफुटीसारखे गैरप्रकार वाढलेत. आधीच परीक्षेच्या तणावातून जात असताना अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचा मनस्ताप अजून वाढतो. पेपरफुटीसारखे प्रकार परीक्षा देणारे काही विद्यार्थीच मोठ्या प्रमाणात करतात. अशा विद्यार्थ्यांचे कौन्सिलिंग व्हायला हवं. तसंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा घेणाऱ्या यंत्रणामध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात गोपनीयता बाळगली पाहिजे.
निखिल अहिरे, सीएचएम कॉलेज

...तेव्हाच दृष्टिकोन बदलेल
दहावी-बारावीच्या परीक्षा म्हटलं की एकंदरीतच तणावाचं वातावरण असतं. पालकांमध्ये मुलांच्या अभ्यासाचं टेन्शन आणि मुलांमध्ये परीक्षेची भीती! जोडीला सालाबादाप्रमाणे न चुकता येणाऱ्या पेपरफुटीच्या बातम्या... त्यातून निर्माण होणारा अधिक मनःस्ताप. कुठेतरी यासर्व प्रकाराला पूर्णविराम लागणं आवश्यक आहे. कुठलीही परीक्षा हा कधीच शेवट नसून पुढील वाटचालीचा दुवा असतो. गुणांवर अवलंबून परीक्षा पद्धतीपेक्षा ज्ञानावर अवलंबून शिक्षणपद्धती अस्तित्त्वात येईल तेव्हाच खऱ्या अर्थाने अभ्यास आणि परीक्षा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. यासाठीची सुरूवात 'पालक-पाल्य-शिक्षक' ह्या त्रिकुटानेच होऊ शकते.
अमेय नर, पद्मभूषण वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग

कारवाई व्हावी
बारावी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. पेपरफुटीमुळे अभ्यास करणाऱ्या मुलांचा ताण अधिकच वाढतो. कारण त्यांना एकाच पेपरचा अभ्यास पुन्हा करावा लागतो. त्यात शिक्षकांच्या काही अटी सरकारने मान्य न केल्यामुळे 'आम्ही पेपर तपासणार नाही', या भूमिकेवर ते ठाम आहेत. तंत्रज्ञानाचा वाढता वापर पाहता शैक्षणिक यंत्रणांनी उपाय योजणं गरजेचं आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर करणारे आणि पेपरफुटीला प्रोत्साहन देणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. तरच भविष्यात असे प्रकार कमी होतील आणि मुलांना अशा प्रकारच्या तणावाला सामोरं जावं लागणार नाही.
रेश्मा खरपुडे, तेरणा इंजिनीअरिंग कॉलेज

प्रश्न भविष्याचा
बारावीचे, दहावीचे पेपर फुटले ही बाबा आता आम्हा विद्यार्थ्यांच्या सवयीची झाली आहे. बऱ्याच वेळा पेपर फुटला आणि तो कुठल्या तरी खासगी कोचिंग क्लासेसच्या मुलांना मिळाला आणि हे कोचिंग क्लासेस चालवणारे शाळेचे देखील शिक्षक आहेत, असं निदर्शनास येतं. हे खूप चुकीचं आहे. पेपरफुटी थांबवण्यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने पेपर संबंधित सुरक्षा अजून कठोर केली पाहिजे. अशा प्रकरणात दोषी आढळल्यास त्यांना शिक्षा देखील झाली पाहिजे. कारण शेवटी भारताच्या भविष्याचा प्रश्न आहे.
रिंकिता दाभोळकर, पोदार कॉलेज

गोपनीयता हवी
काही लोक आपल्या स्वार्थासाठी पेपर फोडत असतात. पेपर फोडून स्वतःचे खिसे भरायचे आणि दुसऱ्याचं नुकसान करायचे एवढंच त्यांना माहित असावं. पेपर फुटण्याचं मुख्य कारण म्हणजे त्याबद्दल न ठेवण्यात येणारी गोपनीयता, पेपर सेट करण्यापासून ते परीक्षा केंद्रापर्यंत सर्वच लोकांनी ही गोपनीयता बाळगायला हवी. त्या पेपरवर अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य अवलंबून असतं. पण स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त गुण मिळण्यासाठी, पेपरफुटीची प्रकरणं घडवून आणतात. पेपर फोडून व्हॉटसअपसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पेपरचे फोटो काढून ते परीक्षेआधी व्हायरल करायचे आणि त्यातून पैसे कमवायचे असा धंदाच काहींनी सुरु केला आहे. याला आळा म्हणून पेपर सेट करणाऱ्यापासून ते पेपर परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यापर्यंत त्याची काळजी स्वतः अप्पर शिक्षण अधिकाऱ्यांनी घ्यायला हवी.
श्रुती कदम, विवेक कॉलेज

पैसा हेच कारण
पेपर फुटीमागे मुख्य कारण आहे पैसा. पैशाला देव मानणारे या दुष्कृत्यात सहभागी होतात. अलीकडे लष्कर भरतीचा पेपर, बारावीचे पेपर आणि इतर महत्वाच्या परीक्षांविषयीचे पेपर फुटताना दिसले. या सगळ्यामागे एक यंत्रणा काम करते आणि केवळ पैशाच्या हव्यासापोटी अनेक गुणवान तसेच होतकरू विद्यार्थ्यांचं नुकसान होताना दिसते. या सगळ्याना कुठेतरी चाप बसायला हवा. या सगळ्या घटनांकडे आपण जर हातावर हात ठेवून पाहत राहिलो तर भविष्यात अनेक वाईट परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागेल. कुठेतरी खासगी शिकवणी वर्ग देखील यासाठी अंशतः जबाबदार असल्याचं दिसतं. बहुतांश प्रश्नपत्रिका या छपाई दरम्यान गहाळ करून पेपरफुटीचे प्रकार घडताना दिसतात. तरी सदर विभागांवर लक्ष ठेवणं गरजेचे आहे. परीक्षेआधी तासभर इ-पेपर परीक्षा केंद्रावर पाठवण्याचं मुंबई विद्यापीठाचं पाऊल पेपरफुटीला आळा घालण्याच्या दृष्टीकोनातून सकारात्मक वाटतं. परीक्षा प्रक्रियेदरम्यान संबंधित लोकांकडील मोबाइलवर वगैरे बंदी घालणं अनिवार्य आहे. परीक्षा यंत्रणेवर कडक लक्ष आणि दोषी लोकांवर कडक कारवाई हे पर्याय वापरुन आपण हे प्रकार थांबवू शकतो.
मानसी धुमाळ, जे. एस. एम. कॉलेज

विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाचं काय?
नवीन तंत्रज्ञानामुळे आपला समाज विकसित होत चालला आहे हे खरं आहे. पण त्याचबरोबर याचे वाईट परिणामही दिसून येताहेत. व्हॉटसअपने तर तरुणाईवर जणू भूलच टाकली आहे. अलीकडे दोन-तीन परीक्षांबाबत असं झालं, की परीक्षेला जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांना हे पेपर १५ते२० मिनिट्स आधी व्हॉटसअपवर आले होते. हे असंच चालू राहिलं तर परीक्षा अर्थहीन होईल. पण या सर्व प्रकारांमुळे नुकसान होतं ते प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं. त्यांचा आत्मविश्वास डगमगतो. आधीच परीक्षेचं टेन्शन, त्यात या पेपरफुटीच्या प्रकारामुळे तणाव अधिक वाढत जातो. म्हणून पेपर काढताना दक्षता घ्यावी. कारण माझ्या मते बारावीचे आत्तापर्यंत झालेले सर्वच पेपर फुटले आहेत. म्हणूनच पेपर काढणारे जे अधिकारी असतात त्यांना त्या केंद्रात मोबाइल वापरण्यावर बंदी असावी. आणि जमलं तर त्या अधिकाऱ्यांना पेपर होईपर्यंत त्या केंद्रामध्येच राहण्याची सोय करावी. कारण काही अधिकारी भ्रष्टाचार करून पेपर फोडतात. त्यामुळे कोणताही अधिकारी बाहेरही जाणार नाही आणि मोबाइल वापरण्यावरसुद्धा बंधन असल्यामुळे व्हॉट्सअपवरही कुणी पेपर पाठवणार नाही.
कांचन गावस्कर, एच.आर कॉलेज

तंत्रज्ञानाचा गैरवापर
तंत्रज्ञानातील वाढत्या प्रगतीनंतर त्याचे दुरुपयोगही दिवसागणिक वाढतच चालले आहेत. हल्लीचा गंभीर विषय म्हणजे पेपरफुटी. बारावीच्या पेपरफुटीत देखील तंत्रज्ञानाचा गैरवापर झाला असून, शिक्षकांनीच व्हॉट्सअॅपवर हे पेपर फोडले आहेत अशा बातम्या कानावर येत आहेत. आधीच दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर दडपण असतं. त्यात हे असले अडथळे आले, की त्यांचा तणाव अधिकच वाढतो. काही ठिकाणच्या बातम्यांनुसार, जे शिक्षक स्वतःचे क्लास घेतात त्यांनीच स्वतःच्या क्लासचा निकाल उत्तम लावण्यासाठी हे असले प्रकार केल्याचे आढळते. बारावीच्या परीक्षेसाठी ज्या शाळा आणि कॉलेजं परीक्षेचं केंद्र असतात, तेथील शिक्षकांनी या गोष्टीचा दुरुपयोग केल्यामुळे प्रामाणिकपणे परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत जर विद्यापीठाने पुन्हा परीक्षांचा निर्णय घेतला, तर विद्यार्थी अजूनच खचून जातील. या प्रकारांवर निर्बंध घालण्यासाठी शासनाने काही ठोस पावलं उचलायलाच हवीत. परीक्षा केंद्रं असलेल्या ठिकाणी अधिक गुप्तता व सुरक्षितता पाळण्यात यावी.
वृषाली भामरे, एच आर कॉलेज

गोपनीय गोष्ट फुटतेच कशी?
पेपरफुटी काही नवीन राहिलेलं नाही. गेल्या अनेक वर्षांमध्ये असे बरेच गंभीर प्रकार घडले आहेत, मग ते मुंबई विद्यापीठ असो अनेक शासकीय परीक्षा असो. आताही बारावीचे व्हॉटसअॅपवर फिरणारे पेपर असो, हे पेपरफुटीचं सत्र चालूच आहे. मुळात परीक्षेचा पेपर ही अगदी गोपनीय गोष्ट आहे. ती शासकीय सुरक्षा यंत्रणेच्या किंवा एखाद्या अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळेच होऊ शकते. पेपरफुटीला मुख्यतः प्रशासनच जबाबदार आहे.
तुषार पाचपांडे, भारती विद्यापीठ कॉलेज

चांगले टक्के हेच सर्वस्व नव्हे
आपली परीक्षा पद्धती खूपच जुनाट आहे असं म्हणता येईल. वर्षभर केलेली घोकंपट्टी ही वर्षाच्या शेवटी कागदावर उतरवायची असते. पेपर फोडणारे विदयार्थी नक्कीच नसणार. ते पेपर सेट करणाऱ्यांमधलेच असू शकतात. तंत्रज्ञानाच्या मदतीने ते पेपर फोडतात. तर तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्यावर लक्षसुद्धा ठेवता येऊ शकतं. आपली परीक्षा पद्धती ही गुणात्मक आहे, ज्यातून फक्त नोकरदार वर्ग तयार होतो. ती बदलून चांगले नागरिक कसे तयार होतील याकडे लक्ष द्यायला हवं. आपल्याकडच्या लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की फक्त चांगले टक्के म्हणजे चांगली बुद्धीमत्ता असं काही नाही.
नागेश सुतार, मुंबई विद्यापीठ

परीक्षाच ऑनलाइन करा
कुठलीही परीक्षा द्यायची म्हटलं, तरी विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्या पालकांनाच त्याचं अधिक दडपण असतं. त्यात हे पेपरफुटी प्रकरण झाल्यावर तर ते आणखी वाढतं. मुळात कुठलाही पेपर अधिक व्यक्तींनी हाताळला तर तो फुटण्याची संख्या जास्त असते. कुठलाही पेपर साधारणपणे छापणारी मंडळी, वाहतूक करणारी मंडळी यांच्या हातात पडतो. जर आपण परीक्षाच ऑनलाइन घेतल्या, तर हे प्रकार कमी होऊ शकतील. कारण प्रत्येक प्रश्नपत्रिका ही एका सुरक्षित डेटाबेसवर पासवर्डच्या संरक्षणाखाली असेल. ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांचा पर्याय तर हमखास वापरता येइल. याचं यशस्वी उदाहरण म्हणजे कॅट ही परीक्षा. परंतु ज्या परीक्षात सब्जेक्टीव्ह प्रश्न असतील तिथे देखील प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर असलेल्या कम्प्युटरवर थेट टाकता येइल व पेपर लिहिता येइल. वेबसाइट हॅक होण्याची भीती आहेच. पण कुशल कम्प्युटर इंजिनीअर्सच्या निगराणीखाली हे काम करता येऊ शकतं.
श्रेया जाधव, मुंबई विद्यापीठ

मुलांवर अन्याय कशाला?
वार्षिक परीक्षा म्हणजे कठोर परिश्रम करणारे विदयार्थी वर्षाच्या अखेरीस पेपर देण्यासाठी जातात. त्यातून बारावीची परीक्षा म्हणजे आधीच शिक्षकांचं आणि कुटुंबाच्या अपेक्षांचं ओझं विद्यार्थ्यांवर असतं. अशावेळी आधीच मुल चिंतेत असतात. जर त्यांना पेपर फुटल्याची बातमी समजली की तिथेच त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. शिवाय त्यांना त्यांच्या प्रयत्नांचं फळ मिळत नाही. पेपरफुटीमुळे मुलांना उगाच मनस्ताप सहन करावा लागतो. म्हणूनच यासाठी शासनाने खूप कडक नियम करायला हवेत. जेणेकरून मुलांवर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही.
प्रतिक लाड, भवन्स कॉलेज

कडक कारवाई हवी
हल्ली पेपरफुटीचा जणू ट्रेंडच आलाय असं म्हणावं लागेल. आधी सैनिकी खात्याचा व नंतर बारावीचे पेपर फुटले. अर्थात या गोष्टींचा अधिक मनस्ताप हा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना होतो. ज्या विद्यार्थ्यांनी मन लावून मेहनत घेतली आहे, त्यांचं खच्चीकरण यामुळे होतं. शिवाय, ज्या मुलांनी अभ्यास प्रामाणिकपणे केलेला नाही त्यांच्या बेजबाबदारपणाच्या वृत्तीला पेपरफुटीमुळे खतपाणी मिळतं. शिक्षणमंत्री, शिक्षण मंडळाने पेपरफुटीसारख्या लांच्छनास्पद प्रकाराला आळा घालण्यासाठी एकत्र बसून उपाय काढणं गरजेचं आहे. तसंच विचारपूर्वक पावलं उचलून, ज्यांनी यात त्यांच्या हुद्द्याचा गैरवापर केलाय त्यांच्यावर कडक कारवाई होणं अपेक्षित आहे.
सायली शिंदे, भवन्स कॉलेज

बदल होणं अपेक्षित
वाढत्या स्पर्धामुळे आणि पुढे आपलं करिअर उत्तम व्हावं म्हणून सध्याचे विद्यार्थी काहीही करण्याची तयारी दाखवतात. त्यातूनच पेपरफुटीसारखे प्रकार होतात. जेवढ्या सोप्या मार्गाने यश मिळेल ते सर्व मार्ग विद्यार्थी स्वीकारतात. हे सर्व रोखण्यासाठी यंत्रणा अपयशी ठरत आहे, असं मला तरी वाटतं. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास हे नक्कीच टाळता येईल. परीक्षा घेणाऱ्या यंत्रणांमध्ये सुधारणा आणणं आवश्यक आहे. पेपरफुटीसारख्या सर्व त्रुटी कमी केल्या पाहिजेत. जेणेकरुन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी न होता तो अधिक वाढेल. त्याचबरोबर हे प्रकार थांबवण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांनी पुढाकार घेणं महत्त्वाचं आहे. शिक्षण विभागाने योग्य तेवढी गोपनीयता बाळगली पाहिजे. त्याचबरोबर परीक्षा पद्धतीमध्ये बदल व्हायला हवा, असं मला तरी वाटतं.
ओमकार आर्दे, सीएचएम कॉलेज

पदरी निराशाच
प्रामाणिकपणे मेहनत करून परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर जर पेपर फुटल्याचं समजल्यावर विद्यार्थ्यांची मात्र निराशा होते. यासाठी येत्या परीक्षांमध्ये असं होऊ नये म्हणून उपाय करणं आवश्यक आहे. नाहीतर याचा गंभीर परिणाम विद्यार्थ्यांच्या करिअरवर आणि त्यांच्या भवितव्यावर होतो. तसंच झटपट तंत्रज्ञान जितकं उपयोगी आहे, तितकंच दुरूपयोगीही आहे हे प्रत्येकानेच लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा सदुपयोग प्रत्येकाने स्वत:च्या विकासासाठी करावा. पण सद्यस्थितीत त्याचा दुरुपयोगच जास्त प्रमाणात होतोय. यावरुन परीक्षे आधीच प्रश्न पत्रिका फॉरवर्ड केल्या जातात. असं करण्यांवर कठोर कारवाई व्हावी, असं माझं स्पष्ट मत आहे. पेपरफुटी यासारखे प्रकार परत घडून नयेत म्हणून शिक्षण विभागाने खबरदारी घेतली पाहिजे. त्याचसोबत प्रत्येक परीक्षा केंद्रांवर कडक पहारा असावा जेणेकरुन असे अनुचित प्रकार कमी होतील.
अन्वित मेढेकर, एम. डी कॉलेज

गैरवापरच मोठ्या प्रमाणावर
आधी सैनिकी खात्याचा पेपर त्यानंतर लगेचच बारावीचा पेपर फुटला आणि तेही व्हॉटसअपवर. एवढंच नाही तर ही मालिका पुढे अन्य पेपरांच्या बाबतीतही चालूच राहिली. यासर्व प्रकरणामध्ये मेहनती विद्यार्थ्यांची मात्र गोची होते. यावर लवकरात लवकर उपाय काढणं खूप गरजेचं आहे. कारण आता लागोपाठ परीक्षा सुरू होतील. त्याआधीच ही समस्या सुटणं जास्त महत्त्वाचं आहे. नाही तर या त्रासाचे बळी अनेक विद्यार्थी ठरतील. अभ्यासासाठी व्हॉटसअपचा वापर सध्या खूप मोठ्या प्रमाणावर होतो. पण मात्र त्याचा गैरवापरच मोठ्या प्रमाणात केला जातो. तसंच बारावीचा पेपर फुटण्याचं हे सलग तिसरं वर्ष आहे. याला जे कोणी कारणीभूत आहे त्यांना जोपर्यंत कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही. पण या सगळ्यात प्रामाणिकपण अभ्यास करणारे, मेहनत घेणारे विद्यार्थी भरडले जात आहेत, हे नक्की. अशा विद्यार्थ्यांच्या करिअरवर, भवित्यावर परिणाम होऊ शकतो. त्यांच्या कारण याबाबत शिक्षण विभागाने महत्त्वाचं पाऊल उचललं पाहिजे. अशा या गोंधळात प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांवर काही परिणाम होणार नाही याचीदेखील काळजी घेतली पाहिजे.
कोमल कांगण, श्रीराम पॉलिटेक्निक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवं ते हवं, पण...

$
0
0

गुढीपाडव्याच्या स्वागतयात्रांमधून तरुणाईचा सळसळता उत्साह पुन्हा पाहायला मिळेल. आपली परंपरा, संस्कृती जपताना त्याची शोबाजीच जास्त होतेय, हा आरोप तरुण-तरुणींना फारसा मान्य नाही. बदलत्या काळानुसार सण साजरे करण्यामध्ये बदल तर होणारच ही प्रतिक्रिया युवा कट्टावर उमटली. भपक्यावर होणारा खर्च, सोशल मीडियावर चमकण्यासाठी सुरू असलेली धडपड या मुद्यावर मात्र तरुणाईमध्ये दोन मतप्रवाह दिसतात. परंपरेच्या नावाखाली इतरांना त्रास होऊ नये, खर्चावर बंधनं असावीत असं काहींना वाटतंय. तर सोशल मीडियावर राहण्यापेक्षा भेटीगाठींमधून प्रत्यक्ष आनंद मिळवावा, असं काहींचं म्हणणं आहे.

तो दिवस सरला की...

खरंतर हा बदल खूपच सकारात्मक झालाय असं म्हणता येईल. कारण पाश्चात्यांचं अंधानुकरण करणारी तरुण पिढी थर्टी फर्स्ट ज्या उत्साहात साजरी करते तितक्याच उत्साहात आपल्या मराठमोळ्या नवीन वर्षाचेही स्वागत करते. प्रत्येक गोष्टीला इव्हेंटचं स्वरूप आलंय आणि त्यानिमित्ताने का होईना आपली परंपरा आज तरुणपिढी जपताना दिसतेय. पण तो दिवस सरला की, परत पहिले पाढे पंचावन्न. काळाप्रमाणे बदलणं तर आवश्यकच आहे. पण सण समारंभातून आपल्या भाषेचं खऱ्या अर्थानं संवर्धन करण्याची आणि आपला इतिहास आणि संस्कृतीची मुलांना ओळख आणि जाणीव करून देण्याची गरज आहे. तसेच अशा मिरवणुकीमधून काही सामाजिक संदेशही देता येऊ शकते.

चिन्मयी वझे, व्हीजेटीआय कॉलेज

संस्कतीला पोषकच!

सण समारंभ आले की नटणं-थटणं, सेल्फी आणि बरंच काही सध्या पाहायला मिळतं. ऐरवी पाश्चात्य संस्कृतीचा जागर करणारे तरुण या शोभायात्रेच्या निमित्ताने का होईना आपली संस्कृती जपताना दिसतात. मराठमोळा पोशाख करून त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकणं ही तरुणाईची सण साजरा करण्याची नवीन पद्धत आहे. फक्त या सर्वांचा अतिरेक नको व्हायला, असं मला तरी वाटतं. सध्या सण-समारंभात आलेला दिखाऊपणा आपल्या संस्कृतीला पोषक असा आहे. पण फक्त शोबजीचं न करता सर्वांनी आपुलकीने सण साजरे करायला हवे, असं मला तरी वाटतं.

अपर्णा वाडेकर, शासकीय तंत्रनिकेतन

खरं शास्त्र विसरलोत

आपण समाजात वावरताना वेगवेगळे सण साजरे करायला लागलो. कारण समाजातील सर्व घटकांनी कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं औचित्य साधून एकत्र यावं आणि विचारांची तसंच परंपरेची देवाणघेवाण व्हावी. आजच्या युगात सणांमागचा हा उद्देश कुठेतरी मागे पडतोय, असं मला वाटतं. कारण आज माणसं मनानी नाही तर तंत्रज्ञानाने प्रत्येकाशी जोडली गेलीत. पण त्यात प्रेम, आपुलकी, जिव्हाळा कुठेच नसतो. पूर्वी सणवार हेच एकत्र येण्याचा दिवस असायचे. पण आजकाल तसं नाही. म्हणून मला वाटतं की, हे सण साजरे करणं फक्त दिखावा झालेत. खरं कारण, शास्त्र मात्र कुठेतरी हरवलंय.

अश्विनी आचारी, एल्फिन्स्टन कॉलेज

खरा जिव्हाळा

'विविधतेत एकता', अशी भारताची ओळख आहे. प्रत्येकजण प्रत्येकाच्या आनंदात आनंद मानून सण साजरे करतात. लोकांमधे एकता आणणं हे सणांचं मुख्य कारण असतं. सणांच्या निमित्ताने आपण नातेवाईकांना भेटतो, त्यांना सणांच्या शुभेच्छा देतो. पण आता सणांना काहीसं वेगळं रूप आलंय. परंपरा जोपासणं हे विधान वगळून केवळ मज्जा, मस्ती म्हणून सणांकडे पाहिलं जातं. या एकविसाव्या शतकात तरुणाईचा कल दिखावेपणाकडे वळत जात आहे. दुसऱ्यापेक्षा छान दिसणं, सुंदर फोटोज काढून ते सोशल मीडियावर अपडेट करणं, मनात जिव्हाळ्याची भावना नसून एखादी कॅप्शन टाकून भावना व्यक्त करणं अशा अनेक कामात तरुणाई रमून गेलीय. त्यामुळे सणांचे महत्त्व जाणून ते साजरे करावेत आणि नात्यांतील खरा जिव्हाळा ओळखावा.

श्वेता सकपाळ, डहाणूकर कॉलेज

भावनिक आनंद महत्त्वाचा

हल्ली उत्सवाला खरंच वेगळं वळण आलंय. सोशल मीडियावर जास्त आणि सत्यात कमी वावरणाऱ्या तरुणाईला सण का साजरे करतात या मागील संकल्पना समजून घ्यायला हवी. पारंपरिक वस्त्र परिधान करणं हा देखील एक संस्कृतीचा भाग आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करणारी तरुणपिढी शोभायात्रा, मिरवणुका या निमित्ताने का होई ना पारंपरिक वस्त्र परिधान करु लागलीय. जे चांगलच आहे. त्याबरोबरच कुटुंब, मित्र, नातेवाई यांच्यासोबत आनंदात वेळ घालवणं म्हत्त्वाचं आहे. फोटोंना लाइक्स खूप मिळतील, त्याची अनेक जण स्तुतीही करतील. पण त्या क्षणिक आनंदापेक्षा, भावनिक आनंद फार मोठा असतो.

स्नेहा वंझारे, साठ्ये कॉलेज

उत्सवाचं स्पर्धेत रुपांतर

महाराष्ट्रातील गुढीपाडवा असा मराठी संस्कृतीचा वारसा जपतो जसा गुढीपाडवा आला की, आपल्याला आठवतात त्या शोभायात्रा. मग ती गिरगावची असो किंवा डोंबिवलीची. ढोल ताशांचा गजर, डोक्यावर फेटा, छान पारंपारिक पेहराव, मुलींच्या रंगीबेरंगी साड्या आणि केलेला मेकअप या तयारीने नवीन वर्षाची सुरुवात होते. वर्षानुवर्षे याची रंगत वाढत चालली आहे. पण तरुणाईमध्ये स्पर्धादेखील तेवढीच वाढली आहे. सोशल मीडियावर प्रत्येकाला प्रसिद्धी हवी असते. फेसबुकवर टाकल्या जाणाऱ्या पोस्ट यामध्ये वेगळीच रंगत असते. सेल्फीचं वेड मात्र तरुणाईला विरंगुळा वाटतो. या नुसत्या शोबाजीमुळे आपण आपलं नुकसान करतोय, वरवरच्या दिखाव्यामुळे परंपरेची रंगत घालवतोय.

देवल महाडीक, सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्स

पद्धत बदलली!

सध्याच्या काळात सण आणि शोबाजी यामधला फरक सांगणं खूप अवघड आहे, असं म्हटलं तरी हरकत नाही. आधी मराठी सणांकडे पाठ फिरवणाऱ्या तरुणाईने त्यांच्या पद्धतीने पण मराठमोळपण जपून पाडव्यासारखे सण साजरे करायला सुरुवात केलीय. यात मला तरी काही चुकीच वाटत नाही. तरुणाईला आपल्या मित्र परिवारासोबत सण साजरे करायला आवडतं, यात काही वावगं नसावं, असं मला तरी वाटतं. फक्त याचा अतिरेक होता कामा नये. कारण सोशल मीडियावर हा दिखाऊपणा दाखवण्याच्या नादात उत्सवातील आपुलकी जपायला हवी.

निखिल अहिरे, सीएचएम कॉलेज

अभिमान आणि आदरही

सध्याच्या काळात धकाधकीच्या जीवनात आज लोकांना सणांचा विसर पडलाय. पण गेले काही वर्षं तरुणांमध्ये गुढीपाडव्यासारखे सण खूप उत्साहात आणि जोशात साजरे होतात. दिवसेंदिवस सणांचं स्वरूप बदलत चाललंय. तरुणपिढी पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करते आणि अशावेळी अशा सणाच्या निमित्ताने आजची तरुण पिढी आपली संस्कृती जपतेय. मराठी पेहेराव करून शोभायात्रेत मिरवतात आणि सोशल मीडियावर याचं प्रदर्शन करतात. पण त्यात वाईट काहीच नाही. त्या निमित्ताने आपल्या संस्कृतीचा प्रसार होतोय आणि आजच्या पिढीला त्याचं महत्त्व पटतंय. त्यामुळे आपले मराठमोळे सण आजचा तरुण पिढीने अभिमानाने आणि जोशात साजरे करावेत, असं मला वाटतं.

अभिषेक साटम, एम. डी. कॉलेज

सणांचं महत्त्व जाणा

जगाबरोबर, आजुबाजूच्या परिस्थितीनुसार आपण बदलायचं, असं म्हंटलं जातं. बरोबर आहे पण आजची तरूणाई सोशल मीडियामध्ये जास्तच गुंतलेली आहे, असं दिसून येतं. पण सण उत्सवामध्ये आजची पिढी रमत आहे, असं देखील दिसून येत आहे. आजचे सण उत्सव हे नटणं-थटणंच नव्हे तर मराठमोळे सण साजरे करण्याकडे तरुणांचा कल तसेच परंपरा जपण्याचा तरुणांचा प्रयत्न असतो. दिखाऊपणा दाखवण्यापेक्षा जरा सणांचे महत्त्व जाणून घेणं हे ही महत्वाचं आहे.

किशोरी सुरोशी, जीवनदीप कॉलेज

सण की स्पर्धा?

आपला सांस्कृतिक वारसा हा फार मौल्यवान आहे. पण आपल्या कोणालाच याची जाणीव नाही. सणसमारंभाचा मूळ उदेश बाजूला राहून केवळ सादरीकरणाच्या दिखाव्या वरच काही मंडळांचा जोर असतो. तरुणांची सांस्कृतिक कार्यक्रमातून आपली अस्मिता जपायची धडपड सुरु होते आणि त्यातूनच सुरु होते ती स्पर्धा! सुरुवातीला एक-दोन नंतर वीस-तीस अशी पथके मोठ्या आनंदात मिरवणुकीत सामील होतात. अफाट गर्दी, तो मोठ्याने होणारा गजर, कानाला सहन न होणारा तो आवाज आणि पथकाची होणारी स्पर्धा या सर्वांमुळे सणांचे पावित्र्य कमी होते. असं न करता, आपण आपली संस्कृती नीट जपली पाहिजे, तरुणांची शक्ती, युक्ती आणि भक्ती याचा योग्य रितीने वापर करायला हवा. शोबाजी न करता निस्वार्थी मनाने आपले समारंभ साजरे केले पाहिजेत.

स्मिता चव्हाण, बिर्ला कॉलेज

त्यात काय वावगं?

हल्ली सण साजरे करायचं एक अनोखं फॅड आलंय. प्रत्येक छोटा मोठा सण अगदी धूमधडाक्यात साजरा होतो. पण तरीही आतून कुठेतरी असं वाटतं की, आमच्या मागच्या पिढीत अशी हौस कोणाला नव्हती आणि हल्ली आम्हा मुलींना अचानक साड्या, पारंपरिक दागिने यांचं आकर्षण वाटू लागलंय. काहींसाठी असेलही ते फक्त सेल्फी पुरतं, पण काहींना खरंच आवडतं. काहीतरी नवीन म्हणून ते करण्यात काहीच वावगं नाही.

सानिका देशपांडे, मुंबई विद्यापीठ

ट्रेंड आजमावण्याचा काळ

कुठलाही सण-समारंभ हा सामूहिक बांधिलकी जोपासली जावी, याकरता असतो. कुठल्याही प्रदेशाचा सांस्कृतिक वारसा हा तेथील सणांद्वारेच जोपासला जातो. त्यात बदलणारा काळ, त्यानुरुप प्रगत होणारं तंत्रज्ञान यांचीही भर पडत असते. सण साजरे करण्याच्या पद्धतीतही फरक पडतो; जो साहजिकच आहे. पण आजच्या भाषेत कुठलाही सण हा फॅशनचे नवे ट्रेंड आजमावण्याचा सुपिक काळ झाला आहे. प्रत्येकाच्या संकल्पना, मतं, दृष्टिकोन हे सगळंच एकसारखं कसं असेल? माझ्या मते, असूही नये. फक्त त्यामागील मूळ उद्देश हा, ज्या पद्धतीने आपण तो साजरा करतोय, त्यातून खरोखरच साधला जातोय का, हे मात्र प्रत्येकाने जरूर पडताळून पाहावं.

चारुश्री वझे, रुईया कॉलेज

सणांचा गोडवा जपण्यासाठी...

सणांमधून प्रत्येक जण स्वतःची संस्कृती, परंपरा यांना जपण्याचा प्रयत्न करत असतो. मग ते प्रयत्न वेशभूषेतून, वागण्या-बोलण्यातून, राहणीमानातून यासर्व गोष्टीतून प्रखरतेने दिसून येतात. मला वाटतं नटणं -थटणं, मिरवणं हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं. शिवाय प्रत्येक सणांमध्ये असणाऱ्या वैशिष्ट्यांमुळे, वेशभूषेमुळे, उत्साह, आनंद आणि तरुणाईचा जोश या सर्वांमुळे सणांचा गोडवा जपला जात आहे. शोबाजी आणि दिखाऊपणा यात जरी तरूणाई रमलेली असली तरी त्यामागची त्यांची संस्कृती-परंपरा जपण्याची भावना ही महत्त्वाची आहे.

भक्ती पालांडे, तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स

संस्कृती जपण्याचा आटोकाट प्रयत्न

आजच्या तरुण पिढीला झगमगत्या दुनियेचं आकर्षण आहे खरं, पण त्यात ती पूर्णपणे वाहवत चालली आहे, असं म्हणता येणार नाही. आजच्या पिढीमध्येच असे अनेक तरुण-तरुणी आहेत, ज्यांना आपल्या संस्कृतीची पूर्णपणे जाणीव आहे आणि ती जपण्याचा ते आटोकाट प्रयत्नही करत आहेत. अनेक लोक स्वतःच्या घरी गुढीपाडव्याचा सण साजरा करून नंतर मिरावणुकांमध्येही सहभागी होतात. जरी आजच्या पिढीचे काही अंशी या सगळ्याकडे दुर्लक्ष होत असले, तरी त्याचा संपूर्ण दोष त्यांनाच देऊन चालणार नाही. केवळ 'आपल्या सणांमधील आपुलकी हरवत चालली आहे', असं म्हणून काही होणार नाही. ती परत आणण्यासाठी घरी गुढी उभारून, घरातील थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेऊन, पारंपरिक पद्धतीने सण साजरा करून आपली संस्कृती जपायला हवी.

वृषाली भामरे, एच. आर कॉलेज

पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड हवी

'पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करणारी पिढी', असा शिक्का बसलेली आजची तरुणाई गेल्या काही वर्षांपासून आपले पारंपरिक सण उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे करत आहेत. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरणात नववर्षाचे मंगलमयी स्वागत आपण करतो. या दिवशी आपण खास पारंपरिक पेहेरावात असल्याने मित्रमंडळींसोबत सेल्फी आणि ग्रुप फोटो तर नेहमीपेक्षा जास्तच काढतो आणि सोशल मीडियावर अपलोड करतो. पण असं करत असताना कोणाच्या मनात दिखावेपणाची भावना असते किंवा असे काही केल्याने उत्सवातली आपुलकी, जिव्हाळा कमी होतो असं म्हणणं जरा अतिशयोक्ती ठरेल. एकविसाव्या शतकात जगताना सोशल मीडियासारख्या गोष्टी आज जगाने स्वीकारलेल्या आहेत. असं असताना पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड मिळत असेल तर त्यात बिघडलं कुठे?

अभिषेक नकाशे, एम. डी. कॉलेज

साज आधुनिकतेचा

कुर्ता-पायजमा, डोक्यावर भरजरी फेटा, मुलींनी नेसलेली नऊवारी साडी, नाकात नथ आणि हाती बुलेटचं हँडल या सर्व गोष्टी तरुणाईला आवडू लागल्या आहेत, ही बाब खरी आहे. पण यामागचं कारण असं की, सांस्कृतिक पणाचा वारसा जपताना नव्या पिढीने त्या सर्व गोष्टींना आपलेपणाचा अर्थात आधुनिकीकरणााचा साज चढवलेला आहे. सेल्फी काढणं, मिरवणुकांमध्ये सहभागी होणं आणि ते सोशल मीडियावर टाकणं हे सगळं नवी पिढी आपल्या परीने साजरा करते. तसंच सण-समारंभ साजरा करताना सामाजिक भान ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या जल्लोषाला काहीच हरकत नसावी, असं माझं मत आहे.

सायली शिंदे, भवन्स कॉलेज

रंग आपुलकीचे

गुडीपाढवा हा अस्सल मराठमोळा सण, ज्याची उत्सुकता आणि मजा जणू वेगळीच असते. अलीकडच्या काळात सणांचाही दर्जा खालावत आहे. सण हे माणासांमधील आपुलकीचं, जिव्हाळ्याचं नातं जिवंत ठेवण्यासाठी साजरे होत होते. पण आता सणांचाही खेळ करण्यात येत आहे. त्यावेळची ती संस्कृती आजच्या पिढीत तीळमात्र दिसत नाही. आपले सण हे आपली शान असतात, याचं तरुण मंडळींनी भान ठेवावं. एकविसाव्या शतकात पाऊल ठेवताना सणांमधील गोडवा आपणच अबाधित ठेवला पाहिजे. आपल्या मौज-मजेसाठी इतरांना त्रास होत नाही ना याची दाखल तर घेतलीच पाहिजे. पूर्वीसारखेच सणांमध्ये तेच आपुलकीचे रंग भरले पाहिजेत.

अभिषेक टुकरूल, विकास रात्र कॉलेज

गाजावाजा करण्याचं खूळ

आज या टेक्नॉलॉजीच्या युगात सण समारंभाच्या दिवशी पारंपरिक पेहरावांचा ट्रेंड सुरू झालाय. त्याच बरोबर गाजावाजा करून सण साजरे करण्याचं खूळ सुद्धा आता सध्या चर्चेत आहे. आपली मराठी संस्कृती ही साध्या आणि सोज्वळ पद्धतीने सण साजरे करणारी होती. पण सध्या दिखाऊपणाच्या नादात सगळं साधेपण आपण हरवून बसलोय. एकत्रित येऊन साजरे करण्यासारखे सण आता गटागटाने साजरे होत आहेत. म्हणजेच यामध्येही स्पर्धा चालू झाली आहे. शोभायात्रेसारख्या कार्यक्रमांसाठी होणारा वायफळ खर्च गरीबांसाठी किंवा समाजाच्या विकासासाठी वापरावा.

तन्वी बर्वे, पाटकर कॉलेज

वारसा जपूयात!

सण-उत्सव म्हटले की, सर्वत्र आनंदी आनंद असतो. पण दुसरीकडे मात्र असं दिसतं की, ही तरुण पिढी फक्त दिखाव्यासाठी नटतात आणि मिरवणुकीत सुद्धा फोटो, सेल्फी आणि शोबाजीच जास्त असते. या शोबाजीमध्येच तरुण पिढी रमू लागली आहे. सण-उत्सव साजरा करण्याचा मूळ उद्देशच नष्ट झाला आहे. उत्सवातील खरी आपुलकी, जिव्हाळा आपण विसरत चाललो आहोत. म्हणूनच आपण सण-उत्सव शोबाजी न करता आपल्या पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत मोठ्या उत्साहाने, आनंदाने साजरे केले पाहिजेत. तरुण पिढीने आपलं वागणं सुधारून योग्य चालीरितींचा स्वीकार केला पाहिजे.

कांचन गावस्कर, एच. आर कॉलेज

काळ बदलला, भावना तीच

आजची तरुणपिढी ही केवळ नटणं, छानछान कपडे घालणं मिरवणुकीत मिरवणं एवढंच करत नाही तर आता ती खऱ्या अर्थाने समाजभिमुख झाली आहे. तरुणींनी केलेले श्रमदान, रक्तदान, समाजसेवा, समाजातली भ्रूणहत्या यावर सभा, पथनाट्य आणि खेड्याला भेट देऊन शेतकऱ्यांशी साधलेला संवाद यांच्या बातम्या असे ही उपक्रम सध्याची तरुण मंडळी राबवतात. काळ बदलला पण भावना तिच आहे.

अथर्व भुसे, दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग

भान विसरु नका

महाराष्ट्रात खूप उत्साहाने गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. पण या गुढीपाडाव्याच्या सणाने सध्या वेगळेच रूप धारण केलंय. नटून-थाटून जाणं, सेल्फी काढणं आणि या सेल्फीच्या नादात आपलं भान विसरणं, हे आजकाल सर्रास पाहायला मिळतं. आज सण म्हणजे नवीन पोशाख करणं, कामाला-कर्तव्याला सुट्टी देऊन आराम करणं अशी बऱ्याच लोकांची धारणा झाली आहे. गुढीपाडवा म्हणजे नव्या वर्षाची सुरुवात असते. नव्या वर्षी आपण नव्याने सुरुवात केला पाहिजे.

सुजय निंबरे, पाटकर कॉलेज

संस्कृतीचा आरसा

उत्सव हे एकत्र येऊन साजरे करायला हवेत. पण सध्या उत्सव सोशल मीडियावर साजरे केले जातात. ज्यामुळे आपण सामाजिक बांधिलकी गमावतोय. तरूणाईने आपल्या सणांचं महत्त्व समजून घ्यायला हवं. ते का साजरे केले जातात? त्यातले बदल समजून घ्यायला हवेत. उत्सव म्हणजे काही रस्त्यावर उतरून ढोल ताशे बडवणं नव्हे. त्या मागचं मूळ शास्त्र कळायला हवं. एक गोष्ट विसरता कामा नये उत्सव हे आपल्या संस्कृतीचा आरसा आहेत.

नागेश सुतार, मुंबई विद्यापीठ

यावेळच्या युवा कट्टात सहभागी झालेलं मुंबई विद्यापीठ आणि संलग्न कॉलेजेस

सेंट झेविअर्स कॉलेज (फोर्ट)
सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्स (फोर्ट)
एच. आर कॉलेज (चर्चगेट)
एल्फिन्स्टन कॉलेज (परळ)
एम. डी. कॉलेज (परळ)
व्हीजेटीआय कॉलेज (माटुंगा)
रुईया कॉलेज (माटुंगा)
गर्व्हमेंट पॉलिटेक्निक (वांद्रे)
साठ्ये कॉलेज (विलेपार्ले)
डहाणूकर कॉलेज (विलेपार्ले)
तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स (अंधेरी)
भवन्स कॉलेज (अंधेरी)
पाटकर कॉलेज (गोरेगाव)
विकास रात्र कॉलेज (विक्रोळी)
जोशी-बेडेकर कॉलेज (ठाणे)
दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (ऐरोली)
बिर्ला कॉलेज (कल्याण)
सीएचएम कॉलेज (उल्हासनगर)
जीवनदीप कॉलेज (गोवेली)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संप’वा हे आता!

$
0
0

डॉक्टर म्हणजे जणू देवच हे तुम्ही-आम्ही नेहमी ऐकत असतो. पण सतत होणाऱ्या मारहाणीमुळे गेल्या आठवड्यात या डॉक्टरांनी संप पुकारला आणि रुग्णांचे प्रचंड हाल झाले. मुळात डॉक्टरांवर कुणी हात उगारण्याचं धाडस करुच कसं शकतं? हे थांबवायला हवं, असं आग्रही मत युवा कट्टावर व्यक्त झालं. डॉक्टरांनीही किंवा इतर अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जबाबदारी ओळखून, संप पुकारुन लोकांना वेठीस धरु नये असं तरुणाईचं म्हणणं आहे. अशा प्रकारच्या संपांमुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास, त्यांची गैरसोय हा मुद्दा प्राधान्याने लक्षात घेऊन सरकारने त्यानुसार उपाययोजना केली पाहिजे असं तरुणाईला वाटतंय.

यावेळच्या युवा कट्टात सहभागी झालेलं मुंबई विद्यापीठ आणि संलग्न कॉलेजेस
• सेंट झेविअर्स कॉलेज (फोर्ट)
•एच. आर कॉलेज (चर्चगेट)
•एम.डी.कॉलेज (परळ)
•व्हीजेटीआय (माटुंगा)
•गुरु नानक कॉलेज (माटुंगा)
•साठ्ये कॉलेज (विलेपार्ले)
•डहाणूकर कॉलेज (विलेपार्ले)
•गर्व्हमेंट पॉलिटेक्निक (वांद्रे)
•तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स (अंधेरी)
•विकास रात्र कॉलेज (विक्रोळी)
•जोशी-बेडेकर कॉलेज (ठाणे)
•विवा कॉलेज (विरार)
•एस. एस जोंधळे पॉलिटेक्निक (आसनगाव)
•डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ फार्मसी (पनवेल)

सुवर्णमध्य साधण्याची गरज
मुळात संप पुकारण्याचा उद्देशच सामान्य माणसांना ओलीस ठेऊन आपल्या मागण्या मान्य करून घेणं असा झालाय. अत्यावश्यक सेवांच्या बाबतीत संप पुकारला की, त्यामुळे लोकांना त्रास होणार मग जनता पेटून उठणार आणि सरकार आपल्या मागण्या मान्य करणार असं समीकरण झालंय. म्हणजे कुठेतरी परिस्थितीचा गैरफायदा घेतला जातो. दुसऱ्या बाजूचा विचार केला तर संप पुकारणाऱ्यांची बाजू जरी बरोबर असली तरी मार्ग चुकतोय. आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी संप हेच अस्त्र न वापरता इतरही मार्ग शोधावेत. सरकारनेही अशा तक्रारी आणि मागण्या यांची योग्य वेळी दाखल घेतली तर प्रकरण चिघळणार नाही. तसंच सेवा पुरवणाऱ्यांना जनतेनेही सन्मानाने वागवायला हवं. इतर पर्यायी संघटनांनी संपाकडे स्पर्धा किंवा संधी म्हणून न पाहता सामान्य नागरिकांना जास्तीत जास्त सहकार्य केलं पाहिजे. इतर कशाहीपेक्षा रुग्ण आणि त्यांचा जीव महत्त्वाचा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. थोडक्यात या बाबतीत सर्वांचेच प्रबोधन व्हावं आणि सुवर्णमध्य साधला जावा असं मला वाटतं.
चिन्मयी वझे, व्हीजेटीआय

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरच
गेल्याच आठवड्यात घडलेल्या डॉक्टरांच्या मारहाणीच्या प्रकारावरून पुन्हा एकदा डॉक्टरांनी स्वतःच्या सुरक्षेचा प्रश्न उचलून धरला. पण अशावेळेला ते स्वतः मात्र स्वतःच कर्तव्य विसरून गेले, कोणास ठाऊक त्या काळात किती निरपराध जीव गेले असतील. त्या सर्वांची जबाबदारी कोण घेणार? समाजातील कोणत्याही घटकावर जर अन्याय होत असेल तर त्यावर बंद किंवा संप हा उपाय असूच शकत नाही. डॉक्टर हा समाजातील अगदीच महत्त्वाचा घटक असल्याने त्यांच्या संपाने समाजावर खूप मोठा वाईट परिणाम झाला. असं असलं तरीही एका बाजूने विचार करता, डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा ही तेवढाच महत्त्वाचा आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सध्याचे डॉक्टरांवरील हल्ल्यांचे वाढलेले प्रमाण अगदी चिंतेची बाब आहे. त्यामुळे हे हल्ले थांबवण्यासाठी सरकारने लवकरात लवकर ठोस पावलं उचलायला हवी.
निखिल नार्वेकर, साठ्ये कॉलेज

...तर एकमत होणं अशक्य
सर्व प्रथम डॉक्टरांना मारहाण, त्यांनी पुकारलेला संप आणि रुग्णांच्या नातेवाइकांनी केलेली दमदाटी या सर्व प्रकारामुळे आज त्याची झळ सर्वसामान्यांना भोगावी लागत आहे. आपण जर एकमेकांच्या चुका काढण्यात वेळ घालवला तर समाजात एकमत होणं अशक्य होईल आणि जर एकमत नसेल तर ही परिस्थिती अधिकाधिक चिघळणार. डॉक्टर नेहमीच रुग्णांना चांगल्यात चांगली सेवा पुरवण्याचा प्रयत्न करतात. पण जेव्हा त्यांच्याकडून हलगर्जीपणा होतो तेव्हा मारहाण, जीव घेणं हा त्यावरचा उपाय होऊ शकत नाही. डॉक्टरांनी रुग्णांना अत्यावश्यक सेवा पुवरणं आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी संयम व विश्वास ठेवणं गरजेचं आहे. रिक्षा-टॅक्सी, बस-सफाई कामगार यांच्या बाबतीतही असंच वाटतं की कधी प्रशासन मुजोरपणा करतं तर कधी रिक्षा-टॅक्सी चालक बेजबाबदारपणे व्यवहार करतात. असे काही प्रकार घडू नयेत म्हणून प्रशासनानेही कठोर पावलं उचलली पाहिजेत आणि प्रश्न सोडवले पाहिजेत.
योगेश जगदाळे, गर्व्हमेंट पॉलिटेक्निक

मार्ग अयोग्यच
डॉक्टरांनी जो संप केला होता तो त्यांनी त्यांच्या सुरक्षतेवर बोट दाखवत केला होता. त्यांना हे असं करण्याची गरज का भासली. डॉक्टरांना सुरक्षा देणं ही सरकारची जबाबदारी आहे. जे लोकांचे प्राण वाचवतात त्यांनाच आज आपला प्राण मुठीत धरून काम करावं लागतंय. पण एकीकडे दिवसेंदिवस डॉक्टरांची प्रतिमा मलिन होत चाललीय. गैरव्यवहार, गैरवर्तवणुक यात आज अनेक डॉक्टर अडकले आहेत. एकंदरीत डॉक्टरांना तर सुरक्षा दिली पाहिजे, पण त्यांनीही सुरक्षितता मिळवण्यासाठी जो मार्ग अवलंबला तो अगदी अयोग्य होता असं मला वाटतं. या अशा संपामुळे डॉक्टरांची प्रतिमा अधिक मलीन होते. अशा या आपल्या मागण्या मान्य करवून घेण्यासाठी सर्वसामान्य लोकांना वेठीस धरणाऱ्या डॉक्टरांना निलंबित केलं पाहिजे. तसंच यापुढे लोकांनीही डॉक्टरांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे. जो लोकांचे प्राण वाचवतात त्यांनाच मारहाण करणं कधीच क्षम्य नाही, हे लोकांनी जाणलं पाहिजे.
कार्तिक जाधव, गुरु नानक कॉलेज

सामंजस्याने परिस्थिती हाताळावी
अत्यावश्यक यंत्रणांच्या संपामध्ये भरडला जातो तो सर्वसामान्यच. या वेळी झालेल्या डॉक्टरांच्या संपात राज्यभरातून जवळपास ३७७ रुग्ण दगावल्याचा अंदाज आहे. कोणाच्यातरी हट्टापायी सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही. मुळातच अत्यावश्यक सेवांमध्ये मोडणाऱ्या यंत्रणांनी काही समस्या असल्यास थेट संपावर न जाता इतर पर्यायाचा विचार करायला हवा. एकंदरीत या सर्व प्रकाराला शासकीय रुग्णालयातील एकूणच दुरावस्था आणि डॉक्टर- रुग्णांचे नातेवाईक यांच्यातील संवादाचा अभाव या गोष्टी कारणीभूत आहेत. गेल्या काही वर्षात वैद्यकीय सेवेचे झालेले बाजारीकरण पाहता सर्वसामान्यांच्या मनात एकूणच यंत्रणेबद्दल विश्वासार्ह्यता कमी झालीय. यातूनच अशा प्रकारचे हल्ले होतात. त्यामुळे सामंजस्याने ही परिस्थिती हाताळणं गरजेचं आहे.
अभिषेक नकाशे, एम.डी.कॉलेज

डॉक्टरांचं काय चुकलं?
डॉक्टरांचं आयुष्य किती खडतर आहे हे वेगळ्याने मांडायची गरज नाही. अशिक्षित लोकांसोबत भावनेच्या भरात सुशिक्षित लोकही चुकीची पाऊले उचलतात. एखाद्या वेळेस तातडीने रुग्ण आला तर आपल्या परिवाराचा विचार न करता सगळं सोडून दवाखान्यात येतात, हे आपल्या लक्षात का येत नाही? डॉक्टर आपल्या बाजूने पूर्ण प्रयत्न करतात. पण जर त्यांना अपयश आलं तर अशी मारहाण करणं आणि हे त्यांनी सहन करणं हे कितपत योग्य आहे? त्याविरुद्ध डॉक्टरांनी संप केला ते पण आपली बाजू मांडण्यासाठी तर काय चुकलं! या सगळ्या गोष्टींचा विचार करून लवकरात लवकर ठोस पावलं उचलण्याची गरज आहे.
धनश्री मांडके, डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ फार्मसी

सामोपचाराने प्रश्न सोडवावेत
डॉक्टर हा सामाजिक जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे. पण गेल्या काही दिवसांत डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणींच्या घटनांत वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टरांनी संप पुकारला होता. डॉक्टरांना मारहाण करणं हे अत्यंत चुकीचं आहे. पण मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टरांनी संप पुकारणं हे सुद्धा अयोग्यच आहे. अनेक अत्यावश्यक सेवांच्या बाबतीतसुद्धा या गोष्टी अनुभवायला मिळतात. हल्ली अनेक ठिकाणी संपाचा वापर शस्त्र म्हणून केला जात आहे. मुळात संपाच्या वेळी सर्वात जास्त त्रास हा सर्वसामान्य नागरिकांना होतो. या गोष्टी निश्चितच टाळता येऊ शकतात. यासाठी सामान्य नागरिक आणि अत्यावश्यक सेवा यात उत्तम संबंध प्रस्थापित व्हायला हवेत. तसंच अशा घटना घडल्यास मारहाण किंवा संप न करता सामोपचाराने आणि एकत्र येऊन त्यातून मार्ग काढायला हवेत. नियमांचे योग्य प्रकारे पालन झालंच पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे.
वैभव पुरव, डहाणूकर कॉलेज

तेही सर्वसामान्यच!
कुठलीही कार्यरत संघटना संपावर गेली की, त्याची झळ सर्व सामान्य माणसाला बसल्याशिवाय राहत नाही. संपांमुळे पूर्ण समतोलच बिघडतो. प्रवासाचे, वैद्यकीय मदतीचे, व्यवाहारांचे सगळ्यांचेच वांदे होतात. मग जी संघटना बंड पुकारते त्यांच्या विषयी आपण नाराजी व्यक्त करतो आणि टिकाही करतो. पण आपण कुठेतरी हेही विसरतो की, जे संपावर जातात तेही सर्व सामान्य माणूसच आहेत. आपल्याप्रमाणे त्यांच्याही समस्या असतात. परिस्थिती त्यांच्या जीवावर बेतत असेल तर त्यांना अशी पाऊलं ऊचलावी लागतात. हे सगळं टाळण्यात सरकार मोठं योगदान करू शकतं. प्रत्येक संघटनेला योग्य तो मोबदला आणि आवश्यक सुरक्षा दिली तर असे प्रसंग उद्भवणार नाही.
मधुरा गावडे, डहाणूकर कॉलेज

संप- एकमेव मार्ग नव्हे
डॉक्टरांवर गेल्या काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. त्या विरोधात संपूर्ण राज्यभर संप पुकारण्यात आला. या संपामुळे खूप रूग्णांचे हाल झाले. एखाद्या रूग्णाचे हाल होणं फार चुकीचं आहे. डॉक्टरांवर बऱ्याच वेळा हल्ला होतो. पण नेमकं कोणाचं चुकतं याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. प्रसाशनसुद्धा या हल्ल्याबद्दल तेवढंच जबाबदार आहे. शासकीय यंत्रणा कमी पडत असल्याचं येथे समजतं. नातेवाईकांनीसुद्धा थोडा विचार करायला हवा. डॉक्टरांवर हल्ला झाला ते अयोग्यच आहे. पण त्याची शिक्षा इतर रूग्णास का? अशा वेळेस सरकार मात्र आपली राजकीय पोळी भाजतंय. पुन्हा आश्वासन देण्यात आलंय की, सुरक्षा यंत्राणांमध्ये वाढ करू. पण हे आश्वासन कधीपर्यंत पूर्ण होईल याची काही शाश्वती नाही.
अनिरुद्ध गायकवाड, सेंट झेविअर्स कॉलेज

दोषींवर कारवाई व्हावी
अजारी पडल्यावर देवाच्या आधी आपण ज्याला शरण जातो तो म्हणजे डॉक्टर. पण आज डॉक्टरांवरील होणारे हल्ले ही लाजीरवाणीबाब आहे. सरकारने त्वरित पावलं उचलून दोषींवर कारवाई करावी आणि डॉक्टरांना आवश्यक ती सुरक्षा पुरवावी. जेणेकरुन अशा घटना घडणार नाहीत आणि डॉक्टरांनाही सुरक्षेचं वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. कोणताही डॉक्टर रुग्ण बरा व्हावा, म्हणून शंभर टक्के प्रयत्न करत असतो. पण कधी-कधी रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत नाही आणि तो दगावतो तेव्हा डॉक्टरांना दोष देणं, हे चुकीचं आहे. म्हणून रुग्णांच्या नातेवाईकांनी आपली मानसिकता बदलायला हवी आणि डॉक्टरांना सहकार्य करण्याची भूमिका स्वीकारावी.
आकाश पाखरे, विकास रात्र कॉलेज

डॉक्टर अविभाज्य घटकच
गेल्या आठवड्यातच वडिलांच्या ओळखीने हॉस्पिटलमध्ये नोकरीची संधी मिळाली. त्याप्रमाणे मी शिक्षणासोबत नोकरी करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी कामावर हजर झालो. तिथं गेल्यावर कळलं की, डॉक्टरांचा संप आहे. तिथं दोन-चार जणांना विचारल्यावर समजलं की, डॉक्टरांवर रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केली. कारण डॉक्टरांनी रोग्णाच्या जीवाची योग्य ती दखल घेतली नाही, त्यामुळे त्याचा जीव गेला. मारहाणीमुळे डॉक्टरांनी संप पुकारणं यात त्यांचं काही चुकलं मुळीच नाही. तर डॉक्टरांनी जे केलं त्यात काही गैर नाही, असं मला वाटतं. सर्वप्रथम डॉक्टरांवर हल्ला व्हायला नको होता. आपण डॉक्टरांना देव समजतो. त्यात मी तर जास्तच कारण पाच वर्षांपूर्वी जेव्हा माझा अपघात झाला होता तेव्हा मला डॉक्टरांनीचा मृत्यूच्या दारातून आणलं. रुग्णांनी डॉक्टरांकडून अति अपेक्षा ठेवू नयेत. डॉक्टरांना आपण देव समजत असलो तरी समजणं आणि असणं यात फरक असतोच. डॉक्टर हे आपल्या प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक असतात. त्यांच्यावर अशा मारहाणीचे प्रकार होणं चांगलं नाही.
अभिषेक टुकरूल, विकास रात्र कॉलेज

संपाचं नवं शस्त्र
सामान्य नागरिकांच्या काय गरजा आहेत? हे जाणून न घेता कोणतीही संघटना आपल्या गरजा पूर्ण करून घेण्यासाठी संपाचं शस्त्र बाहेर काढतं. पूर्वी अतिशय महत्त्वाच्या कारणासाठी होणारे संप आता कोणत्याही किरकोळ गोष्टीसाठी होऊ लागलेत, हे मोठं दुर्देवच. डॉक्टरांच्या संपात किमान २०० लोकांचा उपचार अभावी मृत्यू झाला, अशी माहिती मिळत आहे. या २०० लोकांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे, संपकारी डॉक्टर या प्रश्नाचं उत्तर देतील का? का सरकारने डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू नये? मी असं म्हणत नाही की, पूर्णपणे डॉक्टर चुकीचे आहेत. पण डॉक्टर लोकांच्या मनातील आपला विश्वास गमावत चाललेत. सरकारनेसुद्धा अशा संपाची वेळीच दखल घेऊन त्वरित योग्य ती कारवाई करावी. समस्या सामोपचाराने सोडवण्याचा प्रयत्न करावा. याच बरोबर चुकीची माहिती पसरवणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करावी आणि शांततेला बाधक ठरणाऱ्या गोष्टीवर नियंत्रणात आणाव्यात.
अंकुश चुरी, मुंबई विद्यापीठ

संप डॉक्टरांचा, हाल रुग्णांचे
गेल्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांच्या बेमुदत सामुहिक संपामुळे सार्वजनिक रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग सलग चौथ्या दिवशी बंद राहिला. त्यामुळे अनेक रुग्णांना उपचारांकरिता नाईलाजाने खासगी रुग्णालयात जावे लागले. व्यवस्थेतील दोषाचा परिणाम सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे, ही सर्वस्वी जबाबदारी तेथील स्थानिक पोलिसांची आहे. सरकारला हे सांभाळता येत नसेल तर त्यांनी कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षक प्रत्येक रुग्णालयात द्यावे जेणेकरून डॉक्टरांना सुरक्षित वाटेल.
रमण जगताप, मुंबई विद्यापीठ

माणूसकी हरवतेय का?
मागचा आठवडा गाजला तो डॉक्टरांच्या संपामुळे, त्यातच सामान्यांच्या गैरसोयीच्या बातम्यांमुळे, त्याचं कारण म्हणजे डॉक्टरांना होणारी मारहाण आणि त्या सगळ्याचा निषेध म्हणून सर्व डॉक्टर संपावर गेले. पण यात भरडला तो सामान्य माणूस! उपचाराभावी खूप लोकांना प्राण गमवावे लागले, अशी माहिती मिळतेय. हे डॉक्टरांच्या बाबतीत नाही तर इतर आवश्यक सेवांबाबतही घडतं. पण या सगळ्यात सामान्य माणूस त्याची झळ सोसतो हे लक्षात कसं येत नाही. हा सगळा प्रकार संतापजनक आहे, असं मला वाटतं. अशा सगळ्या परिस्थितीत सामान्य माणसं वेठीस धरली जातात. हे या लोकांच्या 'गावीही नसतं'. असं वाटतं की, या सगळ्यांमधली माणूसकी हरवतेय का? मला वाटतं की, यासागळ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी. जेणेकरून सामान्यांचे हाल होणं थांबेल.
वैष्णवी सुर्वे, जोशी-बेडेकर कॉलेज

डॉक्टरांनी कर्तव्य विसरु नये
मागचा आठवडा गाजला तो डॉक्टरांच्या संपामुळे. याच संपामुळे देशभर सर्वत्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. खरं पाहिलं तर हल्ला हा एका रुग्णाच्या नातेवाईकांकडून झाला. पण जे निरपराध रुग्ण उपचारा अभावी दगावले त्याला जबाबदार कोण? डॉक्टरांवर हल्ले होऊ नये, हे आमचंही मत आहे. जर डॉक्टर उपचारात हलगर्जीपणा करत असतील तर त्यांची वरिष्ठांकडे तक्रार करायला हवी होती. कायद्याचा वचक न बाळगता असे हल्ले करणं अशोभनीय आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनीही आपली मानसिकता बदलावी. उपचारांमध्ये कमतरता जाणवल्यास कायदेशीर मार्ग आवलंबवावा पण असे हल्ले करु नये. डॉक्टरांनीपण आपलं कर्तव्य विसरु नये. पुन्हा कधी असे संप करु नका आणि सामान्य जनतेला वेठीस धरु नका.
किशोर धानके, एस. एस जोंधळे पॉलिटेक्निक

अशोभनीय प्रकार
डॉक्टरांनी त्यांचं 'प्राथमिक कर्तव्य' बाजूला ठेऊन संप पुकारणं हे त्यांच्या कार्याला शोभत नाही. विचार करण्याजोगी गोष्ट आहे, संप पुकारल्यानंतर कितीतरी आजारी व्यक्ती, गरोदर स्त्रिया अत्यंत नाजूक अवस्थेत असतील तर त्यांच्या जीवाच काय झाल असेल? या प्रकरणात चूक कोणाचीही असो पण भोगावं त्या निष्पाप रुग्णांना लागलं. हक्कांसाठी लढत असताना आपण कोणाचा तरी जीव टांगणीला टाकला नाही ना? याचा विचार व्हायला हवा. तसंच रुग्णांच्या नातेवाइकांनी समजून घेऊन जर वागलं तर पुढील सर्व धोका, समस्या टाळता येतील.
प्रणित समजीसकर, गर्व्हमेंट पॉलिटेक्निक

चूक कोणाची?
कॉलेजांमध्ये प्रवेश घेणं असो किंवा मग राशनच्या दुकानातील अरेरावी असो..जिथे शाशकीय काम येतं तिथं सामान्य माणसाला मन:स्ताप सहन करावाच लागतो. सामान्य जनतेने डॉक्टरांना केलेली मारहाण आणि त्यावर डॉक्टरांनी पुकारलेला संप ही खरतर एक गंभीर बाब आहे. पण मला वाटतं यात दोघांची ही चूक नाही. या सर्व परिस्थितीत खरं तर आपल्या वैद्यकीय व्यवस्थेची आणि यंत्रणेची चूक आहे. यावर उपाय म्हणजे रुग्णांच्या गर्दीनुसार डॉक्टरांची संख्या वाढवावी. योग्य त्या आणि मुबलक प्रमाणात सोयी-सुविधा पुरवाव्यात, व्यवहारातील ढसाळपणा, भ्रष्टाचार पूर्णतः नष्ट करावा.
भक्ती पालांडे, तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स

अधिक सक्षम यंत्रणा असावी
डॉक्टरांवर झालेली मारहाण आणि त्यामुळे त्यांनी पुकारलेला संप या सगळ्यामध्ये चूक कोणाचीही असो सामान्य माणूसच भरडला जातो. म्हणूनच नागरिकांनीसुद्धा कोणत्याही कायद्याचं उल्लंघन करू नये. कारण यासर्वांचे परिणाम त्यांनाच भोगावे लागतात. रिक्षा-बस- टॅक्सी चालकांचा संप असो किंवा सफाई कर्मचाऱ्यांचा संप असो झळ ही सर्वसामान्य नागरिकांनाच पोहोचते. यासाठी सरकारनेदेखील ठोस पावलं उचलायला हवीत. प्रशासन यंत्रणा सक्षम करायला हवी.
कांचन गावस्कर, एच. आर कॉलेज

चुक शोधण्यापेक्षा माणुसकी शोधा
दरम्यानच्या काळात घडलेल्या सर्व प्रकाराचा आपण नीट विचार केला तर दोघांचीही चुकी आहे असं म्हणता येईल. काही व्यक्ती आपल्या राजकीय पदाच्या जोरावर तर काहीजण पैशांच्या जोरावर डॉक्टरांवर दादागिरी करून डॉक्टरांवर मानसिक दबाव आणतात. तसंच काहीजण डॉक्टरांवर हातही उगारतात, हे मला अत्यंत चुकीचं वाटतं. त्यामुळे अशा या डॉक्टरांच्या संपावर जाण्याच्या गोष्टीला अनेकदा अशा दादागिरी करणाऱ्या व्यक्तीही जबाबदार ठरतात. पण डॉक्टरांनी ही आपली जबाबदारी पूर्ण करणं आवश्यक आहे आणि थोडी फार माणुसकी जपणं आवश्यक आहे.
अक्षय अनभवणे, विवा कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपेक्षाभंग

$
0
0

भारतरत्न सचिन तेंडुलकर असो, वा ज्येष्ठ अभिनेत्री रेखा...तुमच्या क्षेत्रातील कामगिरीचा आम्हाला अभिमानच आहे. पण संसदेत खासदार म्हणून काम करताना मात्र आमचा अपेक्षाभंगच झाला आहे. आमच्या मनात असलेल्या तुमच्या प्रतिमेलाही यामुळे अनपेक्षितपणे तडा जातोय. त्यामुळे खासदारकीचा भार पेलवत नसेल, तर ती जबाबदारी घेऊ नका, असा सल्लाच तरुणाईने युवा कट्टाच्या व्यासपीठावरुन राज्यसभेतील या ताऱ्यांना दिला आहे. कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रातून राष्ट्रपतींकडून नियुक्त होणाऱ्या अशा अनेक मान्यवरांचा यापूर्वीचा रेकॉर्डही यापेक्षा वेगळा नाही. त्यामुळे यांना खासदारकीचा मान देण्याचा पुनर्विचार व्हावा, असं मत अनेक प्रतिक्रियांमधून व्यक्त झालं.

यावेळच्या युवा कट्टात सहभागी झालेलं मुंबई विद्यापीठ आणि संलग्न कॉलेजेस
• सेंट झेविअर्स कॉलेज (फोर्ट)
•एच. आर कॉलेज (चर्चगेट)
•एम.डी.कॉलेज (परळ)
• व्हीजेटीआय कॉलेज (माटुंगा)
•गुरु नानक कॉलेज (माटुंगा)
•गर्व्हमेंट पॉलिटेक्निक कॉलेज (वांद्रे)
•नॅशनल कॉलेज (वांद्रे)
•चेतना कॉलेज (वांद्रे)
•साठ्ये कॉलेज (विलेपार्ले)
•डहाणूकर कॉलेज (विलेपार्ले)
•भवन्स कॉलेज (अंधेरी)
•पाटकर कॉलेज (गोरेगाव)
•विवेक कॉलेज (गोरेगाव)
•एन. एल. कॉलेज (मालाड)
•शैलेंद्र कॉलेज (दहिसर)
•विवा कॉलेज (विरार)
•विकास रात्र कॉलेज (विक्रोळी)
•झुनझुनवाला कॉलेज (घाटकोपर)
•एस. एस. जोंधळे पॉलिटेक्निक (आसनगाव)
•भीमराव टी. प्रधान कॉलेज (शहापूर)
•जोशी-बेडेकर कॉलेज (ठाणे)

समस्यांवर साध्य भाष्यही नाही!
कला, क्रीडा हे आताच्या या काळात फार मोलाचं साधन झालंय. त्या व्यक्ती स्वत:च्या क्षेत्रात योग्य आहेत, पण त्यांना सामान्य जनतेचे प्रश्न कितपत कळले? अहो, ते सोडा जनतेला ज्या काही समस्या भेडसावतात त्यावर साधं कधी भाष्य करुन जनतेला मदत केलेली मला तरी आठवत नाही. पण तरीही याच नामांकित व्यक्तींना डोक्यावर घेऊन मिरवणारे आपणच ना? जर अशा महत्त्वाच्या गादीवर विराजमान करायचं असेल तर 'नाम' फाऊंडेशनसारखं चांगलं कार्य करणारे, दुष्काळग्रस्त गावासाठी धावून येणारे, फक्त आश्वासन न देता स्वतःहून समाजसेवेच्या कार्यात स्वतःला सोपवून देणारे असे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांना का म्हणून राज्यसभेवर विराजमान करत नाही? अशा व्यक्तींना सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यसभेवर विराजमान तरी आपण करु शकतो. याचा थोडा तरी विचार तुम्ही करुन पाहा.
प्रिया धाडवे, विवा कॉलेज

पदरी अपेक्षांचा भंगच
संगीत, कला, चित्रपट अशा विविध क्षेत्रात नाव कमावलेल्या लोकप्रिय दिग्गजांचाही राज्यसभेच्या सदस्यांमध्ये समावेश होतो. मात्र, हेच लोकांचे लाडके दिग्गज, खासदारकीची शपथ घेतल्यानंतर मात्र खूप कमी वेळा राज्यसभेत हजेरी लावतात. त्यामुळे लोकांना या खासदारांकडून असलेल्या अपेक्षांचा भंग होतो. सरकारने दिलेली ही संधी न दवडता, या खासदारांनी आपल्यावर असलेल्या जबाबदारीचे भान ठेवून, जास्तीत-जास्त समाज उपयुक्त कामं करायला हवीत. लोकांच्या हितासाठी मिळालेल्या या संधीचा त्यांनी फायदा घ्यायला हवा. आपण राज्यसभेवर नियुक्त केलेले खासदार आहोत, याच गोष्टीचा जर त्यांना विसर पडला असेल, तर सरकारने त्यांची खासदारकी रद्द करावी.
सौरभ शेलार, शैलेंद्र कॉलेज

असमर्थनीय बाबच!
सन्मान म्हणून जरी त्यांना संसदेचं सदस्यत्व बहाल करण्यात आलेलं असलं तरी त्यांनी खासदार म्हणून जनतेची मतं आणि लोकांच्या व्यथा समर्थपणे मांडल्या पाहिजेत असं मला वाटतं. त्यांच्याकडून खासदारांसारख्या अपेक्षा आपण ठेवाव्या का? असा प्रश्न पडणं सहाजिक आहे. तर माझ्या मते याच उत्तर, अशा अपेक्षा ठेवण्यात काहीच गैर नाही. या सदस्यांनी सामान्य माणसाचे जरी प्रतिनिधीत्व नाही केले तरी त्यांनी त्यांच्या क्षेत्रात वावरणाऱ्या माणसांचे प्रतिनिधीत्व केलंच पाहिजे. दुर्दैवाने आज खासदारांवर जो खर्च सरकार करते त्या योग्यतेचे काम आपले निवडून आलेले खासदार नक्कीच करत नाहीत. तेव्हा अशा सन्मानित व्यक्ती असलेल्या पण फक्त नामधारी खासदार असलेल्या सदस्यांवर सरकारने एवढा खर्च करणं फारसं समर्थनीय नाही.
ओमकार जोशी, व्हीजेटीआय

पदाचा मान राखा
संगीत, कला, क्रीडा, चित्रपट, नृत्य इ. क्षेत्रातील विविध मान्यवरांना राष्ट्रपतींनी राज्यसभेत खासदार म्हणून नियुक्त केलं. पण त्यांच्या ज्ञानाचा सदनाला कोणत्याही प्रकारचा उपयोग झालेला दिसून येत नाही. या उलट त्यांच्या गैरहजेरीचे विविध आकडे समोर येतात. या मंडळींकडून इतर लोकप्रतिनिधींप्रमाणे अपेक्षा नाहीत. पण निदान त्यांनी त्यांच्या क्षेत्रातील प्रश्न मांडावेत एवढी साधी अपेक्षा आहे. संसदेला विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या ज्ञानाचा उपयोग व्हावा एवढा साधा मुद्दा आहे. जनता या विविध क्षेत्रातील दिग्गजांकडे आदर्श म्हणून पाहत असते, त्यांना केंद्रस्थानी ठेवत असते, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवं. राष्ट्रपतींनी दिलेल्या जबाबदारीचं भान ठेवलं पाहिजे आणि ती योग्य पद्धतीने पार पाडायला हवी, तर त्या पदाचा योग्य तो मान राखला जाईल.
हर्षदा नारकर, भवन्स कॉलेज

उपेक्षितांचे प्रश्न सोडवावेत
कला, क्रीडा, अभिनय आणि इतर क्षेत्रात अत्यंत मानाचं स्थान प्राप्त केलेल्या दिग्गजांनी सामान्य जनतेच्या मनावर त्यांनी आधीच राज्य केलेलंय. पण त्यांना लोकप्रतिनिधींच्या माळेत बसवताना सामान्य माणसांच्या प्रश्नांची त्यांना असलेली जाणीव, त्यांनी केलेले समाजकार्य यांचाही विचार केला जावा. तसंच असे दिग्गज जेव्हा लोकप्रतिनिधी होतात तेव्हा त्यांच्याकडून हीसुद्धा अपेक्षा असते की त्यांनी त्यांच्या क्षेत्रातील उणिवांबद्दल आवाज उठवावा. काही कलाकारांमध्ये तर कला उत्तम असते पण त्यांना संधी मिळत नाही किंवा मिळालीच तर आर्थिक पाठबळ मिळत नाही, त्यावेळी अशा उपेक्षित कलाकारांसाठी काही योजना करता येईल का हे पाहिलं पाहिजे.
चिन्मयी वझे, व्हीजेटीआय कॉलेज

जबाबदाऱ्याही 'खास'च
लोकप्रतिनिधी म्हणजे एखाद्याला दिलेला सर्वोच्य मान आहे. हे पद कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील असामान्य कामगिरी बजवणाऱ्या व्यक्तीला बहाल केला जातो. त्यांनी आपाआपल्या क्षेत्रातील विविध समस्या जाणून त्यात अजून कशा प्रकारे सुधारणा करता येईल यासाठी त्यांची निवड केली जाते. पण कुठेतरी या विशेष लोकप्रतिनिधींना आपल्या जबाबदारींचा विसर पडलाय. सर्व खासदारांकडून कमी अपेक्षा आहेत. पण कमी असल्या म्हणून त्या नाकारणं किंवा त्याच्यावर लक्ष न देणं हे अयोग्य आहे. कमी असल्या तरी त्या महत्त्वाच्या आणि गरजेच्या आहेत. म्हणून अशा खास प्रतिनिधींनी आपल्या क्षेत्रातील कामासमवेत आपल्या खास जबाबदाऱ्यासुद्धा पार पाडायला हव्या.
मानसी चव्हाण, एन. एल. कॉलेज

चर्चेत सहभागी तरी व्हा
कला, साहित्य, विज्ञान, सामाजिक शास्त्र अशा विविध क्षेत्रातील १२ सदस्यांचे राज्यसभेचे खासदार म्हणून नामांकन करण्यात येते. क्रिकेट या लोकप्रिय खेळाचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि आपल्या कारकीर्दीत शांत, संयमी खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या सचिन तेंडुलकर. भारतीय क्रीडा विश्वाला सचिनच्या या दुसऱ्या इनिग्स कडूनही खूप मोठ्या अपेक्षा होत्या. तसंच क्रीडा क्षेत्रातील विविध प्रश्न, समस्या यांच्यावर संसदेत चर्चा होणं अपेक्षित होतं मात्र तीन वर्षं उलटली तरीही या गोष्टी होताना दिसत नाहीत, ही गंभीर बाब आहे. सचिन तेंडुलकरने खासदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत दोन गावं दत्तक घेतली आहेत. त्या दोन गावांचा विकास त्याने सुरु केला असला तरीही संसदेत उपस्थित राहून चर्चेत सहभागी होणं गरजेचं आहे.
वसंत पाटील, भीमराव टी. प्रधान कॉलेज

मत मांडण्यासाठी तरी उपस्थित राहावं
राष्ट्रपतींनी अशा 'खास'दारांवर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्या पदासाठी नेमणूक करण्यामागे राष्ट्रपतींनी योग्य तोच विचार केला आहे. भारतीय राज्यघटनेनुसार संसदेत कुणीही असामान्य किंवा सामान्य नाही. त्यामुळे दुसऱ्या सदस्यांप्रमाणेच यांची गणना होणं आवश्यक आहे. दुसऱ्या खासदारांसारख्या अपेक्षा करणं चुकीचं ठरणार नाही. पण ते त्या अपेक्षांवर कितपत खरे उतरतील ही शंका वाटते. त्या कलाकारांनी किंवा खेळाडूंनी आपल्या क्षेत्रात उच्चतम कामगिरी केलेलीच आहे. फक्त एवढंच की, त्यांनी त्यांची मतं तिथं उपस्थित राहून मांडायला हवीत.
प्रणित समजीसकर, गर्व्हमेंट पॉलिटेक्निक कॉलेज

वेगळी ओळख मिळेल
कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रात विशिष्ट कामगिरी करणाऱ्यांना आपण लोकप्रतिनिधित्व दिलं. असं नाही की यांना राजकारण्यांच्या माळेत बसवणं चुकीचं आहे. पण त्यांच्या तेथील कामगिरीवरसुद्धा लक्ष असायला हवं. आपापल्या क्षेत्रात होणारे वेगळे प्रयोग, तसंच त्यात सुधारणा करण्यासाठी त्यांनी नेहमीच तत्पर असणं गरजेचं आहे. वेगळ्या जबाबदारीची जाणीव आणि त्याचं भान त्यांनी राखायला हवं. खासदार म्हणून त्यांनी एक वेगळी छाप सामान्य नागरिकांच्या मनावर उमटवायला हवी. ते राजकारणी नाहीत पण आपण एक लोकप्रतिनिधी आहोत याची दक्षता घेत लोकांना आपली वेगळी ओळख करून द्यावी.
श्रुती कदम, विवेक कॉलेज

वेळ, आवड असावी
कला, क्रीडा, समाजसेवा या क्षेत्रातील विशेष अभ्यास असलेल्या व्यक्तींची राज्यसभेत निवड केली जाते. या मागील उद्देश हाच की, संगीत, कला, शास्त्र या क्षेत्रातील व्यक्तींचे प्रतिनिधी संसदेत त्यांचे विचार आणि त्या क्षेत्रातील विकासावर लक्ष द्यावं. पण चित्र मात्र उलटंच आहे. स्टार्सचा संसदेत सहभाग खूपच कमी दिसून येतो. कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील व्यक्तींचा संसदेत समावेश असावा, पण अशांचा असावा ज्यांना दोन्हीकडे देण्यासाठी वेळ आणि आवडही आहे.
अजय कारवार, व्हीजेटीआय कॉलेज

प्रगतीसाठी उपस्थिती आवश्यक
आजवर अनेक मान्यवरांनी राज्यसभेचं सदस्यत्व भूषवलं. पण ज्यांच्या अनुपस्थितीवर प्रश्न निर्माण व्हावे असे हे पहिलेच. क्रिकेटच्या स्कोरबोर्डवर अनेकदा विक्रमी स्कोर देणाऱ्या मास्टरब्लास्टरचा संसदेच्या उपस्थितीचा स्कोर पाच वर्षात फक्त आठ टक्के असा निराशाजनक आहे. संसदेचे सदस्यत्व मिळणं हा जसा मान असतो तसंच या मानाबरोबर येणारी जबाबदारी पार पाडणं हे कर्तव्य असतं. या मान्यवरांना आपल्या क्षेत्राबद्दल असलेलं ज्ञान आणि अनुभव वापरून त्या क्षेत्राच्या प्रगतीसाठी काही योजना आखता येऊ शकतात. देशाच्या निर्णय-प्रक्रियेत सहभागी होता येतं. या संधीचा उपयोग करून आपल्या ज्ञानाच्या आधारे योग्य ते बदल सुचवून देशाला प्रगतीपथावर नेणं, हे या मंडळींच्या हातात आहे. त्यामुळे या मान्यवरांनी निदान आपआपल्या क्षेत्राच्या प्रगतीचा विचार करून त्यासाठी प्रयत्न केले पाहीजेत. प्रयत्न करायचे म्हटलं तर आधी सभागृहात उपस्थित रहायला हवं.
प्रतिक्षा पाटील, डहाणूकर कॉलेज

चमकदार कामगिरी अपेक्षित
दिग्गजांनी कधी संसदेत लक्षणीय कार्य केलंय, असं कधीच कानावर आलं नाही. ना कधी त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उचलला, ना कधी त्यांनी अभ्यासपूर्ण भाषणं दिली. उलट ही मंडळी संसदेत अनुपस्थित असल्याची आकडेवारी जास्त आहे. या स्टार मंडळींनी देखील सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर बोलणं अपेक्षित आहे. या मंडळींनी त्या दृष्टीने कार्य केलं पाहिजे. त्यांनी त्यांच्या क्षेत्रात चमकदार कार्य केलंय, असंच कार्य त्यांनी संसदेत देखील केलं पाहिजे. अशी ही दिग्गज मंडळी जेव्हा संसदेत महत्त्वपूर्ण कार्य करतील तेव्हा खऱ्या अर्थाने ते संसदेत देखील चमकू लागतील. त्यांच्या वरील सर्वसामान्यांचा विश्वास आणखी दृढ होईल. हे सर्व घडण्यासाठी त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला पाहिजे.
कार्तिक जाधव, गुरु नानक कॉलेज

का निवडावं?

अहो, तुमच्या झगमगाटाचा अभिमान होता फार,
म्हणूनच धाडले तुम्हा सभागृहात
राव अपेक्षा नाहीत फार
पण सोडा की कधीतरी ए.सीवाली कार,
अहो, तुम्ही म्हणे गोंधळ्यांना हिणवता फार,
पण तुम्हीदेखील गैरहजर राहता बरं का फार.
राव अपेक्षा नाहीत फार
पण जिथे गाजवता मैदानं, मारता बाजी,
तिथे केणासाठी करता फक्त हा जी हा जी
राव अपेक्षा नाहीत फार
जसे ठोकता षटकार,
आलापता संगीताचा राग
तसेच ठोका भाषण,
आलापा प्रगतीचा राग
राव अपेक्षा नाहीत फार
अहो, संकटांवर एकदा तरी करा वार
आपल्या स्टार मंडळींचं काहीसं झोपी गेलेल्या सिंहाप्रमाणेच अवस्था झालीय. त्यांना त्यांच्या ताकदीची कल्पना नाही की ते जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत असा प्रश्न उभा ठाकलाय. सर्वसामान्यांच्या नाहीतरी कमीतकमी त्यांच्या क्षेत्रातातील उणीवा दूर करण्यासाठी तरी त्यांनी प्रयत्न करायला हवे. स्टार मंडळींनी ही जबाबदारी फक्त मिरवण्यासाठी न घेता प्रमाणिकपणे निभावायला हवी. या स्टार मंडळींना त्यांच्या जबाबदारीचं भान असायलं हवं. शेवटी जनतेचे प्रश्न, समस्या तीन तासांचा सिनेमा नाही किंवा पंधरा मिनिटांचं गाणं नाही किंवा वन डे मॅचदेखील नाही याचं भान त्यांना असायला हवं.
प्रियंका खाटमोडे, नॅशनल कॉलेज

जनसामान्यांच्या समस्या मांडाव्यात
राष्ट्रपतींकडून कला, साहित्य, क्रीडा, चित्रपट या क्षेत्रातील मान्यवरांची निवड केली जाते. ती व्यक्ती त्या क्षेत्रातील सर्वपरिचित आणि प्रतिष्ठित असते. म्हणून अशा व्यक्तींकडून त्या क्षेत्रातील समस्या, असुविधा आणि त्या क्षेत्राची प्रगती होण्यासाठी अभ्यासपूर्ण विवेचन होणं अपेक्षित आहे. त्या समस्या राज्यसभेमध्ये मांडल्या पाहिजे. प्रत्येक राज्यसभा सदस्याला त्या क्षेत्राच्या विकासासाठी विशिष्ट विकासनिधी आणि अनेक सोयी सुविधा मिळतात. पण अशा सुविधांचा लाभ घेत असताना असा विकासनिधी कुठे आणि कसा वापरावा याचीच जाण नसेल तर मग या सर्वोच्च पदाचा फायदा काय? कारण अशा व्यक्तीकडे समाज आदर्श म्हणून बघतो. त्यामुळे त्यांची ही नैतिक जबाबदारी असते.
राहुल चंदेल, डहाणूकर कॉलेज

नैतिक जबाबदारीच!
संसदेचं सदस्यत्व मिळणं हा त्या व्यक्तीचा बहुमान आहे. विविध क्षेत्रातील व्यक्तींची जेव्हा संसदेवर नेमणूक होते तेव्हा आपल्या क्षेत्राशी संबंधित प्रश्न मांडावे, त्यावर चर्चा करावी ही त्याची नैतिक जबाबदारी असते. मात्र असं होताना दिसत नाही. किमान त्यांची सभागृहात नियमित उपस्थिती तरी असावी. आपली जबाबदारी ते टाळत असतील तर त्याची दखल घेतली जावी. आज आपल्या देशातील चित्रपट, संगीत आणि इतर क्षेत्रात अजूनही बऱ्याच समस्या आहेत. संसदेसारख्या महत्त्वाच्या व्यासपीठावर त्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. हे काम त्या-त्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीच चांगल्या प्रकारे करू शकतात.
श्रद्धा देशमुख, साठ्ये कॉलेज

गांभीर्याने विचार व्हावा
संगीत, कला, क्रीडा, चित्रपट अशा विविध क्षेत्रातील काही दिग्गज मंडळी सध्या राज्यसभेत सन्मानपूर्वक विराजमान आहेत. पण नुसतं संसदेत उपस्थित राहून आणि खासदार म्हणून मिरवून काय फायदा, जर त्या पदाचा योग्य उपयोग आणि त्याच्या जबाबदारीची जाणीवच नसेल. तर अशांनी ती पदं न घेता आपापल्या क्षेत्रातच लक्ष द्यावं. पण घटनेतील या कायद्यात असा बदल करावा की या विशेष १२ सदस्यांनी जर काही मर्यादित कालावधीत आपले मुद्दे, आपली भूमिका मांडली नाही किंवा संसदेच्या बैठकांमध्ये सहभाग दर्शवला नाही तर त्यांचे सदस्यत्व कायमचं रद्द करण्यात येईल. असा सक्त कायदा केल्या शिवाय याचा गांभीर्याने विचार होणार नाही.
साईराज उतेकर, शैलेंद्र कॉलेज

मैदानातील दिग्गज संसदेत अपयशी
कला, क्रिडा, चित्रपट यांसारख्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना राज्यसभेत स्वीकृत खासदार म्हणून निवडलं जातं. असे स्टार्स खासदार म्हणून निवडल्यानंतर त्यांच्या कार्यात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आणि सर्वसामान्याच्या आशाही उंचावल्या. मूळात कुठलेही पद असो त्या खुर्चीवर बसल्यानतंर एक जबाबदारी असते. प्रतिनिधीत्व करत असताना त्या क्षेत्रातील समस्यांना वाचा फोडून न्याय देण्याची मोठी जबाबदारी असते. सर्वसामान्यांसाठी काही करायची तळमळ असती तर या समाजउपयोगी व्यासपीठाचा वापर या मान्यवरांकडून झाला असता. ज्याला त्याबद्दल खरोखरंच आस्था असेल आणि सामाजिक तळमळ असेल अशाच व्यक्तीला ही महत्त्वाची जबाबदारी द्यावी.
किशोर धानके, एस. एस. जोंधळे पॉलिटेक्निक

परिस्थिती कधी बदलणार?
संसदेतील कामकाज हे अतिशय महत्त्वपूर्ण मानलं जातं. तसंच संसदेत कामकाज करणारी मंडळी आणि त्यांची भाषणं यांचा मोठा प्रभाव समाजावर पडत असतो. संसदेतील चालणाऱ्या कामकाजावरून देशाच्या प्रगतीला हातभार लागतो. त्यामुळे प्रत्येक सदस्याची उपस्थिती महत्त्वाची असते. तसंच अनेकदा संसदेत तारे-तारकांची नियुक्ती केली जाते, पण त्यांची अनुपस्थिती वारंवार निदर्शनास येते. तसंच ते कोणत्याही सामान्यांच्या प्रश्नांवर वाचा फोडताना दिसत नाहीत. पण तारे-तारकांनी आपणास संसदेत का पाठवले? याची नोंद घेणं आणि संसदेतील सर्व विषयांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. विविध क्षेत्रातील गोष्टींचा जाणीवपूर्वक अभ्यास करून नवीन उपाययोजना काढून त्रुटींवर मार्ग काढणं जनतेला अपेक्षित आहे.
सायली शिंदे, भवन्स कॉलेज

पुढाकार घेणं अपेक्षित
सर्वप्रथम राज्यसभेवर निवडून गेलेल्या किंवा नियुक्त केलेल्या प्रत्येक खासदाराला उपस्थित राहणं गरजेचं आहे. त्याला ही स्टार मंडळी अपवाद नाहीत. कारण तिथे नागरीकांचे प्रश्न आणि समस्या यांवर मार्ग काढले जातात. स्टार मंडळींनी स्वतःच्या क्षेत्राबरोबरच इतर क्षेत्रात सुधारणा घडवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. कारण त्यांच्या भोवती लोकप्रियतेचं वलय असतं. त्यांच्या प्रत्येक विधानाचा गांभिर्थाने विचार केला जातो. जे असामान्य कर्तुत्व त्यांनी आपल्या क्षेत्रात दाखवलं, ते त्यांनी राज्यसभेवर दाखवावं हीच आमची रास्त अपेक्षा आहे.
नागेश सुतार, मुंबई विद्यापीठ

कारवाई व्हावी
संगीत, कला, क्रीडा, चित्रपट क्षेत्रात नाव कमावलेल्या स्टार मंडळींची राष्ट्रपतींद्वारा अथवा संसदीय लोकप्रतिनिधींद्वारा राज्यसभेवर सन्मानपूर्वक नियुक्ती होते. पण या स्टार मंडळींची सभागृहातील अनुपस्थती कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. त्यांच्या संबंधीत क्षेत्रात तथा समाजात होणाऱ्या अन्याय-आत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी भारतीय घटनेद्वारा या स्टार मंडळींना समाजविकासाची मोठी संधी उपलब्ध झालेली असताना यांची अनुपस्थती समाजाप्रती ते किती जागृत आहेत हे दर्शवते. जर ही स्टार मंडळी समाजाप्रती भावनाशून्य आहे तर यांनी खासदार पदाचा राजीनामा द्यावा.
लिना घेगडमल, मुंबई विद्यापीठ

अपेक्षा कोणाकडून ठेवायची?
ज्या क्षेत्रात एखादी व्यक्ती हुशार असते त्या क्षेत्राची प्रगती पटकन आणि योग्य दिशेने होते. या हेतूने राज्यसभेत कलाकार आणि खेळाडूंना पद मिळतं. जर मी एका विशिष्ट क्षेत्रात प्रगती करत असेन तर मला त्या क्षेत्राची प्रगती करण्याची कला किंवा त्या क्षेत्रातील व्यक्तींचे प्रश्न आणि समस्या सोडवता येतात. पण कलाकार आणि खेळाडू हे संसदेतील सभेला अनुपस्थिती दर्शवतात. मग अशा वेळी आपण त्या क्षेत्रातील प्रगतीची अपेक्षा कोणाकडून ठेवणार? ते त्या-त्या क्षेत्रांची फारशी प्रगती करु शकले नाही. त्यामुळे मग सामान्य नागरीकाला लोकसभेप्रमाणे निवडून त्या क्षेत्रातील प्रगती करण्याची गरज मला भासते.
नेहा जाधव, जोशी-बेडेकर कॉलेज

पदाला न्याय द्या!
सचिन तेंडुलकर, लतादीदी आणि रेखा यासारख्या दिग्गजांनी आपआपली क्षेत्रं गाजवली. राज्यसभेवर विराजमान होण्यापूर्वी त्यांना आपल्या पदाच्या जबाबदाऱ्या, आपली कार्ये माहिती असणं गरजेचं होतं. याचा अभाव असल्यामुळेच ही दिग्गज मंडळी आपल्या पदाला न्याय देऊ शकलेली नाहीत. किंबहुना कला, क्रीडा, मनोरंजन इत्यादी क्षेत्रात असणाऱ्या समस्या आणि त्यावर असणारे उपाय हे ज्याला माहीत असेल त्यानेच त्या पदावर विराजमान व्हायला हवं. मग तो एक चांगला समाजसेवक असू शकतो किंवा वकिल असू शकतो. संसदेतली रिक्त पदे द्यायचीच आहेत म्हणून सर्रास कुणालाही देत सुटणं हे मात्र अयोग्यच आहे.
ज्ञानेश्वर शिंदे, चेतना कॉलेज

पुढे काय?
समाजातील खेळ, कला, शिक्षण इ. पैलूंवर अधिक लक्ष देता यावं, त्यातील त्रुटी दूर कराव्यात यासाठी त्या-त्या क्षेत्रातील एक दिग्गजांना राज्यसभेत स्थान दिलं गेलं. या मंडळींनी आजतगायत इतर नेत्यांप्रमाणे कधी भाषणबाजी केली नाही. पण त्यांच्या क्षेत्रातील उणीवा, गरजा या विरोधातही आवाज उठवला नाही. हे सगळे आपआपल्या क्षेत्रात खूष असताना त्यांना अन्य खासदारांच्या जागा अडवायला बसवलं आहे, असं वाटतं. एखाद्या गटातील महत्त्वाचे मुद्दे, अडी-अडचणी लोकप्रतिनिधींपेक्षा त्या क्षेत्रातील मुरलेली व्यक्तीच उत्तम रितीने व्यक्त करू शकते. क्रीडा​-कला क्षेत्रात यांनी त्यांचे कसब दाखवून राज्यसभेत​ही मानाचे स्थान मिळवले आहे. त्यांच्या एका आवाजामुळेही समाजात​ चांगले बदल घडतील व येणाऱ्या तरूण पिढीला त्याचा नक्कीच फायदा होईल याची जाणीव त्यांना झाली पाहिजे.
मैथिली मोरे, पाटकर कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फक्त सिनेमेच बेजबाबदार?

$
0
0


कॉलेज अड्ड्यावर 'तो' घोळक्यात उभा असतो…'ती' तिथून जात असते. तो तिची छेड काढतो…असं करता-करता पुढे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात. कुठल्याही हिंदी सिनेमाचा हा हिट फॉर्म्युला. गेल्याच आठवड्यात मेनका गांधींनी हाच मुद्दा महिलांच्या छेडछेडीला कारणीभूत असल्याचं विधान केलं. याबाबत तरुणाईला विचारलं असता, बहुतांश जणांनी मात्र युवा कट्टावर याच्याशी असहमत असल्याचं म्हटलं आहे. सगळी जबाबदारी सिनेमांवर ढकलून समाजाला यातून वेगळं कसं काढता येईल, असं त्यांचं मत आहे. समाजातल्या काही घटकांची विकृत मानसिकता हीच महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला जबाबदार आहे, असं तरुणाईला ठामपणे वाटतंय.

यावेळच्या युवा कट्टात सहभागी झालेलं मुंबई विद्यापीठ आणि संलग्न कॉलेजेस

• सेंट झेविअर्स कॉलेज (फोर्ट)
•एच. आर कॉलेज (चर्चगेट)
•वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (माटुंगा)
•रुईया कॉलेज (माटुंगा)
•पोदार कॉलेज (माटुंगा)
•व्हीजेटीआय (माटुंगा)
•साठ्ये कॉलेज (विलेपार्ले)
•डहाणूकर कॉलेज (विलेपार्ले)
•तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स (अंधेरी)
•एम.डी कॉलेज (परळ)
•झुनझुनवाला कॉलेज (घाटकोपर)
•विकास रात्र कॉलेज (विक्रोळी)
•जोशी-बेडेकर कॉलेज (ठाणे)
•बांदोडकर कॉलेज (ठाणे)
•ज्ञानसाधना कॉलेज (ठाणे)
•एफ. जी. नाईक कॉलेज (कोपरखैराणे)
•सीएचएम कॉलेज (उल्हासनगर)
•बिर्ला कॉलेज (कल्याण)
•सुयश कॉलेज (मुरबाड)

प्रभावाचा परिणाम
सिनेमातील विश्व आदर्श समजून काहीजण त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. पण सिनेमातील पात्रांमध्ये किती गुंतायचं हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. मुळात लहानपणापासूनच मुलांवर स्त्रीकडे उपभोगाची वस्तू म्हणून न पाहता तिचा आदर करण्याचे संस्कार बिंबवले तर सिनेमा पाहतानाही योग्य आणि अयोग्य काय याचा विचार मुलं करतील. तेवढी समज मुलांना आली की, चित्रपटांचा त्यांच्या मनावर फारसा परिणाम होणार नाही. त्याशिवाय मुलांचा मित्रपरिवार, आजुबाजूचे वातावरण, सोशल मीडियावरून स्त्रियांवर केले जाणारे विनोद याचाही मनावर परिणाम होतच असतो. जर छेडछाड किंवा अत्याचार ही कथानकाची गरजच असेल तर नंतर ते कसं चुकीचं आहे, त्याविरोधात मुलींनी कसा आवाज उठवावा तसंच अशा प्रसंगी इतर समजूतदार पुरुषांनीही स्वतः पुढाकार घेऊन मुलींच्या पाठीशी कसं उभं राहावं हे सिनेमात दाखवलं तर नक्कीच परिस्थिती बदलायला मदत होईल असं मला वाटतं.
चिन्मयी वझे, व्हीजेटीआय

आशयघन चित्रपटांची कमतरता
हल्लीच्या चित्रपटात मादक दृश्यं तसंच अश्लील विनोदांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. महिलांशी केले जाणारं गैरवर्तन, छेडछाडींच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होते. यासाठी चित्रपटांना जबाबदार धरलं जातं. पण केवळ चित्रपटांना दोष देणं योग्य नाही. पुरूषांची मानसिकता आणि त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे घटक याला कारणीभूत आहेत. तसंच चित्रपटातील मादक आणि अश्लील दृश्ये हे घटकही जबाबदार आहेत. हल्लीच्या चित्रपटांत नेमक्या याच गोष्टींचा वापर जास्त केला जातो. चित्रपटांत दाखवल्या जाणाऱ्या दृश्यांबाबत काळजी घ्यायला हवी. हल्ली आशयघन चित्रपटांपेक्षा अशा चित्रपटांची संख्या जास्त आहे. या दोन्ही घटकांमुळे स्त्रियांवरील अत्याचारांचं प्रमाण वाढतंय.
वैभव जयेंद्र पुरव, डहाणूकर कॉलेज

सर्वस्वी मानसिकतेवर अवलंबून
भारतातील स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला सर्वस्वी चित्रपट जबाबदार आहेत, असं मला अजिबात वाटत नाही. भारतात 'तारे जमीन पर', 'नटसम्राट', 'कट्यार काळजात घुसली' अशा कितीतरी चित्रपटातून खूप काही शिकण्यासारखं आहे. दिग्दर्शकाचा सिनेमा बघण्याचा दृष्टिकोन आणि लोकांचा तो पाहण्याचा हेतू हा सर्वस्वी त्यांच्या मानसिकतेवर अवलंबून असतो. सिनेमांमधून स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्यांची छेडछाड यांचं प्रदर्शन होतं, पण त्यातूनच या अन्यायाविरुद्ध आवाज कसा उठवायचा हे देखील दाखवलं जातं. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात आणि त्या दोन बाजूंना जोडणारी कडा ही महत्त्वाची भूमिका बजावते. सिनेमांमधून प्रदर्शित होणारे चित्रण ही नाण्याची एक बाजू तर प्रेक्षकांचे त्या विषयीचे मत ही त्या नाण्याची दुसरी बाजू आहे. त्या चित्रपटांतून आपण काय शिकलो आणि चित्रपटाचं आपल्यावरील वर्चस्व ही त्या नाण्याची कडा आहे.
भक्ती पालांडे, तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स

विलनची भूमिका प्यारी वाटते!
प्रत्येक सिनेमाची कथा ही समाजातील घटकांशी निगडीत आहे, असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे हा सिनेमा अमुक व्यक्तीशी जुडत आहे किंवा त्याची कथा ही माझ्या जीवनावर आधारित आहे, असं वाटायला लागतं. त्यामुळे त्यांचं अनुकरण किंवा प्रतिबिंब समाजामध्ये उमटायला लागतं. पण सिनेमांमध्ये दाखवलं जाणारं विश्व हे केवळ काल्पनिक असतं. अनेकजण सिनेमांमध्ये दाखवतात त्याचं अंधानुकरण करतात. पण एखाद्या स्त्रीवर अन्याय किंवा तिची छेडछाड होत असेल तर सिनेमातील हिरोसारखं तिच्या मदतीला का जात नाही? केवळ विलनचीच भूमिका पार पाडतात. सिनेमा पाहा पण केवळ मनोरंजना पुरताच, त्याचं अंधानुकरण करु नका, हा मी मैत्रीपूर्ण सल्ला देऊ इच्छिते.
अनिरूद्ध गायकवाड, सेंट झेविअर्स कॉलेज

फक्त मनोरंजनच!
मी मेनका गांधी यांच्या विधानाशी सहमत आहे. पण प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी असते, हेही लक्षात घ्यायला हवं. नवीन चित्रपटांमध्ये एकतर्फी प्रेम प्रकरण आणि पुढे हाणामारी आजकालच्या चित्रपटात दाखवली जाते. याचा परिणाम चित्रपटांवर होतो. मानवाच्या विचार करायच्या दोन बाजू असतात, एक म्हणजे आपण चित्रपट मनोरंजन म्हणून पाहतो आणि दुसरा चित्रपटात जे पाहून आपल्या जीवनात तसंच करायला पाहतो. या दुसऱ्या प्रकारातल्या मानसिकतेमुळे मग पुढे दुर्घटना घडतात. या सगळ्यांना एकच सांगू इच्छितो ते म्हणजे चित्रपट हे फक्त मनोरंजनासाठी पाहा. नवनवीन विचार त्यातून घ्या.
दुर्वांक तेली, एम.डी कॉलेज

वास्तवाचं दर्शन
चित्रपट हे सामाजिक, राजकीय, कौटुंबिक, प्रेमकथेवर भाष्य करतात. मराठीमध्ये अनेक चित्रपट हे सामाजिक जीवनावर भाष्य करतात. त्यामुळे छेडछाड, एकतर्फी प्रेमातून होणारे गुन्हे यासाठी सिनेमा जबाबदार आहे, असं बोलणं चुकीचं आहे. सिनेमांमधील दृश्य हे त्या चित्रपटाचा भाग म्हणून तर कधी जे समाजात दिसतं तेच या माध्यमातून चित्रीत केलं जातं.बालक-पालकसारखा चित्रपट हा वास्तवाचं दर्शन घडवणारा होता. त्यामुळे सिनेमांमधील दृश्य हे त्या चित्रपटांमधील केवळ भाग असतो. त्याकडे कधी मनोरंजन म्हणून तर कधी त्यातून सामाजिक भान जपलं पाहिजे. मुळात चित्रपट हे एक प्रभावी माध्यम असून ते २-३ तासात खूप काही सांगून, शिकवून जातं. दुर्घटनांसाठी चित्रपटाला जबादार धरू शकत नाही.
निखिल मालवणकर, डहाणूकर कॉलेज

हिंसेची सुरुवात चित्रपटातूनच
चित्रपट आपण मनोरंजन म्हणून बघतो. काही चित्रपटातील गाणी, संवाद आपल्याला चोख पाठ असतात. हे सद्यस्थितीचं झालं. पूर्वी चित्रपटात माणूसकी, संस्कार यांचं दर्शन घडायचं. आता काळाप्रमाणे लोकांची मानसिकता बदलतीय आणि सिनेमाची परिभाषासुद्धा काळाप्रमाणे बदलावी. पण आज सिनेमात सामाजिक संदेशांच्या नावाखाली प्रेमप्रकरणं दाखवली जातात. त्याची सुरुवात हीच थिल्लरपणाने होते. सिनेमात नायिकेची आधी छेडछाड, मग त्यांचं प्रेम असं चित्रण अतिशय चुकीचं आहे. अशात महिलांची छेड काढणं, अश्लील भाषेत बोलणं हे प्रकार वाढतात. यामुळे स्त्रियांवरील होणाऱ्या हिंसेला हे सिनेमे जबाबदार आहेत, हा मेनका गांधीचा आरोप चुकीचा आहे, असं मला वाटत नाही.
वैष्णवी सुर्वे, जोशी-बेडेकर कॉलेज

रिल, रिअलमधला फरकच उमजेना
आजच्या काळात चित्रपट स्वप्नं दाखवणारा आणि ती विकणारा धंदा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पूर्वी हे केवळ मनोरंजनाचं साधन होतं. पण काळानुरुप सिनेमा बदलला. आजुबाजूला घडणाऱ्या घटनांवर आधारित वास्तवदर्शी चित्रपट बनू लागलेत. पण असं करताना बऱ्याचदा एखादा प्रसंग अतिशय भडक स्वरुपात दाखवला जातो. हॉलिवूडशी बरोबरी करायची म्हणून तसे भडक, रक्तरंजित दृश्य, विचित्र स्टंट्स दाखवले जातात. त्यावर आक्षेप घेतला असता ती पटकथेची गरजच होती, अशी सबब पुढे केली जाते. प्रत्यक्षात मात्र याचा प्रेक्षकांवर विशेषतः तरुणांवर परिणाम होत असतो. वास्तविकता आणि काल्पनिकता यातील फरक समजून न घेता तरुण चित्रपटातल्या गुलाबी विश्वात रमतात. प्रत्यक्षात आपल्याला जबाबदार प्रेक्षक बनता आलं पाहिजे. 'रील'लाईफ आणि 'रिअल'लाईफ मधला फरक मनावर ठसला की काय घ्यायचं आणि काय सोडायचं याची जाणीव होते.
श्रद्धा देशमुख, साठ्ये कॉलेज

भान नाही वास्तवाचे
चित्रपट हे वास्तवाचं दर्शन घडवतात पण सद्यस्थितीत वास्तव हे सिनेमाला पाहून घडतं, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. पण चित्रपटांचा निव्वळ मनोरंजन हा हेतू असतो. स्त्रियांवर होणारे अत्याचार, छेडछाड, एकतर्फी प्रेम यातून होणारे गुन्हे हे सर्व सिनेमा पुरतंच राहिलं तरच चांगलं आहे. पण वास्तवाचं भान हे चित्रपट वेड्यांनी ठेवायला हवं. चित्रपटात जे-जे घडतं ते सर्वच खरं असतं असं नाही. चित्रपट हे केवळ मनोरंजनासाठीच असतात. प्रत्येक चित्रपट येतो आणि जातो, पण आपण वास्तवात जगतो. तेव्हा वास्तवाचं भान असलंच पाहिजे.
साक्षी तावडे, झुनझुनवाला कॉलेज

...तरच समाजात बदल होतील
चित्रपट हे समाजाचं प्रतिबिंब असतं, हे विसरता काम नये. नुसतेच सिनेमे जबाबदार नसून घराघरात पोहोचलेल्या टीव्हीवरच्या जाहिराती किंवा कार्यक्रमांमध्ये फक्त अंगप्रदर्शन जास्त प्रमाणात दाखवलं जातं. वाढती पाश्चात्त्य संस्कृती आणि आगळीवेगळी फॅशन याचा तरुणांवर विपरीत प्रभाव पडतो. तसंच पालकांचीसुद्धा जबाबदारी आहे. आपला मुलगा कुठे जातो, काय करतो, कुणासोबत जातो, काय बघतो या सर्व गोष्टींचा जाब त्याला विचारायला नको का? त्यांच्याच जागी एखादी मुलगी असती तर तिला नको-नको ते प्रश्न विचारले जातात ना? समाजाला बदलायचं असेल अन् महिलांवरील अत्याचार रोखायचे असतील स्वतःपासून सुरुवात झाली पाहिजे तर आणि तरच समाजात बदल होईल.
रमण जगताप, मुंबई विद्यापीठ

प्रेमाची कोडी अन् भानगडी
भारतामध्ये पुरुषांकडून स्त्रियांवर होणाऱ्या छेडछाडीला, मारहाणीला भारतीय सिनेमाचं जबाबदार आहेत, असं मत मांडणाऱ्या केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. आपण मनोरंजनासाठी चित्रपट पाहतो. पण त्यात काय? सर्व चित्रपटांमध्ये पाहायला गेल्यावर असं दिसून येतं की, प्रथम नायक नायिकेची छेडछाड करतो. नंतर हळुहळू नायिका नायकाच्या प्रेमात पडते. हे असं दृश्य जेव्हा तरुण पिढी पाहते, तेव्हा त्यांमध्येही नायकासारखे करण्याची जिज्ञासा उत्पन्न होते. मग ती मुलं मुलींची छेडछाड करतात. चित्रपटाप्रमाणे मुली नंतर त्यांच्या प्रेमात पडत नाहीत तर उलट त्यांचंच आयुष्य खडतर बनतं. म्हणूनच मला असं वाटतं की, अशा भारतीय चित्रपटांवर बंधन लादली पाहिजेत. त्यामुळे समाजातील स्त्रियासुद्धा सुरक्षित राहतील आणि कोणत्याही तरुणाच्या मनात वाईट विचार येणार नाही.
कांचन गावस्कर, एच. आर कॉलेज

दृष्टिकोन महत्त्वाचा
मेनका गांधी यांचं उपरोधात्मक मत सध्या खूप गाजतंय. भारतीय चित्रपटांवर सरळपणे टीका व्यक्त करून पुन्हा एकदा चित्रपट सृष्टीवर अरोप करण्यात आलेत. समाजामध्ये होणाऱ्या घडामोडी, गुन्हे असे विषय घेऊनच सिनेमांची निर्मिती केली जाते. ज्यामुळे जे काही समाजात चाललंय त्यावरून चांगला तो संदेश घेऊन आपण आपल्या विचारात बदल करावा. स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्यांची छेडछाड, एकतर्फी प्रेमातून होणारे गुन्हे यासाठी जर सिनेमे जबाबदार आहेत तर आज भारतात असेही बरेचसे चित्रपट आहेत जे या अन्यायाविरुद्ध वाचा फोडायला मदत करतात. तेव्हा चांगल्या गोष्टी सिनेमांमधून का शिकल्या जात नाही? सिनेमांचा परिणाम हा प्रत्येकाच्या मनावर होतो. पण त्यातून चांगलं आणि वाईट किती प्रमाणात घ्यायचं हे प्रत्येकावर अवलंबून आहे. सिनेमांचा किती प्रमाणात आपल्या मनावर परिणाम करुन घ्यावा ही प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे.
पूजा कोर्लेकर, एच. आर कॉलेज

ज्याचा-त्याचा प्रश्न
सिनेमा पाहून समाजात वाईट घटना घडतात, असं म्हणणं साफ चुकीचं आहे. सिनेमा हा एक समाजामध्ये घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब असतो. समाजात जे वर्षानुवर्षे घडतंय, तेच मनोरंजक रूपात दाखवलं जातं. सिनेमा पाहून समाजात वाईट घटना घडतात किंवा त्यापासून प्रेरणा घेतली जाते, असं म्हणणं चुकीचं आहे. चांगल्या घटनांवर आधारित चित्रपटांचीही निर्मिती होत असते. तेव्हा त्याबाबत कोणी का बोलत नाही. प्रत्येक सिनेमा हा वेगळा संदेश देऊन जातो. पण सिनेमा बघत असताना लोकांचा दृष्टिकोन नकारात्मक गोष्टी बघण्यात असतो. त्यामुळे चित्रपटातील संदेश त्यांच्यापर्यंच पोहोचत नाही. चित्रपट हे भावना व्यक्त करण्याचं आणि त्यातून स्वतःचं दोष ओळखण्याचं एक उत्तम साधन आहे हे ही चित्रपट प्रेमींनी ओळखलं पाहिजे. अखेर आपण चित्रपट का बघतो, कशासाठी बघतो आणि त्यातून मला काय घ्यायचं आहे हे ज्याचं-त्यानं ठरवायचं असतं.
हर्षल पाटील, सुयश कॉलेज

साचेबद्ध मानसिकता जबाबदार
छेडछाडीसाठी फक्त सिनेमा किंवा मनोरंजन क्षेत्राला जबाबदार ठरवण्यापेक्षा लोकांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि मानसिकता बदलायला हवी. मुलींनी मॉडर्न राहण्याचा किंवा बिनधास्त राहण्याचा प्रयत्न केला तर ती उपलब्ध आहे असा समाज करून घेणं चुकीचं आहे. आपल्याकडे कोणी काहीही केलं तरी चूक मुलींचीच असा समज करून मुलीला बदनाम केलं जातं. पण तिची बाजू ऐकून घेतली जात नाही. आजही काही घरांमध्ये पालक मुलांना चित्रपट पाहू देत नाही तरीही छेडछाडीसारखे गुन्हे घडतात. हे रोखण्यासाठी पालक आणि मुलं यांच्यात संवाद व्हायला हवा तरच छेडछाडीसारखे गुन्हे घडणार नाहीत.
ईशान कल्याणकर, एफ. जी. नाईक कॉलेज

अंधानुकरणाचं प्रमाण जास्त
चित्रपट हा समाजाचा आरसा आहे, असं म्हटलं जातं. जे समजात घडत असतं ते चित्रपटात दाखवलं जातं. पण या संकल्पनेला तडा देत केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी स्त्रियांवरील वाढत्या आत्याचारासाठी चित्रपटांना जबाबदार धरलंय. एकप्रकारे हे बरोबरच आहे. कारण अनुकरण करणं ही मानवी वृत्ती आहे. चित्रपटात दखवलेल्या छेडछाडीनंतर सुरु होणारे प्रेमप्रकरण याला रोड रोमिओ सत्य मानून त्याचं अनुकरण करतात. त्यामुळे मुलगी अत्याचाराला बळी पडतो. चित्रपट हा प्रेरणा स्त्रोत आहे, पण ते माणसाच्या दृष्टिकोनावर, मानसिकतेवर आधारित असतं. त्यामुळे पूर्णतः चित्रपटांना दोष देणं ही चुकीचं ठरेल.
आकाश पाखरे, विकास रात्र कॉलेज

मर्यादा ठेवावी!
महिलांच्या वाढलेल्या असुरक्षितेचं मूळ कारण म्हणजे सिनेमा, असं माझं मत आहे. पण सिनेमांमधून लोकांना नेमकं काय घ्यायचं हेच कळत नाही. तरुणवर्ग चित्रपटातील सर्वच गोष्टींचं अनुकरण करतात. अशा सिनेमांमुळे तरुणांचे विचार करण्याची वृत्तीच खुंटली आहे. त्यांना स्वतःचं असं काही मत राहिलेलंच नाही. सिनेमात दाखवतात तेच योग्य प्रेम असं त्यांना वाटतं आणि ते त्याच ओघात वाहत जातात. महिलांचा आदर करणं, त्यांना समाजात चांगलं स्थान देणं हे हल्ली कोणत्याच सिनेमात फारसं बघायला मिळत नाही. सिनेमाच्या प्रभावाने भारतात गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतंच चाललीय. हे सर्व जर थांबवायचं असेल तर निर्मात्यांनी आणि एकंदरीतच सर्व कलाकारांनी एक मर्यादा ठेवली पाहिजे.
स्मिता चव्हाण, बिर्ला कॉलेज

फरक जाणा
'जे आहे ते दाखवलं तर त्यात गैर काय?', असा कधीकधी सिनेमा निर्मात्यांचा प्रश्न असतो. पण पाहायला गेलं तर त्या मंडळीचंही काही चुकीचं नाही. आपल्याकडच्या काही मडळींना कित्येकदा काल्पनिक आणि वास्तव यातला फरकच कळंत नाही. म्हणूनच काही वेळा मेनका गांधी यांचा आरोप खरा आहे, असं वाटतं. आता राहिला प्रश्न महिलांच्या सुरक्षेचा जर मानसिकता बदलली तर समाज सुधारेल, समाज सुधारला तर देश सुधारेल आणि मानसिकता बदलली तर माणसं माणूस म्हणून वावरतील.
अश्विनी सगळे, साठ्ये कॉलेज

चित्रपट जबाबदार कसे?
मेनका गांधी यांच्या मताशी मी अजिबात सहमत नाही. स्त्रियांवरील अत्याचाराला आणि छेडछाडीला भारतीय चित्रपट कारणीभूत आहेत, हे अत्यंत बालिशपणाचं वक्तव्य आहे. सिनेमात जे सगळं दाखवतात त्याचा वास्तविक आयुष्याशी काही संबंध नसतो, हे सिनेमा सुरु होण्याआधी दाखवतात. आपला समाज तसा प्रगल्भ आहे. सिनेमा बघून कोणी अशी कृत्य करत असतील, असं वाटत नाही. स्त्रियांवर जे अत्याचार होतात ते थांबवण्यासाठी सरकारने कोणती कठोर पावलं उचलली, कायद्यात काय बदल केले याबद्दल बोलण्याऐवजी या सगळ्याला चित्रपटांना दोषी ठरवणं अत्यंत चुकीचं आहे.
बिपिन जाधव, वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट

अशावेळी सुजाणता जाते कुठे?
स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्यांची छेडछाड, एकतर्फी प्रेमातून होणारे गुन्हे या सगळ्याला चित्रपटच जबाबदार आहे, असं नाही म्हणता येणार. चित्रपटातील कथा व पात्रं काल्पनिक असतात. त्यांचा वास्तवाशी काहीच संबंध नाही, हे प्रत्येक चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवलं जातं. मग असं असतानाही आजची पिढी का त्या आशयाच्या पलीकडे जातेय? कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी ती आपल्याला बुद्धीला पटते का? त्यामुळे कोणाला त्रास होईल का? याचा विचार करत नाही. जर आपण स्वतःला सुजाण म्हणतो तर ही सुजाणता आपल्या वागण्यातही दिसली पाहिजे. चित्रपटाला निव्वळ मनोरंजनाचं साधन मानायचं की, त्याच्या आहारी जायचं हे आपल्या हातात आहे.
मधुरा गावडे, डहाणूकर कॉलेज

मानसिकता बदला, समाज बदलेल
चित्रपट हे फक्त लोकांचं मनोरंजनासाठी असतात. त्यामुळे स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांसाठी चित्रपट हे जबाबदार आहेत, असं म्हणणं चुकीचं आहे. चित्रपटातून कोणत्या गोष्टी घेणं आणि कोणत्या नाही हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. खरं म्हणायचं झालं तर अनेक जणांना असं वाटतं की, चित्रपटात अभिनेत्री जे कमी उंचीचे कपडे घालतात त्याचा परिणाम हा आजच्या पिढीतील मुलींवर पडला आहे. त्याचं अनुकरण हे आजच्या मुली करतात. पण असं असलं तरी मुलींनी कोणते कपडे घालावेत हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, आपल्याकडच्या लोकांची मानसिकता बदलणं अत्यंत आवश्यक आहे. तेव्हाच समाजात सुधारणा होईल
पौर्णिमा बसवणकर, झुनझुनवाला कॉलेज

सेन्सॉर बोर्डाची भूमिका महत्त्वाची
मलाही असं वाटत की, स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांवर चित्रपटच जबाबदार आहेत. कारण चित्रपटांमधल्या नायकाच्या भूमिकेत पुरूषवर्ग स्वतःला पाहत असतो. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे आपलीसुद्धा अशीच कहाणी असावी अशी त्यांची अपेक्षा असते. मग स्वतःला आवडणाऱ्या मुलीकडे तो त्या अनुषंगाने पाहू लागतो. आधी तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करणं, मग तिला आपल्या प्रेमाची कबूली देणं आणि मग तिने नकार दिल्यास, त्याचा सूड घेण्याच्या उद्देशाने तिच्यावर अत्त्याचार करणं, असे अनेक प्रसंग घडतात. चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या काही अश्लील दृश्यांमुळे तरुण पिढीची मानसिकता खरंच बदलतीय. अशा दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने खरंच एकदा विचार करावा, असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण लोकांची मानसिकता व विचारसरणी बदलवण्याचं चित्रपट हे मुळात सर्वोतम माध्यम आहे. पण अशा काही दृश्यांमुळे गुन्ह्यांचं प्रमाण वाढतंय.
दिप्ती मुणगेकर, एम. डी कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी सिनेमांना ‘अच्छे दिन’ कधी?

$
0
0

राष्ट्रीय पुरस्कारांवर सातत्यानं मोहोर उमटवूनही, पिकतं तिथं विकत नाही अशी मराठी चित्रपटांची अवस्था का होतेय? दर्जेदार असूनही त्यांना लोकाश्रय का मिळत नाही? असे प्रश्न युवा कट्टावर तरुण वर्गासमोर ठेवण्यात आले. चांगला संदेश देणाऱ्या सिनेमांपेक्षा मनोरंजन करणाऱ्या सिनेमांकडे तरुणवर्ग वळतोय सगळ्यांनाच मान्य आहे. मात्र, पुरस्कारप्राप्त सिनेमांचं प्रमोशनच होत नाही असं सांगत मराठी सिनेमांना अच्छे दिन आणण्यासाठी शेवटी प्रेक्षकांनीच त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहावं, असंही तरुणाईला वाटतंय…

यावेळच्या युवा कट्टात सहभागी झालेलं मुंबई विद्यापीठ आणि
संलग्न कॉलेजेस
• एच. आर कॉलेज (चर्चगेट)
•सेंट झेविअर्स कॉलेज (फोर्ट)
•साठ्ये कॉलेज (विलेपार्ले)
•डहाणूकर कॉलेज (विलेपार्ले)
•तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स (अंधेरी)
•गोखले कॉलेज (बोरिवली)
•गुरु नानक कॉलेज (माटुंगा)
•पोदार कॉलेज (माटुंगा)
•एस. आय. डब्ल्यू. एस कॉलेज (विक्रोळी)
•सीएचएम कॉलेज (उल्हासनगर)
•विवा कॉलेज (विरार)

सकारात्मक प्रतिसाद आवश्यक
मराठीत सध्या आशयघन आणि दर्जेदार सिनेमांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत आहे. विविध चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटांनी स्थान अव्वल स्थान पटकावलंय. सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटात मराठी चित्रपट आघाडीवर आहेत. यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर 'कासव', 'दशक्रिया' यांसारख्या मराठी चित्रपटांनी मोहोर उमटवली. पण अशा मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा अत्यंत कमी प्रतिसाद मिळतो. मुळात हे चित्रपट प्रेक्षकांपर्यत पोहोचत नाहीत. या मराठी चित्रपटांची जास्त प्रसिद्धी होत नाही. त्यातसुद्धा असे चित्रपट प्रेक्षकांपर्यत पोहोचले तरी प्रेक्षक ते पाहण्यासाठी उत्सुक नसतात. 'सैराट' या सिनेमाची प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी झाली. त्यामुळे लोक आकर्षित झाले आणि चित्रपटाला प्रचंड यश मिळालं. हिंदी आणि तामिळ चित्रपटांची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी केली जाते, तसंच हिंदी आणि तामिळ चित्रपटसृष्टीत असलेल्या कलाकारांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्या चित्रपटांना प्रचंड यश मिळतं. मराठी चित्रपटांना लोकाश्रय मिळण्यासाठी मराठी चित्रपटांची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी केली पाहिजे तसंच प्रेक्षकांनीसुद्धा तितकाच सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे. यासाठी आधुनिक साधनांचा योग्य वापर करुन जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यत मराठी चित्रपट पोहोचावेत यासाठी प्रयत्न केले व्हावेत.
वैभव पुरव, डहाणूकर कॉलेज

पायरसी जबाबदार
चित्रपट म्हटंला की लांबच लांब रांगा, प्रेक्षकांची गर्दी...हे सर्व कुठे तरी नाहीसे होत चाललंय. मराठी व्यतिरिक्त इतर भाषांकडे वाढणारा कल, बदलती जीवनशैली शिवाय रोजच्या धकाधकीच्या जीवनातून स्वतःच्या मनोरंजनासाठी न मिळणारा वेळ, चित्रपटांच्या तिकीटांची वाढती किंमत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर लगेच काही दिवसात इंटरनेटवर अगदी सहज रितीने उपलब्ध होतो. म्हणजेच सध्याच्या घडीला चित्रपटांची पायरसी मोठ्या प्रमाणावर होते. अशी सगळी कारणं यामागे असावीत असं मला वाटतं. शिवाय प्रमोशन, जाहिरातबाजीही तितक्या योग्यतेने होत नाही. त्यामुळे प्रेक्षकांपर्यंत ते सिनेमे पोहोचतच नाहीत. त्यामुळेच प्रेक्षकांची संख्या कमी होतेय. मला वाटतं जर चित्रपटांविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करायची असेल तर सर्वात प्रथम चित्रपटांच्या पायरसीवर निर्बंध आणले पाहिजेत. प्रमोशन आणि चित्रपटाचा थोडक्यात आशय सर्वांपर्यंत कसा पोहोचवता येईल याकडे जास्त लक्ष द्यावं. तिकीटांची किंमत मर्यादेत असावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चित्रपटगृहात मराठी सिनेमे लावण्यासाठी सक्ती करावी. प्रेक्षकांनी ही स्वतःची मानसिकता आपल्या संस्कृतीकडे वळवली तर मराठी चित्रपटाचा दर्जा खालावणार नाही.
भक्ती पालांडे, तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स

आवड जोखा, शक्कल लढवा
मराठी सिनेमा किंवा नाटकांना सध्या व्यासपीठ उपलब्ध होत नाही, असं आपण ऐकतो. याचं कारण म्हणजेच मराठी चित्रपटांचा प्रसार आणि प्रचार यामध्ये आपण कमी पडत आहोत. लोकांची आवड जोखण्यात कमी पडत आहोत, हे निश्चित. प्रेक्षकांना काही तरी नवीन हवं आहे. मग सैराटसारखा एखादा सिनेमा येतो आणि सिनेमा क्षेत्रात आपली एक ओळख करु जातो, असं का? त्याचं कारण हेच आहे की, त्या चित्रपटाचा वेगळेपणा. हिंदीची लोकप्रियता आणि आवडीमुळे मराठी रंगभुमीकडे पाठ फिरवली जाते. इतर भाषिक राज्यातील खास करून दक्षिणेकडील सिनेमांचा जास्त प्रमाणात व्यवसाय कसा होतो? याचं कारण की, तेथील सिनेनिर्मात्यांनी तेथील लोकांनची मानसिकता, आवड चांगल्याप्रकारे जोखली आहे. त्यामुळे सिनेमाबद्दलचं आकर्षण तिथं दिसून येतं. सिनेमा, नाटक मनोरंजनाचं माध्यम आहे. यासाठी मनोरंजन करणं हेच केवळ उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून, त्याची निर्मिती करणं आवश्यक आहे. प्रेक्षकांना पारंपरिक, त्याच-त्याच गोष्टी पाहण्यामध्ये जास्त रस राहिलेला नाही तर त्यांना नवीन आणि वेगळं पाहण्याची इच्छा आहे. त्यासाठी काही तरी शक्कल लावणं गरजेचं आहे.
अनिरुद्ध गायकवाड, सेंट झेविअर्स कॉलेज

वास्तवापेक्षा खयाली दुनियेत रमतात
बदलत्या काळाची गरज ओळखत मराठी सिनेमांचे विषय अधिकाधिक प्रगल्भ झालेत. दर्जेदार आशयघन सिनेमे बनवून लेखक-दिग्दर्शकांनी वेळोवेळी नवनिर्मितीचा घाट घातला. हे सिनेमे येतात अन् जातात पण तिकीटबारीवर जास्त चालत नाहीत, याची खंत वाटते. अजरामर कलाकृती बनवणाऱ्या कलाकारांच्या कलेला न्याय देणं ही प्रेक्षक म्हणून आपली जबाबदारी आहे. पण लोक तीन तास उपदेशाचे डोस घेण्यापेक्षा बाहेरचं वास्तव विसरुन खयाली दुनियेत नेणारे व्यावसायिक सिनेमे आवडीने पहातात. याशिवाय मराठी सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला कमी पडतोय. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी त्याला जाहिराती, प्रीमीयर, मुलाखतींच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळायला हवी. त्यासाठी आशयघन सिनेमांना चांगले निर्माते लाभावेत. असं झालं तर खरे मराठी रसिक सिनमागृहाकडे वळतील आणि सिनेमाला नक्कीच 'अर्थ'पूर्ण दिवस येतील.
श्रद्धा देशमुख, साठ्ये कॉलेज

फेस्टिव्हल गाजवले, थिएटर्स कधी?
मराठी सिनेमा जरी राष्ट्रीय पातळीवर गौरवला जात असला तरी त्याला वितरक न मिळणं ही दुर्दैवी बाब आहे. दाक्षिणात्य सिनेमा (मसालापट असो किंवा आशयघन असो) कमाईच्या बाबतीत तुफान यशस्वी होतो. पण हेच चित्र मराठीत का दिसत नाही? का फक्त 'सैराट' सारखेच चित्रपट मराठीत कमाई करतात? आज मराठीत उत्तम व राष्ट्रीय पुरस्कार मिळवतील असे चित्रपट बनवले जात आहेत. पण मोठे व चांगले वितरक या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी पुढे येत नाही, चित्रपट जरी प्रदर्शित केला तरी त्याला थिएटर्स मिळत नाही, प्राईम टाइम मिळत नाही. आज 'ख्वाडा'सारखा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट फक्त एकच आठवडा थिएटर्समध्ये टिकू शकला, यात चित्रपटाचे निर्माते म्हणतात चित्रपटाला प्रेक्षक नसतात, तर प्रेक्षक म्हणतात थिएटर्स मध्ये शोचं नसतात. याला नक्की जबाबदार कोण? 'कट्यार काळजात घुसली', 'मुंबई पुणे मुंबई २' हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होऊनही कमाईच्या बाबतीत अव्वल ठरले, का तर त्यांची निर्मिती ही मोठ्या वितरकांनी केली. 'सैराट' चित्रपट यशस्वी होण्याचे एक कारण हे त्याचं मार्केटिंग होत. 'कासव',' दशक्रिया' यासारख्या चित्रपटांचे असे 'मार्केटिंग' होऊ शकेल का? माझ्या मते, या विषयात वितरकांनी थोडं समजून घेऊन, पैसा हा एकमेव उद्देश बाजूला ठेऊन, या चित्रपटांची निर्मिती करणं गरजेचं आहे. नाहीतर असे चित्रपट फक्त 'फेस्टिव्हल्स' गाजवतील 'थिएटर्स' नाही.
देवेंद्र कुलकर्णी, गोखले कॉलेज

उत्तम प्रमोशनची गरज
मराठी सिनेमे प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत या मागे कुठेतरी निर्माते जबाबदार आहे का? असा प्रश्न मनात घर करतो. ज्या प्रमाणावर हिंदी सिनेमांचं प्रमोशन होतं त्याच्या तुलनेत मराठी सिनेमांचं प्रमोशन खूप कमी होतं. कित्येक हिंदी सिनेमांचं प्रमोशन वर्षभराआधी पासूनच सुरू होतं. उदाहरणार्थ 'दंगल' या सिनेमाबद्दल प्रेक्षकांन‍ा वर्षभरा आधीपासूनच माहिती होतं. एका आठवड्यात किमान दोन ते तीन हिंदी सिनेमे प्रदर्शित होतात. असं मराठी सिनेमांबाबत क्वचितच पाहायला मिळतं. मराठी सिनेमांना हिंदी सिनेमांच्या तुलनेत स्क्रिन्स कमी मिळतात, ज्यामुळे प्रेक्षकही कमी आणि प्रसिद्धीही कमी मिळते. शिवाय महाराष्ट्रात लोकांना मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा उत्तमपणे येत असल्याने त्यांच्यापुढे मराठी आणि हिंदी या दोन्ही सिनेमांचे पर्याय असतात. 'कासव', 'अस्तु' असे राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित सिनेमे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न क्वचितच दिसून येतात. ज्यामुळे त्यांना पुरेशी प्रसिद्धी आणि लोकाश्रय मिळत नाही. उत्कृष्ट विषय, आशय, सादरीकरण या सोबतच मराठी सिनेमांना उत्कृष्ट प्रमोशनची ही गरज आहे. तरीही अलीकडे मराठी सिनेमांची जादू वाढतांना दिसतय. पण मराठी सिनेमांची क्रेझ आणखीन वाढायला हवी.
वेदांत पोदुटवार, एच. आर कॉलेज

जो दिखता है वही बिकता है!
गेल्या काही वर्षात 'टाईमपास', 'लय भारी', 'दुनियादारी', 'नटसम्राट', 'कट्यार काळजात घुसली' या सिनेमांनी मराठी सिनेसृष्टीला एका नवीन उंचीवर पोहोचवलं. तसंच सैराटने बॉक्स ऑफिसवर केलेला विक्रम तर निराळाच होता. पण तरीही यावर्षी उत्कृष्ट असे ठरलेले सिनेमे म्हणजेच 'कासव', 'अस्तु' या आशयघन सिनेमांना वितरकच मिळालेले नाहीत, त्यामुळे ते प्रदर्शित होऊ शकले नाहीत. 'सैराट'सारख्या सिनेमाने यश मिळवलं यामागचं मुख्य कारण म्हणजे त्याचं प्रमोशन. सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधी प्रत्येक मराठी तसंच हिंदी वाहिन्यांवर संपूर्ण दिवसभर फक्त सैराटचंच गाणं दाखवलं जायचं. संगीतात एक विशिष्ट ताकद असते याचा प्रत्त्यय आला. वास्तविक पाहता 'सैराट'ची कथा नवीन नव्हती. अशा धाटणीचे सिनेमे या आधीही येऊन गेले. पण 'सैराट'चं झालेलं म्युझिक लाँच आणि त्यानंतर गाण्यांचं झालेलं प्रोमोशन यासर्व गोष्टींमुळे त्या सिनेमाने यश मिळवलं. 'सैराट' सिनेमाची गाणी सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच लोकांच्या मनावर बिंबवलं गेलं. यावरून 'जो दिखता है वही बिकता है' याचा प्रत्त्यय आला. 'कासव', 'अस्तु' इतके अप्रतिम सिनेमे आपल्याकडे आहेत, तर ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याआधी जाहिराती, ट्रेलर्स आणि प्रमोशनच्या माध्यमातून सिनेमाची झलक प्रेक्षकांना दाखवली तर नक्कीच लोकांना सिनेमा बघायची इच्छा होईल आणि आपल्याला लोकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळेल.
वृषाली भामरे, मुंबई विद्यापीठ

मार्केटिंग अभावी चित्रपटांना अपयश
प्रेक्षकांना आकर्षित करतील असे विषय अगदी कमी प्रमाणातच दाखवले जातात, हेच मराठी सिनेमांना जास्त प्रेक्षक न मिळण्यामागे कारण असावं, असं माझं मत आहे. कठीण भाषेचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. चालू घडामोडींचा या चित्रपटांमध्ये समावेश करणं आवश्यक आहे. त्यामुळे हे चित्रपट अधिक प्रेक्षकांना आकर्षित करत नाही. हेच 'सैराट'मध्ये वास्तव दाखवण्यात आलंय. त्यामुळे हा चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आणि त्याने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली. तसंच या चित्रपटातील गाण्यांनीही लक्ष वेधून घेतलं. एवढंच नाही तर या चित्रपटाची भुरळ सर्व देशवासियांना इतकी पडली की, या चित्रपटाचा कन्नट भाषेतही रिमेक आला. माझ्या मते, राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये दिसून आलेल्या काही चित्रपटात सद्यपरिस्थितीचं, वास्तवातं प्रमाण हे अगदी कमी प्रमाणात असतं. तसंच या चित्रपटांतील संगीत हे एवढे आकर्षक नसतं आणि या चित्रपटांचं योग्य पद्धतीने मार्केटिंगही होत नाही. याचा ही कुठे तरी या चित्रपटांवर प्रभाव पडत असतो आणि त्यामुळे ही या चित्रपटांना योग्य तो प्रेक्षक वर्ग मिळत नाही.
अक्षय अनभवणे, विवा कॉलेज

चित्रपटांना पुरक बदल व्हावेत
पूर्वी सिनेमा म्हणजे केवळ मनोरंजन एवढंच नव्हतं त्यामागे एखादा विषय मांडण्याचा प्रयत्न असायचा. आज मनोरंजन म्हटलं की सिनेमा अशी काहीशी ओळख झालीय. आजकालची तरुण मंडळी आशयघन सिनेमांकडे पाठ फिरवताना दिसते. आपण समाजाचे देणे लागतो याची जाणीव करून देणारे चित्रपट यामुळेच आजच्या कोटींच्या शर्यतीत मागे पडतात. आशयपूर्ण चित्रपटांना अनेक वितरक सहाय्य देण्यास नाक मुरडतात. फॅशन, नयनरम्य ठिकाणं, विनोदी कथा या भुरळ घालणाऱ्या गोष्टींमुळे प्रेक्षक व्यावसायिक चित्रपटांना प्राधान्य देतो. त्यामुळे आशयघन चित्रपट हे प्रेक्षकांच्या पसंतीस ठरतील अशा प्रकारे मांडण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. उत्कृष्ट कथा, संकलन, मुद्देसुद मांडणी, प्रभावी कलाकार मंडळी, सुश्राव्य संगीत याला आजचा प्रेक्षक आवर्जून दाद देतो. त्यामुळे या गोष्टींचा अभ्यास करून सादर केलेल्या चित्रपटाला नक्कीच यश मिळेल. त्याचबरोबर नियोजनबद्ध प्रमोशन ही आजच्या चित्रपटाची गरज आहे. चित्रपट हा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रमोशन झालं पाहिजे. वितरकांनीसुद्धा असे चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच असे चित्रपट आजच्या बॉक्स ऑफिसच्या शर्यतीत आपला ठसा उमटवतील. मराठी प्रेक्षकांनीही आपली मानसिकता बदलून सामाजिक संदेश देणारे किंबहुना आपली संस्कृती जपणाऱ्या चित्रपटांना प्राधान्य देण्याची गरज आहे. कदाचित त्यामुळे सामाजिक बदल घडण्यास हे चित्रपट पुरक ठरतील.
गौरी कोतवडेकर, पोदार कॉलेज

..तरच सिनेमा होतो लोकप्रिय
नुकतेच मराठी सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेत, हे आपण जाणून आहोत. पण वितरकांच्या अभावी हे सिनेमे प्रदर्शितच झालेले नसतात. या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळतात म्हणजे हे सिनेमे नक्कीच चांगल्या प्रतीचे, दर्जाचे असतात. पण ते लोकप्रिय होत नाहीत. याचं कारण तरुण मंडळींचं रोमँटिक आणि अॅक्शन सिनेमांकडे वाढतं आकर्षण. त्याशिवाय मराठी सिनेमे बघायला गेलं तर थोडे वैचारिक अथवा काही तरी संदेश देणाऱ्या स्वरूपाचे असतात. पण आताच्या तरुणाईची सिनेमातून काहीतरी चांगलं घेण्याची मानसिकता नाही. फक्त मनोरंजन हाच हेतू असतो. आताच्या तरुणाईचं बॉलीवूड, हॉलीवूड, टॉलीवूडचे चाहते असल्याकारणानं मराठी सिनेमांकडे दुर्लक्ष होतं. त्याच बरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रमोशन. हिंदी किंवा तामिळ सिनेमे असो, त्यांच प्रोमोशन किती मोठ्या प्रमाणात होतं. म्हणजेच संपूर्ण सिनेमा बनवायला खर्च लागला असेल त्याच्या अर्धा खर्च ते प्रोमोशनसाठी करतात. तिथेच तर आपण मागे पडतो. कारण आज मार्केटमध्ये एखादी वस्तू कितीही चांगली असो त्याची जाहिरात केल्याशिवाय विक्री होत नाही. उत्तम प्रमोशनेच सिनेमाला लोकप्रियता मिळते.
स्नेहल कोलते, एच. आर कॉलेज

प्रेक्षकांची मानसिकता कारणीभूत
आजपर्यंत मराठी पडद्यावर विविध विषयांवर भाष्य करणारे सिनेमे मिळाले किंवा येत आहेत. नवनवीन कलाकार आणि तंत्रज्ञानाच्या साथीने सिनेमांमध्ये रंगत आणण्यासाठी सिनेमावाल्यांकडून हरप्रकारे प्रयत्न झाले आणि होत आहेत. मराठीतील एकसो एक कलाकृतींना निरनिराळ्या पुरस्कारांच्या रूपाने वाहवा मिळतेय. पण हे सगळं जरी खरं असलं तरी मायबाप रसिकांकडून मात्र हवा तितका पाठिंबा आणि म्हणावा तसा लोकाश्रय मिळण्यात कमालीची कमतरता दिसून येते. माझ्या मते, समाजाची आणि रसिकांची मानसिकताच याला सर्वतोपरी जबाबदार आहेत. आजही फार कमी मराठी रसिक प्रेक्षक थेट सिनेमागृहात जाऊन सिनेमांचा आस्वाद घेताना दिसतात. अगदी हाकेच्या अंतरावर सिनेमागृह असलं तरी ‘अरे कशाला पैसे खर्च करतोस, महिन्याभरात टीव्हीवर येईल हा पिक्चर’ अशा स्वरुपाची विचारसरणी आज मराठी मायबाप रसिकांच्या मनात घर करून आहे. चांगल्या कलाकृतीला घर बसल्या शाब्बासकी देणारे आपण सिनेमागृहात जायला जाणूनबुजून कंटाळा करतो. परिणामी जगाच्या पाठीवर वाहवा मिळवणारे अनेक चित्रपट आणि कलाकृती लोकांसमोर येत नाहीत. कधी-कधी उत्कृष्ट कलाकृती आणि सादरीकरण यांनी साकारलेला सिनेमा असतानाही त्याला आपल्या या मानसिकतेमुळेच कमी लोकप्रियता मिळते. त्यामुळे आपली मानसिकता बदलणं किंवा नव्या पिढीकरवी ती बदलायला लावणं हाच यावर उपाय ठरेल असं मला वाटतं.
हर्षल शेटकर, एस. आय. डब्ल्यू. एस कॉलेज

केवळ मनोरंजन हाच उद्देश
सध्या मराठी सिनेमे यशाची शिखरं गाठत आहेत. त्याचबरोबर मराठी सिनेमांना अमराठी प्रेक्षकसुद्धा मोठ्या प्रमाणात लाभत आहेत. राष्ट्रीय पुरस्कारांमध्येही मराठी सिनेमांचे यश अगदी मोठ्या प्रमाणात दिसून येते. पण राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत नाही; याचं मुख्य कारण म्हणजे अशा चित्रपटांचे कमी प्रमाणात होणारे प्रमोशन. हे सिनेमे लोकांपर्यंत पोहोचण्यात कुठे तरी कमी पडतात; असं मला तरी वाटतं. व्यावसायिक चित्रपट अगदी मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात कारण त्यांचे मोठ्या प्रमाणात होणारे प्रमोशन आणि त्यातील प्रसिद्ध असे चेहरे. उत्कृष्ट विषय असलेल्या चित्रपटांना क्वचितच असं यश मिळतं. कारण माझ्या मते तरी सध्याच्या प्रेक्षक वर्गाला आशयघन चित्रपटांपेक्षा त्यांना फक्त त्याचे मनोरंजन करणारे चित्रपट जास्त आवडू लागले आहेत. ही एक दुःखाचीच बाब म्हणावी लागेल, असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण हेसुद्धा एकप्रकारे मराठी संस्कृतीचं नुकसानच आहे. पण ही परिस्थिती बदलू शकते जर आपण तरुणांनाही अशा चित्रपटांना पाठिंबा दिला तर!
निखिल अहिरे, सी. एच. एम. कॉलेज

बॉलीवूडची क्रेझ फार
'सैराट'सारख्या सिनेमांनी मराठी प्रेक्षकांना पुन्हा सिनेमागृहाकडे वळवलंय, पण तरीहीदेखील मराठी सिनेमांसाठी प्रेक्षक कमी असल्याचं प्रमुख कारण म्हणजे प्रेक्षकांपर्यंत सिनेमा न पोहोचणं आणि बॉलीवूडची असलेली क्रेझ. बॉलीवूड चित्रपटांचे प्रमोशन मोठ्या प्रमाणात होते. पण तसं मराठी चित्रपटांच्या बाबतीत घडत नाही. मराठी चित्रपट लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत आणि म्हणून मराठी सिनेमांना प्रेक्षकांचा आकडा कमी दिसतो. कॉलेजांमध्येही बोलबाला असतो तो बॉलीवूड चित्रपटांचाच. मराठी सिनेमांचे बजेट कमी असल्यामुळे प्रमोशन वर पैसे कमी खर्च करायचे हे गृहीतच धरलं जातं. त्याचप्रमाणे मराठी चित्रपट सोशल मीडियावर ही जास्त दिसत नाहीत. आजची तरूणाई ही सोशल मीडियावर जास्त असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा हा उत्तम मार्ग ठरू शकतो. पण तरीही देखील 'सैराट', 'व्हेंटिलेटर', 'नटसम्राट' यांसारख्या चित्रपटांमुळे मराठी सिनेमाला उत्तम प्रेक्षकवर्ग लाभला आहे. 'कासव', 'दशक्रिया' यांनी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नवीन मार्गांचा अवलंब करावा, जेणेकरून असे दर्जात्मक सिनेमे अनेक लोकांपर्यंत पोहोचतील. मराठी सिनेमा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर नक्कीच मराठी लोकांची पहिली पसंती बॉलीवूड नाही तर मराठी सिनेमांना असेल.
जय नलावडे, डहाणूकर कॉलेज

आर्थिक पाठबळ नसल्यामुळे
मराठी चित्रपट एक प्रकारची क्रांतीच करत आहेत. वेगवेगळे विषय आणि त्याला न्याय देत चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार मिळवत आहेत. चित्रपट वेगळ्या धाटणीचे असल्यामुळे त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवले जात असताना, मात्र हे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचतच नाही आणि पोहोचले तरी प्रेक्षक त्यांना नापसंती दर्शवताना दिसतात. हिंदी आणि दाक्षिण्यात सिनेमे जेवढी कमाई करतात तेवढी कमाई आणि त्यांच्या एवढी प्रसिद्धी मराठी चित्रपटांना महाराष्ट्रात मिळत नाही. याला जबाबदार म्हणजे मराठी चित्रपटांची पाहिजे तेवढी न होणारी जाहिरात, प्रसिद्धी आणि कमी असलेले आर्थिक पाठबळ. पुरेसे असे आर्थिक पाठबळ नसल्यामुळे कित्येक मराठी सिनेमे धूळ खात पडलेले असतात तर काही सिनेमागृहात येतात पण त्यांच्या विषयी कोणालाच काही माहिती नसतं. वेगवेगळे विषय, उत्कृष्ट संगीत आणि आधुनिक तंत्रज्ञ यामुळे मराठी चित्रपट अनेक पुरस्कारांनी गौरवले जात असताना, काही नवीन चित्रपट जे विषय आणि त्याची धाटणीमुळे गौरवले जात आहेत. त्याकडे मात्र मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होतंय. याला जबाबदार कुठे तरी प्रेक्षक आहेत. कारण त्यांनी असे चित्रपट फक्त एका वेगळ्या प्रेक्षकगटासाठी आहेत असा त्याचा गैरसमज झाला आहे.
अभिजित कानिंदे, पाटकर कॉलेज

मराठी चित्रपट गाजणार कधी?
मराठी सिनेमा असो किंवा हिंदी तो बघायच्या आधी आपण त्या सिनेमात कोणकोणते अभिनेते/अभिनेत्री आहेत. त्यानंतर सिनेमाचा विषय काय आहे, हे पाहतो. यावरुन एक लक्षात येतं की, हिंदी सिनेमे, मराठी सिनेमांना लोकाश्रय का मिळू देत नाहीत. लोकाश्रय मिळवण्यसाठी मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपट यांच्यात चढाओढ दिसते पण तेव्हाच जेव्हा मराठी प्रेक्षक, मराठी चित्रपटाच्या बाजूने उभे राहतात. सैराट, दुनियादारी या चित्रपटांना आपण डोक्यावर घेतलं. त्यामागे कारण की ते व्यावसायिक सिनेमे आहेत. लोकाश्रय तेव्हाच मिळेल जेव्हा मराठी प्रेक्षक आपल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपटांना वाव देतील.
शीतल कारवार, आयडॉल

कथेवर लक्ष केंद्रित करावं
आपले मराठी चित्रपट मागे राहण्यात महत्त्वाचं कारण त्या चित्रपटाबद्दल लोकांच्या मनात असलेली प्रतिमा हे आहे. अनेकांच्या मनात अजूनही तिच मराठी चित्रपटांबद्दल सुमार कल्पना आहे. ती कुठेतरी बदलली पाहिजे. तसंच मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शकाने चित्रपटांच्या नावावर लक्ष द्यावं, असं माझं प्रामाणिक मत आहे. सर्वप्रथम सिनेमाचं नाव प्रेक्षकांच्या कानावर पडतं. त्या नावावरुनच त्या सिनेमाची सर्वप्रथम कल्पना तयार होत असते. सिनेमाचं नाव जितकं आकर्षक तितकंच सिनेमा लोकांना आवडण्याची शक्यता जास्त असते. त्याप्रमाणेच दिग्दर्शकाने चित्रपटांच्या कथेवर लक्ष द्यावं. सिनेमाची कथा ही नावाप्रमाणे प्रभावशाली असली पाहिजे. सध्याच्या पिढीला असे सिनेमे आवडतात जे समाजाच्या चुकीच्या रुढी, परंपरा यावर बोट दाखवणारे असावे. सिनेमांनी समाज मनाचं प्रबोधन केलं पाहिजे. चित्रपटाची गाणी देखील चांगली असली पाहिजेत. एकंदरीत दिग्दर्शकाने सिनेमातील सर्व गोष्टी या प्रेक्षकांची ओळख जोखून केल्या पाहिजेत. 'कासव', 'अस्तु', 'दशक्रिया' अशा सिनेमांना तर राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. पण अशा सिनेमांना लोकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. किमान अशा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमांना तरी लोकांनी पाठिंबा दिला पाहिजे. ज्याप्रमाणे दक्षिणेतील लोक त्यांच्या सिनेमांना भरघोस पाठिंबा देतात. तसंच मराठी सिनेमांबाबत घडलं पाहिजे. आता वेळ आहे ती मराठी सिनेमांबाबत लोकांच्या मनात असलेला दृष्टिकोन बदलण्याची.
कार्तिक जाधव, गुरु नानक कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रणाम महाराष्ट्र देशा!

$
0
0

शिवरायांसारखा प्रेरणादायी आदर्श राजा, संत आणि ग्रंथांचे संस्कार, निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण, खाद्यसंस्कृतीचं वैभव इथपासून ते आधुनिक महाराष्ट्राचे चेहरे असलेले डॉ. रघुनाथ माशेलकर, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर अशी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे महाराष्ट्र. विविधतेचा संगम म्हणजे महाराष्ट्र ही आजच्या तरुणाईने केलेली आपल्या राज्याची व्याख्या आहे. महाराष्ट्रीय असल्याचा गर्व, अभिमान प्रत्येक तरुणाच्या मनात कायम आहेच. हा सुंदर, संपन्न महाराष्ट्र नेमका कोणत्या-कोणत्या गोष्टींसाठी तरुणांना प्रिय आहे, हे वाचा आजच्या युवा कट्टावर.

यावेळच्या युवा कट्टात सहभागी झालेलं मुंबई विद्यापीठ आणि संलग्न कॉलेजेस

• आयडॉल विद्यापीठ
•सेंट झेविअर्स कॉलेज (फोर्ट)
•सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स (फोर्ट)
•एच. आर कॉलेज (चर्चगेट)
•बी.एम. रुईया गर्ल्स कॉलेज (ग्रँट रोड)
•एम.डी कॉलेज (परळ)
•डहाणूकर कॉलेज (विलेपार्ले)
•तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स (अंधेरी)
•शैलेंद्र कॉलेज (दहिसर)
•रुईया कॉलेज (माटुंगा)
•वेलिंगकर इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट (माटुंगा)
•झुनझुनवाला कॉलेज (घाटकोपर)
•बी. एन बांदोडकर कॉलेज (ठाणे)
•जोशी-बेडेकर कॉलेज (ठाणे)
•एफ. जी. नाईक कॉलेज (कोपरखैरणे)
•बिर्ला कॉलेज (कल्याण)
•सीएचएम कॉलेज (उल्हासनगर)
•आदर्श कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स (बदलापूर)
•गुरु नानक कॉलेज (माटुंगा)


वैभवशाली परंपरेची भुरळ
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
ज्या महाराष्ट्राच्या मातीत शिवबा खेळले, झाशीची राणी, भगतसिंग, सुखदेव अशा कितीतरी क्रांतीकारकांनी आणि समाजसेवकांनी या महाराष्ट्रासाठी स्वतःचे प्राण गमावले. आमच्या पूर्वजांचा हा पराक्रम, धाडसी वृत्ती मला फार आवडते. इथल्या परंपरा, सण-उत्सव साजऱ्या करण्याच्या पद्धती अशा कितीतरी असामान्य गोष्टींमुळे हा महाराष्ट मला खूप प्रिय आहे. महाराष्ट मला आवडण्याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे कोकणाचे निसर्ग सौंदर्य, किल्ले, समुद्र किनारे अशा मन भुलवून टाकणाऱ्या आणि पुरणपोळी तांबड-पांढरा रस्सा, लोणचं-पापड, चटण्या हे माझ्या महाराष्ट्राची खासियत आहे आणि याचंच मला अप्रूप आहे.
भक्ती पालांडे, तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स

रंजक इतिहास, वैविध्यपूर्ण निसर्ग
महाराष्ट्राचा इतिहासच इतका थोर आहे की, त्याचा सर्वांनाच गर्व वाटावा. शिवाजी महाराजांसारखा कर्तव्य व प्रजाहितदक्ष राजा या राज्यात होऊन गेला, त्यांचे अनेक शिलेदार व मावळे स्वराज्यासाठी लढून याच मातीत धारातीर्थी पडले. जितका रंजक इथला इतिहास तितकाच इथला निसर्ग वैविध्यपूर्ण! इथला कोकण किनारा, समुद्र, पर्वत, घनदाट अरण्य, वन्यजीवसृष्टी देखील विविधतेने नटलेली आहे. हाच राकट आणि कणखर महाराष्ट्र कलाकारांचा देश आहे. इथली लावणी, पोवाडे, कोळीगीतं, भारुड हे सर्वांना भुरळ घालतात. इथली रंगभूमी, नाट्यगीते सारी जगावेगळीच! इथली पुरणपोळी, मुबंईचा लोकप्रिय वडापाव, कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा, सातारचे कंदीपेढे, पुणेरी मिसळ म्हणजे महाराष्ट्राची वेगळीच ओळख. मला इथला इतिहास, निसर्ग, कला परंपरा व खाद्यसंस्कृती या मुख्य कारणांमुळे महाराष्ट्र प्रिय आहे.
वृषाली भामरे, एच. आर कॉलेज

गडकिल्ले आकर्षित करतात!
महाराष्ट्र हा भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, आर्थिक अशा सर्वच बाबतीत संपन्न आहे. प्रवासासाठी चांगले लोहमार्ग, पक्के रस्ते, चांगली आणि स्वच्छ उपाहारगृहे, धर्मशाळा यांची येथे रेलचेल आहे. अजिंठा लेणी, मुंबई, थंड हवेची ठिकाणं, किल्ले व इतर ऐतिहासिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक दिसून येतात. महाराष्ट्रातील कोल्हापुरी चप्पल आणि पैठणी साड्या जगभर प्रसिद्ध आहे. आपल्या समृद्ध संगीत आणि लोकनृत्यासाठी महाराष्ट्र संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील लावणी, भारूड, पोवाडा आणि गोंधळ हे महाराष्ट्रातील लोकसंगीताचा पगडा आजही लोकांच्या मनावर आहे. तसंच महाराष्ट्राचे गडकिल्ले, पर्यटन स्थळं देशविदेशातील पर्यटकांना भुरळ घालतात. महाराष्ट्राला लाभलेलं हे भौगोलिक वैभव मला खूप आवडतं.
शीतल कारवार, आयडॉल विद्यापीठ

सार्थ अभिमान
आपला महाराष्ट्र डोंगर रांगा, समुद्र, नद्या, जंगल, अभयारण्ये, घाटरस्ते इ. नैसर्गिक विविधतेने नटलेला आहे. देशाच्या विकासात महाराष्ट्र राज्य महत्त्वाची भूमिका निभावत आहे. भारतीय इतिहासात महाराष्ट्राला फार महत्त्व आहे. याच माझ्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांसारख्या थोर व्यक्तिमत्त्वांचा जन्म झाला. महाराष्ट्रातील गडकिल्ले, लेण्या, शिल्पे, प्राचीन वास्तू यांना ऐतिहासिक महत्त्व आहे. महाराष्ट्रातील अनेक जवान आज भारतमातेचे आणि पर्यायाने कोट्यवधींच्या संख्येने असलेल्या भारतीयांचे सीमारेषेवर रक्षण करत आहेत. महाराष्ट्राच्या वीर सुपुत्रांनी देशाच्या संरक्षणात नेहमीच मोलाची भूमिका बजावली आहे. या तीन मुख्य कारणांमुळे मला महाराष्ट्र खूप आवडतो. मला महाराष्ट्राचा आणि मराठी असल्याचा सार्थ अभिमान आहे.
वैभव पुरव, डहाणूकर कॉलेज

शान काही औरच
महाराष्ट्र ही संतांची भूमी मानली जाते. संतांच्या शिकवणी, चांगले विचार, आदर्श जीवन जगण्याचा मार्ग त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला खुला करून दिला. याच संतांनी मराठी संस्कृतीची पायाभरणी केली. रायगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग इत्यादी किल्ल्यांमधून महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास दिसून येतो. याच भूमीत शिवाजी महाराजांसारखा एक महान राजा मिळाला. महाराष्ट्रात पंढरपूर, तुळजापूर, कोल्हापूर व इतर अनेक ठिकाणी तीर्थस्थळे व हिंदूची प्राचीन मंदिरे आहेत. प्रत्येक राज्याची एक वेगळी खासियत असते, तशा आमच्या महाराष्ट्राची शान काही औरच आहे. इथे अहिराणी, मालवणी, कोकणी अशा अनेक मराठी भाषेच्या वेगवेगळ्या छटा पाहायला मिळतात. प्रत्येकाच्या खाण्यापिण्याच्या, सण साजरे करण्याच्या पद्धती थोड्या वेगळ्या, पण नात्यातला गोडवा मात्र अवीट ठेवणाऱ्या आहेत. म्हणूनच 'जय जय महाराष्ट्र माझा' म्हणताना ऊर अभिमानाने भरून येतो.
पूजा चेंडके, तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स

साहित्यातील आपलेपणा भावतो
'गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा', हे वाक्य म्हणण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. मला स्वतःला महाराष्ट्र का आवडतो याचीसुद्धा कारणं अनेक आहेत. 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' ही उक्ती अगदी सार्थ ठरते. आपली राज्यभाषा असलेली मराठी भाषा हे तर एक मुख्य कारण आहे. मराठी भाषा ही जशी मराठी माणसाला समृद्ध करते तसंच ती महाराष्ट्राला सुद्धा प्रतिभाशाली बनवते. महाराष्ट्राचं निसर्ग सौंदर्य याची ख्याती तर सातासमुद्रापार आहे. सह्याद्रीच्या रांगा, सुंदर अशी निसर्गाने नटलेली गावं, प्राचीन इतिहासाची साक्ष देणारे गड-किल्ले असं निसर्ग सौंदर्य प्रत्येकाला भुरळ पाडतं. तिसरं कारण म्हणजे महाराष्ट्रात होऊन गेलेलं अनेक कवी, लेखक आणि त्यांच्या साहित्यातील आपलेपणा मला खूप भावतो.
अपेक्षा इंगळे, सीएचएम कॉलेज

मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा
अनेक कविवर्यांनी महाराष्ट्राचं अगदी सुंदर अशा शब्दात वर्णन केलंय. मला महाराष्ट्र का आवडतो याची द्यावी तितकी कारणं कमीच पडतील. महाराष्ट्राविषयी आदर वाटण्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांचा सुवर्ण असा इतिहास वाचल्यावर महाराष्ट्र आणखीनच आवडायला लागतो. महाराजांनी उभारलेलं हिंदवी स्वराज्य आज आपण महाराष्ट्राच्या रूपात पाहतोय, असं म्हंटल तरी हरकत नाही. दुसरं कारण म्हणजे महाराष्ट्राची राज्यभाषा म्हणजेच आपली मराठी भाषा. नवव्या शतकापासून प्रचलित असलेली शालिनपूर्ण अशी भाषा महाराष्ट्राला अजून समृद्ध करते आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्राच निसर्ग सौंदर्य. इथलं निसर्ग सौंदर्य येथील गड-किल्ले अनेक पर्यटकांना भुरळ घालतात. अशा या प्रतिभावान महाराष्ट्रासाठी ईश्वरा जवळ एकच प्राथर्ना आहे की, 'अखंड राहो सदा हे शिवराष्ट्र'.
निखिल अहिरे, सीएचएम कॉलेज

सांगावी तेवढी थोरवी कमी
आज संपूर्ण भारतात महाराष्ट्र हे एक प्रगतशील राज्य म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्राच्या सर्वच गोष्टी मला आवडतात. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे, महाराष्ट्राचा निसर्ग. पश्चिमेला सुमारे ७२० किमी लांबीची समुद्रकिनारपट्टी महाराष्ट्राला लाभलेली आहे. तर पूर्वेकडे घाटमाथ्याचा प्रदेश आहे. सह्याद्री पर्वतरांगेमुळे दऱ्याखोऱ्यांचं एक अविस्मरणीय चित्रसुद्धा पाहायला मिळतं. महाराष्ट्राची मला आवडणारी दुसरी गोष्ट म्हणजे 'महाराष्ट्राचे महापुरुष'. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास स्वामी यांसारख्या संतांच्या जन्माने ही भूमी पवित्र झाली. एक कर्तृत्ववान राजा म्हणून ज्यांची कीर्ती जगभर पोहोचली, ते छत्रपती शिवाजी महाराज याच मातीत घडले. महाराष्ट्राची मला आवडणारी अजून एक गोष्ट म्हणजे, 'महाराष्ट्राची संस्कृती'. आधुनिकीकरणाकडे वळत असतानासुद्धा, महाराष्ट्राने आपली संस्कृती कधीच सोडली नाही. अशा या माझ्या महाराष्ट्राची सांगावी तेवढी थोरवी कमीच आहे.
सौरभ शेलार, शैलेंद्र कॉलेज

ध्यास संस्कृती जपण्याचा
अर्थात, मला माझ्या महाराष्ट्राचा अभिमान आहे. महाराष्ट्राला खूप मोठी संतांची देणगी लाभलीय, ज्यांनी विश्वाच कोडं ग्रंथबद्ध करून ठेवलंय. अलिबागपासून मालवणपर्यंत असलेली समृद्ध किनारपट्टी आणि तिच्या रक्षणासाठी उभा असलेला सिंधुदुर्ग हा आपल्या इतिहासाचा साक्षीदारच आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राला खाद्य संस्कृतीची जुनी परंपरा आहे, वऱ्हाडी, खानदेशी, मालवणी अशा वेगवेगळ्या प्रांतातली यादी तयार होईल. पण खरंच आपल्याला मिळालेला हा समृद्ध वारसा टिकवून ठेवला पाहिजे; कारण आपली नाळ इथल्या मातीशी जोडलीय. बदल हा अपेक्षित आहे, पण त्यामुळे आपला सांस्कृतिक ठेवा तर नष्ट होत नाही ना याची काळजी आपण घेऊया.
नागेश सुतार, मुंबई विद्यापीठ

नावडण्यासारखं काहीच नाही
महाराष्ट्र या नावातच सर्व काही सामावलेलं आहे. इतिहास, कला, निसर्ग, साहित्य, पाककला या सगळ्यात इतकं वैविध्य क्वचितच जगात आढळेल. हाच तो महाराष्ट्र जिथे अनेक वीर स्वराज्यासाठी लढले आणि कैक धारातिर्थी पडले. याच वीरपुरूषांनी आपला भगवा अगदी अटकेपार फडकावला. त्याशिवाय कोकण किनारा, समुद्र ,सह्याद्री पर्वत, घनदाट अरण्ये, इथली वन्यजीवसुष्टी देखील विविधतेने नटलेली आहे. या सर्वांसोबत कलेच्या बाबतीतही आमचा महाराष्ट्र पुढेच आहे. वारली कला, बिद्री कला, सावंतवाडीची लाकडी खेळणी, कोल्हापूरी चपला हे सारं प्रसिद्ध तर आहेच पण पैठणी, नारायणी पैठ या तर यात आणखी भर घालतात. महाराष्ट्रीयन जेवण म्हणजे तर स्वर्गाहुन सुंदर! अशा माझ्या परिपूर्ण, वैविध्यपूर्ण महाराष्ट्राला नाकारण्यासाठी एकही कारण शोधून सापडणार नाही.
प्रतिक्षा शिंदे, बी.एम. रुईया गर्ल्स कॉलेज

आपुलकी जपाणारा, माझा महाराष्ट्र
संतांची, देशधर्मासाठी प्राण वेचणाऱ्या योद्धांची व वीरांची भूमी, साहित्यिकांची भूमी, स्वर्गाहून सुंदर अशी महाराष्ट्र भूमी. मराठी रयतेच्या मनात अधिराज्य गाजवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. येथील नद्या, दगड, किल्ले, माती शौर्याची व संतांच्या कार्याची साक्ष देतात. मी महाराष्ट्रात जन्माला आलो, हे मी माझं भाग्य समजतो. हे महान असं राष्ट्र आपुलकीची नाती नेहमी बांधतो. म्हणून मला महाराष्ट्र आवडतो. संपूर्ण देशाला अभिमान वाटेल असा माझा महाराष्ट्र जन्माला येणाऱ्यांचे भाग्य म्हणजे ऐकण्यास मिळणाऱ्या यशोगाथा.
देवल महाडीक, सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स

...म्हणून वाटतो आपलासा
महाराष्ट्रात जन्मल्याचा मला अभिमान नक्कीच आहे. भारताला अनेक देणग्या महाराष्ट्राने दिल्या आहेत. लोकमान्य टिळक, आगरकर, स्वातंत्रवीर सावरकर यासारखे अनेक विचारवंत महाराष्ट्रात होऊन गेले. समाजात चालू असणाऱ्या घडामोडींकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन त्यांनी दिला, नवीन विचार करण्याची प्रेरणा दिली. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या साहित्याने पवित्र झालेला आपला महाराष्ट्र आहे. अनेक दिग्गज साहित्यिकांनी दिलेल्या अमूल्य देणगीमुळे मला महाराष्ट्र आपलासा वाटतो.
कुणाल मानकमे, रुईया कॉलेज

गर्व आहे मला!
महाराष्ट्राची माती पवित्र आहे. याच मातीतून शिवाजी आणि संभाजी हे वीरपुत्र जन्माला आले. जेवढा भारी इकडचा इतिहास तेवढाच भारी इथला निसर्ग विविधतेने नटनलेला! महाराष्ट्र म्हणजे संतांची भुमी, कलेचं माहेरघर आणि महाराष्ट्र म्हणजे अभिमानाने मान उंच करुन सांगणाऱ्यांचं महान असं राष्ट्र. महाराष्ट्रातले पदार्थांचं वर्णन करायला शब्दच अपुरे पडतात. वेड लावणारा हापूस आंबा देखील महाराष्ट्राचाच! इकडची ठस्केबाज लावणी, भारुड, कोळीगीत, लोकगीत हे खूप प्रसिध्द आहे. सह्याद्री पर्वत, समुद्र, विविध वन्यजीव, अभयारण्ये विविधतेने नटलेला असं माझं महाराष्ट्र राज्य आहे. अशा या सप्तरंगी महाराष्ट्राचा मला खूप अभिमान आहे. मला गर्व आहे की, मी या महाराष्ट्राची मुलगी आहे.
दर्शना पवार, बिर्ला कॉलेज

सुजलाम् सुफलाम् भूमी
महाराष्ट्राची ही भूमी शौर्याची, त्यागाची, बलिदानाची आणि स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवरायांची आहे. सुजलाम् सुफलाम् महाराष्ट्रात आकाशाशी स्पर्धा करणारा सह्याद्री म्हणजे उदात्त मराठी मनाच्या महत्वकांक्षाचे प्रतीक आहे. अफाट समुद्रकिनारा लाभलेल्या या महाराष्ट्रात फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटा जेव्हा किनाऱ्यावर आदळतात तेव्हा त्यात आवाज असतो छत्रपतींच्या कर्तृत्वाचा! महाराष्ट्राचा वारसा, संस्कृतीची ओळख आणि मानबिंदू जपणारी तसंच येथील हजारो वर्षे जुनी असलेली निशब्द वास्तू म्हणजे लेण्या आणि मंदिरे! निसर्गाची मुक्तहस्तपणे उधळण आपल्याला कोकणात पहावयांस मिळते. येथील माणसंसुद्धा ‘येवा कोकण आपलाच असा’, म्हणत प्रेमाने स्वागत करतात. असा आहे आपला महाराष्ट्र,सर्वांचा प्रिय महाराष्ट्र!
सागर सुर्वे, आदर्श कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स

थोरांची भूमी
पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, आचार्य अत्रे, रणजित देसाई, कवी ग्रेस, बालकवी हे आणि यांसारखे अनेक दिग्ग्ज लेखक आणि कवी महाराष्ट्राला लाभले. महाराष्ट्रीय जेवण तर सगळ्यात सुंदर असून देश-विदेशातील लोक इथे जेवायला येतात. इथल्या प्रत्येक शहराला आपली अशी एक खाद्य संस्कृती लाभलेली आहे. तर, कणखर आणि राकट असून सर्वांना आपलंसं करणारा, मुलांसारखा जपणारा, शूरवीरांची भूमी असणारा आणि संतांची परंपरा लाभलेला असा हा महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र आहे.
ईशान कल्याणकर , एफ. जी. नाईक कॉलेज

परंपरा जपत आधुनिकतेचे स्वागत
महान असे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याची जेवढी किर्ती सांगू तेवढी कमीच आहे. महाराष्ट्र म्हणजे शिवराज्याचा सुवर्णकाळ, महाराष्ट्र म्हणजे संत-वारकऱ्यांचे संस्कार, महाराष्ट्र म्हणजे सण-उत्सवांची परंपरा, महाराष्ट्र म्हणजे उज्ज्वल भविष्यकाळ अन देशाचा अभिमान.....अशा विविध रूपांनी आपल्या महाराष्ट्राला ओळखलं जातं. आधुनिक संस्कृतीने नटलेल्या महाराष्ट्राला ऐतिहासिक, सांस्कृतिक, भौगोलिक वारसा लाभलेला आहे. यामुळे महाराष्ट्र समृद्ध झाला आहे. संत वारकरी यांनी सांगितलेले अभंग खूप काही शिकवून जातात. त्यातून अमूल्य अशी शिकवण मिळते. शिवाजी महाराजांनी विजय मिळवलेले आणि इतर किल्ले या ऐतिहासिक वास्तुमधून तर प्रचंड ज्ञानज्योत फुलते. महाराष्ट्रात असणारी थंड हवेची ठिकाणं, पर्यटन स्थळं यासाठीसुद्धा महाराष्ट्र प्रख्यात आहे. महाराष्ट्रातील सण-उत्सव, परंपरा, व्रतवैकल्य, चालीरीती कला- क्रीडा, सांस्कृतिक-ऐतिहासिक वास्तू यामुळे मला महाराष्ट्र आवडतो.
कांचन गावस्कर, एच. आर कॉलेज

जय, जय महाराष्ट्र माझा
प्रत्येक माणसाला आपल्या राज्याचा अभिमान असतो तसाच मलाही माझ्या महाराष्ट्राचा खूप अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवलेले गडकिल्ले आपल्या राज्याचं वैभवच आहे. आज महाराष्ट्र हे देशातील एक अग्रेसर राज्य आहे. तसंच आपल्या महाराष्ट्राला परंपरेचा प्राचीन वारसा आहे. महाराष्टाला कला, साहित्य, क्रीडा, शिक्षण, राजकारण आणि प्रामुख्याने समाजकारण या सर्व गोष्टींची एक ऐतिहासिक परंपरा आहे. या सर्व गोष्टींमुळे महाराष्ट्राने नेहमीच आपली वेगळी ओळख संपूर्ण देशात निर्माण केलीय. मला महाराष्ट्र आवडतो, कारण महाराष्ट्राला लाभलेल्या इतिहासामुळे.. खूप गोष्टी त्यातून शिकण्यासारख्या आहेत. दुसरं म्हणजे महाराष्ट्राला लाभलेली नैसर्गिक देणगी. तसंच महाराष्ट्राला लाभलेला थोर विचारवंतचा वैचारिक वारसा. त्यामुळे महाराष्ट्र हा किती समृद्ध आहे हे दिसून येतं. म्हणूनच अभिमानने म्हणावंसं वाटत मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र
बिपिन जाधव, वेलिंगकर इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट

राकट देशा, कणखर देशा
महाराष्ट्र म्हणजे शिवरायांचा सुवर्णकाळ हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. या मराठमोळ्या मातीत अनेक शूर वीर, महापुरुष, तसंच संतांचा जन्म झाला. कवी महाराष्ट्राचं वर्णन करताना म्हणतात, ' राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा'. जेव्हा-जेव्हा आपल्या देशावर संकट आलं तेव्हा-तेव्हा महाराष्ट्र जनतेच्या रक्षणासाठी उभा राहिला. म्हणूनच शौर्य आणि पराक्रमाची फार मोठी परंपरा ही महाराष्ट्राला आहे. असा हा आपला महाराष्ट्र विविध संस्कृतीने, सण- उत्सवांनी, विभिन्नतेने नटलेला हा माझा महाराष्ट्र खूपच बहुमूल्य आहे.
पौर्णिमा बसवणकर, झुनझुनवाला कॉलेज

सर्वांग सुंदर असा महाराष्ट्र

सर्वांगी शोभतो सह्याद्रीचा वेश
राकट, दणकट, बलदंड,
सदैव राहो एकसंघ नी अखंड...
महाराष्ट्र हा सुसंस्कृत, संस्कारी आणि विविध भाषा या विविधतेने नटलेला आहे. महाराष्ट्राला लाभलेली अद्भुत पर्यटन स्थळं आणि तिथल्या वेगळेपणाची छवी ही प्रत्येकाच्या हृदयात उमटते. तसंच इथला इतिहास हा अविस्मरणीय आहे. जीवाची पर्वा न करता महाराष्ट्र टिकावा यासाठी मावळे, राजे यांची कामगिरी, किल्ले, कला, कलाकृती या सर्वांमुळे महाराष्ट्र सर्वांत वेगळा आणि सर्वांनाच भुरळ घालणारा आहे.
साक्षी तावडे, झुनझुनवाला कॉलेज

प्रगती करणं आमचंच कर्तव्य
आपल्यासारख्या मराठी तसंच इतर राज्यातील पारिभाषिक लोकांचा आधार महाराष्ट्र आहे. आशा या आपल्या महाराष्ट्रात देवतांचा तसंच संतांचा वास आहे. सण, नृत्य, वेशभूषा, बोलीभाषा, राहणीमान अशा विविध अंगांचं दर्शन आपल्या या महाराष्ट्रात घडून येतं. आपल्या या महान महाराष्ट्रात अनेक पर्यटन स्थळं असल्याने देशविदेशातील लोकांना आपल्या महाराष्ट्राची भुरळ पडली आहे. म्हणून असा हा महाराष्ट्र मला खूप आवडतो आणि त्याचा मला फार अभिमान आहे. असं असलं तरी माझ्या मित्रांनो, महाराष्ट्र आपला आहे. त्याची आणखीन प्रगती करणं हे आपल्याच हातात आहे, सारे एकत्र येऊया.
दुर्वांक तेली, एम.डी कॉलेज

खाद्यसंस्कृतीचा आनंद निराळाच
महाराष्ट्र हा भौगोलिक दृष्ट्या संपन्न आहे. येथे प्रचंड मोठा समुद्र किनारा तसंच राज्याच्या संरक्षणासाठी सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत. सतत खळखळणाऱ्या नद्यासुद्धा या राज्यात आहे. पर्यटन, शेती, उद्योग, पशुपालन वैगेरे हे येथले मुख्य व्यवसाय आहे. माझ्या या महाराष्ट्रात विविधतेत एकता आहे. येथे सणावार आणि उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे करतात. त्यामुळे येथे संस्कृतीचीही जपवणूक होते. शिवाजी महाराजांचे गडकिल्ले या राज्यांची शान आहे आणि अजिंठा-वेरुळसारख्या लेण्यांची शिल्पकृतीचा आम्हाला अभिमान आहे. जागरण गोंधळ, लावणी पोवाडे, भजन-कीर्तन यामुळे महाराष्ट्रांची ओळख चटकन पटते. येथली खाद्य संस्कृती झुणका भाकर, वडा-पाव, पुरणपोळी वैगेरे ही आहे आणि त्यांचा आनंद निराळाच आहे.
अनिरुद्ध गायकवाड, सेंट झेविअर्स कॉलेज

नवरत्नांची खाण
शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने, सावरकरांच्या मातृभूमी विषयाच्या ओढीने आणि देशभक्तीने वि. दा. करंदीकर, पु. ल. देशपांडे यांसारख्या प्रतिभावंत आणि आपल्याला लेखणीतून साऱ्या जगाला वेड लावणाऱ्या कवितेतून, सचिन तेंडुलकरसारख्या महान खेळाडूने आणि लता दीदींसारख्या गायिकेने ही महाराष्ट्र भूमी पावन झाली आहे. नवरत्नांची खाण अशी महाराष्ट्राची ओळख आहे. प्रांताप्रांताप्रमाणे पदार्थांची खासियत आणि तेथील भाषा ही महाराष्ट्राची ओळख आहे. कोकणातील आंबा, काजू, समुद्र आणि मांसाहारी पदार्थ, कोल्हापुरातील रस्सा आणि मिसळ, पुण्यातील अनेक नामांकित स्थळं, मुंबईमधील सण आणि उत्सव, नागपूर, जळगाव आणि लातूरमधील अनेक खाद्यपदार्थ जगभर प्रसिद्ध आहे. कुठल्याही प्रसंगाशी धैर्याने सामोरं जायचं अनेक उत्सवांच्या वेळी एकत्र यायचे आणि गडकिल्ले, नद्या, समुद्र, पदार्थ आणि भाषेतील गोडवा यामुळे मला महाराष्ट्र खूप प्रिय आहे.
निखिल मालवणकर, डहाणूकर कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विनोदातही हवं गांभीर्य

$
0
0


हसणं-हसवणं हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग. मनोरंजनाची विविध माध्यमं समोर असताना, कॉमेडी करणारे बरेचजण मात्र, खळखळून कसं हसवावं हेच विसरत चालले आहेत. कारण मुळात हसवण्यासाठीही गांभीर्य हे असावंच लागतं. ७ मे रोजी असणाऱ्या ‘वर्ल्ड लाफ्टर डे’च्या निमित्तानं, तरुणाई या विषयावर अगदी भरभरुन व्यक्त झालीय...

यावेळच्या युवा कट्टात सहभागी झालेलं मुंबई विद्यापीठ आणि संलग्न कॉलेजेस
• सेंट झेविअर्स कॉलेज (फोर्ट)
•सिडनहॅम कॅालेज ऑफ कॅामर्स अँड इकोनॅामिक्स (चर्चगेट)
•चेतना कॉलेज (वांद्रे)
•साठ्ये कॉलेज (विलेपार्ले)
•तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स (अंधेरी)
•एम. डी कॉलेज (परळ)
•पोदार कॉलेज (माटुंगा)
•गुरु नानक खालसा कॉलेज (माटुंगा)
•एस. के. सोमैय्या कॉलेज (विद्याविहार)
•विकास रात्र कॉलेज (विक्रोळी)
•बी. एन. बांदोडकर कॉलेज (ठाणे)
•इंदिरा गांधी कॉलेज (कोपरखैराणे)
•बिर्ला कॉलेज (कल्याण)
•सीएचएम कॉलेज (उल्हासनगर)
•बी.आर.हर्णे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (वांगणी)

थोडा कम, थोडा ज्यादा
विनोदामुळे माणसाला त्याच्या आयुष्यातील दुःखाचा थोडा वेळ का होईना पण विसर पडतो. अनेक विनोदी कार्यक्रमांद्वारे लोकांना हसवण्याचा, त्यांच्या डोक्यावरील कामाचा ताण कमी करण्याचा प्रयत्न अनेक टीव्ही शोज करताना दिसतात. अनेक लहान- सहान गोष्टींद्वारे विनोद करून लोकांना हसवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. पण काही वेळा त्यांच्या प्रयत्नांना तेवढं यश मिळत नाही. विनोद करताना तो कोणत्याही व्यक्तीच्या शारीरिक व्यंगावर नसावा. तसंच विनोदी कलाकारांनी विनोद करताना कोणाचाही अपमान होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कारण यामुळे भांडणं होण्याची ही शक्यता असते. तसंच आजकाल विनोदी कार्यक्रमांमधून समाज प्रबोधनाचं कार्यही केलं जातं, ही एक उत्तम बाब आहे. माणसाला हसवून, त्याला न दुखावता त्याच्या स्वभावातील उणीवा दाखवण्याचं कार्य अनेक विनोदी कलाकार करत आहेत. समाजातील अंधश्रद्धा, विचित्र रूढी परंपरा अशा अनेक गोष्टी विनोदी कार्यक्रमांमध्ये दाखवून त्यांना कसा आळा घालता येईल यासाठीचे उपायही सांगितले जातात, जे आजच्या काळासाठी खूप गरजेचं आहे.
नेहा जाधव, तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स

कोणतंही बंधन नकोच!
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात दिवसा अखेरीस येणारा मानसिक आणि शारीरिक थकवा दूर व्हावा म्हणून विनोदी मालिका हा एक चांगला पर्याय आहे. पण आजकाल विनोदाची पद्धत बदललेली आहे आणि त्यामागे तशी कारणंही आहेत. त्यात मुख्य म्हणजे बदलेला प्रेक्षक वर्ग, त्याप्रमाणे विनोदाचे विषय आणि पद्धत ही बदलत गेली. त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही, कारण जर का ते चूक असतं तर ज्याप्रमाणे आपण एखादा रोमँटिक सिन आल्यावर चॅनल बदलतो तसंच या विनोदी मालिकांच्या ही बाबतीत केलं असतं. याउलट हे शो पूर्ण कुटुंबासहित बघितले जातात. त्यामुळे विनोदाला कोणतंही बंधन नसावं, असं मला वाटतं. पण त्याचबरोबर त्या विनोदी कलाकाराने प्रेक्षकांच्या भावनांचा सन्मान करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. ओघळणाऱ्या अश्रूंना गालावर हसवून थांबवण्याचे सामर्थ्य हे फक्त विनोदात आहे आणि त्याला अंगविक्षेप, कंबरेखालचे विनोद या बंधनात अडकवून ठेवण्याची काही गरज मला वाटत नाही. निखळ विनोद हा प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद देण्याचं काम करतो आणि त्याने ते करतच राहावं.
उदय गावडे, बिर्ला कॉलेज

टीआरपी मिळवण्याच्या नादात...
रोजच्या धकाधकीच्या जीवनात एक विरंगुळा म्हणून प्रत्येकजण टीव्ही वरील अनेक कॉमेडी मालिका पाहत असतात. त्यातील निखळ विनोद पाहून प्रत्येकजण थोडा वेळ का होईना मनापासून हसतो. पण आता असं होताना दिसत नाही. कॉमेडीला मरण नाही या उक्तीनुसार प्रत्येक चॅनेल विशिष्ट कालावधीनंतर एक तरी कॉमेडी मालिका काढतोच. पण प्रेक्षकांनकडून योग्य तसा प्रतिसाद मिळत नसल्यानं थोड्याच दिवसात अशा मालिका बंद पडतात. टीआरपी मिळवण्यासाठी अगदी अर्थहीन आणि खालच्या दर्जाचे विनोद अनेक मालिकांमध्ये होताना दिसतात किंवा विशिष्ट व्यक्तीला टार्गेट करून त्यावरून विनोद केला जातो. टीआरपीच्या स्पर्धेत विनोदाचा दर्जा घसरत चालला आहे, असं मला तरी वाटतं. पण तरी काही मालिकांचे विनोद अगदी निखळ असतात आणि अगदी अलगद हसवून जातात. कॉमेडी शोकडून फक्त एकच अपेक्षा आहे विनोदाच्या नावाखाली कोणाच्या भावना दुखावल्या जात नाही ना याचा विचार व्हावा. माझ्या मते, दर्जेदार विनोदी कार्यक्रम देण्यासाठी प्रत्येक मालिकांनी एकमेकांचं अनुकरण करणं थांबवलं पाहिजे व प्रत्येक मालिकेने एक नवीन व प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा विषय घेऊन यायला हवं. जर असं झालं तर नक्कीच विनोदाचा दर्जा घसरणार नाही व प्रेक्षक पुन्हा तितक्याच मोकळ्या मनाने या मालिकांचा आनंद घेऊ शकतील.
निखिल अहिरे, सीएचएम कॉलेज

दर्जा खालावतोय!
आजच्या स्पर्धात्मक जीवनात माणसाला अनेक कारणांमुळे ताण येत असतात. त्यामुळे माणसांचा तणाव दूर व्हावा व माणसाचं मनोरंजन व्हावं या उदिष्टाने अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम प्रसारीत होऊ लागले. पण काळानुरूप मनोरंजनाचे प्रकार ही बदलत गेले. पूर्वी सहपरिवार आपण मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा आस्वाद घ्यायचो. पण आता सगळ्यांनी एकत्र बसून असे विनोदी कार्यक्रम बघणं खूप अवघड झालंय. कारण आज विनोदांचा दर्जा हा खूप खालावला आहे. विनोदी कार्यक्रमात सरासपणे द्व्यअर्थी शब्द वापरले जातात. त्यामुळे अशा वेळेस हसणं तर दूर पण संताप होतो. त्यामुळे आसे कार्यक्रम बघावे की, नाही असा प्रश्न मनात निर्माण होतो. त्यामुळे विनोदी कलावंतनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की, सहपरिवार बसून पाहता येतील असेच विनोद करावे. जेणेकरुन प्रेक्षेकांचे निखळ मनोरंजन होईल आणि सहपरिवार कार्यक्रम पाहताना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही.
आकाश पाखरे, विकास रात्र कॉलेज

सामाजिक विषय मांडावेत
सध्या प्रसारीत होणाऱ्या बहुतांश कॉमेडी शोचा द्व्यअर्थी भाषा हा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे सध्या द्व्यअर्थी भाषेशिवाय विनोद शक्यच नाही, असं समीकरण आहे. खालच्या दर्जाच्या विनोदांमुळे प्रेक्षकांचा कॉमेडी शोकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय. एवढंच नाही तर विनोद व्हावा म्हणून सेलिब्रेटींकडून विविध कृत्य करुन घेणं, हे असले प्रकारही सर्रास पाहायला मिळतात. तारक मेहता, आर.के.लक्ष्मण की दुनियासारख्या मलिकांनी चांगल्या दर्जाचा विनोद आणि त्याचबरोबर सामाजिक दृष्टिकोन ठेवत वर्षानुवर्ष प्रेक्षकांना हसवतायत. विनोद हा फक्त हसण्यासाठी नसावा त्यातून काहीतरी सामाजिक विषय मांडता आला पाहिजे. कमरेखालचे विनोद करून हसवणाऱ्या कॉमेडी शोवर बंदी आणली पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे.
विजय भोईर, बी.आर.हर्णे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी

कॉमेडी शोजचा फॉर्म्युला फसतोय
सध्याच्या कॉमेडी मालिका पाहताना एकच प्रश्न पडतो की, हसायचं होतं का? याचं मूळ कारण म्हणजे कार्यक्रमांमध्ये कॉमेडी कमी आणि याची-त्याची टरच खेचणं असतं. हजरजबाबी पणा आता शिल्लक राहिलाच नाही. व्हॉटसअॅप, फेसबुकवरच्या जोकमध्ये अजून मसाला टाकून ते प्रेक्षकांसमोर सादर करायचे, हा सध्याचा कॉमेडी शोचा फॉर्म्युला आहे. त्यामध्येच खरंच प्रेक्षकांना काहीच रस उरलेला नाही. एखाद्या व्यक्तीला टार्गेट करुन त्यावर विनोद करणं हे कितपत योग्य आहे?, याचा विचार झाला पाहिजे. यापूर्वी अनेक विनोदी मालिका किंवा सिनेमे आले, त्यातील विनोद बघा आणि आताचे सिनेमे आणि मालिकांमधील विनोदांचा दर्जा बघावा. असा आशय असलेले कार्यक्रम प्रेक्षकांना नकोय. त्यामुळे प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न करा पण कोण्या एका व्यक्तीला टार्गेट करून त्यावर विनोद करु नका.
अनिरुद्ध गायकवाड, सेंट झेविअर्स कॉलेज

अचूक शब्दांची निवड महत्त्वाची
विनोदाची गोडी तेव्हाच वाटते जेव्हा त्या विनोदामुळे फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टींची जोड लागते. पण हल्लीचे काही विनोदी कार्यक्रम कळत-नकळत चुकीचे संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात, असं माझं मत आहे. प्रत्यक्षात पाहायला गेलं तर नकळत का होईना काहींना अशा प्रकारची कॉमेडी दुखावते. विनोद सादरकर्त्याने हे लक्षात ठेवलं पाहिजे की, आपण सांगणारा प्रत्येक विनोद हा प्रत्येक वयोगटातील व्यक्ती पाहत असतो, तर आपल्या विनोदाची कोणाही व्यक्तीवर चुकीची छाप पडायला नको. विनोदाच्या खजिनांचा समुद्र अखंड आहे, पण विनोददात्याने त्या अखंड विस्तारलेल्या समुद्रातून हिरे पारखून प्रेक्षकांपुढे सादर करायला हवे, असं माझं स्पष्ट मत आहे. टीव्हीवर विनोदी कार्यक्रम सादर करणाऱ्यांनी विनोद हे ध्येय ठेवून सादर करावे. आपल्या प्रत्येक विनोदाचा प्रेक्षक फक्त आस्वाद घेत नाही तर ते आत्मसात देखील करतो, याचं भान असावं. त्यामुळे विनोदाबरोबर अचूक शब्दांची निवड, उत्कृष्ट सादरीकरण, भावनिक भान यासगळ्या गोष्टी जुळून आल्या तर नक्कीच याची प्रेक्षकांच्या मनावर सकारात्मक छाप पडेल.
प्राजक्ता भरगुडे, गुरु नानक खालसा कॉलेज

भान नाही या जगाचे
हसणं हे मानवी स्वभावाचं, भावना दर्शवणारं एक माध्यम आहे. अगदी लहान बाळापासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनी खळखळून हसावं. हसणं हे निसर्गाने दिलेला एक अनमोल दागिना आहे. जो आपण नेहमी जपण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. त्यासाठी विविध विनोदी कार्यक्रम बघतो आणि त्याचा मनमुराद आनंद लुटतो. पण सध्याच्या याच विनोदी कार्यक्रमांमध्ये दर्जा खालावलेले विनोद सादर होतात. कित्येकदा काहीतरी भलताच अर्थ असणारे किंवा नवीनच काही तरी शब्द बनवून ते विनोदी ढंगाने सादर केले जातात. यात प्रेक्षकांना काडी मात्र रस नसतो. तसंच या कार्यक्रमांच्या निर्मात्यांनीही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे हे कार्यक्रम सर्व वयोगटातील मंडळी बघतात. त्यामुळे ते सादर करताना त्याचं भान बाळगावं. प्रेक्षकांनीही असे विनोदी कार्यक्रम बघताना खबरदारी बाळगावी. आपला पाल्य काय बघतो याकडे लक्ष असलं पाहिजे. कारण लहान मुलांनी कार्टून शो बघायचं सोडून प्रौढांसाठी असलेले कार्यक्रम बघितले तर त्याचा त्यांच्या बालमनावर परिणाम होतो, हे बोलणं अयोग्य ठरेल.
अश्विनी सगळे, साठ्ये कॉलेज

खिल्ली उडवणं सध्याचा ट्रेंड
सद्यस्थितीत कित्येक कॅमेडी शोज आहेत, मात्र त्यातले किती आपण घरच्यांसोबत बसून बघू शकतो? असा प्रश्न आपल्याला कधी ना कधी पडतोच. अर्वाच्य भाषा आणि कमरेखालच्या विनोदामुळे आपण असे हे कार्यक्रम घरच्यांसमवेत बघूच शकत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विनोदी कार्यक्रमांमध्ये एखाद्या व्यक्तीला टार्गेट करुन टर खेचली जाते. बहुतेक कार्यक्रमांमध्ये हेच पाहायला मिळतं. त्यामुळे कोण्या एका व्यक्तीची खिल्ली उडवणं, हा सध्या कॉमेडी शोमध्ये ट्रेंड आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. विनोद करायला विषय नसला की, कलाकर दिग्गज व्यक्तींची खिल्ली उडवून कार्यक्रमाचे दिवस ढकलतात. यामुळे येणाऱ्या पिढीच्या मनात दिग्गज व्यक्तींविषयी आदर कमी होण्याची शक्यता आहे.
प्रतीक कोळी, एस. के. सोमैय्या कॉलेज

फक्त निखळ विनोद अपेक्षित
कामाच्या धावपळीत ते दिलखुलास वागणं, मनापासून हसणं हे सगळं कुठे तरी कमी होतंय. साधं आईचंच उदाहरण घ्या ना. आई सतत स्वयंपाकघरात व्यस्त असते, घरातल्यांच्या आवडी-निवडीचा विचार करता-करता तीदेखील हसायचं विसरुन गेलीय. या सगळ्यांना खळखळून हसायला लावणाऱ्या मालिका, कार्यक्रम सध्या अनेक आहेत. लहानग्यांपासून, प्रौढ आणि वयस्कर मंडळीदेखील या मालिका आवडीने न विसरता, न चुकता बघतात. 'तारक मेहता का उलटा चष्मा'सारख्या कार्यक्रमात विनोद हा ठासून भरलेला असतो. आज जगभरात ही मालिका गाजतेय. लोक आवडीने या मालिकेचा आनंद लुटतायत. या मालिकेत फक्त निखळ विनोदच नाही तर सामाजिक संदेशसुद्धा दिला जातो. यासारख्या अशा अनेक मालिका जगाला खळखळून हसवतायत. असेच अधिक दर्जेदार विनोदी कार्यक्रम यावेत, ही सामान्य प्रेक्षकांची अपेक्षा आहे.
श्रुती कीर, एम. डी कॉलेज

सहज घडतो तो विनोद
आजच्या धकाधकीच्या जीवनातील ताण कमी करणारं साधन प्रत्येकाला हवं असतं. यासाठी टेन्शन विसरुन मनमुराद, खळखळून हसायला लावणारं काही तरी हवं असतं. ही काळाची गरज लक्षात घेऊन आज अनेक कॉमेडी शोज, मालिका येत आहेत. अनेक हलक्या-फुलक्या विनोदांवर मनमुरादपणे खळखळून हसवण्याचं महत्त्वपूर्ण काम या मालिका करतात. लोकांना काही काळापुरतं तणावमुक्त ठेवून, रिफ्रेश करतात. आजच्या तणावयुक्त वातावरणात खळखळून हसणं हे आरोग्यासाठीसुद्धा आवश्यक आहे. पण विनोदाची कला सर्वांनाच जमते असं नाही; त्यामुळे ज्यांना ती कला अवगत आहे, त्यांनीच त्या क्षेत्रात उतरणं योग्य ठरेल. कारण विनोद 'सहज घडवता आला' तर तो जास्त खुलतो व प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे ओढून ताणून घडवून आणलेले विनोद निरर्थक आहेत. कुणीही समोर येऊन विचित्र हालचाली, अंगविक्षेप करणं, म्हणजे विनोद नाही. विनोदी कार्यक्रम हे आबालवृद्धांपर्यंत सर्वजण पाहतात; त्यामुळे आपल्या समाजाला अनुरूप, सामाजिक भान राखून विनोद केले पाहिजेत. मनोरंजनाच्या किंवा ग्लॅमरच्या नादात 'विनोदाचा दर्जा घसरतोय', हे लक्षात घेतलं पाहिजे.
सिद्धी पाटील, बी. एन. बांदोडकर कॉलेज

नैतिकता, सामाजिक भान जपावं
हास्य हे सर्वश्रेष्ठ औषध आहे, ही म्हण तंतोतंत खरी आहे. खरोखरंच हास्य मानवी जीवनात फार बहूमूल्य आहे. त्याचे महत्त्व खूप लोकांना जाणवतं. दिवसभर थकून-भागून आल्यावर जेव्हा एखादी व्यक्ती कॉमेडी शोचा आस्वाद घेते तर मनोरंजन तर होतेच पण ताण आणि थकवा देखील नाहीसा होतो. मनात असलेल्या विचारांची दाटी कमी होते व कामाचा काही काळासाठी विसर पडतो. आजकालच्या जीवनात तर कॉमेडी शो हे एक अविभाज्य घटक बनले आहे. कॉमेडी करण्याच्या पद्धतीत चांगली सुधारणा व्हावी, बदल व्हावे व विनोदाची पातळी उंचावी ही आशा व अपेक्षा प्रेक्षकवर्ग करतात. त्यात काही गैर आहे, असं मला अजिबात वाटत नाही. नेहमीच्या रटाळ विनोदाने प्रेक्षक देखील कंटाळून गेले आहेत. त्यात काहीतरी नावीन्य हवं. तसंच तो विनोद सादर करताना तो नैतिकतेला धरून असावा, त्यामुळे कुणाचाही अपमान होऊ नये आणि कुणाचीही भावना दुखावली जाऊ नये. विवेकाचं भान कायम असावं तरच त्या विनोदाचा निखळ आनंद लुटता येईल, असं मला वाटतं.
श्रेया जाधव, पोदार कॉलेज

चांगल्या दर्जाच्या विनोदांची अपेक्षा
आजच्या बऱ्याचशा कॉमेडी शोमधील अंग प्रदर्शन, विचित्र हालचाली, कर्कश संगीत यागोष्टींचा प्रेक्षकांवर परिणाम होतो. कॉमेडी शोमध्ये अनेकदा अश्लील विनोद असतात. त्यामुळे कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून तो कार्यक्रम बघणं अशक्य आहे. अजाण वयात या गोष्टींचे मनावर विपरीत परिणाम होतात. विनोदी कार्यक्रमांकडून चांगल्या दर्जाच्या विनोदांची अपेक्षा आहे. तसंच आज कॉमेडी शोची दुसरी बाजू पाहिली तर अलीकडे भारतीय कॉमेडी शो अधिक प्रगल्भ होऊ लागले आहेत. एका पाठोपाठ एक उत्तम दर्जाचे मराठी आणि हिंदी कॉमेडी शो जास्त संख्येने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. विशेष म्हणजे त्यांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्याशिवाय काही कॉमेडी शोमधून सामाजिक संदेशही दिला जातोय.
केतन भोज, इंदिरा गांधी कॉलेज

विनोद कमी, विचित्रपणा जास्त
हसा आणि हसवत राहा हा कानमंत्र प्रत्येकानेच जपायला हवा. आपल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यामध्ये होणाऱ्या त्रासात काही हसरे क्षण आपल्याला सुख देऊन जातात. सध्याच्या कॉमेडी शोमध्ये जे काही ओढूण-ताणून विनोद केले जातात त्याला काही अर्थ नाही. याउलट त्यात विनोद कमी आणि विचित्रपणा जास्त दिसतो. पुरूषांनी साडी नेसणं हल्ली काही नवीन नाही, पण त्यात कमरेखालचे विनोद जास्त असतात, जे चुकीचं आहे. त्यातही स्त्रीची प्रतिमा दुबळी रंगवली जाते. या असल्या कॉमेडी शोजमधून लोकांपर्यत चुकीचा संदेश जातो; यातून नकळत का होईना पण कमरेखालचे विनोद म्हणजे कॉमेडी असा दृष्टिकोन तयार होतोय. हे समीकरण बदलणं अत्यंत गरजेचं आहे.
नागेश सुतार, मुंबई विद्यापीठ

विनोदाची व्याख्या बदलतीय
सध्याच्या थकाथकीच्या जीवनात लोकांना गरज असते ती मनोरंजनाची. अशा परिस्थितीत हसणं आणि हसवणं यापेक्षा उत्तम मनोरंजनाचं साधन दुसरं कोणतंच नाही. हल्ली दूरदर्शनवर अनेक प्रकारचे कॉमेडी शो, कॉमेडी सिरीयल, नाटक आपल्याला दिसतात. ही खरी गोष्ट आहे की, पुरुषांना साड्या नेसवून विनोद केला जातो किंवा कॉमेडीसाठी अनेक मार्ग शोधले जातात पण ही गोष्ट पण तेवढीच खरी आहे की, लोकांना रडवणं खूप सोपं असतं पण हसवणं तेवढंच कठीण! दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे यांसारखे हास्यसम्राट आपल्या महाराष्ट्राला लाभले. अशा काही हास्यसम्राटांमुळेच आपल्याला खरा विनोद समजला. माणूस जेव्हा टेन्शनमध्ये असतो तेव्हा त्याला गरज असते ती हसण्याची. सर्व औषधांमध्ये हास्य हेच श्रेष्ठ औषध मानलं जातं. पूर्वी मनावरील ताणतणाव कमी करण्यासाठी विदूषक हे राजेमहाराजे यांचं मनोरंजन करत असत. विनोदाने आपल्या बेचव आयुष्याला चव येते. एवढंच सांगू इच्छीते की, विनोद हा प्रमाणिक व निरागस असला पाहिजे.
दर्शना पवार, बिर्ला कॉलेज

बोधात्मक कार्यक्रम असावेत!
हसवणं आणि हसणं हा एक प्रकारचा व्यायाम असला तरी तो प्रत्येकालाच जमतं असं नाही. मनोरंजनाजे वेड तर सर्वांनाच असतं पण गमतीदार कॉमेडी शो पाहायला लोकांना आवडतं. तसं बघितलं तर कॉमेडीला खरंच मरण नाही. पण अनेकदा यामध्ये जे दाखवलं जातं ते पाहून हसायला जरी येत नसलं तरी बोध घेण्यासारखं नक्कीच असतं. हसायला हे सर्वांनाच आवडतं पण त्यातून काही महत्त्वपूर्ण बोध किंवा संदेशही मिळावा. तसंच काही दर्जेदार मालिकांनी लोकांच्या नव्हे तर लहान मुलांच्या मनात देखील घर केलंय. लहान मुलांनादेखील गमतीशीर मालिका पाहायला आवडते व त्यातून अनेकदा बोधही घेतात. अनेक विनोदी मालिकांनी, वृद्ध व्यक्तींचे वेळ, लक्ष व मन वेधून घेतलंय. इंडस्ट्रीनं अशाच गमतीशीर मालिका अजून बनवाव्यात. तसंच त्या बोधात्मर असाव्यात अशी अपेक्षा आहे. यामुळे नवीन कलाकारांनासुद्धा त्यांची कला सादर करण्यास एक व्यासपीठ मिळेल.
रसिका भोगले, चेतना कॉलेज

मनापासून हसवणारा विनोद हवा
आजची तणावग्रस्त आणि धावपळीची परिस्थिती पाहता प्रेक्षकवर्ग विनोदी मालिकांना जास्त पसंती देतात आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन आज अनेक विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येतायत. पण त्यातील काही कार्यक्रम मनापासून हसवतात तर काही जबरदस्तीने हसायला भाग पाडतात. विनोदी मालिका किंवा विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना फक्त हवं असतं ते निखळ मनोरंजन, पोट धरुन हसायला लावणारे विनोद. पण आजची परिस्थिती पाहता विनोदातील अतिक्रमण, हरवलेली विनोदातील नैसर्गिकता, विषयांची कमतरता या गोष्टी आपल्या निदर्शनात येतात. अधिक प्रभावशाली विनोदी कार्यक्रम देण्यासाठी योग्य पात्र निवड, तंत्रशुद्ध विनोद, विनोदाचा विषय, अर्थाच सुस्पष्टिकरण, विशिष्ट देहबोली, वेळेची योग्यता, योग्य वेषभूषा या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विनोदातील मर्यादा, बारकावे, कमतरता, त्रुटी लक्ष्यात घेऊन दिवसेंदिवस त्यांचा दर्जा वाढवावा. त्याच-त्याच विनोदांची पुनरावृत्ती नसावी. स्त्रीवेशभूषेतील पुरुषांची भूमिका ही वेळखाऊ, वायफळ आणि विचित्र नसावी.
मदन भुवड, सिडनहॅम कॅालेज ऑफ कॅामर्स अँड इकोनॅामिक्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आई...रॉक्स!

$
0
0

बदलत्या काळात आई-मुलांचं नातंही बदललंय. चुकल्यावर ओरडणारी, पण त्यापेक्षाही मुलांशी मैत्रीचं नातं निर्माण झालेली आई आज पाहायला मिळते. शेअरिंगपासून केअरिंगपर्यंत प्रत्येक भूमिका‌ समर्थपणे निभावणाऱ्या आईविषयी तरुणाई युवा कट्टावर भरभरुन व्यक्त झाली. येत्या रविवारी साजऱ्या होणाऱ्या ‘मदर्स डे’निमित्त, आई-मुलांच्या या नात्याविषयीचं तरुणाईचं म्हणणं…

यावेळच्या युवा कट्टात सहभागी झालेलं मुंबई विद्यापीठ आणि संलग्न कॉलेजेस
• सेंट झेविअर्स कॉलेज (फोर्ट)
•एच. आर. कॉलेज (चर्चगेट)
•विल्सन कॉलेज (गिरगाव)
•चेतना कॉलेज (वांद्रे)
•एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्टस (वांद्रे)
•साठ्ये कॉलेज (विलेपार्ले)
•डहाणूकर कॉलेज (विलेपार्ले)
•तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स (अंधेरी)
•पाटकर कॉलेज (गोरेगाव)
•के. इ. एस श्रॉफ कॉलेज (कांदिवली)
•एम.डी. कॉलेज (परळ)
•एलफिन्स्टन कॉलेज (परळ)
•रचना संसद अकादमी ऑफ आर्किटेक्चर (दादर)
•व्हीजेटीआय (माटुंगा)
•पोदार कॉलेज (माटुंगा)
•वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (माटुंगा)
•गुरु नानक खालसा कॉलेज (माटुंगा)
•आचार्य मराठे कॉलेज (चेंबूर)
•विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (वडाळा)
•विकास रात्र कॉलेज (विक्रोळी)
•इंदिरा गांधी कॉलेज (विक्रोळी)
•के. सी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (ठाणे)
•दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (ऐरोली)
•बिर्ला कॉलेज (कल्याण)

मैत्रीपूर्ण, समजूतदार नातं
असं म्हणतात की आई-वडिलांची चप्पल मुलांच्या पायात यायला लागली की मुलांशी मैत्री करावी. त्याप्रमाणे आई जेव्हा मैत्रीण होते तेव्हा लहानपणी ज्या गोष्टींसाठी तिचा राग यायचा किंवा ज्या गोष्टी उपदेशाचे डोस किंवा लेक्चर वाटायच्या त्या खऱ्या अर्थाने पटतात. या तरुण वयात जेव्हा करिअरच्या वाटा खुणावू लागतात पण त्याचबरोबरीने स्पर्धा, टार्गेट्स, डेडलाइन्स यामधून जावं लागतं तेव्हा ऑफिसमध्ये कामाचा ताण असतानाही आईने कशी आपली काळजी घेतली आहे, आपल्यासाठी प्रसंगी काही संधींचा त्यागही केलाय या गोष्टींची जाणीव होते. आई मैत्रीण झाल्यापासून जनरेशन गॅप कुठेतरी पुसट झाली आहे आणि एकमेकींना समजून घेणं वाढलंय. तसंच लहानपणी आईची भीती वाटायची पण आता तिच्याही काही न पटणाऱ्या गोष्टी मी एखाद्या मैत्रिणीसारख्या थेट सांगू शकते आणि तीही लहानपणीसारखं 'तू मला शिकवू नकोस' असं न म्हणता माझ्या मतांवर विचार करते. थोडक्यात, आम्ही मुलं जशी मोठी होत जाऊ तसतसे आमच्यातील आणि आईमधील नातं अधिकाधिक मोकळं, मैत्रीपूर्ण आणि समजूतदार होत जाईल हे नक्की.
चिन्मयी वझे, व्हीजेटीआय

तिच्यासारखी तीच!
आजची आई वर्किंग वुमन असून दोन्ही जबाबदाऱ्या अगदी चोख पार पाडते. तिच्याशी सगळं शेअर केल्याशिवाय राहवत नाही. तिच्या मते, 'शेअरिंग इज केंअरिंग' असतं. जे बऱ्याच प्रमाणात खरं आहे. कारण जितकं जास्त तिच्याशी शेअर करू तितकी ती आपलीशी होत जाते, अगदी आपल्या मैत्रीणीसारखी ती असते. आईच्या आणि माझ्या नात्याविषयी बोलायचं झालं तर; वेळ पुढे सरकत गेली आणि आमचं नातं तितकंच घट्ट होतं गेलं. काळानुरूप आमच्या नात्याला एक वेगळं स्वरूप आलंय. आपणहून सगळ्या गोष्टींची चौकशी करणारी ती, सगळ्या मॉडर्न गोष्टींचं भान असणारी ती, बाहेरच्या जगात वावरत असूनसुद्धा आपली संस्कृती जपणारी ती, सगळ्यांची तितकीच काळजी घेणारी ती, अशी माझी आई तिच्यासारखी तीच!
पौर्णिमा बुद्धिवंत, रचना संसद अकादमी ऑफ आर्किटेक्चर

आमची सॉलिड टीम
आई म्हणजे मुलीची पहिली मैत्रीण असते. अगदी जवळची सखी जिच्यासोबत आपण आपल्या मनात सर्व काही सहजासहजी बोलू शकतो. आई आपल्यासोबत अगदी मैत्रिणीसारखी असते. ऑफिस आणि घर अशी तारेवरची कसरत करताना ती किती ही दमली असेल, तरी ही ती थोडा वेळ का होईना पण आपल्या परिवारासाठी नक्की काढते. त्यावेळेत ती आपलं आयुष्य, आपलं बालपण आपल्या मुलांसोबत जगते. तो वेळ तिच्यासाठी तसंच आपल्यासाठी ही खूप महत्त्वाचा असतो. आपले बदलते विचार ही काही प्रमाणात तिला पटतात. पण आईची काळजी ही सारखीच आहे. आपली जीवलग मैत्रीण आपल्याला ओळखते, त्यापेक्षा चांगले आपली आई रूपातील मैत्रीण आपल्या मुलांना ओळखते. हे आई मुलांचं नाते दुनियेतील वेगळं आणि सर्वात खास नातं आहे. माझ्याकडून आईसाठी ही छोटीशी कविता-
माय ही अशी जननी,
जी कायम राहील स्मरणी
तुझ्याविना नाही ही सृष्टी,
नाही माजी दृष्टी
तू नाही तर काहीच नाही,
तुझ्यासारखे कोणीच नाही
जी सर्वात कायम प्रेमळ राही
- विजया केणी, गुरु नानक खालसा कॉलेज



मातृ देवो भव:
माझ्या आईने मला लिहायला, वाचायला, बोलायला, चालायला शिकवलं. कोणाचं वाईट चिंतू नये, सर्वांना मदत करावी हे संस्कार तिने माझ्यावर केले. माझ्या आईचं स्वप्न आहे की, मी मराठी व संगीत विषयात पी.एच.डी करावी आणि मी हे स्वप्न पूर्ण करणारच. आई वेगवेगळ्या वयाच्या वेगवेगळ्या समाजस्तरातील मुलांना शिकवते तेव्हा मीदेखील तिच्याकडून मुलांबरोबर कसं वागायचं, त्यांच्या अडचणी. काही मुलं त्यांच्या पालकांना सांगू शकत नाहीत पण माझ्या आईला सहज सांगू शकतात. त्यांच्या अडचणी कशा सोडवायच्या, त्यांना अभ्यास, क्रीडा-कला क्षेत्रात प्रोत्साहन कसं द्यायचं आणि उत्तम कामगिरी कशी करावी हे शिकतेय आईकडून कधी चुकांवरून बोलणीसुद्धा खावी लागतात तेव्हा राग येतो पण नंतर शांतपणे विचार केल्यावर तिचं म्हणणं पटतं. अशी माझी आई जणू काही अष्टभुजा देवीप्रमाणे सर्व कामं करत आपलं जीवन आनंदाने कसं जगावं हे शिकवते अशा आईची मी मुलगी आहे, याबद्दल मी देवाचे आभार मानते.
सिद्धी पटवर्धन, मुंबई विद्यापीठ

नातं मैत्रीपलीकडचं
आई या शब्दातच ऐवढं प्रेम आहे की, ती न सांगता कधीच आपली प्रिय मैत्रीण, सवंगडी बनून जाते हे कळतंच नाही. आई एक असा आरसा आहे, ज्यात न सांगता, न बोलता सर्व काही तिला कळतं. आपलं दुखणं, आपलं रडणं, आपले आनंद आणि अर्थातच आपलं भविष्य हे तिलाच कळतं आणि तिच वळवते. सावली जशी आपल्यासोबत असते तशी आई पण न सांगता, न भासता आपल्यात व आपल्या जवळच असते. सध्याच्या जमान्यातलं आई आणि मुलांचं नातं हे रेश्माच्या धाग्यासारखं आहे. ज्यात फक्त मऊपणा आणि कोमलताच जपलेली आणि लपलेली आहे. तिचा चेहरा एखाद्या गिफ्टपेक्षा आपल्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यावर जास्त खुलतो. खरंच आई न सांगता ऐवढी जवळची झाली आहे की, बेस्ट फ्रेंड कधी झाली हे कळलंच नाही.
रसिका भोगले, चेतना कॉलेज

शेअरिंगही अन् केअरिंगही

कधी तू झाशी
कधी तू जिजाऊ
कधी तू हिरकणी
तर कधी वर्किंग वुमन
अशी एक ना अनेक रुप तिची. हल्ली स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून दिवसरात्र मेहनत करत असतात. स्त्री जरी मॉडर्न झाली तरी ती एक आईच असते. ती जरी दिवसभर कामानिमित्त बाहेर असली तरी ती आपल्या मुलांना तेवढंच समजून घेते आणि मुलंसुद्धा आईला तेवढंच समजून घेतात. आई आणि मुलं जी काही दोन-चार घटका एकत्र घालवतात त्यामध्येसुद्धा त्यांच एक वेगळंच नातं निर्माण होतं. रात्री आई कधी ऑफिसवरुन येते आणि आज झालेल्या घडामोडी मी कधी आईला सांगते, असं माझं झालेलं असतं. त्याचप्रमाणे कधी एकदा घरी जाऊन माझ्या पिल्लूला कुशीत घेते असं आईलाही झालेलं असतं. ही ओढ काही वेगळीच असते. वेळ जरी कमी मिळत असला तरी फ्रेंडशिप तेवढीच स्ट्राँग असते. त्यामुळे आई ही माझी सर्वांत जवळची आणि बेस्ट फ्रेंड आहे.
पूजा कोर्लेकर, एच. आर. कॉलेज

ती सुपरवुमनच

आई असतं एक नाव,
घरातल्या घरात गजबजलेलं गाव
आकाशाचा केला कागद ,
वापरली सागराची शाई
तरीही महती सांगून उरेल आई
असं प्रत्येकाचं भावविश्व जिच्या आजुबाजूला फिरतं अशा आईबद्दल, तिच्या मायेबद्दल बोलावं तितकं कमीच आहे. प्रत्येक आईच्या जीवनात आव्हानं तर असतातच पण ही तारेवरची कसरत करताना, दुसऱ्यांसाठी जगता-जगता, दुसऱ्यांना जपता-जपता आपण आपलं स्वत्व तर हरवून नाही बसलो आहोत? आपली स्वप्नं, आपल्या इच्छा-आकांक्षा आपण पूर्ण करत आहोत का? याकडे प्रत्येक आईने पाहायला हवं. मला आणि आईला जो काही वेळ मिळतो त्यात आमच्या बऱ्याच गप्पा अर्थातच खूप छान शेअरिंग होतं. आईची अनेक रूपं साऱ्यांच्याच मनाला भावतात. आपल्या मुलांना मोठं करण्याची जिद्द तिच्यात असते. नोकरी, संसार साऱ्या गोष्टी सांभाळून आपल्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी ती झटत असते अशा सर्व आईंना मातृदिनानिमित्त सलाम!
कांचन टाकसाळे, विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी

एकमेकांना जाणून-समजून घेताना...
आईला तिच्या आयुष्यात ज्या गोष्टी करता आल्या नाही किंवा तिच्याकडून झाल्या नाही त्या गोष्टी आपल्या मुलांनी पूर्ण करायला हव्या अशी तिची इच्छा असते. मुलांना मनासारखं आयुष्य जगता यावं किंवा त्याच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळावी या करता तिची धडपड चालू असते. स्पर्धात्मक जीवन जगणाऱ्या आईला आपल्या मुलांकडून खूप-खूप अपेक्षा असतात. हे योग्यच आहे, पण आपल्या मुलाची कुवतसुद्धा जाणून घेणं यामध्ये खरं मातृत्व आहे. संसाराचा तसंच जबाबदारींचा गाडा ओढत असताना थोडा वेळ मुलांसाठी काढावा. त्यामुळे आई आणि मुलांचं नातं अजून घट्ट होईल.
अनिरूद्ध गायकवाड, सेंट झेविअर्स कॉलेज

नातं आपुलं जन्मोजन्मीचं

पूर्वजन्माची पुण्याई असावी,
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला
कॉलेजमधून घरी आल्यावर पहिला प्रश्न हाच असतो की आई कुठेय? आईच्या वाढदिवसाला मी स्कॉलरशिपच्या पैशातून आणलेली साडी जेव्हा आईच्या हातात दिली तेव्हा आई माझ्याकडे बघतच राहिली. तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. पण आईचे पाणावलेले डोळे सर्व काही सांगत होते. माझंही मन तेव्हा खूप भरून आलं होतं. खरंच तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. आई आणि मुलाचं नातं आताच्या जगात खूप जवळचं, आपलुकीचं आणि मायेचं आहे.
अरविंद साबळे, एम.डी. कॉलेज

लांब असूनही जवळ
खरं तर लहानपणापासूनच मला माझ्या आईपासून लांब राहावं लागलं. मुंबईत मी माझ्या नातेवाईकांकडे शिक्षणासाठी राहिले आहे. माझे सर्व मित्र-मैत्रिणी मुंबईत असल्याकारणानं त्यांचे पालकही नोकरी करणारे व शिकलेले आहेत. मला माझ्या आईचा खूप अभिमान वाटतो की, ती शेतकरी आहे. सगळं काही सांभाळून ती एकटीच गावी शेती करते. लहानपणापासूनच तिच्यापासून लांब राहिले असल्यामुळे तिचं असणं माझ्यासाठी किती मोलाचं हे वेगळं सांगायला नको. सहजासहजी आमचं बोलणंही होत नाही. कारण ती गावाला असल्यामुळे मोबाइल फोनला रेंज मिळत नाही. पण आम्हा दोघींमध्ये असलेल्या अतूट बंधनाची रेंज कधीच तुटणार नाही. मी तिला वर्षातून जेमतेम एकदाच भेटते. पण ती भेट वर्षभर आठवणीत राहणारी असते. लांब असल्यामुळे ती मला ओरडण्याचा वगैरे कधी प्रश्नच येत नाही. वर्षातून एकदाच मी तिच्यासमोर गेल्यावर तिच्या डोळ्यांतलं समाधान, हसू हेच तिच्यासाठी खूप मोलाचं असतं. माझ्याकडून आणखी कोणतंही वेगळं गिफ्ट तिला अपेक्षित नसतं. मी जेव्हा आयुष्यात कुणीतरी मोठी होईन तोच दिवस तिच्यासाठी मोठं गिफ्ट असेल. ते मी तिला लवकरच देईन.
अश्विनी सगळे, साठ्ये कॉलेज

दैवत दुसरं नाही
आईसारखं दैवत साऱ्या जगात नाही हे वाक्य मला अगदी पुरेपूर पटलं आहे. प्रत्येक सुखाच्या क्षणी, दुःखाच्या क्षणी मला आईच हवी असते. तिचं असणं मला सुखावून जातं. आई कामाला जात असल्यानं ती २४ तास माझ्या सोबत नसते. पण दिवसाचे जे काही ४-५ तास माझ्यासोबत असते ते २४ तासांपेक्षा कमी नसतात. आता कॉलेजमुळे मी तिच्यापासून लांब असते. पण न चुकता रोज सकाळी आमचा एक फोन असतो. कधी कधी बोलायला काहीच नसतं. पण तिचा आवाज माझ्या दिवसाची खरी सुरुवात करतो. खूप दिवसांनी आम्ही भेटलो की आमच्या गप्पा रंगतात. आईसाठी मी तिची बोलकी बाहुली आहे. बाकीच्यांना मी खूप बोलते असं वाटतं, ते तसं मला ऐकवतातही. एखाद्या मैत्रिणीसारखं मी बोलायचं थांबत नाही, माझी आईही शांतपणे ऐकून घेत असते. माझं प्रत्येक गुपित, माझी प्रत्येक गोष्ट माझ्या आईला ठाऊक आहे. रडू आलं, राग आला, आनंद झाला की मी आईकडे व्यक्त होते. माझ्या पालनपोषणाची सगळी जबाबदारी ती छान पार पाडते. माझ्या अव्यक्त भावनांना माझ्याकडून व्यक्त करुन घेणं फक्त तिलाच जमतं. आईच्या रुपात मला एक गोड, मस्तीखोर पण समजूतदार मैत्रीण मिळाली आहे. माझं पहिलं प्रेम, माझी पहिली मैत्रीण म्हणजे माझी आई.
एकता खैर, विल्सन कॉलेज

स्पेशल माझी आई
बाबा हा घरातला महत्त्वाचा खांब असला तरी आईशिवाय त्याला बळ येत नाही. बाबा ऑफिसला जातात पण आईही घराची देखभाल करते. नेहमी दुसऱ्यांचा विचार करणाऱ्या तिला स्वतःसाठी वेळ नसतो. माझी आई ही माझी बेस्ट फ्रेंडच आहे. घरातून बाहेर पडल्यापासून ते घरी येईपर्यंत दिवसभर घडलेल्या सगळ्या गोष्टी तिला सांगताना मन मोकळं होतं. माझी आई गृहिणी आहे. पण तिचं ज्ञान अफाट आहे. नवनवीन गोष्टी मला सांगत असते, त्यातून माझ्या ज्ञानात भर पडते. जीवनातल्या प्रत्येक घटनेबद्दल माझी आई मला मार्गदर्शन करते. कधी-कधी आमच्यामध्ये भांडणं देखील होतात. मीच तिच्यावर रागावत असतो आणि ओरडत असतो. पण त्या परिस्थितीतही ती मलाच समजून घेत असते. माझाच राग शांत होण्याची वाट पाहत असते. माझ्या प्रत्येक खरेदीच्या वेळी ती माझ्या सोबत असते. या सगळ्या कारणांमुळे ती खूप स्पेशल आहे.
शुभम भांदिर्गे, आचार्य मराठे कॉलेज, चेंबूर


माझी मार्गदर्शक
हल्लीच्या जगातली आई ही मॉडर्न आहे. ती तिच्या कामात कितीही व्यग्र असली, तरी मुलांसाठी वेळ काढते. बदलत्या काळासोबत तिचं व्यक्तिमत्त्व बदललं आहे. मी तरी माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी आईशी शेअर करतो. त्यावर ती कधीही चिडत नाही, उलट मलाच समजून घेते, काही चुकत असेल तर ती चूक दाखवून देते. वेळप्रसंगी रागावते, कानउघडणी करते. मला तरी वाटतं की बदलत्या काळाबरोबर आईची भूमिका आणि समजूतदारपणा व्यापक झालाय. पण आपण तिला समजून घेतो का? माझ्यासाठी होणारी तिची तगमग मला दिसत असते. तरीही स्वतःचा त्रास सांभाळून जो काही वेळ मिळतो त्यात ती माझे प्रॉब्लेम्स समजून घेते, मला मार्गदर्शन करते.
नागेश सुतार, मुंबई विद्यापीठ

सगळं शेअरिंग होतं
असं म्हणतात की आई हे घराचं मांगल्य असते आणि वडील घराचं अस्तित्व. आधुनिक काळात मुलांशी जुळवून घेणं हे पालकांना, विशेषतः आईला गरजेचं असते. मात्र सगळ्याच जणी या आधुनिक विचारांच्या असतीलच असं नाही. तरीही त्यांचा सगळा विचार हा निव्वळ मुलांच्या काळजीपोटी असतो. आजच्या या आधुनिक जगात सगळ्यांना आई जवळची वाटते. कारण तिला एखादी गोष्ट समजावणं आणि एखाद्या गोष्टीसाठी तयार करणं सहज सोपं असतं. मी आईसोबत सगळ्या गोष्टी शेअर करते. कारण ती आजपर्यंत माझ्यासोबत जिवलग मैत्रिणीसारखी राहिली. तिच्या सोबत कोणतीही गोष्ट शेअर करायला मला भीती नाही वाटत. मात्र ती जेवढी प्रेमळ आहे, तितकीच ती रागीट व शिस्तप्रिय आहे. तसे पाहायला गेलं तर मी माझ्या बाबांच्या जास्त जवळ आहे. परंतु बाबा नसताना आई ही माझ्यासाठी दोन्ही भूमिका साकारते.
अश्विनी आचारी, एलफिन्स्टन कॉलेज

मुलांसाठी सगळी धावपळ
आई ही एक अशी व्यक्ती आहे जिची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. नऊ महिने ती बाळाला पोटात वाढवते. जन्मानंतर ती आपल्या हातानं बाळाला खाऊ घालते. तो चिमुरडा जीव आईचं बोट पकडून जीवनातलं पहिलं पाऊल टाकायला शिकतो. लेकरांचा अभ्यास, जेवण, झोपणं, उठणं, खेळणं अशा प्रत्येक गोष्टीत आईचा वाटा महत्त्वाचा असतो. लेकरांची प्रत्येक परीक्षा ही जणू त्या आईचीच परीक्षा असते. जणू सावली बनून आई आपल्या लेकरांसोबत असते. मुलाच्या आजारपणात दिवस-रात्र एक करून त्याची काळजी करते. आपल्या मुलाला पौष्टिक आहार मिळावा ह्यासाठी लवकर उठून त्याचा जेवणाचा डबा बनवते. त्याला शिकवते, मोठं करते. काही मुलं कृतघ्न असतात. ती आपल्या आईला विसरतात. जिच्यामुळे आपण हे जग पाहू शकलो तिच्याकडे लक्ष देणं त्यांना महत्त्वाचं वाटत नाही. काही जण परदेशात स्थायिक होतात. त्यांना काय म्हणावं? सध्याच्या जमान्यात मॉडर्न वर्किंग वुमन संकल्पनेमुळे आईला आपल्या मुलासाठी तितकासा वेळ देता येत नसेल, परंतु तिची ही धावपळ, श्रम व तारेवरची कसरत आपल्या लेकरांसाठीच असते. प्रत्येक मुलानं हे समजून घ्यायला हवं. कारण. जगातल्या कुठल्याही यशस्वी व्यक्तीच्या यशामागे सगळ्यात मोठा वाटा हा त्याच्या आईचाच असतो. माझी आई आणि माझं नातं खूप घट्ट आहे. माझ्या आईसोबत माझं खूप काही शेअरिंग होत असतं. दिवसाची सुरुवात आणि शेवट यामध्ये झालेल्या सगळ्या गोष्टी मी आईबरोबर शेअर करतो. आईवरचं प्रेम हे कधीही न संपणारं आहे.
कल्पेश कदम, डहाणूकर कॉलेज

जबाबदाऱ्यांसाठी सज्ज
आजच्या काळात वाढत्या महागाईमुळे नवरा-बायको दोघंही नोकरी करतात. घर आणि नोकरी अशी कसरत करताना, कितीही इच्छा असली तरी आईला मुलांसोबत खूप कमी वेळ मिळतो. ऑफिसमधल्या जबाबदाऱ्या सोडून ती मुलांसाठी येऊ शकत नाही. पण हे प्रत्येकालाच कळतं असं नाही. काहीही झालं तरी आपली आई प्रत्येकालाच प्रिय असते. आता स्त्रीमधली आईच हरवलीय की काय असं सगळ्यांना वाटतं. पण त्या आईची व्यथा तिची तिलाच माहित! न खचता, न डगमगता दररोज घर, ऑफिस, कुटुंब अशा सगळ्या जबाबदाऱ्या ती न चुकता पार पाडण्यासाठी सज्ज असते. नऊ महिने नऊ दिवस एका जीवाला पोटात वाढवून, अनेक वेदना सहन करून ती एका नव्या जीवाला जन्म देते. बाळाचा जन्म झाल्यावर तिचाही पुनर्जन्मच होतो. आईच्या प्रेमाला, मायेला कशाचीच उपमा नाही. म्हणून तर म्हणतात ना 'स्वामी तिन्ही जागाचा आईविना भिकारी'.
स्नेहल कोलते, एचआर कॉलेज

सकारात्मक ऊर्जेचं स्रोत
देवाने या जगाची निर्मिती करताना बनवलेली दोन निर्मळ नाती म्हणजे मातृत्वाचे व मित्रत्वाचे. या दोन्हींचा सुंदर मिलाप म्हणजे ‘आई’. माझी आई एक वर्किंग वुमन असली तरी आमचं नातं हे फार मजबूत आहे. ती माझ्यासाठी नेहमीच एक आदर्श आहे. तिला कामातून फार कमी वेळ मिळतो. पण तरीही ती तिच्या साऱ्याच भूमिका चोख पार पाडते. बेस्ट फ्रेंडला कसं न सांगताच सगळं कळतं तसंच आईलाही काही न बोलताच समजतं. मला सांगायची गरजच भासत नाही. कितीही काम केलं तरी तिझा चेहरा कायम ऊर्जा देणाराच असतो. आई आजकाल जरी मुलांची बेस्ट फ्रेंड झाली तरी तिझ्या संस्कारांचं रूप काही बदलेलं नाही. ती नेहमीच एक योग्य मार्गदर्शन करणारी गुरु, एक उत्कृष्ट मैत्रीण व देवाची सुंदर निर्मिती आहे. आजची आई ही जरी वर्किंग वुमन असली तरी घरची जबाबदारी तेवढ्याच ऊर्जेने पार पाडते.
स्मिता चव्हाण, बिर्ला कॉलेज

आई, तुझ्यासाठी काही पण...
आई घरी असली की, तिच्याशी सगळं काही शेअर करता येतं. दिवसभर घडलेल्या घडामोडी व कॉलेजमधील किस्से सांगून मन मोकळं होतं. तिच्यामुळेच तर मला वाचनाचा छंद व लिखाणाची गोडी लागली आहे. लहान वयात नकळतपणे का होईना पण मी लिहिलेली पहिली कविता 'आई' याच विषयावर होती. आयुष्यात कितीही अपयशी झाले, हताश झाले तरी आई कायम खंबीरपणे पाठीशी उभी राहते. स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याची प्रेरणा ती मला कायम देत असते. तिच्यातील चिकाटी व साधं राहणीमान हे गुण खरंच खूप कौतुकास्पद आहेत. माझ्या संगोपनसाठी या माऊलीने स्वतःचं करिअरदेखील बाजूला ठेवलं. त्यासाठी मी आजन्म तिची ऋणी राहीन.
श्रेया जाधव, पोदार कॉलेज

शिस्तप्रिय होममेकर
आपली आई काळजीपोटी आपल्याला​ प्रश्न विचारते, आपली विचारपूस करते. याचा कधी-कधी वैताग येतो; पण आपण जेव्हा अडचणीत​ पडतो तेव्हा आई हे सर्च इंजिन आपल्याला​ मदत करतं. माझी आई मॉडर्न नाही पण मॉडर्न विचारांचा अवलंब करणारी वर्किंग वूमन आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत 'होममेकर'ची भूमिका ती चोखपणे पार पाडते. आजच्या दिवसात स्वावलंबी होऊन मुलांची हौस-मौज पुरवायला व संसारात नवऱ्याला हातभार लावताना त्यांची तारेवरची कसरत होते. त्यामुळे आई व मुलांमधील संवाद कमी होत आहे; जो सध्याची वस्तूस्थिती पाहता भावनात्मक दृष्ट्या महत्त्वाचा आहे. रोजच्या कामातून​ मला जेव्हाही सवड मिळते​ तेव्हा मी आईसोबत वेळ घालवतो. तिला घरकामात मदत करतो. माझे प्लॅनिंग्स, ईच्छा, विचार, इतर गंमती तिला सांगतो. तीसुद्धा माझ्याकडे मन मोकळं करते. किती तरी गोष्टी मनात ठेवून ती मनमोकळेपणाने घरात वावरत असते याची जाणीव तेव्हा मला होते. त्यावेळी माझी कडक शिस्तप्रिय आई माझी जवळची मैत्रीण होते.
तुषार भद्रिके, पाटकर कॉलेज

माझं सर्वस्व
आई या दोन शब्दातच सारं जग सामावून घेण्याची ताकद आहे, हे मी माझ्या आईकडे बघून नक्कीच बोलू शकतो. माझी आई जरी एक गृहिणी असली तरी माझ्या बाबांऐवढीच तीसुद्धा आमचं घर चालवण्यासाठी खूप मेहनत घेते. कुटूंबातील सर्वांची काळजी घेण्यापासून ते त्यांना हवं नको ते सर्वकाही आई पाहते. देवाने जगात अशी एकच व्यक्ती बनवली आहे, जी कोणत्याही परिस्थितीत अगदी खंबीरपणे उभी असते व न डगमगता सर्व काही गोष्टी सांभाळते ती व्यक्ती म्हणजे ‘आई’. म्हणूनच या मातृदिनाच्या निमित्ताने एक छोटीशी कविता माझ्या आईसाठी...
स्पर्शाने ही या व्यक्तीला बोलता आले
वेळोवेळी फक्त सर्वांवर प्रेम केले
स्वतः कष्ट घेऊन इतरांना आनंदी ठेवले
माझ्या मायने कुंटूंबासाठी खूप काही केले
- अक्षय पुळास्कर, गुरू नानक खालसा कॉलेज


माझ्या गुपितांचा खजिना

'आई तुझ्याच ठाई सामर्थ्य नंदिनीचे
गांभीर्य सागराचे औदार्य या धरेचे'
माझ्या आईचं वर्णन कोणी मला करायला सांगितलं तर माझी आई हा माझ्या गुपितांचा खजिना आहे असंच मी तिचं वर्णन करीन. मी अनेकदा पाहिलंय की, इतर मुलं त्यांच्या आईपासून काही न काही लपवतात, पण मी एखादी गोष्ट आईला सांगितली नाही तर मला अस्वस्थ वाटू लागतं. तिच्याकडे मला पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं असतात. मी दहा वेळा चुकल्यानंतरही मला समजून घेण्याची क्षमता तिच्यात आहे. थोडक्यात म्हणायचं तर ती माझं सर्वस्व आहे.
अथर्व अणेराव, पोदार कॉलेज

आई एक, रोल अनेक
घरातली माणसं, बाहेरची नाती सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची एक ना अनेक कामं करताना कितीही थकून कोमेजली तरी टवटवीत राहणारी आणि आयुष्यातली एकमेव हक्काची व्यक्ती म्हणजे माझी आई! मदर्स डे ही संकल्पना जितकी मला आवडते तितकंच अनेक प्रश्नांचं काहूरही डोक्यात माजतं. जसं की का म्हणून या ३६५दिवसात १ दिवस आईचा म्हणून साजरा करायचा? आपण रोज आईच्या प्रश्नांनी कंटाळतो पण हेच जर प्रश्न आपण कधी आपल्या आईला विचारले तर ती मात्र नक्कीच खुश होईल. आई माझ्या आयुष्यात अनेक पात्र पार पाडत असते तशीच माझी आई ही माझी आई, मैत्रीण, शिक्षक असं बरंच काही आहे आणि परिस्थितीनुसार ती तिच्या एका पात्रातून दुसऱ्यात अगदी चटकन बदलत असते. पण कुठल्याही रुपात का असेना पण माझी आई नेहमी माझ्या सोबत असते आणि नेहमी असावी अशीच इच्छा आहे.
गायत्री वायाल, विल्सन कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपलं नाटक ‘सही’, पण…

$
0
0

हॉलिवूड असो, बॉलिवूड असो, टीव्ही असो वा वेबसीरिज…हे सगळं आम्ही बघतोच. पण यापैकी कशालाही ‘लाइव्ह’ नाटकाची सर नाही. नाटक हा आपल्या संस्कृतीचा एक ठेवा आहे, जो जपण्याचा आम्ही प्रयत्न नेहमी करतो, हे आपलं म्हणणं तरुणाईनं युवा कट्टावर ठामपणे व्यक्त केलंय. फक्त, नाटकांकडून त्यांच्या काही अपेक्षा आहेत. नाटकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, आम्हाला भावतील असे विषय घ्यावेत, तसंच नाटकाची प्रसिद्धी आणखी प्रभावीपणे करावी असं त्यांना वाटतंय…

यावेळच्या युवा कट्टात सहभागी झालेलं मुंबई विद्यापीठ आणि संलग्न कॉलेजेस

• सेंट झेविअर्स कॉलेज (फोर्ट)
•एच. आर. कॉलेज (चर्चगेट)
•विल्सन कॉलेज (गिरगाव)
•चेतना कॉलेज (वांद्रे)
•एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्टस (वांद्रे)
•साठ्ये कॉलेज (विलेपार्ले)
•डहाणूकर कॉलेज (विलेपार्ले)
•तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स (अंधेरी)
•पाटकर कॉलेज (गोरेगाव)
•बाफना कॉलेज (मालाड)
•के. इ. एस श्रॉफ कॉलेज (कांदिवली)
•एम.डी. कॉलेज (परळ)
•एलफिन्स्टन कॉलेज (परळ)
•रचना संसद अकादमी ऑफ आर्किटेक्चर (दादर)
•रुपारेल कॉलेज (माहिम)
•व्हीजेटीआय (माटुंगा)
•रुईया कॉलेज (माटुंगा)
•पोदार कॉलेज (माटुंगा)
•वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (माटुंगा)
•गुरु नानक खालसा कॉलेज (माटुंगा)
•आचार्य मराठे कॉलेज (चेंबूर)
•विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (वडाळा)
•विकास रात्र कॉलेज (विक्रोळी)
•इंदिरा गांधी कॉलेज (विक्रोळी)
•के. सी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (ठाणे)
•दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (ऐरोली)
•बिर्ला कॉलेज (कल्याण)
•जीवनदीप कॉलेज (गोवेली)

दोरी मराठी माणसाच्याच हाती!
ग्रामीण भाग वागळता शहरी भागात मोठ्या प्रमाणात नाटकांचे प्रयोग चालू असतात. तसेच कॉलेजांमधील फेस्टमध्येदेखील एकांकिका, पथनाट्य, एकपात्री यातून नाटकांना वाव मिळत आहेच. सध्या नाटकांपेक्षा चित्रपटांना जास्त वाव आहे. कारण नाटकांना आर्थिक पाठबळ कमी मिळतंय. त्यामुळे मग तरुण कलाकार मागे पडताना दिसत आहेत. तसंच चित्रपट हे टीव्हीमार्फत प्रत्येकाच्या घरात पोहोचले आहेत. पूर्वी नाटक, भारूड, लोकगीते याव्यतिरिक्त लोकांकडे मनोरंजनाची साधनं नव्हती. त्यामुळे लोक नाटकं आवर्जून पाहायची. पण सध्या लोकांकडे टीव्ही आल्याने नाटकांचा बाजार कमी झालाय. नाटकांना भरपूर मेहनत घ्यावी लागते. तसंच नाट्यगृहेदेखील ग्रामीण भागात कमीच आहेत. त्यामळे तेथील लोकांचा कल कमी प्रमाणात दिसून येतो. मराठी नाट्यसृष्टीचा विकास होण्यासाठी मराठी प्रेक्षकांनी जास्तीत जास्त नाटकं आवर्जून पाहावीत, असं मला वाटतं.
सुजय निंबरे, पाटकर कॉलेज

सिनेमांसारखाच दर्जा मिळावा
भारतामध्ये सर्वप्रथम मनोरंजनासाठी सिनेमापेक्षा नाट्य संस्कृती अतिशय नावाजलेली होती. खंत एकाच गोष्टीची आहे की, आता ही नाट्य संस्कृती कुठेतरी संपुष्टात येत आहे. मला तिच्या लोप पावत चालण्यामागे नाट्य निर्माते, दिग्दर्शक किंवा कलाकारांचा कोणताही दोष वाटत नाही. आजही नाटकं तितकीच चांगली आहेत जशी ती पूर्वी होती. कालानुरुप नाटकांच्या विषयांमध्ये बदल झाले. पण हा प्रश्न उरतो तो तरुणाईबरोबर कनेक्ट होण्याचा. नवीन पिढीला आणि प्रेक्षकांना फक्त आवडतं ते भरपूर मसाला असलेल्या गोष्टी. आजकाल तर नाटकं काय वेगवेगळे सिनेमे पण त्यांना बघता येत नाही. मारामारी, आइटम साँग्स, प्रेमकथा याच्यातच त्यांना रस उरला आहे. मला वाटतं प्रेक्षकांचा कल नाटकाकडे वळवण्यासाठी त्यांना त्याचे महत्त्व पटवून द्यावे लागेल. नाटकांना त्यांच्या दिग्दर्शनात किंवा विषयात बदल करण्याची काहीही गरज नाही. गरज आहे प्रेक्षकांना, विशेषत: पिढीला नाट्य संस्कृती हीसुद्धा सिनेमासारखी तितकीच दर्जेदार आहे हे पटवून देण्याची. मला असं वाटतं त्यासाठी प्रत्येक कॉलेजच्या नाट्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी नाटकं बसवावीत आणि ती सादर करावीत.
अश्विनी आचारी, एल्फीन्स्टन कॉलेज

लोकाश्रय कधी?
तसं पाहायला गेलं तर नाट्यकलेचा रंगमंच तसा मराठ्यांचाच! नाट्यकला क्षेत्राला महाराष्ट्रात फार जुनी परंपरा आहे. जी आजतगायत चालवण्याचा सर्वच मराठी कलाकार प्रयत्न करत आहेत. नवनवीन कथा, कथानक प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. 'ती फुलराणी', 'कुसुम मनोहर लेले', 'तो मी नव्हेच!', 'युगपुरुष', 'कट्ट्यार काळजात घुसली' अशी अनेक नावं आपल्या सर्वांना परिचयाची आहेत. कारण या नाटकांनी अनेक प्रेक्षक मंडळींची वाहवा मिळवली आहे आणि मिळवत राहतील. आजही त्यांचे प्रयोग सभागृहात लागले तर 'हाऊस फुल्ल' होतात, जिथं त्याच बरोबरची दुसरी नाटकं दर दिवसाला थिएटरमध्ये लागतात आणि प्रेक्षक वर्ग नसल्यानं पडतात. नाटकांची प्रसिद्धी हे त्याच्या यशामगाचं महत्त्वाचं कारण आहे.
स्नेहल कोलते, एच. आर. कॉलेज

चित्रपटांइतकी प्रसिद्धी आवश्यक
पूर्वी जेव्हा स्मार्टफोन्स, कम्प्युटर्स, टीव्ही नव्हते आणि चित्रपटांचा शोध लागला नव्हता, तेव्हा नाटक हे एकमेव मनोरंजनाचं माध्यम होतं. पण आता घर बसल्या सर्व कार्यक्रम पाहता येत असल्याने लोक मालिका, रिअॅलिटी शोज तसंच सिनेमेही टीव्ही, किंवा युट्यूबवर पाहाण्यास प्राधान्य देतात. कुठेही पाहता येणाऱ्या, मर्यादित एपिसोडस असणाऱ्या आणि कमी वेळात योग्य विषय मांडणाऱ्या वेबसिरीज आणि शॉर्टफिल्म्सची तरुणाईला लगेच भुरळ घालतात. असं असलं तरीही लोक सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहायला गर्दी करतातच. पण नाटकांच्या बाबतीत ही गर्दी फार कमी पाहायला मिळते. विषयांच्या बाबतीत म्हटलं तर आजची नाटके काळाप्रमाणे बदलत आहेत. उलट काही तद्दन मसालापटांपेक्षा नाटकांचे विषय दर्जेदार आणि तरुणाईसकट सर्व वयोगटाला आकर्षित करणारे आहेत. असं असलं तरीही नाटकांची फार जाहिरात होताना दिसत नाही. एवढंच नाही तर मालिका आणि चित्रपटांमधील नवीन चेहऱ्यांना लगेचच सेलिब्रिटी म्हणून प्रसिद्धी मिळते. याउलट नाटकांमधील नवोदीत कलाकारांना तितकीशी प्रसिद्धी मिळत नाही. उलट असे कलाकार एखाद्या चित्रपट किंवा मालिकेत दिसले तर कळतं की, ती व्यक्ती एकांकिकांमधून वर आली आहे. चित्रपटांइतकीच आणि चित्रपटांसारखीच नाटकांची प्रसिद्धी झाली तर नाटकांना चांगले दिवस येतील असं मला वाटतं.
चिन्मयी वझे, व्हीजेटीआय

रसिक प्रेक्षकांची अरसिकता
'मास आणि क्लास' अशा नाटकांच्या दोन प्रकारांपैकी क्लास नाटकं प्रसिद्ध होतात; पण मात्र मास प्रकारात मोडणारी नाटकं जास्त प्रमाणात चालत नाहीत. मला वाटतं नाटकांची संख्या आणि विषय हे योग्यच आहे, पण प्रेक्षकांचा नाटकांविषयीचा रस कमी होत चालला आहे. नाटकांची जागा सिनेमांनी घेतल्यामुळे तसंच नाटकांचा तिकीट दर हा जास्त असल्यामुळे नाटक पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या कमी होतेय. एक प्रेक्षक म्हणून तरुणाईचा विचार करताना मला वाटतं नाटकांमध्ये धम्माल, मज्जा मस्ती आणि सामाजिक संदेश यांचा संगम असला पाहिजे. शिवाय नाटकांच्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडिया आणि टेक्नॉलॉजीचा वापर करावा. मला वाटतं जर मराठी संस्कृतीचा पाया असलेल्या नाटकांना जपायचा असेल तर प्रत्येक शाळा कॉलेजांमध्ये नाटकांविषयी मुलांच्या मनात रुची निर्माण करावी. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये एक ते दोन नाटकं असावीत. जेणेकरून नाटकांचा दर्जा खालावणार नाही.
भक्ती पालांडे, तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स

लवकरच रंगभूमीला सुदिन यावेत
पूर्वी लोक सिनेमासोबत नाटकंसुद्धा आवडीने बघायचे. नाटक हे लाइव्ह असतं म्हणून त्यातून आपल्याला अनेक नवनवीन विषय जाणून घेता येतात. पण नाटकांची प्रसिद्धी फार कमी केली जाते. सोशल मीडियावर नाटकांचं प्रमोशन वाढलं तर नक्की रंगभूमीला चांगले दिवस येतील. लोकांना सिनेमा आवडतो आणि नाटकांमध्ये सामाजिक विषयांवर आणि चालू घडामोडींवर भाष्य केलं जातं. सोशल मीडियावर नाटकसुद्धा सोशल व्हावं, असं मला वाटतं. आपल्या मराठी संस्कृतीची ओळख असणारं नाटक नेहमी पुढे जात राहील, सिनेमांच्या बरोबरीने नाटकांची प्रसिद्धीसुद्धा व्हावी. तिसरी घंटा ऐकायला आमची तरुण मंडळी जमतील. वेब सीरिज किंवा इंटरनेटचा फटका थोड्या प्रमाणात नाटकाला बसतो आहे. प्रत्यक्ष बघण्याची गंमत या तरुणाईला समजेल तेव्हा नाटकांना सोनेरी दिवस येतील आणि पुन्हा तिसरी घंटा वाजेल.
चेतना खानविलकर, रुईया कॉलेज

नाटकांच्या माध्यमातून होते जनजागृती
नाटक म्हटलं की, लोकांची गर्दी व हसण्याचा खळखळाट एवढ्या पुरतंच मर्यादित असलेलं नाटक आज लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करतंय. आजच्या घडीला कोणाकडे वेळ नसल्याने व सोशल मीडियाच्या आहारी गेलेला आजचा तरुण वर्ग यांनाही नाटकाकडे वळवणं, खूप कठीण आहे. असं असलं तरी नाटकातून मनोरंजन व मनोरंजनातून माहिती देण्याचा प्रयत्न हे नाटककार करत असतात. उदा. स्त्री भ्रूणहत्या, बालगुन्हेगारी, भ्रष्टाचार अशा ज्वलंत विषयावर भाष्य करणारी नाटकं व आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक धडे देण्याचा प्रयत्न करत असतात. नाटकातून कमीत-कमी वेळात जास्तीत जास्त माहिती ही लोकांपर्यंत पोहोचवली जाते. यामुळे समाजात बदल होण्यास वेळ लागणार नाही. म्हणून नाटकातून माहिती ही मोठ्या प्रमाणात मिळते.
गीता गायकर, जीवनदीप कॉलेज

तरुणाई चित्रपटांच्या प्रभावाखाली
अभिनय आणि रंगमंच या दोन्ही गोष्टी एकत्र केल्यावर नाटक हा शब्द तयार होतो. मला असं वाटतं की, जगात नाटक ही एकच अशी गोष्ट आहे जी अभिनयाच्या बाबतीत अगदी निर्मळपणे प्रेक्षकांच्या समोर सादर होते. प्रेक्षकांना त्याचा आनंदही अगदीच समक्षपणे अनुभवता येतो. त्याच बरोबर खऱ्या कलेचं दर्शन अगदीच जवळून मिळते. मग राहीला प्रश्न नाटकांना अंतर का? तर याचं उत्तर असं की,आजकाल जास्तीत जास्त तरुणांवर चित्रपटांचा पडणारा प्रभाव हा नाटकांपेक्षा जास्त आहे.
अश्विनी सगळे, साठ्ये कॉलेज

आम्ही जुन्या नाटकांचे चाहते
मराठी माणसाचं नाटकावर फार प्रेम आहे. मी ही नाटकं पाहतो. चित्रपट, वेबसीरीज कितीही गाजत असली तरी नाटकांची जागा घेऊ शकत नाहीत. नाटकाला न होणाऱ्या गर्दीला कदाचित निर्माते, दिग्दर्शक जबाबदार आहेत. टिव्हीवर जेव्हा कोणती मालिका गाजते, तेव्हा त्यातील कलाकारांनाही प्रसिद्धी मिळते. काही दिग्दर्शक या कलाकारांना घेऊन नाटकं करतात ज्यात नाटकांच्या विषयावर भर न देता निव्वळ कलाकारांच्या प्रसिद्धीच्या जोरावर नाटक यशस्वी करण्याचा प्रयत्न करतात. अशा नाटकांना अर्थातच प्रेक्षकांची पसंती मिळत नाही. फक्त नामांकित कलाकार असलेल्या नाटकांऐवजी आम्हाला नवनवीन विषयांची नाटकं आणि जुनी अभिजात नाटकं नव्याने रंगमंचावर बघायला नक्कीच आवडतील.
सुमित राणे, साठ्ये कॉलेज

प्रेक्षकांची गरज ओळखावी
नाटक हा विषय पहिल्यापासूनच माझ्या आवडीचा आहे. पण नाटकांना अंतर का? या प्रश्नाचं उत्तर हे की, सध्याची तरुणपिढीला काय अपेक्षित आहे? तर तरुणपिढीला नाटक हे दृकश्राव्य कला आहे, हे माहिती करुन देण्याची गरज आहे. जितक्या आकांताने एक नट त्याचं पात्र प्रेक्षकांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो तितकाच प्रयत्न ते पात्र समजून घेण्यास प्रेक्षकांना करावा लागतो. पण आजच्या प्रेक्षकांकडे ती श्रवणकलाच नाही. तरुण पिढीला नाटक हे फक्त प्रबोधन असा गैरसमज आहे. त्या गैरसमजाचं आधी समजात रुपांतर व्हायला हवं. जेव्हा एखादं नाटक रंगभूमीवर येतं तेव्हाच ते नाटक सर्वस्व जिंकलेलं असतं. निर्मात्यांनी नाटक तरुणपिढीपर्यंत कसं पोहोचेल आणि त्यांच्या आवडीचे विषय विचारात घेऊन नाटकं रंगभूमीवर आणावीत.
सूरज खरटमल, रुपारेल कॉलेज

...तरच नाटकांना अच्छे दिन
आज कोणतीही वस्तू विकायची असल्यास त्या वस्तूचा प्रसार व प्रचार होणं हे फार गरजेचं आहे. याच ठिकाणी आपली मराठी नाटकें कमी पडतात. दर्जेदार नाटकं रंगभूमीवर येतात पण पुरेशा प्रचाराअभावी ती रसिकांपर्यंत पोहोचतच नाहीत. तसंच आजचा रसिकवर्ग हा पारंपरिक आणि वास्तववादी विषयांकडे न वळता तो काल्पनिक दुनियेत रमतो. त्यामुळे निर्मात्यांनी हे ध्यानात घ्यायला हवं की, प्रेक्षकांना नेमकं काय हवंय व त्यानुसारच नाटकांची निर्मिती करावी. आपलं नाटक हे प्रेक्षक वर्गाकडे पोहोचेल याची दक्षता घ्यावी. कारण 'जो दिखता है वही बिकता है'. माझ्या मते, जर नाटकांच्या विषयांमध्ये आणि त्याच्या प्रचारांच्या संकल्पनेत बदल केल्यास निश्चितच नाटकांना भरपूर प्रेक्षकवर्ग मिळेल आणि खऱ्या अर्थाने नाटकांना अच्छे दिन येतील.
आकाश पाखरे, विकास रात्र कॉलेज

आधुनिक यंत्रणेचा अभाव
नाटक म्हणजेच प्रबोधन, मनोरंजन, समाजातील समस्या वेगळ्या मार्गाने मांडण्याचं व्यासपीठ होय. तसंच नवनवीन कलाकरांना आपल्यातली कला, अभिनय प्रत्यक्ष सादर करण्याचं ठिकाण म्हणजेच ही रंगभूमी होय. पण या कलेकडे रसिक प्रेक्षक मोठ्या प्रमाणात पाठ फिरवत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्याचं कारण म्हणजेच नवनवीन नाटकांच्या प्रेक्षक वर्गात वाढ झालीच नाही. कारण त्यांचा प्रसार आणि प्रचार होतंच नाही. लेखक मंडळी पांरपरिक विषयावरच लेखन करत आहेत. आधुनिक यंत्रणा यांचा मोठ्या प्रमाणात अभाव दिसून येतो. पुस्तकांवर आधारित नाटकं सध्या मोठ्या प्रमाणात होतायत. विषय तेच-तेच होत असल्यामुळे नाटकांकडे प्रेक्षकांना सध्या पाठ फिरवावी लगातीय. तरूण वर्गाला आकर्षित करण्यासाठी फार कमी प्रयत्न होतायत. नाट्य परिषद किंवा संमेलनांसारखे कार्यक्रम दर सहा माहिन्यांनी करावेत, जेणेकरुन लोकांना त्याबद्दल हवा वाटेल आणि नाटकांचं महत्त्वही कळेल.
अनिरूद्ध गायकवाड, सेंट झेविअर्स कॉलेज

आकर्षक नावं असावीत
मराठमोळी नाटकं रंगभूमीवर ज्या काळापासून सुरु झालेली, त्या काळात प्रेक्षकांची नाटकांप्रतीची ओढ अप्रतिम होती. पण जस-जसा काळ बदलत गेला तस-तशी प्रेक्षकांची नाटकांबद्दलची आवड कुठेतरी कमी होताना दिसली. यासाठी खूप सारे घटक कारणीभूत आहेत. जसं की, आजकालचे बहुतांश लोक टीव्ही, इंटरनेट, मोबाइल अशा गोष्टींच्या आहारी गेलेत. नाटकं अप्रतिम असतात किंबहुना त्यातून चांगल्याच गोष्टींचा बोध मिळतो यात काही शंका नाही. प्रेक्षक सर्वप्रथम आकर्षित होतो ते म्हणजे नाटकाच्या नावाकडे. मग नाटकांची नावंदेखील अशी हवी की, नाव वाचून प्रेक्षकांच्या मनात ते नाटक पाहण्याची उत्सुकता निर्माण व्हायला हवी. आपल्या मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या नाट्यसंस्कृतीचं महत्त्व येणाऱ्या प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचेल.
प्राजक्ता भरगुडे, गुरु नानक खालसा कॉलेज

सोशल मीडियाचा फटका
'पंचतुंड नररूंडमालधर' ही नांदी आजही चिरतरुण आहे. पण आज नाटक बघायला मिळत नाही. खरंतर नाटक आपल्याला वास्तवाचं भान देतं. समोर घडणाऱ्या घटनांनी नाटकातली वास्तविकता उठून दिसते. पण हल्ली नाट्यसंस्कृती मागे पडण्यामागचं कारण म्हणजे, तितकेसे खिळवून ठेवणारे विषय नाहीत. नवनवीन विषय रंगभूमीवर यायला हवेत. निर्मात्यांनी अति प्रयोग करायच्या मागे लागू नये. त्यामुळे चांगला कलाकार हा एका चौकटीत अडकला जातो. आम्हाला त्याच्या नवनवीन भूमिका बघायला आवडतील. या सगळ्यात इंटरनेटचा, सोशल मीडियाचा फटका मात्र नाटकांना बसतोय, ज्यांनी नाटकं पाहावीत असा तरूणवर्ग फेसबुक आणि व्हॉट्सअॅपमध्ये रमलाय. त्यामुळे नाटकांपासून प्रेरणा घेऊन पुढे चांगले कलाकार घडतील, ही शक्यता ही कमीच आहे. नाट्यसंस्कृती टिकण्यासाठी शालेय पातळीवर उपक्रम राबवायला हवेत, खेळांसाठी तास राखून ठेवले जातात तसंच नाटकांच्या सरावाचे, तालमीचे विशेष तास असावेत.
नागेश सुतार, मुंबई विद्यापीठ

प्रेक्षकांनीच पुढाकार घ्यावा
खरं तर नाटक हे पूर्वीपासूनच लोकप्रिय मनोरंजनाचं माध्यम आहे. पण चित्रपट, शोस, वेब सीरीजमध्ये आजचा तरुण वर्ग इतका गुंतून गेलाय की, त्यांचं मन नाटकाकडे ओढ घेत नाही. अचानक एखादं नाटक इतकं लोकप्रिय होऊन जातं की प्रेक्षकवर्ग तिथंच धाव घेतात आणि इतर नाटकाकडे त्यांचे दुर्लक्ष होतं. आजकल तरुणांना आवडेल अशी टेक्नॉलॉजी नाटकात वापरली जाते, जेणेकरुन तरुणाई नाटकाकडे ओढ घेतील. आता नाटक हे मराठी संस्कृतीमध्ये जपणं याची संपूर्ण जबाबदारी आपली आहे. प्रेक्षकांनीच नाटकाच्या दिशेने आपलं पाऊल उचलायला हवं.
स्नेहल जाधव, बाफना कॉलेज

अनेक समस्या अन् आव्हानंही!
नाटक हे असं क्षेत्र आहे जिथं जिवंत अभिनयाला वाव मिळतो. तरी मराठी नाट्यसृष्टीची सध्याची स्थिती दयनीय आहे. याचं मुख्य कारण म्हणजे नाटकांची मर्यादित ‘प्रसिद्धी’. एखादा नवीन सिनेमा आला की, ट्रेलर्स, गाणं आणि विविध मुलाखती या माध्यमातून सिनेमाचं प्रमोशन केलं जातं. त्याविरुद्ध नवीन नाटकांची प्रसिद्धी फारच कमी आहे. शिवाय नाटक म्हणजे फक्त शब्दांची खेळी, त्यात सिनेमासारखी लखलखती दुनिया कुठे असाही आजच्या तरुणाईचा समज आहे. घरबसल्या विविध सिनेमे, सीटकॉम, वेबसीरिज फोनवर अथवा लॅपटॉपवर उपलब्ध असताना तिकीट काढून रंगमंदिरात प्रत्यक्ष नाटक बघणारी रसिक प्रेक्षक मंडळी आजकाल फारच कमी होत चालली आहे. तरुण प्रेक्षकवर्गाचा नाट्यकलेत विश्वास पुन्हा जागरूक करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सध्याचे ट्रेंडिंग विषय नाटकात आणणं, त्यामधून समाजामध्ये जागृती करणं आणि या नाटकांना आवश्यक तशी प्रसिद्धी देऊन घरारात पोहोचवणं, हे नाट्यसृष्टीपुढील सगळ्यात मोठं आव्हान आहे.
ऋतुजा बागुल, व्हीजेटीआय कॉलेज

उद्देश निखळ मनोरंजनाचा
नाटक हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात कमी पडतंय. नाटकाचा विषय, त्याची खासियत हे फक्त वर्तमानपत्रातून पोहोचते, पण नाटकवाल्यांनी त्यासाठी काही विशेष प्रयत्न घ्यायला हवेत, असं माझं मत आहे. सिनेमाचं ज्या पातळीवर प्रमोशन होतं, त्या पातळीवर नाटकाचं होत नाही, म्हणून नाटक आज प्रेक्षकांना खेचू शकत नाही. आजच्या पिढीला भेडसावणाऱ्या समस्या यावर खूप नाटकं आली. पण आपल्या रोजच्या कटकटींच्या पलीकडे निखळ मनोरंजन करणारी नाटकं त्या तुलनेने कमी आहेत. जी आहेत त्यांचा दर्जा तितका चांगला आहे, असं म्हणता येणार नाही. थोडक्यात नाटकांचे जास्तीत जास्त प्रेक्षकांकडे पोहोचणं जसं महत्त्वाचं आहे तसंच आपण जे नाटक दाखवतोय त्यातून प्रेक्षक घरी काय घेऊन जातो यापेक्षा तो नाट्यगृहात असताना किती दिलखुलासपणे ते नाटक एन्जॉय करू शकतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मैत्रयी नामजोशी, रुपारेल कॉलेज

संस्कृतीचा अविभाज्य भाग
नाटक म्हणजे कलाकाराच्या मनातील भाव जो थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. पूर्वी अनेक मराठी नट-नट्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात नाटकांपासून केली. त्यामुळे नाटक हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. पूर्वी नाटकाला सिनेमाइतकीच गर्दी व्हायची. पण सध्याची परिस्थिती पाहता कोणतं नाटक येतं आणि जातं हेसुद्धा अनेकदा कळत नाही. नाट्यगृहातील जेमतेम ठीक असलेली आसनव्यवस्था, अस्वच्छ स्वच्छतागृह, नावाला फिरत असलेले पंखे अशा ठिकाणी जाऊन २००-३०० रुपयांचं तिकीट काढून नाटक पाहण्यापेक्षा प्रेक्षक एसी, आरामदायी आसनव्यवस्था असणाऱ्या आणि नाटकाच्या अर्ध्या किंमतीत मिळणाऱ्या मल्टिप्लेक्समधील सिनेमाला जास्त गर्दी करतात. त्याचप्रमाणे सिनेमाच्या मोठमोठ्या जाहिराती, नवनवे विषय, भव्यदिव्यता प्रेक्षकांना भावते. कलाकार जितका लोकप्रिय तितका प्रेक्षकवर्ग मोठा. त्यामुळे व्हॉट्सअॅप, फेसबुक, युट्यूब यासारख्या सोशल मीडियाचा वापर, नवनवे विषय, नाट्यगृहांची सुधारणा आणि जोरदार प्रमोशन केलं तर नक्कीच नाटकाला सुगीचे दिवस येतील.
विभक्ती साळवी, डहाणूकर कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कडक कारवाई हाच इलाज!

$
0
0



शहरे असोत वा रेल्वे स्टेशन्स, स्वच्छतेच्या बाबतीत केंद्र सरकारच्या यादीमध्ये पहिल्या दहा नंबरात नवी मुंबई वगळता ना मुंबई दिसली ना आजूबाजूची इतर शहरं. असं का घडलं? या प्रश्नावर तरुणांनी युवा कट्टावर व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया पुरेशा बोलक्या आहेत. ‘मी कचरा करणार नाही आणि दुसऱ्याला करु देणार नाही’ हा संकल्प आपण स्वतः अंमलात आणत नाही, तोपर्यंत आपल्याला प्रशासनाला दोष देण्याचा अधिकार नाही, असं स्पष्ट मत बहुतांश प्रतिक्रियांमधून व्यक्त झालं. स्वच्छतेच्या दुश्मनांवर कडक दंडात्मक कारवाई हाच रामबाण इलाज असल्याचंही तरुणांना वाटतंय.

यावेळच्या युवा कट्टात सहभागी झालेलं मुंबई विद्यापीठ आणि संलग्न कॉलेजेस
• सेंट झेविअर्स कॉलेज (फोर्ट)
•गर्व्हमेंट लॉ कॉलेज (चर्चगेट)
•एच. आर. कॉलेज (चर्चगेट)
•बी. एम. रुईया गर्ल्स कॉलेज (ग्रँट रोड)
•चेतना कॉलेज (वांद्रे)
•डहाणूकर कॉलेज (विलेपार्ले)
•तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स (अंधेरी)
•एम.डी. कॉलेज (परळ)
•एम. के. कॉलेज (परळ)
•व्हीजेटीआय (माटुंगा)
•गुरु नानक खालसा कॉलेज (माटुंगा)
•विकास रात्र कॉलेज (विक्रोळी)
•वझे-केळकर कॉलेज (मुलुंड)
•जोशी-बेडेकर कॉलेज (ठाणे)
•एस. एस. जोंधळे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (डोंबिवली)
•बिर्ला कॉलेज (कल्याण)
•विवा कॉलेज (विरार)

बेजबाबदारपणा कारणीभूत
स्वच्छता हा सध्याच्या जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे. 'स्वच्छ भारत अभियान' हे स्वच्छतेच्या दृष्टीने उचललेले एक महत्त्वाचं पाऊल आहे. खरंतर स्वच्छता राखणं हे आपलं कर्तव्य आहे. तरुणाईने रेल्वेस्थानके आणि इतर विविध ठिकाणं स्वच्छ केली. रेल्वे स्थानकांच्या पानाच्या पिचकाऱ्यांनी भरलेल्या भिंती साफ करुन त्या कल्पकतेने रंगवल्या. पण थोड्याच दिवसात चित्र पूर्णपणे पालटलं. स्वच्छतेच्या बाबतीत जाहीर केलेल्या शहरांच्या आणि रेल्वेस्थानकांच्या बाबतीत मुंबई, ठाणे यांसारखी शहरे पिछाडीवर आहेत. रेल्वेस्थानके आणि इतर ठिकाणी कचराकुंडी असली तरी अनेकदा लोक कचरा इतरत्रच टाकतात. पानाच्या पिचकाऱ्यांनी भिंती, रेल्वेचे डबे रंगवले जातात. रेल्वे स्थानकांच्या बाहेर पूर्वी क्लीन-अप मार्शल्स होते. ते अस्वच्छता करणाऱ्यांकडून दंड आकारत असत. हल्ली मात्र हे क्लीन-अप मार्शल्स क्वचितच पाहावयास मिळतात. 'स्वच्छ भारत अभियाना' सोबत दहा जणांची स्वच्छतेचे राजदूत म्हणून निवड केली गेली. पण त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत कुठेही विशेष उल्लेख आढळला नाही. बेजबाबदार नागरिक, योग्य नियोजनाचा अभाव इ.घटक यासाठी कारणीभूत आहेत.
वैभव पुरव, डहाणूकर कॉलेज

सुरुवात स्वतःपासून
'स्वच्छ मुंबई ,हरित मुंबई', हे वाक्य ऐकायला छान वाटतं. पण खऱ्या आयुष्यात पाहता खरंच आपली मुंबई स्वच्छ आहे का? चांगल्या जीवनासाठी केवळ पैसा, शिक्षण महत्त्वाचा नाहीये तर चांगलं आरोग्य हाच मूलभूत घटक आहे. चांगले आरोग्य लाभण्यासाठी आजुबाजूचा परिसर स्वच्छ- नीटनेटका असणं आवश्यक आहे. परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सरकारची नसून तुम्हा आम्हा सर्वांची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमंलबजावणी केलेले स्वच्छ भारत अभियान फक्त कागदावरवच राहिले. पण प्रत्यक्षात मात्र कोणाकडूनच ते आमलात आणलं गेलं नाही. केवळ रेल्वेस्थानाकांवर सुंदर रंगीबेरंगी चित्र काढून उपयोग नाही. तर त्याची निगा राखणं हे नागरिकांचं कर्तव्य आहे. यासाठी इतरांवर अवलंबून राहू नये. सुरुवात स्वतःपासून करूया. प्रत्येकाने स्वतःचा परिसर स्वच्छ ठेवण्यास सुरुवात केली तर हळुहळू सारा देश स्वच्छ होईल. झाडे लावून सभोवलताचा परिसर प्रदूषण मुक्त करूया. नाले, गटारे यांची योग्यवेळी साफसफाई करून चांगले आरोग्य मिळवूया. एकजुटीने प्रयत्न केल्यास आपलं शहरदेखील स्वच्छ शहरांच्या यादीत अव्वल स्थानावर येईल.
स्वेता सकपाळ, डहाणूकर कॉलेज

आपल्या देशासाठी गरजेचं
'हात फिरवाल तेथे स्वच्छता', असे उद्गार काढणारे गाडगे महाराजांनी सर्वांना स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. पण तरीदेखील आज आपल्या देशात अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलेलं आहे. मला वाटतं लोकांच्या मानसिकतेत न होणाऱ्या बदलांमुळे तसंच कायद्याची भीती नसल्यामुळे आणि सर्वच ठिकाणी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नसल्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत आपण मागे पडतोय. भिंतींवर रंग काम करून, स्वच्छतेचे पोस्टर चिकटूनसुद्धा व्यसन धारकांनी त्याला ही घाण केलं. त्यामुळे तरूणाईला या स्वच्छता अभियानामध्ये वेगवेगळ्या संस्था वगळता इतर फार कमी लोकांचं पाठबळ मिळालं. मला वाटतं जर स्वच्छता अभियान यशस्वी करायचं असेल तर सर्व प्रथम स्वच्छतेचं महत्त्व सर्वांना पटवून दिलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावून कायद्याची भीती सर्वांच्या मनात निर्माण केली पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाने स्वच्छता ही माझ्यासाठी आणि माझ्या देशासाठी गरजेची आहे हा विचार करून या मोहिमेकडे जर पाहिलं तर नक्कीच हे अभियान यशस्वी होईल.
भक्ती पालांडे, तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स

जनता, व्यवस्थेची सांगड आवश्यक
जनजागृती हे या अभियानाचं महत्त्वाचं उद्दीष्ट आहे. या संकल्पनेचं महत्त्व मुंबईतील तरुण वर्गाला उमगलं आहे, हे नक्की. जनजागृतीच्या मोहिमेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न पाहता त्याची प्रचिती येते. काही लोकांवर या संकल्पनेचा फारच परिणाम झाला आहे तर काही लोकांना त्याची पुसटशी कल्पनाही नाही. लोकलमधून कचरा टाकणारे लोक आणि तिला ते करण्यापासून थांबवू पाहणारी व्यक्ती यांच्यातील वाद आता सर्वांना परिचयाचा झाला आहे. बदल घडतोय पण तो पुरेसा नाही. योग्य जनजागृती मोहिमेतून स्वच्छ मुंबईचं स्वप्न साकारता येईल. त्याचबरोबर ज्यांना याची महती कळली आहे त्यांनी आपल्या शहारासाठी आपलं कर्तव्य म्हणून योग्य तो सहभाग देणं अत्यावश्यक ठरेल. शेवटी जनता आणि व्यवस्था यांची योग्य ती सांगड घालूनच स्वच्छ भारताचे स्वप्न सत्यात उतरवता येईल.
लीना जाधव, व्हीजेटीआय

संस्कार रुजावेत

करा मुलांवर स्वछतेचे संस्कार
रोगमुक्ती जीवन होईल साकार
आपण मुलांना लहानपणापासून शिकवतो, नेहमी खरं बोलावं, वाईट कामं करू नये असं बरंच काही. पण आपण मुलांना कचरा बाहेर टाकायचा नाही, तो कचरापेटीतच टाकावा. रस्त्यात थुंकू नये, त्याने दुर्गंधी-रोगराई पसरते, असे कधीच बजावून सांगत नाही. माझ्या मते, आपण मुलांवर स्वछतेचे संस्कार करण्यातच कमी पडत आहोत. बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला वाचता येतात, पण भिंतींवर थुंकू नये असे लिहीलं असताना देखील लोक तिथेच पिचकाऱ्या मारून भिंती रंगवतात. आपण किती दिवस सरकारी कर्मचाऱ्यांवर बोट दाखवणार. आपल्या मतानुसार स्वछता करण्याचं काम फक्त कर्मचाऱ्यांचं आहे. आपल्याला कचरा उचलण्यास, साफ करण्यास कमीपणा वाटतो. स्वछता कशी होतेय हे केवळ बघून चालणार नाही तर स्वच्छतेचे संस्कार प्रत्येकाने मनात रुजवायला हवे आणि त्याची बीजं सगळीकडे पेरायला हवीत. तेव्हाच होईल स्वच्छ भारत, मेरा भारत!
योगिता कुवेसकर, गर्व्हमेंट लॉ कॉलेज

आपलीही जबाबदारी!
स्वच्छतेच्या संदर्भात असलेल्या या संपूर्ण परिस्थितीसाठी सामाजाचा एक भाग म्हणून आपणसुद्धा तितकेच जबाबदार आहोत. ज्या पद्धतीने आपण आपल्या घराला स्वच्छ ठेवून त्याची काळजी घेतो, त्याच पद्धतीने आपण दिवसभर जिथे जिथे वावरतो त्या ठिकाणांची आपण आपल्या घरासारखी काळजी घ्यायला हवी. स्वच्छतेबाबत जर कोणी नियमांचे उल्लंघन करत असेल तर प्रशासनाकडून देखील त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. पण अशी कारवाई क्वचितच होते. काहीतरी बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात आपण स्वतःपासूनच करायला हवी, तरच बदल घडू शकतो. 'भारत माझा देश आहे',असं म्हणून भारत आपला होत नाही. त्यासाठी आधी आपल्याला भारताचा जबाबदार नागरिक होण्याची कर्तव्ये पार पाडणंसुद्धा गरजेचं आहे. भारत देशाला स्वच्छ ठेवणं हे माझं आद्य कर्तव्य आहे व मी ते देशप्रेम या भावनेने पार पाडणारच असा निश्चय प्रत्येकाने केल्यास 'स्वच्छ भारत, अतुल्य भारत'चा नारा जगभर अभिमानाने दिला जाईल.
आशुतोष साळुंखे, एस्. एस्. जोंधळे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग

दंडात्मक कारवाई व्हावी
आपल्या आजुबाजूचा परिसर स्वछ ठेवावा, असं प्रत्येकाला मनापासून वाटणं गरजेचं आहे. उपक्रमांअंतर्गत कितीही साफसफाई केली तरीही रस्त्यावर कचरा टाकणं आणि घाण करणं जिथपर्यंत थांबत नाही तिथपर्यंत फारसा फरक पडणार नाही. मुलांना पुस्तकात परिसर स्वछ ठेवा असं कितीही शिकवलं तरीही शाळे बाहेर आल्यावर कोणालाही घरातून, ट्रेनमधून वगैरे कचरा बाहेर टाकताना किंवा थुंकताना पाहिलं की मुलांना त्यात काही गैर वाटत नाही. त्यामुळे स्वच्छतेबाबतच्या चांगल्या सवयी स्वतः अंगीकारून पुढच्या पिढीलाही अगदी लहानपणापासूनच अशा सवयी लावणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. स्वछतेबाबत जनजागृती करण्याबरोबरच ठोस कायदेही करणं आवश्यक आहे, जेणेकरून परिसर अस्वच्छ करणाऱ्यांना धाक बसेल. रेल्वे स्टेशन, रस्ते आणि इतर सार्वजनिक ठिकाणी तसंच सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि सेन्सर्स लावून कचरा टाकणाऱ्यांवर नजर ठेवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. ट्रेन, बस आणि इतर सर्वजनिक वाहनांमाध्येही कचराकुंडी, वमनथैली अशा सोयी कराव्यात. सुलभ शौचालयांची संख्या वाढवून तीसुद्धा वारंवार स्वच्छ करावीत.
चिन्मयी वझे, व्हीजेटीआय

तरुण पिढीच आघाडीवर
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालवलेल्या स्वच्छता अभियानाला फार व्यापक रूप प्राप्त झालंय. सुरुवातीचे काही महिने सगळ्यांनीच स्वच्छता अभियानाला पाठिंबा दिला. अनेक शहरांमध्ये स्वच्छता स्पर्धा घेण्यात आल्या. आपल्या शहराला विजयी ठरवण्यासाठी कित्येकांनी स्वतः हातात झाडू घेऊन शहर स्वच्छ ठेवण्याचं काम केलं. या सगळ्यात बेजबाबदार समजली जाणारी तरुण पिढीच अगदी आघाडीवर होती. सुट्टीच्या दिवशी आपला परिसर स्वच्छ करणं, लोकांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत जागरूकता निर्माण करणं, शहरातील अस्वच्छ भिंतींवर सुंदर कलाविष्कार दाखवून त्यातही सामाजिक संदेश देणं यासारख्या अनेक उत्तम कल्पना तरुण पिढीच्याच होत्या. पण सगळ्यांकडून त्यांना पाठिंबा मिळालाच असं नाही. ज्याने अस्वच्छता पसरवली त्यालाच ते साफ करून परत दंड आकारला तर नक्कीच लोक आशा गोष्टी करणं टाळतील. निदान आपला देश निरोगी देश व्हावा या साठी तरी स्वच्छता राखा. स्वच्छता ही केवळ एक दिवस राखण्याची गोष्ट नसून, त्या साठी सतत प्रयत्न करायला हवेत.
वृषाली भामरे, एच. आर. कॉलेज


...तेव्हाच महत्त्व पटेल!
'एक कदम स्वच्छता की और' हा नारा घेऊन भारत देशातील सर्व नागरिक एकजुटीने स्वच्छ भारत अभियान मोहिमेमध्ये सहभागी झाले. या मोहिमेअंतर्गत अनेक वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले. अनेक लोक या उपक्रमात सहभागी झाले. सर्वांनी एकमेकांना सहकार्य करत ही मोहीम पार पाडली. पण खरंच ही मोहीम यशस्वीरीत्या पार पडली का? तर नाही. कारण जेव्हा ही मोहीम सुरू करण्यात आली तेव्हा सर्व यामध्ये सहभागी झाले होते. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सर्व सहभागी होऊन मोठ्या उत्साहाने कार्यक्रमाची शोभा वाढवली. पण हे फक्त सुरुवातीचंच चित्र होतं. नंतर हे सर्व चित्र पालटलं. सर्वात मुख्य म्हणजे मुलं आपली उन्हाळी सुट्टी घालवून एवढ्या उकाड्यात मेहनतीने स्टेशनच्या भिंती रंगवतात. मात्र दुसऱ्या दिवशी मात्र बेशिस्त लोक त्या भिंतींवर पान, तंबाखू खाऊन थुंकतात. ही तर खरंच लज्जास्पद गोष्ट आहे. एकीकडे मात्र आपला देश स्वच्छ करण्याची शप्पथ घेतात आणि दुसरीकडे मात्र हे असं दिसून येतं. यांच्यावर तर कारवाई करायलाच हवी. हळुहळू स्वच्छतेचं महत्त्व सर्वांना उमगल्यावर सर्व पुन्हा या मोहिमेत सहभागी होतील आणि तेव्हा खऱ्या अर्थाने स्वच्छ भारत अभियान मोहीम यशस्वी होईल.
कांचन गावस्कर, एच. आर. कॉलेज

गरज खंबीर पाठींब्याची
स्वच्छ भारत अभियान हे तरुणाईने मनावरच घेतलं होतं. नुसतं बोलण्यातून नाही तर कृतीतूनसुद्धा तरुणाई या अभियानात सहभागी झाले, तरीसुद्धा मुंबई-ठाणेसारखी शहरं पिछाडीवर पडली. या स्वच्छतेच्या अभियानामध्ये नुसतंच तरुण पिढींनी मनावर घेऊन चालणार नाही तर त्यासाठी प्रौढ वर्गाचासुद्धा तेवढाच हातभार हवा. तरुणाईंनी तर रेल्वे स्टेशनपासून बाकीच्या सर्व अस्वच्छ जागांची साफसफाई करण्यापर्यंतच व्रत घेतलेलं दिसलं. पण त्यासाठी त्यांना पाठींबा पूर्णपणे मिळाला नाही. प्रशासनसुद्धा यामागच्या कारवाईत कुठेतरी कमीच पडत आहे. स्वच्छतेच्या दुश्मनांवर योग्य ती कारवाई झालीच नाही. अशा लोकांवर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. स्वच्छतेच्या दूतांकडून तरी सकारात्मक प्रतिसाद मिळालाच नाही, पण आता पुन्हा एकदा ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे.
पूजा कोर्लेकर, एच. आर. कॉलेज

दोष आपलाच!
स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत मुंबई आणि ठाणे ही महानगरे पिछाडीवर गेली आहेत, ही बाब गांभीर्याने घेण्यासारखी आहे. यात एकूणच शहरातील स्वच्छता आणि रेल्वे स्थानकांची स्वच्छता या दोन गोष्टींवरील शहरांसाठी अतिमहत्वाच्या असून ही त्यांचा दर्जा खालावलाय हे वास्तव आपण स्वीकारायला हवं आणि अस्वच्छतेची नेमकी कारणं शोधून त्यावर ठोस उपाययोजना करायला हव्यात. यासाठी फक्त प्रशासनाला त्याच्या अकार्यक्षमतेसाठी दोष देणं अजिबात योग्य नाही. सुजाण नागरिक म्हणून आपल्या शहरात स्वच्छता ठेवणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. कचरा कुंड्या गरजेपेक्षा कमी संख्येत असणं, त्या नित्यनेमाने रिकाम्या न झाल्यामुळे क्षमते पलीकडे भरलेल्या असणं आणि नाल्यांना पुरेशा उंच संरक्षक भिंती नसणं ही कचरा साचण्याची तीन मुख्य कारणं आहेत. यामुळे अस्वच्छता आणि त्यातून होणारे आजार उद्भवतात. या सगळ्यावरून मला एवढंच सांगावंसं वाटतं की, शेवटी आपण तर स्वतः स्वच्छतेचे नियम पाळले, इतरांना तसं प्रोत्साहन दिलं आणि कोणी नियम तोडत असेल तर त्याला वेळीच समजावलं तरच आपल्याला प्रशासनावर अकार्यक्षमतेचा आरोप करण्याचा हक्क आहे.
ओमकार जोशी, व्हीजेटीआय

...तरच सुधारणा शक्य
स्वच्छ भारत हे सर्वांनी अभियान कमी आणि देशप्रती असलेलं कर्तव्य आहे, असं समजलं पाहिजे. कारण स्वच्छता ही सांगून नाही तर निभावून पूर्ण होते. आपल्या घरी जरा कचरा दिसला की, आपण साफ करतोच पण त्यासोबत कचरा केलेल्या आपल्या व्यक्तीला चार शब्द किंवा थोडक्यात ओरडा देतो. तेच आपण बाहेर का करत नाही? रस्त्यावर कोण कचरा करत असेल तर थांबवून त्यालाच तो कचरा परत देऊन चार गोष्टी लोकांच्या मदतीने सांगाव्यात. स्वच्छ भारताच्या दिशेने आपण सर्वांनी एकत्र मिळून एक पाऊल पुढे उचलायला हवं. हे आपलं कर्तव्य समजून त्यात कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न शोधता केलं तर नक्कीच सुधारणा आपोआप होईल.
रसिका भोगले, चेतना कॉलेज

मूलभूत गरज
स्वच्छता फक्त सुंदरतेसाठी गरजेची नसते तर आपल्या आरोग्यासाठी ही तेवढीच गरजेची असते. भारता सारखा देश जिथे लाखो लोक अस्वच्छतेमुळे पसरले जाणारे रोग जसं की, कॉलरा, मलेरिया, डेंगू यामुळे दगावतात. अशा ठिकाणी स्वच्छतेची फार आवश्यकता असते. आपण नेहमी रेल्वे स्टेशन, बसस्टॉप या गर्दीच्या ठिकाणी बघतो की, पान किंवा गुटका खाऊन तेथील स्वच्छ भिंती घाण करणारे अनेकजण आहेत. अशा लोकांना दंड अथवा शिक्षा केली पाहिजे. आपल्या सभोवतालचा परिसर आपण स्वच्छ ठेवला पाहिजे, रस्त्यात पडलेला कचरा उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकला पाहिजे आणि सर्वात मुख्य म्हणजे आपण आपलं घर, आंगण, गाव स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
दर्शना पवार, बिर्ला कॉलेज

स्पर्धा की दिखाऊपणा?

माझा भारत साफ असो
त्यात सर्वांचा हात असो
या ओळीप्रमाणे प्रत्येकाने जर का या गोष्टीला पाठींबा दिला तर हे शक्य होईल. याच बरोबर एक कदम स्वच्छता की और या घोषवाक्यात प्रत्येक व्यक्ती मनापासून सामील झाला पाहीजे. स्वच्छतेचं महत्त्व पटवण्यासोबतच साक्षरतेचं महत्त्व सुद्धा पटवून द्यायला हवं. कारण जेव्हा मानसिकता बदलेल तेव्हाच बदल घडेल. स्वच्छतेबाबात सर्वांनाच कळतं पण जेव्हा ते प्रत्येकाला वळेल ना तेव्हाच काही घडून येईल आणि तेव्हाच हे व्रत पूर्ण होईल. स्वच्छ भारत अभियानांर्तगत घेण्यात आलेल्या स्पर्धेसाठी आपण नक्की कोणत्या दृष्टिकोन ठेवून स्वच्छता केली? विजयी होण्याच्या दृष्टिकोनातून की खरंच आपला भारत स्वच्छ व्हावा या दृष्टीने प्रयत्न केले? हे जेव्हा आपल्यापैकी प्रत्येकाला उमजेल ना, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने विजयी झालेले असू.
प्रतिक्षा शिंदे, बी. एम. रुईया गर्ल्स कॉलेज

अधिक प्रमाणात जागरुकता आवश्यक
भारतभर स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येतं. पण या स्वच्छतेच्या मोहिमेमध्ये आपण कुठे कमी पडतोय? याचा अभ्यास का केला जात नाही? आज या मोहिमेमध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणा सहभागी होतोय. सद्य परिस्थितीत रेल्वेतून दररोज लाखो लोक प्रवास करतात आणि रेल्वे स्वच्छ ठेवण्यासाठी केवळ हातावर मोजण्या इतपतच कर्मचारी आहेत. लोकांमध्ये अजूनही जागरुकता निर्माण केली पाहिजे. भारत भर स्वच्छ भारत अभियान राबवलं जातं. या अभियानात मोठ्या प्रमाणे सहभागी होतात, पण ते केवळ एकच दिवस का? इतर दिवशी का नाही असा ही प्रश्न पडतो. भारत स्वच्छ, सुंदर करायचा असेल तर आपण सर्वांनी या सगळ्याची सुरुवात स्वत:पासूनच करायला हवी.
अनिरुध्द गायकवाड, सेंट झेविअर्स कॉलेज

विचारसरणी मागासलेलीच!
सुंदर निर्मळ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी स्वच्छता फार महत्त्वाची आहे. आपल्या देशाला सुंदर बनवायचं असेल तर स्वच्छतेला आळा घालायला हवा आणि त्याची सुरुवात प्रत्येकाने आपल्यापासून करायला हवी. सरकारने सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत तरुण पिढीने पुढाकार घेऊन ही मोहीम यशस्वी करायला हवी. तरुण वर्गाने तर स्टेशन, रुळांवर फेकलेला कचरा गोळा करण्यापासून ते अगदी स्टेशनवरचे जिने रंगावण्यापर्यंत प्रयत्न केले आणि त्यांचं कौतुकही करण्यात आलं. पण दुसऱ्यादिवसापासून पहिले पाढे पंचावन्न! रंगवलेल्या भिंतींवर परत पिचकाऱ्या मारणं, खाद्य पदार्थांची आवरणं टाकणं या सगळ्या अतिशय वाईट सवयी बदलायला हव्या. मुंबईसारख्या प्रगत शहरात राहूनसुद्धा विचारसरणी मागासलेली आहे. प्रत्येकामधली ही विचारसरणी बदलणं गरजेचं आहे.
वेदांगी काण्णव, वझे-केळकर कॉलेज

नवीन ओळख होण्यासाठी...
कुठलीही संघटना ही संघटीत असेल तरच त्या संघटनेला यश प्राप्त होत असतं. नेमकं हेच संघटन स्वच्छतेच्या बाबतीत आपल्या शहरात पहावयास मिळालं नाही आणि म्हणूनच मुंबई स्वच्छतेच्या यादीत तळाला आहे. स्वच्छता ठेवणं हे प्रत्येक नागरिकाचं सामाजिक कर्तव्य आहे. ही बाब जेव्हा प्रत्येक नागरिकांच्या मनात रुजेल तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वच्छ शहराची निर्मिती होईल. यासाठी शासनाने काही कायदे करावेत व त्यावर कडक अंमलबजावणी करावी. अस्वच्छता पसरवणाऱ्याला केवळ दंड न आकारता त्याने केलेली अस्वच्छताही त्याच्याकडून स्वच्छ करून घ्यावी, जेणेकरून तो पुन्हा अस्वच्छता निर्माण करणार नाही. माझ्या मते, जर सर्वांनीच आपल्या शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी ही आपली जबाबदारी आहे हे स्वीकारलं तर फक्त आपलं शहरच नाही तर संपूर्ण भारत हा विश्वात स्वच्छ आणि निरोगी देश म्हणून ओळखला जाईल.
आकाश पाखरे, विकास रात्र कॉलेज

आपली मुंबई, स्वच्छ मुंबई
'आपली मुंबई, स्वच्छ मुंबई' असं वाक्य बोलताना ही विचार करावा लागतो, कारण वास्तविकपणे पाहायला गेलं तर मुंबई जरी आपली असली तरी ती स्वच्छतेच्या बाबतीत खूप मागे ठरली. रेल्वे स्टेशन्स, रस्ते इत्यादी ठिकाणी भितींवर सुंदर असे संदेश देणारे छायाचित्रं रेखाटलेली असतात पण काही काळाने पाहिलं तर त्या भिंती लाल रंगाने माखलेल्या दिसतात. म्हणजेच काही लोक तिकडे पान खाऊन थुंकतात, ही अत्यंत दुर्देवी बाब आहे. माझ्या मते, प्रत्येक व्यक्तीने फक्त निश्चय नव्हे तर आपली मुंबई, स्वच्छ मुंबई ही धोरण अंमलात आणलं तरच आपलं शहर निरोगी आणि स्वच्छ होईल. जे लोक अस्वच्छता करताना आढळतील त्यांना जाऊन समजावण्याचा अथवा अस्वच्छता केल्याने कोणते दुष्परिणाम होतात हे सांगणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. माझं स्पष्ट मत आहे की, ज्या दिवशी या देशातील प्रत्येक व्यक्ती आपली मुंबई खरोखर आपली मानतील तेव्हाच अस्वच्छतेला खरा चाप बसेल.
प्राजक्ता भरगुडे, गुरु नानक खालसा कॉलेज


स्वच्छतेचा दिखावा कशासाठी?
स्वच्छतेचा देखावा एका दिवसापुरता (सेल्फी काढण्यापुरता) करण्यापेक्षा स्वच्छतेचं महत्त्व प्रत्येकाच्या मनात रूजणं गरजेचं आहे. आपल्या घरापासून आपण दिवसभरात ज्या परिसरात वावरतो तो स्वच्छ ठेवण्याचं व्रत प्रत्येकानेच घेतलं तर बदल अशक्य नाही. जे अस्वच्छता पसरवत असतील त्यांना समज देण्याचं स्वातंत्र्य सामान्य नागरिकांना मिळावयास हवं आणि अशा लोकांविरूद्ध असणाऱ्या शिक्षेची अंमलबजावणी प्रत्यक्षात व्हावी. शिक्षा नुसती पोस्टर्सवर लिहिण्यापुरती नसावी व स्वच्छतेचं महत्त्व पटवून देणाऱ्याचा योग्य सन्मान व्हावा. स्वच्छतेमागील खरे दुश्मन कोणी ठराविक व्यक्ती नसून स्वच्छता न स्वीकारण्याऱ्यांची मानसिकताच कारणीभूत आहे.
सौरभ चव्हाण, डहाणूकर कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ बालपणीचे दोस्त जिवलग

$
0
0


आपल्याला बरेच मित्र-मैत्रिणी असतात. काही शाळेत, कॉलेजमध्ये, नोकरीमध्ये असे वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटतात. काही मित्र-मैत्रिणी मात्र बालपणापासून असतात. ते जीवाला जीव देणारे असतात आणि आयुष्यातल्या प्रत्येक चांगल्या किंवा वाईट गोष्टीमध्ये सोबत असतात. बालपणीच्या मित्र किंवा मैत्रिणीइतकं कोणी आपल्याला नीट ओळखत नाही. त्यामुळेच ते जिवाभावाचे असतात आणि त्यामुळेच कदाचित एखाद्या प्रसंगी चांगला सल्लाही देऊ शकतात.बालपणीचे मित्र अजब असतात. त्यांच्याशी भांडणं होत नाहीत असं नाही. चांगली कडाक्याची भांडणंही होतात. फक्त भांडणांनंतर आपण थेट त्यांच्या घरी जाऊन हक्कानं पुन्हा एकदा बोलू शकतो. एवढंच काय, आपलं भांडण झाल्याचं समजल्यानंतर घरचेही अस्वस्थ होतात आणि दुसऱ्याच्या वतीनं आपल्याशी बोलू लागतात. घरच्यांनादेखील या मैत्रीची जाणीव असते आणि त्यामध्ये भांडणं होऊ नयेत, झालीच तर लवकर मिटावी, असं त्यांना मनापासून वाटत असतं.

बालपणीचे दोस्त एकमेकांना पक्कं ओळखून असतात. एखादा कोणत्या वेळी, प्रसंगी कसा वागेल हे त्यांना माहिती असतं. त्यामुळेच तर काही दिवस भेट होऊ शकली नाही, अगदी फोनही झाला नाही, तरी मैत्रीमध्ये दुरावा येत नाही. उलट, काहीतरी कामात असेल, असं म्हणत समजावून घेतलं जातं. त्यानंतरची भेटदेखील अगदी पूर्वीसारखीच असते. मध्यंतरी बराच काळ आपल्यात बोलणं झालं नाही, याविषयी चर्चा होत नाही. कटुता तर लांबची गोष्ट.बालपणीचे दोस्त हे आपल्यातला प्रत्येक टप्प्यावरचा बदल न बोलता, नकळत टिपत असतात. आपल्याला काय आवडतं, कोणती गोष्ट अजिबात आवडत नाही, आपल्याला कशामुळे राग येतो, कोणत्या गोष्टीमुळे मनापासून आनंद होतो, कोणतं गाणं आवडतं, कोणता रंग आवडतो असं अगदी काहीही त्यांना माहीत असतं. आपलं पहिलं प्रेम त्यांनाच तर विश्वासानं सांगितलेलं असतं. आपल्या साऱ्या गोष्टी त्यांच्याकडे सुरक्षित असतात आणि त्यामुळेच हे मित्र जिवाभावाचे असतात.

आपल्या मनातल्या, फारशा कोणाला न सांगितलेल्या गोष्टी बालमित्रांकडे सुरक्षित आहेत, याची आपल्यालाही मनापासून खात्री असते. त्याशिवाय लहानपणापासूनच्या काही मजेशीर गोष्टीही त्यांना आठवत असतात. अगदी सायकल चालवायला शिकण्यापासून, कुल्फी खाण्यापर्यंत, गल्ली क्रिकेटपासून, लपाछपीपर्यंत आणि कोणाला कोण आवडत होतं इथपासून प्रेमभंगाच्या पहिल्या अनुभवापर्यंत तेच तर बरोबर असतात. त्यामुळेच या मित्र-मैत्रिणींचा परस्परांवरचा विश्वास दृढ असतो. एवढंच नाही, तर वेळप्रसंगी ही मंडळी कोणत्याही वेळी धावून येतील, याची खात्रीही असते. या मैत्रीचा पाया प्रामाणिकपणाचा असतो. साऱ्यांना सारंच माहीत असल्यामुळे, सगळे एकमेकांशी प्रमाणिक असतात. कधीतरी लहानपणी छोटीशी लबाडी केलेली असते, ती पकडली जाते किंवा जातही नाही; परंतु ती गंमत असते. ठरवून केलेली मस्ती असते. आपल्या मित्र किंवा मैत्रिणीशी अप्रामाणिकपणा मात्र कधीच केला जात नाही. म्हणूनच तर ‘तू भाऊ आहेस रे’ किंवा ‘माझी बहीणच,’ असं या मित्र किंवा मैत्रिणीबद्दल हक्कानं बोललं जातं.

या दोस्तांशी गप्पा मारण्यास कोणताही विषय चालतो किंवा कोणताही विषय वर्ज्य नसतो. आपल्या मनातल्या गोष्टी मोकळेपणानं बोलता येतात. क्वचितप्रसंगी सल्ला घेता येतो. हे बालमित्र एकाच शाळेतले असतील, तर बघायलाच नको. त्यांच्याकडे बोलण्यासाठी इतरांपेक्षा दोन विषय जास्तच असतात. त्यामुळे भेटल्यानंतर गप्पांची मैफल अशी रंगते, की वेळेचं भानही हरपतं. उशीर झाल्यानंतर त्या मित्राचं किंवा मैत्रिणीचं नाव सांगितल्यावर घरातलं वातावरणही निवळतं. त्यात तुम्ही एकमेकांपासून लांब राहायला गेला असाल, तर मित्र किंवा मैत्रिणीला भेटल्यावर यांना घरी येण्यास उशीर होणार किंवा हे आता पोटभर गप्पा मारून आणि तिकडेच पोट भरून परतणार, हे घरच्यांनीही गृहित धरलेलं असतं. या दोस्तीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते कायम एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात. आपल्या मित्राची किंवा मैत्रिणीची चूक असली, तरी ते एकमेकांचा हात सोडत नाहीत. उलट चुकीच्या वेळी भक्कमपणे पाठीशी उभे राहतात. तो प्रसंग निभावून न्यायला मदत करतात. पुन्हा पुढे कधी त्या प्रसंगाबद्दल टोचून बोलत नाहीत. त्यांच्या दृष्टीनं तो विषय तिथेच संपलेला असतो. थोडक्यात, बालपणीचे मित्र-मैत्रिणी हे भन्नाट असतात. आपल्या सगळ्यात जवळचे, आपल्या सगळ्या गोष्टी माहीत असलेले, ज्यांच्याशी काहीही बोलता येईल असे आणि आपल्या पाठीशी उभे आहेतच, अशी शंभर टक्के खात्री असलेले. म्हणूनच बालपणीचे दोस्त मनात राहतात. ‘ही दोस्ती तुटायची नाय,’ ही त्यांच्याबाबत शंभर टक्क्यांची खात्री असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाद नको, संवाद हवा

$
0
0

आई-बाबा आणि मुलांच्या गोड नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतोय असं मत युवा कट्टावरील शंभर टक्के प्रतिक्रियांमधून उमटलं. नात्यामध्ये जिव्हाळ्यापेक्षा एकमेकांकडून वाढलेल्या अपेक्षा, कामाच्या स्पर्धेत हरवलेले आई-बाबा आणि सोशल मीडियावर लाइक्सच्या मागे लागलेली तरुणाई, यामुळे अनेक घरांमधील संवादाची जागा विसंवादाने घेतली आहे. यामुळेच या गोड नात्यामध्ये चिडचीड, अंहकार, हेवेदावे, मतभिन्नता वाढतेय. आई-बाबा आणि मुलांच्या नात्यातला दुरावा दूर करण्यासाठी संवाद हे एकच रामबाण औषध असल्याचं सांगतानाच यापुढे यासाठी आपण पुढाकार घेऊ असं मत अनेक प्रतिक्रियांमधून व्यक्त झालं.

यावेळच्या युवा कट्टात सहभागी झालेलं मुंबई विद्यापीठ आणि संलग्न कॉलेजेस
• सेंट झेविअर्स कॉलेज (फोर्ट)
•एच. आर. कॉलेज (चर्चगेट)
•बी. एम. रुईया गर्ल्स कॉलेज (ग्रँट रोड)
•एम. डी. कॉलेज (परळ)
•साठ्ये कॉलेज (विलेपार्ले)
•डहाणूकर कॉलेज (विलेपार्ले)
•भवन्स कॉलेज (अंधेरी)
•तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स (अंधेरी)
•राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अंधेरी)
•पाटकर कॉलेज (गोरेगाव)
•विवेक कॉलेज (गोरेगाव)
•रुईया कॉलेज (माटुंगा)
•पोदार कॉलेज (माटुंगा)
•व्हीजेटीआय (माटुंगा)
•वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनजमेंट (माटुंगा)
•झुनझुनवाला कॉलेज (घाटकोपर)
•विकास रात्र कॉलेज (विक्रोळी)
•अस्मिता कॉलेज ऑफ लॉ (विक्रोळी)
•आर.ए.डी.ए.व्ही कॉलेज (भांडुप)
•जोशी-बेडेकर कॉलेज (ठाणे)
•बिर्ला कॉलेज (कल्याण)
•सीएचएम कॉलेज (उल्हासनगर)
•भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (बेलापूर)
•यादवराव तासगावकर स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (कर्जत)

सुसंवाद महत्त्वाचा
तंत्रज्ञानाचा सर्वात जास्त परिणाम कौटुंबिक व्यवस्थेवर होतोय. काम, शाळा आणि अभ्यासेत्तर उपक्रमांमुळे आधीच कुटुंबासाठी वेळ उरत नाही आणि तंत्रज्ञांच्या वापरामुळे त्यात भर पडते. चॅटिंग, दूरदर्शन, व्हिडीओ गेम्स यामुळे पालक आणि पाल्य यांच्यातील संवाद कमी झालाय. तसंच आई आणि बाबा दोघेही कामानिमित्त घराबाहेर राहत असल्यामुळे त्यांना मुलांसाठी पुरेसा वेळ देता येत नाही आणि नंतर याचं रूपांतर दुराव्यामध्ये होतं. मुलांना आपल्या समस्या शेअर करण्यासाठी पालकांपेक्षा सोशल मीडिया जास्त जवळचं वाटू लागतं. त्यामुळे सुरुवातीपासूनच पालकांनी मुलांना वेळ द्यायला हवा. त्यांच्याशी संवाद हा खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्याशी बोलून त्यांना विश्वासात घेतलं तर ते आपल्या समस्या त्यांच्या समोर मांडतील. त्याचबरोबर तंत्रज्ञानाच्या वापराविषयी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणं आवश्यक आहे.
लीना जाधव, व्हीजेटीआय

विश्वास ठेवा
दिवसेंदिवस पाल्य आणि पालक यांतील नातं अधिक नाजूक होतय. आपले आयुष्य जगण्याच्या पद्धतींमध्ये बदल घडून आल्यामुळे आता शिक्षणाचे मोजमाप हे परीक्षेतील गुण आणि सुखाचे मोजमाप पैसा हे एकक गणलं जातंय. त्यामुळे आयुष्यातील तणाव, त्यातच मुलांना हवे असणारे स्वातंत्र्य, पालक आणि पाल्य यांना वेढलेलं सोशल मीडियाचं जाळं यामध्ये मुलं व पालक यांच्या नात्याचे बंध कमकुवत झाले हे मात्र नक्की! आपल्या पाल्यावर विश्वास असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तसंच मुलांसोबत वेळ घालवणं, त्यांच्या मनातील शंका, प्रश्न, त्रास यांच्याशी मेळ घालण्यास त्यांना मदत करणं व गोष्टी त्यांच्या कलाने घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या पाल्याच्या मनात विश्वास व आदर निर्माण करण्यासाठी, पाल्य व पालक यांच्यातील बंध घट्ट होण्यासाठी मुलांच्या मनात प्रेम निर्माण करणं ही आजच्या काळाची गरज आहे.
सायली शिंदे, भवन्स कॉलेज

दोघांनी पुढाकार घ्यायला हवा!
एकविसाव्या शतकातील हे आधुनिक जीवन फक्त माणसाच्या जीवनशैलीवरच नव्हे तर माणसांच्या आपापसातील नात्यावर देखील परिणाम करतंय. आई-वडील व मुलं यांच्यात असलेल्या मैत्रीपूर्ण नात्यात आजकाल दुरावा येत असल्याचं दिसतंय. त्या मागील पहिलं कारण म्हणजे या जगात चाललेली स्पर्धा. या स्पर्धेचं ओझं सांभाळून, या वाहत्या प्रवाहाबरोबर स्वतःला नेण्यासाठी ही पिढी खरंच खूप धडपडतेय. स्वतःचं करिअर घडवत असताना, बाहेरच्या जगात त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. त्या अडचणी आई-वडील समजून घेऊ शकत नाहीत, असं त्यांना वाटतं. परिणामी, ते सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह असतात. हे नातं सुधारण्यासाठी कुणी एकाने प्रयत्न करून चालणार नाही. पालक आणि मुलं दोघांनी एकत्र पुढाकार घेतला तर नक्कीच हे नातं मैत्रीपूर्ण होऊ शकेल.
वृषाली भामरे, एच. आर कॉलेज

दुराव्यातून संवादाकडे
आजचं युग हे स्पर्धेचं आहे. घरात तीन किंवा चार माणसं, करिअरला प्राधान्य, त्यामुळे सगळ्या पालक-पाल्य यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मला जे-जे मिळाले नाही ते मी मुलांना देईन या हव्यासापोटी पालक आपल्या मुलांची कुवत न ओळखता त्यांना घाणीच्या बैलाला जुंपल्यासारखे वागवतात. यात फक्त अपेक्षांचं ओझं आहे, प्रेम-माया अजिबात नाही. मुलंही अपेक्षांचं ओझं वाहताना थकतात, ताणतणावाला सामोरी जातात, त्यातूनच नैराश्य येऊन नशा करणं, चिडचिड करणं, दिवसभर गेमच्या दुनियेत रमणं हे सर्रास चालतं. कधीतरी सुट्टीत एकत्र फिरायला जाणं, घरातील छोटे-मोठे निर्णय एकत्र घेणं आणि त्याचबरोबर दोघांनीही अपेक्षा कमी केल्या तर नात्यात नक्कीच गोडवा येईल प्रेम, जिव्हाळा वाढेल म्हणून म्हणतात की,
घर असावे घरासारखे
नकोच नुसत्या भिंती
तिथे असावा प्रेम जिव्हाळा
नकोत नुसती नाती

सिद्धी पटवर्धन, मुंबई विद्यापीठ

स्वतंत्र होण्याच्या नादात...
एकाच मुलाच्या या जगात पहिलं नातं जोडलं जातं ते त्याच्या आई-बाबांबरोबर. त्यांच्यापासूनच त्याच्या आयुष्याची सुरुवात होते, त्यांच्यामुळेच त्याची ओळख असते, त्यांच्या बोटं धरूनच ते मूल या जगात वावरायला शिकतं. हळुहळू जसजसं आपलं वय वाढतं, तसतसं आपले विचार प्रगल्भ होत जातात, आपली स्वतःची अशी मतं निर्माण होतात. स्वतंत्र होण्याच्या प्रयत्नात आपण आपल्या आई-बाबांपासून दूर जातो. पुढे याचमुळे निर्माण होणाऱ्या मतभेदांमुळे दुरावा निर्माण होतो. असं म्हणतात हे मतभेद दोन पिढींमधील अंतरामुळे निर्माण होतात. पण विचारांमधील फरक म्हणाल तर तो फक्त संवादामुळे एक होऊ शकतो. दोन्ही नाण्याच्या बाजू आई-वडील व मुलांने एकमेकांना समजावून सांगितल्या तर काही होणार नाही. पण त्यासाठी हवा संयंम, दुसऱ्याचं ऐकून घेण्याची क्षमता आणि ग्रहण करण्याची ताकद जी दोघांनीही आत्मसात करावी.
स्नेहल कोलते, एच. आर. कॉलेज

स्वातंत्र म्हणजे दुरावा?
सध्याच्या धकाकाधकीच्या जीवनशैलीत माणसांमधील नात्याचे दोर तुटत चाललेत. आई-बाबा आणि मुलं यांतील नातं काही वेगळंच आहे, या नात्याला तोड नाही. पण सध्याच्या धकाधकीच्या काळात हे नातं टिकवायला मात्र आज वेळ नाही. शहरांमध्ये तर मूल शाळेत, कॉलेजात, नोकरीमध्ये व्यस्त असतात आणि आई-बाबा देखील दोघंही कामात व्यस्त असल्याने यामुळे मग आई-बाबा व मुलं यांच्यातील जवळीकता, संवाद कमी होताना दिसतो. यामुळे मग मनात गैरसमज निर्माण होऊन जिव्हाळा कमी होऊ लागतो. काही पालकांच्या तर मुलांकडून खूप अपेक्षा असतात, त्यामुळे मुलं ही त्या अपेक्षांच्या बंधनात अडकलेली असतात. काही वेळा तर मुलांना मनसोक्त स्वातंत्र्य हवं असतं, अशा वेळी आई-बाबा हे मुलांपासून दुरावतात. मग राग-रुसवा येऊन चांगल्या नात्याला धक्का बसतो. नात्यातील दुरावा कमी करण्यासाठी आई-बाबा आणि मुलं यांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे.
मन वळू नये, अशी श्रद्धा हवी.
निष्ठा ढळू नये, अशी भक्ती हवी.
सामर्थ्य संपू नये, अशी शक्ती हवी.
कधी विसरू नये, अशी नाती हवी
सुजय निंबरे, पाटकर कॉलेज

बदलत्या परिस्थितीशी जुळवून घ्या
मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्याचं आयुष्य घडवण्यासाठी आई-बाबा अथक मेहनत घेतात. त्यांचं योगदान हे बहुमूल्य असतं. सद्यस्थितीत आई-बाबा आणि मूल यांच्यातील संवादाचा अभाव हे या नात्यात दुरावा निर्माण होण्याचं मुख्य कारण आहे. हल्ली तरुणाई ही बदलत्या जीवनशैलीचं अनुकरण मोठ्या प्रमाणावर करते. स्वतःचे निर्णय स्वतःच घेण्याचं स्वातंत्र्य मुलांना हवं असतं. ते स्वातंत्र्य मिळालं नाही की मतभेद निर्माण होतात. त्याशिवाय सोशल मीडिया, मोबाइलच्या अतिवापराने तरुणाईच्या मनावर परिणाम होतात. हे सर्व रोखण्यासाठी मुळात आई-बाबा आणि मूल यांच्यात सुसंवाद असणं आवश्यक आहे. यासाठी आई-बाबांनी आणि मुलांनी बदलत्या परिस्थितीशी स्वतःला जुळवून घेतलं पाहिजे. आई-बाबांनी मुलांसाठी दिवसातला थोडासा वेळ राखून ठेवला पाहिजे आणि मुलांनी त्याला अनुकूल प्रतिसाद दिला पाहिजे. यामुळे नात्यांतील दुरावा संपून, नातं अधिक दृढ होईल.
वैभव पुरव, डहाणूकर कॉलेज

एकमेकांचा आदर करावा
आई-वडील आणि मुलाचं नातं आजही सुंदर आहे. त्यात दुरावा निर्माण होण्यामागे बदलते दृष्टिकोन, अति अपेक्षा, जगण्यातली स्पर्धा ही कारणं आहेत. नवीन पिढीला सगळंच सहज मिळतं, त्यासाठी कष्ट घ्यावे लागत नाहीत आणि आई-वडील त्यांच्यापर्यंत कोणतीच झळ पोहोचू देत नाहीत, त्यामुळे त्यांना आई-वडिलांची किंमत नसते. मुलांवर सोशल मीडियाचासुद्धा प्रभाव पडतोय, त्यांना आपल्यावर लक्ष ठेवणारी व्यक्ती नकोय. पण ते हे विसरतात की आई-वडिलच खरे आणि जवळचे मित्र असतात. लहानपणी घडलेली प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनात कायम असते, म्हणून सगळ्यात आधी आई-वडिलांनी एकमेकांचा आदर करावा. मुलांनीसुद्धा सोशल मीडियामधून चुकीचं काही शिकण्यापेक्षा आपल्या आई-वडिलांकडून शिकावं, त्यांनी घेतलेले कष्ट, शून्यातून उभ्या केलेला संसार या सगळ्याचा सदसदविवेक बुद्धीने विचार केला की, नात्यात दुरावा निर्माण होणार नाही.
नागेश सुतार, मुंबई विद्यापीठ

मार्गदर्शन ही काळाची गरज
आपली मुलं यशस्वी व्हावीत असं, प्रत्येक पालकाला वाटत असतं. पण आपण एक सुजाण पालक म्हणून त्यासाठी काय करतो? आपण आपल्या मुलांसाठी किती आणि कसा वेळ देतो याचा कधी विचार केला आहे का? पोटच्या मुलांना प्रेम देण्याइतपत वेळ तरी आज आपल्या पालकांकडे आहे का? पालकांच्या मनावर ताण असल्याने त्यांचा परिणाम त्यांच्या मुलांवर होऊ शकतो. सतत भूतकाळावर बोलत राहणं, तुला काही येत नाही, तुझा काही उपयोग नाही असं नकारत्मक बोलत राहण्याने पाल्य आणि पालकांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण होतंय. आपली मतं, आपले विचार, आपल्या भावना आपल्या पालकांशी व्यक्त न करता अनोळखी व्यक्तीशी सोशल मीडीयावर घर बसल्या व्यक्त करताना दिसतात. मार्गदर्शन ही काळाची गरज आहे. आई-बाबा आणि मूल यांच्यातील मित्रत्वाचं नातं टिकवून ठेवण्यासाठी गरज आहे ती मुलांच्या चुका प्रेमाने समजावण्याची, प्रत्येक अपयशात मुलांसोबत साथ देण्याची, पूर्वजांकडून आलेल्या गोष्टी अनुकरण करण्याची.
विश्रांती शिंदे, विवेक कॉलेज

संस्कारांचं बाळकडू सद्यस्थितीत आवश्यक
आजकालच्या धावपळीच्या, स्पर्धात्मक युगात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी यांचा अभाव सतत कुठेना कुठे भासत असतो. कारण या गोष्टींचा मेळ घालायला पालक तितकासा वेळ मुलांना देत नाहीत. मुलं अनुकरणप्रीय असतात. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांचे हवे ते चोचले पालक पुरवतात. त्यामुळे साहजिकच जगण्याच्या स्पर्धेत एकमेकांसोबतचा संवाद तुटत जातो आणि दुराव्याला वाव मिळतो. मुलं स्वत:ला कुठेतरी एकाकी समजतात. या वयात त्यांना हक्काच्या माणसांची गरज असते, पण तीच गरज भागत नाही आणि मग हीच गरज भागवण्यासाठी आजकालची पिढी सोशल मीडियाचा आधार घेताना दिसते. याचबरोबर पालकांच्या वाढत्या अपेक्षांचा भडीमार मुलांवर केला जातो. त्यामुळे आई-बाबा आणि मुलांमधे मित्रत्वाचं नातं निर्माण होण्यासाठी गरज असते ती सवांद साधण्याची, सुयोग्य मार्गदर्शनाची, पाल्याच्या आवडीनिवडी जाणून घेण्याची, त्यांना विचार करण्याचं स्वातत्रं देण्याची, योग्य त्या वयात योग्य शिक्षण देण्याची, अडीअडचणी समजून घेऊन निरसन करण्याची आणि गरज आहे ती संस्कारांचे बाळकडू मुलांमधे रुजवण्याची.
प्रतीक्षा शिंदे, बी. एम. रुईया गर्ल्स कॉलेज

दोर नात्याची
'आई-बाबा' या दोन शब्दांमध्येच संपूर्ण विश्व सामावून जातं. आधुनिक युगात जगत असताना घरातल्या माणसांपेक्षा आपल्यासाठी आपला मोबाइल प्रिय वाटू लागला आहे. आई-वडील हाताचा पाळणा करुन आपल्या लेकराला वाढवतात. पुढे तोच मुलगा आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतो. उच्च शिक्षण घेऊन जर आई वडिलांचीच ओळख विसरायला लागलो तर त्या शिक्षणाचा काय उपयोग? आईने बनवलेल्या चटणी भाकरीची स्तुती केल्यावर जे हास्य आईच्या चेहऱ्यावर येतं ते मनाला इतकं समाधान देऊन जातं की, त्या हास्याला जगातील कोणताही श्रीमंत माणूस विकत घेऊ शकत नाही. मुलांनी आपल्या आई-वडिलांच्या वेदना समजून घ्याव्या, आपल्या मोबाइलपेक्षा जास्त प्रेम आई-वडिलांवर करावं, सुखी कुटुंब घेऊन समाजात सन्मानाने जगावं असं मला वाटतं.
चेतन इंगावले, राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

अविश्वासामुळे नात्यात दरी
पालक आणि मुलांमधील वयाच्या अंतरामुळे शिवाय विचारसरणीतील बदलांमुळे या गोड नात्यात दुरावा निर्माण होतोय. बदलत्या टेक्नॉलॉजीमुळे हल्ली सर्वच मुलांचं लक्ष हे सोशल मीडियावर जास्त असते; शिवाय आजूबाजूच्या वातावरणामुळे पालकांच्या मनात विविध समज-गैरसमज निर्माण होतात आणि वादाची निर्मिती होते. मला वाटतं पालकांनी मुलांवर दाखवलेला अविश्वास शिवाय मुलांनी पालकांच्या विश्वासाचे केलेले अपहरण यामुळे कुठेतरी हे नातं कमकुवत होतंय. जर हे नातं योग्य पद्धतीने टिकावायचं असेल तर पालकांचा मुलांवर आणि मुलांचा पालकांवर विश्वास असायला हवा. बदलत्या काळानुसार, टेक्नॉलॉजीनुसार पालकांनीही स्वतःच्या विचारांना, कृतीला, मतांना, स्वभावाला बदलायला हवं. मूल जर एखाद्या परिस्थितीत त्यांची मतं मागत असतील तर त्याकडे दुर्लक्षित न करता आणि भावनिक न होता योग्यरितीने सल्ला द्यावा. शिवाय मुलांनीही पालकांच्या मनाचा, वयाचा, मताचा विचारांचा आदर करावा.
भक्ती पालांडे, तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स

समजूतदारपणाची जोड
आई-बाबा आणि मुलं या नात्याकडे आतापर्यंत जगातील सर्वात गोड नातं म्हणून पाहिलं जात होतं. पण आता जणू काही काळाच्या ओघात हे नातं हरवत चाललंय. या नात्याची समीकरणंच बदलली आहेत. याचं मूळ कारण आहे वेळेचा अभाव. पालकांकडे नोकरीळे वेळ नसतो आणि मुलं त्यांच्या अभ्यासात व्यग्र असतात. पालकांकडून पुरेसा वेळ मिळत नसल्याने मुलं त्यांच्या सोशल मीडियावरील मित्र मंडळींसोबत सगळं शेअर करतात आणि कधीतरी तिच मंडळी चुकीचा सल्ला देऊन घात करतात. पालकांनी नक्कीच मुलांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि मुलांनीही हे समजून घ्यायला पाहिजे की अनुभवाचे बोल खोटे नसतात आणि आपले पालक नेहेमी आपलं हित ओळखूनच आपल्याला सल्ला देतात. दोन्ही बाजूंनी समजूतदारपणा दाखवला तर या नात्यातला गोडवा नेहेमी टिकून राहिल.
मधुरा गावडे, डहाणूकर कॉलेज

मानसिकता जबाबदार
जगात कोणत्याही नात्यापेक्षा सर्वात श्रेष्ठ नातं हे आई-वडिलांचं आहे, यात कोणतंही दुमत नाही. पण आजच्या बदलत्या युगात पाल्य व पालकांच्या नात्यातील ममतेचा झरा हा आटत चाललाय. आजच्या स्पर्धात्मक जीवनात प्रत्येकजण स्वतःला सिद्ध करण्यात व्यग्र आहे. नात्यांमध्ये मायेचा ओलावा राहिलेला नाही, आज क्रूरवृत्ती या ममतामय नात्यावर वरचढ ठरतेय. यामागे कारण काय हे शोधणं अत्यावश्यक आहे, नाहीतर भविष्यात अशाप्रकारच्या घटना वाढतंच जातील. माझ्यामते अशा घटना घडण्यामागे माणसाची मानसिकता जबाबदार आहे. एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी माणूस हा गैरमार्गाचा अवलंब करतो. वाटेत येणाऱ्या अडथळ्याला कायमचा संपवतो. अशावेळेस तो कुठल्याही नात्याला जुमानत नाही. म्हणून माणसांनी आपली मानसिकता बदलावी व पवित्र असलेल्या या नात्यांना मलीन होण्यापासून वाचवावं.
आकाश पाखरे, विकास रात्र कॉलेज

स्वत:ला सिद्ध करण्याच अट्टहास
माता-पित्यापासून आजची पिढी दुरावत चाललीय, याचं मुख्य कारण म्हणजे जगातील वाढणारी स्पर्धा व स्वतःला सिद्ध करण्याचा मुलांचा अट्टहास. या शर्यतीत मुलं एवढी बुडालेली असतात की नाती-गोती, परिवार हे सगळं त्यांना व्यतय वाटू लागतात. या शिवाय मुलांना ओढ लागते ती समवयस्क सोबत्यांची. यावर एकच उपाय म्हणजे आई-वडिलांनी आपल्या पाल्यांना लहानपणापासून वेळ द्यावा, त्यांच्याशी मोकळा संवाद साधावा, मुल जसजसं मोठं होत जातं तस-तसं त्याच्या दृष्टिकोनात होणारा बदल समजून घेऊन त्याला योग्य ते सहकार्य करावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काहीही झालं तरी आम्ही तुझ्या पाठीशी खंबीर उभे आहोत असा विश्वास निर्माण करावा. मोठ्यांचे विचार जरी आपल्याला पटत नसले तरी ते आपल्या भल्यासाठीच सांगत असणार हे मुलांनी समजून घ्यावं.
ऋतुजा बागुल, व्हीजेटीआय

वेळ आहे कोणाकडे?
ठेच लागल्यास आई आणि आधार लागल्यास बाबा असे दोन सुंदर नाते प्रत्येक मुला-मुलीच्या आयुष्यात बनून जातात. जगातील सर्वात गोड नातं म्हणून या तीन व्यक्तींकडे पाहिलं जातं. नातं म्हटलं की दुरावा आलाच. पण या दुराव्याचं प्रमाण किती ठेवावं हे प्रत्येकावर अवलंबून असतं. आपुलकीने विणलेल्या या नात्यात एकामेकांबद्दलचा तिरस्कार, अपेक्षांचे ओझे, विचारांमधले अंतर या गोष्टीतून दुरावा वाढत चाललाय. कदाचित या वाढत्या दुराव्याचं कारण म्हणजे एकामेकांना न देता येणारा वेळ. दिवसभर कामानिमित्त बाहेर असल्याने पालकांना त्यांच्या मुलांना पुरेसा वेळ देता येत नाही आणि याचमुळे मुलं मोठी झाली की, सोशल मीडियाच्या चक्रव्यूहात सापडतात आणि नात्यांमध्ये दुरावा वाढतो. यावर मार्ग हा एकच पालकांनी आणि मुलांनी एकमेकंसोबत शक्य तेवढा वेळ एकत्र घालवावा.
पूजा कोर्लेकर, एच. आर. कॉलेज

व्हर्च्युअल नाती जवळची वाटतात
सध्याच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकालाच आपण वरचढ असावं असं वाटतं आणि फक्त अभ्यास किंवा करिअरमध्येच नाही तर दिसणं, कपडे, राहणीमान आणि सर्वच बाबतीत. मुलं आणि पालक दोघेही या स्पर्धेचे बळी पडतात आणि मग आपण कुठेतरी कमी असणं हे पचवणं असह्य होऊन जातं. मग नकळत तुलना सुरु होते आणि वादाला तोंड फुटतं. आपल्या मनातल्या गोष्टी शेअर करण्यासाठी मुलांना आपल्याच वयाची मित्रमंडळी जवळची वाटतात. मग सोशल मीडिया वरून जपलेली 'व्हर्च्युअल नाती' जास्त आपलीशी वाटू लागतात आणि मग बंड केल्यासारखा आई-वडिलांना विरोध करायचा या भावनेतून विचित्र प्रकार घडतात. अशा वेळी दोन्ही बाजूंनी नीट बोलून, सामंजस्याने चर्चा केली पाहिजे. शेवटी जगात आई-वडिलांइतकी आपली काळजी घेणारं कुणीच नाही हे मुलांनी समजून घेतलं पाहिजे.
चिन्मयी वझे, व्हीजेटीआय कॉलेज

नात्यात आपुलकी, आदर येण्यासाठी...
आई-बाबा आणि मुलं या नात्यातला दुरावा वाढत चाललाय. यामागे अनेक कारण आहे. आता जग हे सोशल मीडियामुळे जवळ आलं असलं तरी, नात्यातला दुरावा मात्र वाढतंच चाललाय. सध्याचं जग हे धावतं जग आहे. या जगात प्रत्येक जण संपत्तीच्या मागे धावत आहे. आता तर स्रिया देखील पुरुषांप्रमाणे काम करतात. यामुळे पालकांना मुलांना पुरेसा वेळ देता येत नाही. अशा परिस्थितीत मुलांवर त्यांच्या बऱ्या-वाईट मित्रांच्या संगतीचा परिणाम होतो. आता तर काळाप्रमाणे पालकांच्या अपेक्षा देखील वाढल्यात. पालकांनी आपल्या लहान मुलांच्या हातात मोबाइल देता कामा नये. उलट त्यांनी मुलांना विविध खेळ खेळायला प्रवृत्त केलं पाहिजे. पालकांनी देखील मुलांबरोबर संवाद साधला पाहिजे. जेव्हा असं होईल तेव्हा या गोड नात्यात पुन्हा आपुलकी, आदर निर्माण होईल.
कार्तिक जाधव, गुरु नानक कॉलेज

अभासी दुनियेत रमतात
सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आई-वडील मुलांना मुळात वेळच देत नाही आणि त्याकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा ठेवतात. आपण सोशल मीडियावर गप्पा मारू शकतो. पण एकमेकांना प्रत्यक्ष भावना इच्छा व्यक्त करण्यासाठी वेळ कुठे? त्यामळे नात्यात अधिकाधिक दुरावा येतो. आता लाइक किंवा कमेंट एवढीच आपल्या नात्यांची व्याख्या राहिली आहे. आईची माया आणि वडिलांचा धाक राहिलेलाच नाही. त्याचं मूळ कारण म्हणजेच हेच की, कोणालाही मुलांशी गप्पा मारायला किंवा काही विचारायला कोणचं राहिलेलं नाही. यावर उपाय म्हणजे आई-वडिलांनी मुलांच्या मानसिकतेचा विचार करावा की, त्यामुळे त्यांच्यामधील गैरसमज-गैरविचार दूर होईल. आई-वडील आणि मुलांचं नातं घट्टं होईल.
अनिरूद्ध गायकवाड, सेंट झेविअर्स कॉलेज

मनमोकळा संवाद घडावा
आई-वडील आणि मूल यांचं नातं खरंतर मैत्रीचं असलं पाहिजे. मुलांना जे काही वाटतं ते त्यांनी आपल्या पालकांशी शेअर केलं पाहिजे. आजकाल आपण बघतो की आई-बाबा आणि मुलं यांच्यातील संवाद हरवत चाललाय. त्याला बरीच कारणं आहेत. आताच्या मुलांना प्रायव्हसी हवी असते, स्वातंत्र्य हवं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सोशल मीडियाचा होत असलेला अतिवापर. आपण बघतो की, मुलं सोशल मीडियावर खूप व्यक्त होत असतात पण कुठेतरी पालकांसमोर व्यक्त होताना दिसत नाही. यामुळे त्यांच्यातील दुरावा वाढत जातो. याबाबतीत पालकांनी पुढाकार घेऊन आपल्या मुलांसोबत चर्चा केली पाहिजे. मुलांशी बोलताना पालकांनीसुद्धा त्यांचे मित्र होऊन बोललं पाहिजे तर मुलंसुद्धा मोकळेपणाने आपल्या पालकांशी बोलतील. यामुळे मुलं आणि त्यांचे पालक यांच्यात एक मैत्रीच गोड नातं निर्माण होईल.
बिपीन जाधव, वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनजमेंट

दरी कमी करण्यासाठी...
मुलांच्या मते, आई-वडील समजून घेत नाही. तर आई-वडिलांना वाटतं की, आपली मुलं चुकीचं वागता. पण जर प्रत्यक्षात पाहायला गेलो तर आई-वडील आणि मुलं दोघेही आपआपली बाजू योग्य रीतीने मांडतात. कारण आई-वडील त्यांच्या काळातील विचार, परंपरा यानुसार वागतात. आता काळानुसार खूप बदल होत गेलेत. पूर्वीचे विचार आणि आत्ताच्या काळातील विचार यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे मुलं आता नवीन तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सोशल मीडियाचा जास्तीत जास्त उपयोग करतात. आई-वडील आणि मुलं या आपुलकीच्या, जिव्हाळ्याच्या नात्यातली दरी कमी करण्यासाठी प्रथम मुलांनीच प्रेमाने, आदराने पालकांना सोशल मीडिया किंवा इतर अनेक बदल असतील, त्याबद्दल समजून सांगावे. त्याचे सदुपयोग, दुष्परिणामही सांगावे. म्हणजे त्यांना पण याबाबतचं ज्ञान अवगत झाल्यावर वादविवाद होणारच नाहीत. त्यामुळे आपल्या नात्यातला विश्वास, आदर, प्रेम टिकून राहील.
कांचन गावस्कर, एच. आर. कॉलेज

नाती झाली अबोल
'शब्द आहे उरी अनेक, तरी ही राही सदा अबोल', असं दृश्य काही कुटुंबांमध्ये आई-बाबा आणि मुलांच्या नात्यामध्ये आढळून येतं. आई-बाबा आणि मुलांचं नातं अधिक घट्ट होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे या नात्यातील आपुलकी, जिव्हाळा, विश्वास, सौम्य संवाद आणि आदर या गोष्टी आल्याच पाहिजेत. मला असं वाटतं की, या जगातील अतिशय सुंदर नातं म्हणजे आई-बाबा आणि मुलांचं नातं होय. या नात्यात विचारांची देवाण-घेवाण महत्त्वाची असते. नातं अबोल झालं असेल तर या नात्याला शब्दांची जोड महत्त्वाची ठरते. तसंच नात्यातील प्रेम आणि एकमेकांच्या जीवनात एकमेकांचं महत्त्व किती थोर आहे हे समजणं गरजेचं आहे.
प्राजक्ता भरगुडे, गुरु नानक खालसा कॉलेज

अपेक्षा हीच शोकांतिका
प्रेम, जिव्हाळा, आपुलकी असलेल्या पालक व मुलांच्या गोड नात्यात वाद, तिरस्कार या गोष्टी याही आधी होत्या की, पण आजच्या घडीला त्याचं प्रमाण संतुलित ठेवून ते नातं अधिक कसं फुलवता येईल हेच कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. सोशल मीडियाचा अतिरेक हे खरंतर निमित्त पण जगण्याच्या स्पर्धेत आपल्या पाल्याच्या बौद्धिक क्षमतेचा विचार न करता सरसकट ९०-९५% ची अपेक्षा करणं हीच आजची शोकांतिका आहे. खरंतर विद्यार्थी मित्रांनीही पालकांशी खुला संवाद साधत आपल्या क्षमतेची जाणीव करून द्यायला हवी किंबहुना पटवून द्यायला हवं. जेणेकरून पालक मंडळीही अवास्तव अपेक्षा करणार नाहीत. दुसरा मुद्दा हा की, शिक्षण ही काळाची गरज आहे हे मान्य आहे, परंतु आपला पाल्य जर शिक्षणाव्यतिरिक्त क्रिडा, कला क्षेत्रात अव्वल असेल तर त्याला निव्वळ पुस्तकी ज्ञानाच्या अपेक्षेत जखडवण्यात कसला दूर दृष्टिकोन? आपला पाल्य कशात कमी आहे याचा न्युनगंड न बाळगता तो-ती कशात तरबेज आहे हे जाणून त्यासाठी त्यांना पाठींबा द्यावा.
प्रथमेश राणे, आर.ए.डी.ए.व्ही कॉलेज

थोडीशी मुभा द्यावी
आई-वडील आणि मुलं या नात्यात वाढत्या दुराव्यामागचं कारण म्हणजे पाल्याचे उगाचच पुरवलेले हट्ट होय. मुलं लहान असताना केवळ मुलांच्या हट्टापायी पालक त्यांना मोठे मोबाइल घेऊन देतात आणि ते मग त्या सोशल जगात संवेदनाहीन होऊन गुंतात. सोशल मीडियाच्या पलीकडेदेखील एक वास्तव जग आहे, याचा त्यांना विसर पडतो. आजकालच्या वाढत्या चढाओढीत प्रत्येक पालकांना वाटतं आपल मूलही सगळ्यात पुढे असावं. पण आवडत्या करिअरची मुभा, स्वातंत्र आणि प्रोत्साहन तसंच विश्वास ठेवावा. याने त्यांना आधार आणि आत्मविश्वास मिळतो.
साक्षी तावडे, झुनझुनवाला कॉलेज

आपुलकीची, प्रेमाची भाषा गरजेची
आजकाल आपण पाहतो की, मोबाइल शिवाय मुलांचं पान हालत नाही. सारखं आपलं त्या मोबाइलमध्ये डोकं खुपसलेलं असतं. पालक पण आपल्या मुलांना समजून घेतात पण त्यांची एकच भाबडी इच्छा असते की, आपली मुलं त्यांच्यांशी चार शब्द प्रेमाचे, आपुलकीचे, मायेचे बोलावेत. माझं सांगायचं झालं तर मला घरच्यांसोबत वेळ घालवायला खूप आवडतं. कारण त्यांच्याशिवाय मी स्वत:ला अपूर्ण मानते. खास करुन माझे आई-बाबा, माझे दादा, माझी बहीण हे सगळे माझं सर्वस्व आहेत. मी माझ्या अडचणी, माझे प्रश्न त्यांच्याशी विचारविनीमय करून सोडवते. ते मला योग्य मार्गदर्शन करतात. आजकालच्या तरुणाईला मी एकच सांगू इच्छिते की, आपल्या कुटुंबियांशी मन-मोकळेपणाने बोला. यामुळे आजकालच्या नात्यांमधला दुरावा नक्कीच कमी होईल.
पुजा मुंढे, अस्मिता कॉलेज ऑफ लॉ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संवाद साधू चला!

$
0
0

मूल आणि पालकांमधील वाढत्या दुराव्यामागील नेमकी कारणं काय आहेत? या विषयावर मुंटानं तरुणाईलाच ‘युवा कट्टा’वर बोलतं केलं. या महत्त्वाच्या विषयावर सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशिष देशपांडे यांनी नात्यांमधील निखळ आनंद आणि नात्याचे बंध अधिक घट्ट होण्यासाठी काही टिप्स मुंटाच्या वाचकांशी शेअर केल्या आहेत...
आई-बाबा आणि मुलांमधील नात्यात विश्वास, आदर, मित्रत्वाचे नाते टिकवून ठेवणं आज गरजेचं आहे. घरात हा दुरावा निर्माण होऊ नये म्हणून हे महत्त्वाचं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये समोर आलेल्या दुर्दैवी घटनांनी या नात्यातही आता दुरावा वाढत असल्याचं समोर आलंय. अशावेळी कसा मनमोकळा साधावा याबाबत...
•कुटुंबासाठी दिवसातील काही तास राखून ठेवा.
•परिवारातील सदस्यांशी मनमोकळा, दिलखुलास संवाद साधा.
•पाल्यांचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्या मृदू भाषेत समजावून सांगा.
•संपूर्ण परिवार एकत्र असताना अनुभव आणि अनुभूतीची देवाणघेवाण होईल, याची काळजी घ्या.
•कुटुंबामध्ये एकमेकांशी सुसंवाद साधणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच एकमेकांची स्पेस जपणंही महत्त्वाचं आहे.
•सोशल मीडिया काळाची गरज असली तरी काही काळ यापासून लांब राहून कुटुंबाला वेळ द्या.
•प्रोत्साहन मिळणं हे विकासासाठी अत्यंत गरजेचं आहे. वेळोवेळी आपल्या पाल्याला चांगल्या कामासाठी प्रोत्साहन द्या.
•चुकांमधून खूप काही शिकण्यासारखं असतं. आपल्या पाल्याचं काही चुकल्यास आक्रमक पवित्रा न घेता त्याला त्याची चूक समजावून सांगा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्पर्धा काढा निकालात!

$
0
0

परीक्षांमधली मार्कांची स्पर्धा टाळण्यासाठी मेरिट लिस्टची प्रथा बंद झाली. पण त्यानंतरही ही जीवघेणी स्पर्धा थांबलीय का? या प्रश्नावर विद्यार्थी एकमतानं ‘नाही’ म्हणताहेत. मार्कांची टक्केवारी, त्यावर आधारित करिअर हे समीकरण जोपर्यंत आहे तोपर्यंत ही स्पर्धा थांबणं अशक्य असल्याचं विद्यार्थ्यांचं मत आहे. करिअरनिवडीचं स्वातंत्र्य पालक पाल्यांना देतील तसंच परीक्षेतले गुण प्रात्यक्षिकं आणि कौशल्यावर ठरतील तेव्हा जीवघेणी स्पर्धा थांबेल, असं मत युवा कट्टावर व्यक्त झालं.

यावेळच्या युवा कट्टात सहभागी झालेलं मुंबई विद्यापीठ आणि संलग्न कॉलेजेस

• सेंट झेविअर्स कॉलेज (फोर्ट)
•एच. आर. कॉलेज (चर्चगेट)
•विल्सन कॉलेज (गिरगाव)
•बी. एम. रुईया गर्ल्स कॉलेज (ग्रँट रोड)
•चेतना कॉलेज (वांद्रे)
•साठ्ये कॉलेज (विलेपार्ले)
•डहाणूकर कॉलेज (विलेपार्ले)
•तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स (अंधेरी)
•भवन्स कॉलेज (अंधेरी)
•पाटकर कॉलेज (गोरेगाव)
•विवेक कॉलेज (गोरेगाव)
•रुईया कॉलेज (माटुंगा)
•पोदार कॉलेज (माटुंगा)
•वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (माटुंगा)
•व्हीजेटीआय (माटुंगा)
•गुरु नानक खालसा कॉलेज (माटुंगा)
•विकास रात्र कॉलेज (विक्रोळी)
•रामानंद आर्य डी.ए.व्ही.कॉलेज (भांडुप)
•जोशी-बेडेकर कॉलेज (कल्याण)
•बिर्ला कॉलेज (कल्याण)
•सीएचएम कॉलेज (उल्हासनगर)
•जीवनदीप कॉलेज (गोवेली)
•यादवराव तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (कर्जत)

कलचाचणी घ्यावी
प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही सुप्त गुण असतात, कला असतात. पण त्याची हुशारी मात्र साचेबद्ध परीक्षांमधील टक्केवारीवरूनच ठरवली जाते. मग ज्यात रसच नाही त्यात यश मिळत नाही आणि मग ताणतणाव आणि पुढचे प्रकार सुरु होतात. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची लहानपणापासूनच कलचाचणी म्हणजेच अॅप्टीट्यूड टेस्ट घेणं आवश्यक आहे. पण अशाप्रकारे स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात जाण्याची संधी मिळाल्यावर मात्र त्याचं सोनं करणं आणि त्या क्षेत्रात झोकून देऊन काम करणं हे विद्यार्थ्यांचंच कर्तव्य आहे. कारण मेहनत करणं, हे कोणत्याही क्षेत्रात अटळ आहे. शिक्षण संस्थेने टक्क्यांची स्पर्धा कमी करण्यासाठी तुलनात्मक गुणदान पद्धत म्हणजे रिलेटिव्ह मार्किंग स्किम आणि ग्रेडिंग सिस्टिमचा उपयोग करावा. विद्यार्थ्यांना ग्रेड्स दिल्यास एकेका मार्कासाठी होणारी स्पर्धा कमी होण्यास मदत होईल.
चिन्मयी वझे, व्हीजेटीआय

जीवघेणी स्पर्धा नको
परीक्षा म्हणजे उफ टेन्शनची भरती आणि त्यानंतर लागणारा निकाल म्हणजे ओहोटी. अगदी बालवाडीपासून पदवीपर्यंत अशा अनेक परीक्षा आम्ही देतो फक्त भविष्य घडवण्यासाठी. पण एक कागदावरील मार्कांची कुंडली खरंच आपलं भविष्य घडवेल का? स्पर्धा, गुण, गुणवत्ता यादी यावर मुलांचं भविष्य असतं असं कोण म्हणतं? नोकरीला लागल्यावर दहावी बारावीच्या मेरिट लिस्टला कोणी विचारतदेखील नाही. विद्यार्ध्यांमध्ये असलेले संवाद कौशल्य आणि सुविचार याच्याच आधारावर नोकरीसाठी निवड होते. भविष्यात सगळेच कोणत्या न कोणत्या क्षेत्रात चांगलीच छबी उमटवतात. परीक्षेला मेरिट अन् बोर्डचं स्वरूप दिल्याने मुलांची अजून गोची होते. ज्ञान राहिलं बाजूला, गुण मिळवण्यासाठी धडपड केली जाते. परीक्षा आपल्यातील गुणांची आकडेमोड ठरवते, भविष्य नाही. मला असं वाटतं की, परीक्षा भीती नाही तर ज्ञानाची गती वाढवणारी हवी. स्पर्धा सुदृढ हवी, जीवघेणी नको. फक्त गुणांची गुणपत्रिका नसून ज्ञानाची पत्रिका असावी.
विभक्ती साळवी, डहाणूकर कॉलेज

...तर परीक्षेचं गांभीर्य राहणार नाही
विद्यार्थ्यांची मानसिकता जाणून घेण्यासाठी परीक्षा घेतल्या जातात. त्यांच्या मार्क्सनुसार मेरिट लिस्ट लावली जायची. टक्क्यांची ही जागा आता ग्रेडने घेतल्यामुळे आता ही स्पर्धा कमी झालीय. मला वाटतं ही मार्क्स आणि ग्रेडची चढाओढ कमी करायची असेल तर निकालावर फक्त पास आणि नापास असे दोनच शेरे नमूद असावेत. शिक्षण विभागाने अभ्यासक्रमात कसल्या ही प्रकारची ढील देऊ नये. अन्यथा परीक्षेचं गांभीर्य विद्यार्थ्यांना राहणार नाही आणि भविष्यातील कठीण परिस्थितीला तोंड देणं त्यानं अवघड जाईल. निकालानंतर महत्त्वाची भूमिका बजावणारे म्हणजे पालक. पालकांनी आपल्या मुलांच्या मानसिकतेचा विचार करूनच त्यांच्याकडे अपेक्षा कराव्या. स्पर्धेची भावना, भविष्याची भीती दाखवून त्यांच्यावर अभ्यासाचा दबाव आणू नये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची तुलना इतर विद्यार्थ्यांसोबत करू नये. असं केल्यास विद्यार्थ्यांच्या मनातील निकालाची भीती निघून जाईल.
भक्ती पालांडे, तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स

तुलनेचे बळी
माझ्या मते, प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासात म्हणा किंवा इतर क्षेत्रात प्रगती करण्यासाठी इतरांशी स्वतःची तुलना करूच नये. नेहमी प्रत्येकाने स्वतःच्या भूतकाळातील कामाशी तुलना करून स्वतःची प्रगती करावी. यामुळे त्या विद्यार्थ्यांची प्रगती तर होतेच तसंच परीक्षा या जीवघेण्या नाही, हे त्यांना उमजेल. इतरांशी तुलना केल्याने फक्त आणि फक्त स्पर्धात्मक वातावरण राहतं. शिक्षण आणि करिअर निवड या गोष्टी एकमेकांवर जरी अवलंबून असल्या तरी शिक्षण विभागाने सर्व जातीतील विद्यार्थ्यांना समान हक्क दिले पाहिजे. असं झालं तर नक्कीच प्रत्येक विद्यार्थी करिअरची अचूक निवड करू शकेल.
ज्ञानाच्या मंदिरामधून सुरु होते आयुष्याची पहाट,
याच मंदिरामधून घडत जातो व्यक्ती सुसाट,
स्पर्धात्मक जीवनापलिकडेही आहे एक सुंदर आयुष्य,
या शिक्षणाच्या वाटचालीला जो जाणतो तोच खरा शिष्य,
असे हे शिक्षणाचे महत्त्व थोर अनमोल,
जो जाणतो त्याचाच ठरतो खास रोल

प्राजक्ता भरगुडे, गुरु नानक खालसा कॉलेज

शिक्षण पद्धतीत बदल आवश्यक
शिक्षाण पद्धतीत गेल्या काही काळामध्ये काहीच बदल झालेले नाही. आजच्या घडीला बहुतेक विषय हे कालबाह्य झालेत. ही शिक्षण पद्धती अवलंबण्याचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा हा त्यामागील उद्देश आहे. मार्कांचं महत्त्व जरी कमी झालं तरी ग्रेड बद्दल आता धाकधुक असते. त्यामुळे करिअर निगडीत कोर्स चालू करावेत. जेणेकरून प्रत्येक मुलाला त्याच्या आवडीचं शिक्षण आणि करिअर निवडताही येईल आणि त्यांना कोणत्या गोष्टीचं दडपणही राहणार नाही. संपूर्ण शिक्षण पद्धतीमध्ये बद्दल होणं आवश्यक आहे. आज आपण डिजिटल इंडियाचा नारा मिरवतो, मग आपणही या डिजिटल शिक्षणाचा भाग बनूयात आणि आपलं करिअर छान घडवूयात.
अनिरूद्ध गायकवाड, सेंट झेविअर्स कॉलेज

स्पर्धा अटीतटीची
परीक्षेतील टक्क्यांची स्पर्धा कमी करण्यासाठी सर्वच बोर्ड आणि विद्यापीठांनी मेरिटची पद्धत बंद केली खरी पण त्यानंतरही मार्कांची ही स्पर्धा काही कमी झालेली नाही. महात्मा गांधी म्हणालेले की, शैक्षणिक संस्था अशी असावी की ज्याने विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल. आपल्या शिक्षण पद्धतीनुसार आकड्यांवरून मुलांची गुणवत्ता ठरवली जाते. त्यात अभ्यासक्रम व परीक्षेचं स्वरूपसारखं बदलतं. स्पर्धा अटीतटीची असल्यामुळे आपल्या पाल्याने खूप मार्क मिळवावेत, असं प्रत्येक पालकाला वाटतं. मुलांनी आणि पालकांनी हे समजून घ्यायला हवं की, अभ्यासात कमी मार्क मिळाले म्हणजे त्या मुलाचं काहीच होऊ शकत नाही असं नाही. जे विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झालेत त्यांनी दुसऱ्या विद्यार्थ्यांना न हिणवता त्यांची मदत केली पाहिजे. आपली शिक्षण पद्धती अशी असली पाहिजे जेणेकरून मुंलांना कळेल की नक्की त्यांना कशात रूची आहे आणि त्याप्रमाणे ते त्यांच करिअर घडवू शकतील.
मधुरा गावडे, डहाणूकर कॉलेज

स्पर्धा दिवसागणिक वाढतीय
स्पर्धा कमी करण्यासाठी सर्वच बोर्ड आणि विद्यापीठांनी मेरिटची पद्धत बंद केली आहे. पण असं असलं तरीही आजच्या या काळात नवनवीन अभ्यासक्रम (कोर्सेस) उदयाला येतायत आणि हे अभ्यासक्रम विविध विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जातायत. अभ्यासक्रमाच्या वाढत्या संख्येमुळे स्वतःचा टिकाव लागण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांमध्ये मार्कांसाठी शर्यत वाढत चाललीय. त्यामुळे खरं तर मेरिटलिस्ट पद्धत बंद झाली असली तरीही निकालांमधील मार्कांची स्पर्धा कमी झालीय का? याचं उत्तर अजूनही नाही असंच आहे. उलट ही स्पर्धा आणखी जास्त वाढलीय. अशी ही जीवघेणी स्पर्धा कमी करण्याचा अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे विद्यापीठात नव्याने प्रवेश घेणाऱ्या किंबहुना सर्वच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पालकांना माहिती देणं हा होय. कारण शालेय जीवनानंतर विद्यार्थी विद्यापीठात प्रवेश घेताना जो अभ्यासक्रम निवडतात त्याबद्दल त्यांच्या पालकांना स्पष्ट व पुरेशी माहिती नसते. त्यामुळे माहितीत असलेला अभ्यासक्रम आपल्या पाल्याने निवडावा असा पालकांचा आग्रह असतो. यामुळे विद्यार्थी संख्या एकाच अभ्यासक्रमासाठी वाढते व स्पर्धा देखील वाढत जाते.
शिवाली चव्हाण, विल्सन कॉलेज

ताण कमी व्हावा
आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे. याच स्पर्धेमध्ये कधी-कधी अपयश आल्याने माणूस आपलं जीवन संपून टाकतो. आज शिक्षण क्षेत्रात जरी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असली तरी जे अपयशी होतात ते जीवाचं काही बरं-वाईट करतात. प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असतं की, आपल्या कुटुंबाला आपल्याकडून काही अपेक्षा आहेत आणि त्या जर तो पूर्ण नाही करू शकला तर तो प्रचंड मानसिक तणावाखाली येतो. हाच तणाव त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतो. माझ्या मते, जर या आत्महत्या रोखायच्या असतील तर विद्यार्थ्यांनी काही ध्येय ठेवणं आणि त्या दिशेने यशस्वी वाटचाल करणं, गरजेचं आहे. त्यामुळे निश्चितच ते यशस्वी होतील आणि आत्महत्येसारख्या विचारांपासून दूर राहतील. परीक्षा, निकाल हे पुन्हा-पुन्हा जीवनात येतील, पण एकदा जीवन संपलं तर पुन्हा येणार नाही. त्यामुळे क्षणिक दु:ख देणाऱ्या निकालामुळे आपलं सुंदर असं जीवन संपवू नका.
आकाश पाखरे, विकास रात्र कॉलेज

अवाजवी अपेक्षा नकोत!
परीक्षेचा ताण व टक्क्यांची स्पर्धा कमी करण्यासाठी सर्वच बोर्ड व विद्यापीठ प्रयत्नशील आहेत, असं मला वाटतं. म्हणूनच तर अनेक वर्षांपासून मेरिट लिस्ट काढण्याची पद्धत बंद करण्यात आली. बेस्ट ऑफ ५ची अनोखी संकल्पना राबवण्यात आली व आता ८० गुणांची लेखी परीक्षा असून उरलेले २० गुण शिक्षकांतर्फे देण्यात येतात. हे सर्वच बदल सकारात्मक असूनही आपण सतत कुठेतरी कमी पडत आहोत, असं मला वाटतं. विद्यार्थ्यांसाठी जीवघेणी ठरण्याऱ्या स्पर्धेचं मुख्य कारण म्हणजे वाढती स्पर्धा व पालकांच्या अवाजवी अपेक्षा आणि त्या पूर्ण करण्यासाठी मुलांची झुंज. परीक्षेमुळे आधीच तणावाखाली असलेले विद्यार्थी वाढणाऱ्या अपेक्षांमुळे पार दबून जातात व त्याचं दडपण येतं. ही परिस्थिती अयोग्य आहे व ती बदलण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवे, असं माझं मत आहे. योग्य मार्गदर्शनाने व सकारात्मक दृष्टिकोनाने हा तिढा नक्कीच सोडवता येईल.
श्रेया जाधव, पोदार कॉलेज

आवडीला प्राधान्य द्यावं
आजकाल सगळीकडे शिक्षणाचा बाजार भरलेला पाहायला मिळतो. कोणत्याही अभ्यासक्रमाचा प्रवेश हा टक्केवारीनुसार दिला जातो. त्यामुळे खरंच ज्यांची पात्रता आहे अशा मुलांना कमी टक्केवारीमुळे आवडत्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळवता येत नाही. तसंच आजकाल अभ्यासक्रमात बरचसे बदल झालेत. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांना भोगावा लागतो. आपल्या देशात शिक्षणाचा प्रसार फार कमी प्रमाणात होतो. परिणामी, माहितीच्या अभावामुळे करिअरसाठी अनेक पर्याय उपलब्ध असतानाही विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षण पद्धती म्हणजे कला, विज्ञान, वाणिज्य या शाखेत प्रवेश घ्यावा लागतो. त्यामुळे शिक्षण मंडळाने अभ्यासक्रमांचा जास्तीत जास्त प्रसार केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपली आवड लक्षात घेऊन अभ्यासक्रम निवडावा व त्यासाठी योग्य तयारी करावी.
अमित पाटील, डहाणूकर कॉलेज

सर्वसमावेशक धोरण आवश्यक
मेरिट लिस्टसारखे अनेक प्रकार बंद करूनही आजही मार्कांची स्पर्धा कमी झालीय, असं म्हणता येणार नाही. पुढच्या काही वर्षांत सर्वसमावेशक, समर्पक शैक्षणिक धोरण येत नाही तोवर ही स्पर्धा थांबेल असं तूर्तास तरी वाटत नाही. अर्थात वाढत्या स्पर्धेने घेतलेले जीव बघता आठवीपर्यंत पाससारख्या पळवाटा आपण काढल्या, पण अंतिमतः त्याचं भयाण वास्तव समोर आलंच. त्यामुळे घोकंपट्टी करून मिळवलेले जास्त मार्क्स नव्हे तर शिकवलेली संकल्पना नीट समजून घेणं महत्त्वाचं आहे, ही भावना बालवयातच मुलांमध्ये रूजवायला हवी. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा विनाशाकडे नेतो, हा जगाचा नियम आहे. त्यामुळे मार्कांची स्पर्धा पर्यायाने जीवघेणी होतेय. त्यामुळे आवडीच्या क्षेत्रात सक्षम बनवणारं सर्वसमावेशक शैक्षणिक धोरण येत्या काळात येणं ही काळाची गरज आहे.
प्रथमेश राणे, रामानंद आर्य डी.ए.व्ही.कॉलेज

विद्यार्थी ज्ञानार्थी नाही, परीक्षार्थीच!
मार्कांची स्पर्धा कमी झालेली नाही, असं मला वाटतं. कारण आजचे विद्यार्थी ज्ञानार्थी नाही तर परीक्षार्थी आहेत. आताच्या या आधुनिक जीवघेण्या स्पर्धेच्या युगात सर्वच एकमेकांशी स्पर्धा करण्याच्या नादात शिक्षणाचा खरा अर्थ विसरत चाललेत. ज्ञान तर त्यालाच मिळतं जो मनापासून आपलं ध्येय गाठण्यासाठी मेहनत करतो. उलट काही विद्यार्थी परीक्षेत प्रथम, द्वितीय क्रमांक मिळवण्यासाठी किंवा फक्त ग्रॅज्युएशन पूर्ण व्हावं, म्हणून अभ्यास करतात. त्यामुळे या स्पर्धेमध्ये भरडलेल्या मुलांना कमी गुण मिळाले की लगेच आत्महत्या करतात. पण निकालात मिळालेले गुण याचा मुळात करिअरशी संबंधच नसतो. उदा. कारण जर आपल्याला दहावीला कमी गुण मिळाले म्हणून सायन्स झेपणार नाही याकरता जर वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला तर पूर्ण आयुष्यच उलटपालट होईल. म्हणूनच शिक्षण विभागाला फक्त एवढ्याच सूचना द्याव्याशा वाटतात की, जी ही मार्कांची पद्धत आहे, ती या शिक्षण मंडळातून कमी करा. विद्यार्थ्यांना ज्ञानार्थी बनवा. तसंच ज्ञानासोबत इतरही कला, क्रीडा यांनाही वाव मिळेल, या कौशल्यांचा शिक्षण व्यवस्थेत समाविष्ट करा. म्हणजेच विद्यार्थी सर्वार्थाने परिपूर्ण होतील.
कांचन गावस्कर, एच. आर. कॉलेज

प्रत्यक्ष ज्ञान महत्त्वाचं
वाढत्या स्पर्धेत टिकायचं असेल तर अभ्यासाला पर्याय नाही, असं लहानपणापासून मुलांच्या मनावर बिंबवलं जातं. पण अभ्यास म्हणजे ज्ञान मिळवणं नव्हे तर, गुण मिळवणं असे समीकरण रूढ झालंय. शिक्षणातील स्पर्धेमुळे मुलांचं बालपण हरवलंय. पालक आणि शिक्षकांच्या अपेक्षांचं ओझं वाहताना विद्यार्थी आपलं आयुष्य पणाला लावत आहेत. विद्यार्थ्यांना मानसिक आधाराच्या अभावामुळे अपयश पचवण्याची क्षमता कमी झाल्याचं दिसून येतंय. विद्यार्थ्यांच्या क्षमतांमधील वैविध्य शोधून काढून पुस्तकी ज्ञान नव्हे तर प्रत्यक्ष ज्ञान देणं गरजेचं आहे. असं झाल्यावरच गुण आणि करिअरमध्ये योग्य समन्वय साधता येईल. गुणांच्या स्पर्धेंत यशस्वी झाल्यास यशाचा मार्ग मोकळा होतो हा विचार बदलण्याची, स्वतःकडे असलेल्या कलेचा आदर आणि अभिमान बाळगण्याची, स्वतःचे मूल्यमापन स्वतः जाणून घेण्याची विद्यार्थ्यांना गरज आहे.
विश्रांती शिंदे, विवेक कॉलेज

आवडणाऱ्या विषयांचा समावेश
दप्तराचं ओझ, परीक्षांचा भडीमार आणि अपेक्षांच भार या त्रिकूटात आजचा विद्यार्थी जगताना दिसतो. परीक्षेचं आणि स्पर्धांचं जाळंही इतकं मोठं आहे की, विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठेतून फुरसतच मिळत नाही. स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर या परीक्षेच्या निकालात आपलं नाणं वाजवावचं लागेल, तसं नाही झालं तर आपण अपयशी झालो किंवा दुसऱ्यांच्या तुलनेत आपण कमी लेखले जाऊ हा भ्रम त्यांना होतो. कमी गुण मिळाले म्हणून खचून जाणं किंवा जास्त गुण मिळाले म्हणून भारुन जाऊन फक्त गुणांचा विचार करून आयुष्याची घडी बसवण्यापेक्षा आपल्या कलागुणांचा वेध घेऊन योग्य निर्णय घेणं चांगलंच. स्पर्धेचा आणि परीक्षेचा शेदुंरी लेप चढलेल्या या स्वयंभू मूर्तीतला खरा यशस्वी विद्यार्थी बाहेर काढायचा असेल तर गरज आहे ती पुस्तकी ज्ञानांबरोबर भविष्यास पुरक ठरणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांना सक्षम करणं. अभ्यासाच्या भाराने दाबून टाकण्याएवजी आम्हाला आवडणाऱ्या विषयांचा समावेश करावा.
प्रतीक्षा शिंदे, बी. एम. रुईया गर्ल्स कॉलेज

समज बदलण्याची गरज
नुकत्याच लागलेल्या बारावीच्या निकालामुळे 'परीक्षेतील मार्क्स' हा सध्या अत्यंत नाजूक विषय आहे. पालक वर्ग व विद्यार्थ्यांच्या आशा-अपेक्षा, तुलना अशा अनेक बाबी दृष्टीस पडतात. मार्कांविषयीची पालक आणि विद्यार्थ्यांमधली समजूत बदलण्याची गरज आहे. ज्या विद्यार्थ्यांला जास्त मार्क्स तो 'हुशार' ही धारणा अत्यंत चुकीची आहे. कारण प्रत्येकाची हुशारी ही त्याच्या परीक्षेच्या मार्कांवरूनच नाही ठरत. बऱ्याचदा अधिक टक्के मिळाले तर विज्ञान शाखा अथवा अगदीच कमी टक्के मिळाले तर कला शाखेचा मार्ग ही समजूत कुठेतरी बदलण्याची गरज आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून तसंच विद्यार्थ्यांची आवडनिवडही लक्षात घ्यावी. मिळालेले गुण व ठराविक क्षेत्राची आवड यातील ठराविक क्षेत्राची आवड व जिद्द, चिकाटी यांची निवड करणं केव्हाही उत्तमच!
सायली शिंदे, भवन्स कॉलेज

उद्देश वेगवेगळे
आजच्या घडीला कोणताही अभ्यासक्रम निवडताना परीक्षा ही द्यावीच लागते. पण बोर्डाची परीक्षा ही जरा वेगळीच असते. या परीक्षेचा निकाल जाहीर होताच त्यांची बातमी सर्व ठिकाणी पसरते, म्हणून या बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास विद्यार्थी खूप मेहनत घेऊन करतात. त्यातल्या-त्यात जास्त मार्क मिळवण्यासाठी घेतलेली मेहनत, हुशार विद्यार्थी व आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी एक आदर्श मुलगा व मुलगी म्हणून ओळखले जाऊ यासाठी काही अभ्यास करतात. तर काही आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यास करतात. प्रत्येकाचा हेतू जरी वेगवेगळा असला तरी अभ्यास मात्र सारखाच करावा लागतो. म्हणून या काळात विद्यार्थी खूप मेहनत घेऊन मार्क मिळवतात.
गीता गायकर, जीवनदीप कॉलेज

टक्के नव्हे धक्के
गुणांच्या स्पर्धेने शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वातावरण असतं. 'परीक्षेत चांगले टक्के, नाहीतर घराबाहेर धक्के' हे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकाचे ब्रीदवाक्य झालंय. पालकांच्या दबावामुळे आणि सतत बदलणाऱ्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. काही विद्यार्थी टक्के कमी पडल्यामुळे किंवा नापास झाल्यामुळे, पालक ओरडणार या भीतीने आत्महत्येचा पर्याय निवडतात. विद्यार्थी त्याच्या क्षमतेप्रमाणे अभ्यास करत असेल तर त्यामध्ये काय वाईट आहे? का त्याच्यावर एवढा दबाव आणला जातो? कालानुरुप शिक्षण विभागाने अभ्यासक्रमातसुद्धा बऱ्याच सुधारणा केल्या आहेत व अजून कराव्यात जेणेकरून विद्यार्थी दडपणाखाली येऊन काही चुकीचं पाऊल उचलणार नाहीत. करिअरच्या दृष्टिकोनाने टक्केवारीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, त्यासाठी इतरांसोबत स्पर्धा न करता ती स्वत:सोबत करा.
कौस्तुभ शिंदे, यादवराव तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी

शैक्षणिक प्रगती कशी कळणार?
शिक्षण विभाग किंवा बोर्ड कोणीही, कितीही प्रयत्न केले तरी निकालांमधील स्पर्धा थांबणार नाही, कारण काही झालं तरी गुणवत्ता ही दर्शवावीच लागेल मग ती टक्क्यात असो व ग्रेडमध्ये. नाहीतर एखाद्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशी कळणार? मुळात स्पर्धा करणारा विद्यार्थीच असतो. आपल्याला किती गुण मिळालेत यापेक्षा आपल्या मैत्रिणीला किती आपल्यापेक्षा जास्त किंवा कमी मिळालेत याचीच उत्कंठा जास्त असते. पण असं करताना आपण ज्या गुणांची अपेक्षा करत आहोत ते मिळवण्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या मेहनातीकडे का दुर्लक्ष होतं? असं करुन चालणार नाही. स्पर्धा असवी तर ती निकोप असावी, असं माझं मत आहे.
स्नेहल कोलते, एच. आर. कॉलेज

अंगभूत कौशल्य ओळखा
दिवसेंदिवस सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढतीय. परंतु करिअरची योजना ही जीवनभर चालणारी प्रक्रिया असून तिची सुरुवात आपल्या पसंतीच्या अभ्यासक्रम निवडण्यापासून, नोकरी मिळवण्यापासून आणि त्यात प्रगती करण्यापासून होते. योग्य करिअर निवडताना आणि योग्य निर्णय घेताना ते स्मार्टपणे घेणं महत्त्वाचं ठरतं. करिअरची निवड हे खरोखर वेळखाऊ काम आहे. करिअरसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवड. करिअर निवडताना विचारात घेण्याजोगी आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याकडील कौशल्यसंच. कुटुंबातील सदस्यांशी, मित्रांशी आणि शिक्षकांशी बोलून तुमच्या कौशल्यविषयी अधिकाधिक जाणून घेणं महत्त्वाचं आहे. परंतु तसं न होता मार्क्स पाहिले जातात हे मला चुकीचं वाटतं. कारण आपल्यातील अंगीभूत कौशल्य न वापरण्याजोगा अभ्यासक्रम शिकताना, अभ्यासात यशस्वी होण्याच्या आणि व्यवसायिक प्रगती साधण्याच्या संधी कमी होतात.
अरुणा रसाळ, बिर्ला कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नको झिंगाट गोंगाट

$
0
0

‘पाऊस सुरू झाला ना... मग यंदाचा स्पॉट काय भाईलोग?’ कॉलेज कट्ट्यापासून ते एरियातल्या नाक्यापर्यंत सध्या हीच चर्चा आहे. पावसासोबत निसर्गही आपले सौंदर्यही मुक्तहस्ते उधळतो. पण आपल्यातलेच काहीजण याच सौंदर्यात बेधुंद होऊन अक्षरशः धिंगाणा घालतात. कुठे दारुच्या नशेत नंगानाच, कुठे छेडछाड, तर कुठे गावात हुल्लडबाजी अशी ओळख पावसाळी पिकनिकला आली आहे. निसर्गसौंदर्य अनुभवताना भवतालचं भान प्रत्येकानेच ठेवायला हवं, असं तरुणाईला वाटतं. त्यासाठी आवश्यक तिथे कठोर कायद्याच्या भाषेचाही उपयोग करा, त्याला आमची साथ असेल, असं मत युवाकट्टावर व्यक्त झालं.

नियम कडक करावेत

पावसाळी सहल म्हणजे निसर्गसौंदर्याचा मनसोक्त आनंद लुटणं होय. पण मनसोक्त म्हणजे निष्काळजीपणा नव्हे, हे बऱ्याचदा पर्यटकांच्या लक्षात येत नाही. अशावेळी प्रत्येक पिकनिक स्पॉटला जाण्यापूर्वी पर्यटकांची नीट तपासणी व्हावी. निसर्गरम्य पर्यटन स्थळी विशेषतः ट्रेकिंगच्या उंच भागात बहुतेक वेळा सुरक्षारक्षक नसतात, अशावेळी पर्यटक वाट्टेल तसं वागतात. त्यामुळे ठिकठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी. तसंच ठिकठिकाणी कचराकुंड्याची सोय करून त्यातच कचरा टाकणं बंधनकारक करावं. सक्त मनाईचे किंवा नियम मोडल्यावर होणाऱ्या शिक्षेचे फलक जागोजागी लावले तरीही पर्यटकांना धाक बसेल. सोशल मीडियासारख्या प्रभावी माध्यमांमधून अशाप्रकारचे संदेश देणं शक्य आहे.

चिन्मयी वझे, व्हीजेटीआय

हानी नव्हे, संवर्धन करा

महाराष्ट्राला अनेक पर्यटनस्थळं लाभलेली आहेत. पण आजकालच्या बेशिस्त, हौशी पर्यटकांमुळे त्यांचं महत्त्व कमी होताना दिसतंय. ज्यांनी वास्तु उभारल्या त्यांना कधी आपलं नाव वास्तुवर कोरावंसं वाटलं नाही, पण आम्ही मात्र सर्रास कोरतो. कचरा, पिशव्या, बाटल्या पर्यटनस्थळी फेकण्याएवजी वर्षा सहलीला जाताना वेगवेगळ्या बियासोबत घेऊन जा आणि त्या फेका. आपल्या हातून पर्यावरणाचं रक्षण करण्यात खारीचा वाटा झाल्याचं समाधान मिळेल. तसंच आपल्या वागणुकीमुळे त्या पर्यटनस्थळाचं काही नुकसान तर होत नाही ना? इतर पर्यटकांना तसंच ग्रामस्थांना काही त्रास तर होत नाही ना याची खबरदारी घेणं आवश्यक आहे. थोडक्यात, आपल्या पाऊलखुणांशिवाय काही ठेवू नका आणि सुखद आनंदाशिवाय काही नेऊ नका.

प्रतिक्षा शिंदे, बी. एम. रुईया गर्ल्स कॉलेज

जाणीव कर्तव्याची

पावसाळी पिकनिकची मज्जा तर औरच. लोक पिकनिकला गेल्यावर खाऊ खाल्ल्यावर तो प्लॅस्टिकचा कचरा गावामध्ये किंवा किल्ल्यांवर टाकतात. जोरजोरात गाणी लावून वाटेल तसं नाचून धिंगाणा घालतात. पण त्यामुळे आजुबाजूला राहणारे ग्रामस्थांना प्रचंड त्रास होतो. काही ठिकाणी तर ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीमुळे पिकनिक स्पॉटसवर नाईलाजाने बंदी घालावी लागली आहे. म्हणूनच आपण हे सर्व निसर्गरम्य ठिकाणांना लागलेलं ग्रहण घालवण्यासाठी लोकांना प्रथम त्यांच्या कर्तव्यांची जाणीव करून देणं गरजेचं आहे. पावसाळी पिकनिकचा आनंद गाणी लावून नाचण्यातच नसतो तर त्याएवजी कुटुंबियांशी, मित्र-मैत्रीणींशी गप्पा मारु शकता. त्यामुळे मनमोकळ्या हवेत, स्वच्छ परिसरात मन प्रसन्न होतं.

कांचन गावस्कर, एच. आर. कॉलेज

स्वत:वर बंधनं घालणं आवश्यक

पावसाळा सुरु झाला की निसर्गाचं एक अवर्णनीय असं रूप आपल्याला पाहायला मिळतं. सर्वत्र हिरवळ, ओलंचिंब वातावरण, सुसाट वाहणारा वारा आणि खळखळत वाहणारे धबधबे मनाला आनंद देतात. शहरांमधल्या काँक्रिट जंगलात हे अनुभवायला मिळत नाही. मग पर्याय म्हणून शहरी लोक पावसाळ्यात निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी ग्रामीण, डोंगराळ भागात किंवा किल्ल्यांवर भटकंतीचे बेत आखतात. पण या पिकनिकमध्ये निसर्गाच्या अद्वितीय सौंदर्याचा आस्वाद घेण्याऐवजी भलतेच प्रकार घडतात. अशा गैरप्रकारांना आळा घालायचा असेल तर प्रथम प्रत्येकाने स्वतःवर काही बंधनं घातली पाहिजे. नियम आणि दंड याशिवाय या बेशिस्त पर्यटकांना शिस्त लागणार नाही. जेवढे नियम कडक होतील तेवढाच बेशिस्तपणा कमी होईल.

स्नेहल कोलते, एच. आर कॉलेज

तरुण मंडळींची जबाबदारी

पर्यटनस्थळांवर तरूणाईचाच गलबलाट आपल्याला जास्त पहायला मिळतो. तरुणाई म्हटंली, की धम्माल आणि मस्ती हे समीकरणच बनलंय. मात्र पर्यटनस्थळांवर आपल्या धम्माल-मस्तीमुळे कोणाला त्रास होणार नाही, याची काळजी तरुणाईने आवश्य घ्यायला हवी. पर्यटनातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न तरुणाईने करावा. तसंच, पर्यटनस्थळांवर बेधुंद होणं, दारू पिऊन धिंगाणा करणं, गाणी लावून नाचणं, कचरा टाकणं यासारख्या लांछनास्पद गोष्टी करण्यापेक्षा त्या पर्यटनस्थळाच जतन कसं करता येईल, त्याची संस्कृती कशी टिकवता येईल, या गोष्टींचा विचार पर्यटकांनी करावा. बेशिस्त पर्यटकांसाठी कठोर उपाययोजना करावी. तसंच पर्यटकांनीही पर्यटनस्थळांबद्दल योग्य ती खबरदारी घेतली, तरच आपण आपल हे वैभव टिकवू शकतो.

सौरभ शेलार, शैलेंद्र कॉलेज

(अति) उत्साहाला आवरा

पिकनिक…त्यातूनही ती पावसाळी पिकनिक असेल तर उत्साहाला उधाण येतंच. पण हा उत्साह ‘फसफसून’ वाहणारा असेल तर

सुरुवात स्वत:पासून

पावसाचा रोमांचकारक अनुभव घेण्यासाठी आपण एखाद्या निसर्गरम्य वातावरणात हरवून जातो. तो आनंद कॅमेरात कैद करतो. एक सुंदर धबधबा असो किंवा निसर्गरम्य गाव असो किंवा पाणवठ्याच्या जागी अश्लील हावभाव करून बेधुंद नाचणं आणि मोठ्याने आरडाओरडा करून गाणी वाजवतो, यामुळे त्या गावातील नागरिकांसह पर्यावरणावर व वन्य पशु-पक्षांवर विपरीत परिणाम होतो. त्यावर दोन गटामध्ये होणारी हाणामारी यामुळे या पिकनिकला गालबोट तर लागतंच आणि पर्यायाने अशी ठिकाणांवर बंदी येते. केवळ सेल्फीसाठी त्यांचा वापर करून तेथील निसर्गाची वाट लावतो. तरुण मंडळींनी आनंद घेताना जिथं आपण जातो तिकडे स्वतःला शिस्त लावून घेणं गरजेचं आहे. प्रत्येकाने शिस्त पाळली तरच समोरचा निसर्ग आणि मिळणारा आनंद नेहमी द्विगुणित होईल.

ओमकार विलणकर, नवीनचंद्र मेहता इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

मानसिकता बदलणं गरजेचं

निसर्गरम्य ठिकाणांना लागलेलं ग्रहण रोखण्यासाठी अगोदर पर्यटकांच्या बुद्धीला लागलेलं ग्रहण रोखायच कसं याचं नियोजन करणं मला गरजेचं वाटतं. लाजिरवाणी गोष्ट अशी की, अनेक पर्यटक हे बेधुंद होऊन गोंधळ घालणं, महिलांची छेडछाड करणं, अश्लील नाच करणं, बेदरकारपणे वाहन चालवणं. परिणामी, त्यानंतर ऐकण्यात आलेले धक्कादायक प्रकार म्हणजे अपघात, पोहताना बुडून मृत्यू तर उंचावरून सेल्फी काढताना तोल गेला आणि बरंच काही. या बेशिस्त तरूणांच्या हुल्लडबाजीचा खरा त्रास तर तेथील स्थानिकांना सहन करावा लागतो. पर्यारणाचं जतन व संवर्धन करणं माझं कर्तव्य आहे ही भावना प्रत्येक तरुणाने बाळगायला हवी. बेशिस्त पर्यटकांना शिस्त लावण्यासाठी तरुणांची मानसिकता बदलायला हवी.

विश्रांती शिंदे, विवेक कॉलेज

पर्यटकांचं गैरवर्तन रोखण्यासाठी...

पावसाळा सुरू झाल्यावर अनेक लोक ट्रेकिंगला आणि हिरव्यागार निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जातात. पण सध्या पावसाळी पिकनिकमध्ये लोक बेधुंद होऊन कोणतेही सामाजिक भान न जपता पर्यटक गैरव्यवहार करतो. पर्यटक मोठमोठ्या आवाजात लाऊड स्पिकर लावून ध्वनीप्रदूषण देखील करतात. काही लोक तर पर्यंटनाच्यास्थळी मद्यपार्ट्या करतात, पार्ट्या संपल्यानंतर प्लास्टिकच्या बाटल्या, ग्लास हे सगळं तसंच फेकून देतात. त्यामुळे निसर्गाची हानी होतेच पण पर्यटन स्थळाचं सौंदर्य विद्रुप होतं. हे सर्व रोखण्यासाठी प्लॅस्टिकबंद पदार्थ विकण्यास परवानगी न देणं, कचराकुंड्यांची व्यवस्था असावी.

सुजय निंबरे, पाटकर कॉलेज

माफक अपेक्षा

निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी अनेक शहरी मंडळी पिकनिकचे बेत आखू लागतात. अनेकदा निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटकस्थळांची, किल्ल्यांची नावं डोळ्यासमोर येऊ लागतात. अशावेळेस अनेक तरुण मंडळींनी पर्यटक स्थळांना भेटी देताना समाजाचं आणि व्यक्ती स्वातंत्र्याचं भान व मर्यादा लक्षात घेऊन पावलं उचलावीत इतकीच माफक अपेक्षा! आपण समाजाचे, पर्यावरणाचे, तेथील राहणाऱ्या ग्रामस्थांचे अथवा त्या स्थळाचे नुकसान तर करत नाही ना? याकडे लक्ष देण्याची गरज आहे. निसर्गरम्य ठिकाणी पर्यावरणाचा आस्वाद घेताना मनसोक्त आनंद अनुभवा. पण आपल्याकडून माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडणार नाही याची प्रमुख दक्षता घ्या. एका सुजाण व कर्तव्यदक्ष नागरिकाचं कर्तव्य पाळा.

सायली शिंदे, भवन्स कॉलेज

अतिउत्साह ठरतो जीवघेणा

पावसाळा सुरु झाला की, चाहूल लागते ती प्रेक्षणीय स्थळांची आणि मग विविध शहरातून पर्यटक बदललेल्या वतावरणाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. मात्र अशावेळी काही गोष्टींची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच तेथील स्थानिकांच्या सूचनांचं पालन करायला हवं. काही अतिउत्साही पर्यटक मद्यपान करून येतात आणि अपघाताला आमंत्रण देतात. अशा अतिउत्साही लोकांनी एवढा उत्साह न दाखवता नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की, आपली घरी कोणीतरी वाट पाहत आहे.

योगिता केंगवडे, एस. बी. कॉलेज

जनजागृतीचे धडे देणं आवश्यक

पावसाळा सुरू झाला की, पर्यटकांची झुंबड डोंगर, दऱ्याखोऱ्यांकडे वळते. धबधब्यांवरचं पाणी अंगावर झेलण्यासाठी अनेक पर्यटक विशेषतः शहरी पर्यटक ग्रामीण भागाकडे धाव घेतात. मात्र हे निसर्गाचं वैभव तितकंच शाबूत ठेवणंही गरजेचं आहे. काही बेजबाबदार पर्यटक या स्थळांची नासधूस आणि त्यांना प्रदूषणाच्या जाळ्यात टाकतात. पर्यटक बेभान होऊन आपली पातळी ओलांडत असल्यामुळे तेथील गावकऱ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. हे प्रकार रोखण्यासाठी या पिकनिक स्पॉटच्या ठिकठिकाणी सुरक्षारक्षक असणं योग्य, शिवाय तरुणांनी देखील जबाबदारीपूर्ण वागणं गरजेचं आहे. आपल्या मित्रांना याबाबत जनजागृतीचे धडे देणंही योग्य ठरेल. अश्या निसर्गरम्य स्थळांची दक्षता घेणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.

सलोनी कदम, बिर्ला कॉलेज

दंडात्मक कारवाई करावी

गडकिल्ले, धबधबे अशा नैसर्गिक ठिकाणी जाऊन पर्यटक आनंद लुटतात. पण सगळेच पर्यटक पर्यटनस्थळी नियमांचं पालन करतात का? तर याचं उदाहरण हे नाही असंच आहे. काही पर्यटकांना शिस्त नसते. हृदयस्पर्शी वातावरणात प्लास्टिकच्या वस्तू फेकून तिथं प्रदूषण पसरवणाऱ्या आणि पिकनिकच्या नावाखाली दारू पिऊन धिंगाण करणाऱ्या पर्यटकांना कठोर शिक्षा ठोठवावी. कारण अशा पर्यटकांमुळे काही पिकनिक स्पॉट्सवर बंदी घालण्यात आलीय. अशाप्रकारे निसर्गाची हानी करणाऱ्या व बेशिस्त पर्यटकांना दंड करावा आणि पिकनिक स्पॉटवर कडक नियम करण्यात यावेत. आपला निसर्ग खूप सुंदर आहे, त्याची जोपासना करणं हे आपलं कर्तव्य आहे.

शुभांगी भोईर, जोंधळे कॉलेज

प्रदूषणापासून ठेवू दूर

पावसाळा सुरू होताच प्रत्येकाचे वेगवेगळ्या, निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जायचे प्लॅन ठरतात. पण हे प्लॅन इतरांसाठी धोकादाय ठरतात. फिरायला जाणं हे जरी मानसिक दृष्ट्या चांगलं असलं तरी ते काहींच्या जीवावर बेतत असतं. सर्वजण एकत्र येण्याच्या उद्देशाने फिरायला जाण्याचे बेत आखले जातात. पावसाळ्यात पर्यटन स्थळांना भेटी देताना जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे. पर्यटन स्थळांना प्रदूषणाच्या विळख्यापासून दूर ठेवणं ही पर्यटकांची जबाबदारी आहे.

करिश्मा मुठोळकर, जीवनदीप कॉलेज

पाश्चिमात्त्यांचे अंधानुकरण

मला वाटतं पिकनिक म्हणजे काय तर आपला रोजचा दिनक्रमातून वेळ काढून निवांत ठिकाणी जाणं. काही जणांसाठी ते नवीन गोष्टींची माहिती घेणं तर काही जणांसाठी इतिहासाचा अभ्यास असतो. पण हल्ली कामावरचा ताण, अतिअभ्यास या गोष्टींमुळे जी पिकनिक ठरवली जाते ती बेधुंद होण्यासाठी. काही अपवाद वगळले तर सगळीकडे हेच चित्र पाहायला मिळतं. आपण सरळ सरळ पाश्चिमात्त्य लोकांचं अंधानुकरण करतोय, यात प्रामुख्याने चित्रपटसृष्टीचा प्रभाव जास्त आहे. ज्या शिवाजी महाराजांचा जयजयकार केला जातो, त्यांचाच गडावर मद्यपान केलं जातं. यात कसली आलीय शिवभक्ती. अशावेळी सरकारी धोरण महत्त्वाची ठरतील. प्रत्येकालाच आपल्या जबाबदारीचं भान हवं.

नागेश सुतार, मुंबई विद्यापीठ

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवतो

पावसाळा म्हटंला म्हणजे भिजण्याचा मोह कुणाला ही आवरता येत नाही. लहानमोठ्यांपासून सर्वांनाच पावसात चिंब भिजायला आवडतं. तरुणाईला तर या गोष्टीची भुरळच पडते. मग बेत आखला जातो पिकनिकचा. गडकिल्ल्यांवर, टेकड्यांवर, धबधब्यांवर जाऊन चिंब भिजण्यासाठी जय्यत तयारी केली जाते, भिजण्याबरोबर खाणं-पिणं, नाचणं, गाणं अशा सर्वच गोष्टींचे बेत आखले जाते. दारु पिऊन विभत्सपणे नाचणं, रस्त्यांवर धिंगाणा घालणं, अश्लील बोलणं, कचरा करणं असले लज्जास्पद प्रका सर्रास पहायला मिळतात. याचा परिसरातील लोकांना अन् स्त्रियांना खूप त्रास होतो, पर्यटन स्थळांची बदनामी होऊन सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवतो. आपण सर्वांनी आपल्याच पर्यटन स्थळांची काळजी घ्यायला हवी, शांतता, सुरक्षिततेबरोबर अशा ठिकाणी सर्वांशी सौजन्याने वागायला हवं, पोलिसांनी येऊन हस्तक्षेप करण्यापेक्षा आपणच आपली मानसिकता बदलायला हवी. प्रत्येकाने भटकंतीचा आनंद मनसोक्त लुटावा पण इतरांना त्रास होऊ नये, याची काळजी घ्यावी

सागर दिनकर, सुयश कॉलेज

असभ्य वागण्याचा त्रासच

पावसाळ्यात विविध ठिकाणी भेट देणं हे आजच्या तरुणाईला तसंच सर्व वयाच्या लोकांना आवडतंच, पण आपण जिथे जातो त्या ठिकाणाचं विशिष्ट महत्त्व, वैभव असतं, ते तरुणाईने जपायला हवं. आजकालची ही उत्साही मंडळी अतिउत्साहात नको-नको ते करतात आणि सगळ्यांना वेठीस धरतात. स्थानिक लोकांनांसुद्धा अशा असभ्य वागण्याचा त्रास होतोच. एक सुजाण नागरिक आणि त्याहून माणूस म्हणून जिथं कुठे पर्यटनाला निसर्गरम्य ठिकाणी जाणार असाल तिथल्या स्थानिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. आनंद हा सगळ्यांना हवाय, फक्त मूर्ख वागण्याने इतरांचा आनंद हिरावून घेण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही हे तरुणाईने लक्षात घ्यावं.

तुषार पाचपांडे, भारती विद्यापीठ कॉलेज

आनंद लुटण्याची ही कोणती पद्धत?

गेल्या ४-५ वर्षात ट्रेकिंगला जाण्याचं आकर्षण खूप वाढतंय. निसर्गाच्या सान्निध्यात जाणं हे कधीही उत्तमच आहे. पण हल्ली तरुण मंडळी असो वा कोणत्याही वयातील व्यक्ती असो सगळेच बेजबाबदारपणे वागताना असल्याचं निदर्शनात येतं. त्यामुळे अनेक वाईट प्रसंग उद्भवल्याचंही आपण ऐकलंय. या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत असं माझं स्पष्ट मत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन मद्यपान करणं, महिलांची छेडछाड करणं ही कुठली संस्कृती आणि आनंद लुटण्याची पद्धत? याचा आपण गांभीर्याने विचार करायला हवा. सामाजिक जबाबदारीचं भान जपणं गरजेचं आहे. अशा लोकांमुळेच हल्ली अनेक चांगल्या पर्यटनस्थळांवर बंदी घालण्यात आलीय, जी अयोग्य आहे.

प्रथमेश आचरेकर, विद्यावर्धिनी अभियांत्रिकी कॉलेज

सुरक्षारक्षक ठेवावेत

पावसाळा म्हटलं की धबधबे, निसर्गरम्य ठिकाणी होणारी गर्दी हे काही नवीन नाही. गड-किल्ल्यांवर, निसर्गरम्य ठिकाणी लोक मज्जा-मस्ती करायला जातात खरं पण हल्ली या मज्जा-मस्तीचं रूपांतर दारू पिऊन धिंगाणा घालणं, महिलांची छेड काढणं, लाऊड स्पिकर लावून नाचणं यात होत चाललंय. अशा सर्व प्रकारांना पूर्णतः आपणच जबाबदार आहोत, असं मला तरी वाटतं. कारण अश्या पर्यटनस्थळी काही टोळकी अशा पद्धतीचं कृत्य करता असतात आणि आपल्यापैकी एकही सुजाण नागरिक त्यांना जाब विचारात नाही किंवा त्यांना ते करण्यापासून थांबवत नाही. या सर्व प्रकारांना आळा घालणं आपल्यासुद्धा हातात आहे, असं मला तरी वाटतं. त्याच बरोबर पर्यटनस्थळी कचरा होणार नाही, तेथील स्थानिकांना आपल्यामुळे कुठला त्रास होणार नाही याची खबरदारीसुद्धा सर्व पर्यटकांनी घ्यायला हवी. त्याचबरोबर गड-किल्ल्यांसारख्या ठिकाणी पर्यटनाच्या काळात सुरक्षारक्षक ठेवायला हवेत, तेव्हाच या गोष्टींना कुठेतरी जरब बसेल, असं मला वाटतं.

निखिल अहिरे, सीएचएम कॉलेज

यावेळच्या युवा कट्टात सहभागी झालेलं मुंबई विद्यापीठ आणि संलग्न कॉलेजेस

सेंट झेविअर्स कॉलेज (फोर्ट)

एच. आर. कॉलेज (चर्चगेट)

बी. एम. रुईया गर्ल्स कॉलेज (ग्रँट रोड)

रुपारेल कॉलेज (माहिम)

चेतना कॉलेज (वांद्रे)

साठ्ये कॉलेज (विलेपार्ले)

डहाणूकर कॉलेज (विलेपार्ले)

भवन्स कॉलेज (अंधेरी)

तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स (अंधेरी)

विवेक कॉलेज (गोरेगाव)

पाटकर कॉलेज (गोरेगाव)

शैलेंद्र कॉलेज (दहिसर)

नवीनचंद्र मेहता इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (दादर)

रुईया कॉलेज (माटुंगा)

पोदार कॉलेद (माटुंगा)

वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (माटुंगा)

गुरु नानक खालसा कॉलेज (माटुंगा)

व्हीजेटीआय (माटुंगा)

झुनझुनवाला कॉलेज (घाटकोपर)

रामानंद आर्य डी. ए. व्ही कॉलेज (भांडुप)

वझे-केळकर कॉलेज (मुलुंड)

जोशी-बेडेकर कॉलेज (ठाणे)

बांदोडकर कॉलेज (ठाणे)

ज्ञानसाधना कॉलेद (ठाणे)

भारती विद्यापीठ कॉलेज (खारघर)

पेंढारकर कॉलेज (डोंबिवली)

जोंधळे कॉलेज (डोंबिवली)

बिर्ला कॉलेज (कल्याण)

सुयश कॉलेज (मुरबाड)

सीएचएम कॉलेज (उल्हासनगर)

एस. बी. कॉलेज (शहापूर)

जीवनदीप कॉलेज (गोवेली)

विद्यावर्धिनी अभियांत्रिकी कॉलेज (वसई)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ वय नको, मन बघा!

$
0
0

वय नको, मन बघा!

वय हे आयुष्यात खूप महत्त्वाचं ठरतं असं मला वाटतं. एकंदरीत लहान मुलांना शाळेत घालण्यापासून ते अगदी त्याच्या लग्नापर्यंत सर्वच बाबतीत. साधारणतः प्रेमविवाहात वयाची आडकाठी आणली जात नाही. परंतु ठरवून केलेल्या लग्नामध्ये वय महत्त्वाची भूमिका बजावते. मला वाटतं, लग्न म्हणजे दोन मनांचं, जिवांचं, कुटुंबाचं सुंदर मिलन आहे. जिथे दोन मनं जुळतात तिथे वय जुळणं गरजेचं आहे असं मला तरी वाटत नाही. लग्नाच्या वेळेस वयातलं अंतर हे त्या जोडप्याच्या भविष्याचा विचार करून घेतलं जातं. पत्रिकांच्या जुळणाऱ्या गुणांपेक्षा दोन मनांचं, दोन विचारांचं जुळणं महत्त्वाचं असतं. नात्यांत असणारं प्रेम माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि जिथे प्रेम, सामंजस्य, आपुलकी असते तिथे वयाचं बंधन नसतं.

• एच. आर कॉलेज (चर्चगेट)
•डहाणूकर कॉलेज (विलेपार्ले)
•गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज (वांद्रे)
•भवन्स कॉलेज (अंधेरी)
•तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स (अंधेरी)
•विवेक कॉलेज (गोरेगाव)
•रुईया कॉलेज (माटुंगा)
•व्हीजेटीआय (माटुंगा)
•बिर्ला कॉलेज (कल्याण)
•जीवनदीप कॉलेज (गोवेली)

शेअरिंग होत नाही
वयामध्ये थोडं-फार अंतर असेल तर बिघडत नाही. पण हे अंतर एका पिढीइतकं मोठं असू नये. कारण प्रेम हे आंधळे असते परंतु वयात जास्त अंतर असेल तर लग्न केल्यावर पुढे जाऊन जनरेशन गॅप जाणवू शकते. आचारविचारांतील फरकाचा त्रासही होऊ शकतो. आपल्या मनातलं शेअर करायला आपल्या वयाचीच व्यक्ती सर्वात जवळची वाटते. मग वयात खूप फरक असताना हे शेअरिंग कितपत होत असेल? काही वेळा वयात इतकं जास्त अंतर असेल, तर जेव्हा एक व्यक्ती वृद्धत्वाला येते तेव्हा दुसरी व्यक्ती त्यामानाने बऱ्यापैकी तरुण असल्याने उत्साहात असते. त्यामुळे जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षांचा भंग होऊ शकतो. दुसरं म्हणजे सेलिब्रिटींचं आयुष्य म्हणजे आदर्श असे काही जण मानतात. पण त्यांच्या आयुष्यावर एक नजर टाकली, तर ज्या सेलिब्रिटींच्या वयात पिढीइतके अंतर आहे त्यातील काही जणांचे पूर्वी लग्न होऊन घटस्फोटही झालेला आहे. काहींना तर मोठी मुलंही आहेत. अशा वेळी फक्त सेलेब्रिटींचं उदाहरण पुढे करून आकर्षणापोटी असलेल्या प्रेमाचं समर्थन करण्यापेक्षा अशा नात्याचा आपल्याला पुढे त्रास होणार नाही ना याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे.
चिन्मयी वझे, व्हीजेटीआय

सोबत हवी घट्ट
लग्न, प्रेमसंबंध, लग्नासाठीचं योग्य वय व जोडप्यामधली वयोमर्यादा या गोष्टी व्यक्तीगणिक बदलत जातात. लग्नासाठी 'योग्य वय' ही संकल्पना पिढीप्रमाणे, तसंच प्रत्येक व्यक्तीनुसार व त्या व्यक्तींच्या विचारानुसार बदलत असते. लग्न करताना जोडीदारांनी एकमेकांच्या विचारांना, तसंच त्याच्या भावनांना महत्त्व दिलं की वयोमर्यादा अथवा दोघांच्या वयांतलं अंतर हे फक्त आकडे उरतात. लग्नाच्या बेडीत अडकताना पैसा, वय, गुणदोष, पत्रिका जुळवणी या गोष्टींपेक्षा आपल्या आयुष्याच्या जोडीदारविषयी असलेलं प्रेम, आयुष्यभरासाठी साथ देण्याची तयारी, त्याची मानसिकता व त्याच्या मनाचा जास्त विचार केला पाहिजे असं मला वाटतं. वयातलं अंतर फार विचारात घेणं योग्य नाही. कारण एकमेकांची मनं जुळल्यानंतर वाढत जाणारं प्रेम हे या वयाच्या अंतराला नक्कीच कमी करतं. एकमेकांची घट्ट सोबत ही अनेक निरर्थक गोष्टींवर मात करते.
सायली शिंदे, भवन्स कॉलेज

मनं जुळणं महत्त्वाचं
मुलगी एकदा वयात आली की, घरी लगेच स्थळ बघण्याची, लग्नाची चर्चा सुरू होते. प्रत्येकजण आपापल्या पिढीप्रमाणे वेगवेगळी मतं व्यक्त करतो. मग त्यांच्याच मताशी सहमत होऊन मुलांना आपल्या आई-वडिलांच्या आज्ञेचं पालन करावं लागतं. पण आताचा दृष्टिकोन मात्र बदलला आहे. मुलं अगोदर आपल्या करिअरचा विचार करतात. त्यासाठी खूप शिकून आधी आपलं भविष्य उज्ज्वल करतात. हे सर्व करेपर्यंत त्यांचं वय हे २४-२५ च्या घरात जातं. त्यामुळे घरचे पूर्णपणे याला विरोध करतात. मुळात लग्न करताना वय हा मुद्दा महत्त्वाचा नसतोच. तेव्हा महत्त्वाचं असतं ते दोघांची मनं जुळून येणं. त्यासाठी पत्रिकांचे जुळणारे गुण महत्त्वाचे नसतात. जरी दोघांच्या वयात खूप फरक असला तरी आपण त्याकडे लक्ष न देता त्या दोघांमधील प्रेम, त्यांचं करिअर याला प्राधान्य देणं गरजेचं आहे. लोकांचं असं म्हणणं असतं की, वयामध्ये खूप अंतर असलेल्या जोडप्याचं लग्न यशस्वी होऊ शकत नाही. पण कधी-कधी मात्र असंही होतं की, दोघांचं योग्य वय असूनही, पत्रिका जुळूनही जोडप्याचं लग्न अयशस्वी होतं. म्हणूनच आई-वडिलांनी लग्नासाठी मुलांवर जबरदस्ती करू नये. कारण लग्नासाठी वय हा मुद्दा महत्त्वाचा नसतो. कुणी प्रेमात असेल आणि त्यांच्या वयात जास्त अंतर असलं तरी त्यांची मनं जुळलेली असतात हे अधिक महत्त्वाचं आहे.
कांचन गावस्कर, एचआर कॉलेज

मनापासून…इच्छेनं
लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा क्षण असतो. लग्न झाल्यावर या नव्या नात्याला सुरुवात होते आणि आयुष्यातल्या एका नव्या टप्प्यात पती-पत्नीचा प्रवेश होतो. लग्नं जुळवली जातात, काही प्रेमविवाह करतात. सध्या प्रेमविवाहांचं प्रमाण वाढतं आहे. हल्ली तर वयात बरंच अंतर असलेली जोडपीसुद्धा लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. मुळात लग्नासारख्या पवित्र गोष्टीला जात, धर्म, वंश, रंग, वय यांचं बंधन नसावं. जर दोन व्यक्तींची मनं एकमेकांशी जुळत असतील आणि त्या दोघांचं मनापासून एकमेकांवर प्रेम असेल तर वय, वंश आणि इतर गोष्टींचा विचार करण्याची गरजच नाही. लग्न हा आयुष्याला नवीन रंग देणारा क्षण असतो. ज्या दोन व्यक्तींचं लग्न होणार असतं त्या व्यक्तींचे विचार, त्यांचं सुख हे घटक महत्त्वाचे असतात. वयात अंतर असलेली अनेक जोडपी आज सुखाने संसार करत आहेत. लग्न हे मनापासून आणि इच्छेप्रमाणे झालं तर निश्चितच ते यशस्वी ठरतं. त्यामुळे वय, रंग, धर्म, जात या गोष्टींना अतिमहत्त्व देण्याची गरज नाही.
वैभव पुरव, डहाणूकर कॉलेज

तीच योग्य वेळ
‘अभ्यासाविना दिलेल्या परीक्षेच्या निकालाची खात्री देता येत नाही’ ही विवाहासाठी अगदी योग्य उपमा आहे. लग्न हे कुणी आणि कधी करायचं, हा त्या व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न आहे. आजची युवा पिढी ही करिअरस्टीक झाल्यामुळे सर्वांचाच कल शिक्षणाकडे वाढत चालला आहे. लग्न काय असतं हे समजणं आणि ती जबाबदारी घेण्याची मानसिक, शारीरिक आणि आणि आर्थिक तयारी असणं हे मुलासाठी किंवा मुलीसाठी अत्यंत गरजेचं असतं. हीच लग्न करण्याची योग्य वेळ असते. विवाह निश्चित करताना प्रगल्भता महत्त्वाची आहेच. मुलगा-मुलगीमध्ये किती वर्षांचं अंतर आहे, हे देखील पाहणं आवश्यक आहे. कारण जर वर आणि वधू यांच्यात प्रमाणापेक्षा जास्त अंतर असेल तर त्यांच्या विचारात दरी निर्माण होते. भविष्यात ही दरी त्यांच्या नात्यामधल्या प्रेमाचा ओलावा कमी करत असते. प्रत्येकजण एका 'परफेक्ट लाइफ पार्टनर'च्या शोधात असतो. मात्र तो शोधत असताना स्वत:मध्ये व समोरच्या व्यक्तीमध्ये प्रगल्भता असणं फार गरजेचं आहे. विवाह झाल्यानंतर काही दिवसांतच घटस्फोट होण्यामागचं ते एक महत्त्वाचं कारण असू शकतं. यासाठीच एकमेकांवर विश्वास व दोघेही समजूतदार असायला हवेत. असं झालं तरच लग्न यशस्वी ठरू शकते.
विश्रांती शिंदे, विवेक कॉलेज

प्रेम-विश्वास हवा
पूर्वी आपल्या देशात बालविवाहाची प्रथा सुरू होती. काही काळानंतर ही प्रथा बंद झाली. पण अजूनही काही ठिकाणी हे पाहायला मिळतंच. ज्या वयात मुलींना शिक्षणाची खरी गरज असते त्या वयात त्यांना प्रपंच, संसार सांभाळायला लागतो. मुलगी जेव्हा शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभी राहते तेव्हाच तिचं लग्न करून दिलं पाहिजे. कारण आजही आपल्या समाजात स्त्रीला नेहमी कमी लेखलं जातं. लग्न करताना योग्य ते वयाचं अंतर असावं, पण वयाबरोबर प्रेम आणि विश्वास खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा दोन मनं जुळतात तेव्हा अशा नातेसंबंधांत कोणतीही बाधा येत नाही. लग्न हे प्रेम आणि विश्वासावर टिकून राहतं. आपण वेगवेगळे चित्रपट बघतो. त्यामध्ये हिरो-हिरोइन जसं वागतात तसं आपण वागायला बघतो. पण आपलं आयुष्य खरं आहे हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. प्रेम म्हणजे हातात हात घालून फिरणं, गुलाबाचं फुल देणं किंवा एकत्र कॉफी पिणं नव्हे. तर प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणं, नेहमी एकमेकांना सुखदुःखात साथ देणं होय. माझ्या मते वयातलं अंतर लक्षात घेऊन मगच नातेसंबंध जुळवायला पाहिजेत. यातून दोघांची मतं जुळतात आणि हे नातं आयुष्यभरासाठी टिकून राहतं.
दर्शना पवार, बिर्ला कॉलेज

विचारात तफावत असते
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग आहे. लग्नाच्या अतूट बंधनात अडकताना जोडीदाराची योग्य निवड करणं गरजेचं आहे. प्रेमाच्या दुनियेत वावरणाऱ्या आणि प्रेमाच्या बेडीत अडकलेल्या दुनियेला वयाचं भानच राहिलेलं नाही. प्रेमात जरी मनं जुळलेली असली, तरी एकमेकांच्या विचारात फार तफावत असू शकते. नात्यात प्रेम असणं महत्वाचं आहे. पण करिअर देखील तितकंच महत्त्वाचं आहेच. दोघांच्या पत्रिकेतले जुळणारे गुणसुद्धा महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पुढच्या आयुष्यात अनेक प्रॉब्लेम्स निर्माण होतात. हे प्रॉब्लेम्स निर्माण होऊ नयेत म्हणून या सर्व गोष्टींचा सुरुवातीलाच विचार करून, विचारपूर्वक निर्णय घेतले गेले पाहिजेत. एकमेकांच्या वयामध्ये खूप अंतर असणाऱ्या जोडप्यांचं लग्न यशस्वी होत असतील असं मला वाटत नाही. कारण त्या दोघांमध्ये वादाचे प्रसंग घडण्याचे प्रकार व असे अनेक प्रॉब्लेम निर्माण होण्याची शक्यता असते.
रेश्मा माळी, जीवनदीप कॉलेज

मनं जुळावी, वय नव्हे
वय हे आयुष्यात खूप महत्त्वाचं ठरतं असं मला वाटतं. एकंदरीत लहान मुलांना शाळेत घालण्यापासून ते अगदी त्याच्या लग्नापर्यंत सर्वच बाबतीत. साधारणतः प्रेमविवाहात वयाची आडकाठी आणली जात नाही. परंतु ठरवून केलेल्या लग्नामध्ये वय महत्त्वाची भूमिका बजावते. मला वाटतं, लग्न म्हणजे दोन मनांचं, जिवांचं, कुटुंबाचं सुंदर मिलन आहे. जिथे दोन मनं जुळतात तिथे वय जुळणं गरजेचं आहे असं मला तरी अजिबात वाटत नाही. लग्नाच्या वेळेस वयातलं अंतर हे त्या जोडप्याच्या भविष्याचा विचार करून घेतलं जातं. पत्रिकांच्या जुळणाऱ्या गुणांपेक्षा दोन मनांचं, दोन विचारांचं जुळणं खूप महत्त्वाचं असतं. नात्यांत असणारं प्रेम माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं जिथे प्रेम, सामंजस्य, आपुलकी असते तिथे वयाचं बंधन नसतं.
भक्ती पालांडे, तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स

सामंजस्याला प्राधान्य
लग्न करताना वयामध्ये तफावत किंचित असावी. कारण ही गोष्ट विचारांमध्येही तफावत निर्माण करते. लग्न हा निर्णय विचार करून घ्यावा लागतो. कारण हा विचार म्हणजे दोन मनांचं मिलन आहे. इथे वयाच्या अटीपेक्षा दोघांमधल्या विचारांत सामंजस्य असणं महत्त्वाचं असावं. पत्रिकेतले गुण कितीही जुळले तरीही दोघांनी गुण-दोषांसकट एकमेकांना जाणून घेणं आयुष्यात महत्त्वाचं ठरतं. प्रेमाला ना कोणतं बंधन आहे ना कसली अट. इथे वयापेक्षा भावना आणि जोडीदाराबद्दल असलेल्या विश्वासालाच जास्त महत्त्व आहे. वयाची अट ही निश्चितपणे फक्त ठरवून होणाऱ्या लग्नामध्ये लागू होते. सगळ्याशी जुळवून घेण्याची तुमची मानसिकता असली तर तुमच्या नातेसंबंधांत कसलीही दरी निर्माण होणार नाही. जर ही वैचारिक दरी खोल असेल, तर इथे तुमच्या वयामधलं अंतर स्वाभाविकपणे कमी असणं गरजेचं आहे. समंजसपणा असला तर ही नाती आयुष्यभर टिकतात. फक्त अविश्वासाची भावना निर्माण झाली तर नात्यातली दरी खोल होत जाते तीही घटस्फोटापर्यंत.
-प्रणित समजीसकर, गव्हर्नमेंट पॉलिटेक्नक कॉलेज

चांगली-वाईट…दोन्ही बाजू

लग्न म्हटलं की मुलांच्या आई-बाबांवर एक मोठी जबाबदारीच असते. प्रत्येक आई-वडिलांना वाटत असतं की आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न हे योग्य वयात व्हावं. जोडीदार चांगला मिळावा. परंतु आजच्या नवीन पिढीमध्ये तरुण-तरुणी हे पसंतीनुसार आपला जोडीदार निवडत आहेत. कुणाची मनं सोशल साईट्सवर जुळतात तर कुणी वेबसाइट्सवर आपला जोडीदार शोधत असतो. हा निर्णय घेत असताना मात्र ते काही गोष्टींकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. पूर्वी समाजात मुलीचं वय १८ होण्याआधीच तिचं लग्न केलं जायचं. कारण पूर्वी शिक्षणाला तेवढं महत्त्व नव्हतं. मुली सासरी जाऊन घरकामच करणार या विचारानं तिला जास्त शिक्षण न देऊन तिचं लग्न केलं जायचं. परंतु आता कायद्यानंच मुलीचं आणि मुलाचं लग्नाचं वय ठरवून दिलं आहे. पण इतक्या या वयात लग्न करायचं म्हटलं तर करिअरकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. लग्नानंतर करिअर म्हटलं तरी हे प्रत्येक मुलींसाठी नक्कीच तारेवरची कसरत असते. नाण्याला जशा दोन बाजू आहेत तशाच या विषयालासुद्धा दोन बाजू आहेत. चांगली आणि वाईट. जर मुलगा व मुलगी यांच्यामध्ये वयातला फरक जास्त असेल तर त्यांच्या विचारांमध्ये फरक होतो. त्यामुळे भविष्यात त्यांना अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. दुसरी बाजू म्हणजे दोघांमधला वयाचा फरक जास्त असूनही चांगली टिकलेली नाती आज आपण फिल्मइंडस्ट्रीमध्ये बघतोच. यामागचं कारण म्हणजे दोघांमध्ये असलेला समजूतदारपणा. नात्यामध्ये समजूतदारपणा आणि प्रगल्भता असणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण जर तेच नसेल तर वयामध्ये कमी फरक असलेलं नातंसुद्धा जास्त काळ टिकणं अवघड होऊ शकतं. त्यामुळे तरुणाईनं सगळ्या दृष्टिकोनातून आपल्या सुखी जीवनाचा विचार करून आपल्या जीवनातल्या या महत्त्वाच्या टप्प्यावरील हा निर्णय घ्यावा. जेणेकरून दोघांनाही पुढच्या आयुष्यात अडचण निर्माण होणार नाही.
रसिका पाटील, डहाणूकर कॉलेज


स्वभावगुण जुळावेत

लग्नाच्या बेडीत अडकताना आजकाल काय तर पूर्वीपासून वयाचा विचार केला जातो. ज्या व्यक्तीशी आपलं लग्न होणार आहे तो आपल्यासाठी कितपत योग्य आहे हे एका बायोडाटा म्हणजे कागदावरच्या माहितीवरून ठरवलं जातं. ती माहिती बघूनच नंतर जोडीदाराची भेट करून दिली जाते. हा प्रकार मुळात फार चुकीचा आहे. हे कुठेतरी थांबायला हवं. आजकाल प्रेम करताना पण वय बघितलं जात नाही. मान्य आहे की प्रेम हे कधी आणि कोणासोबत होईल ते सांगता येणार नाही, पण निदान थोडी वयोमर्यादा पाळायला हवी, असं मला वाटतं. लग्न म्हणजे दोन जीवांचे विचार आणि मन जुळणं फार महत्त्वाचं आहे. तेच जर जुळलं नाही तर संसार कसा होईल. लग्न करताना पत्रिकेतील गुण बघण्यापेक्षा स्वभाव गुण किती जुळतायेत ते बघायला हवं.
प्रज्ञा खैरे, रुईया कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ स्वरक्षणासाठी होऊ सज्ज!

$
0
0

रिक्षामध्ये होणारे तरुणींचे विनयभंग असो, तुरुंगातली क्रूर मारहाण असो किंवा बलात्काराच्या वाढत्या घटना…महिलांची सुरक्षितता हा आजही महत्त्वाचा प्रश्न बनून राहिला आहे. आजवर कितीतरी अॅप्स सुरू झाली, हेल्पलाइन्स आल्या पण त्यानं फारसा फरक पडला नाही. मुळात समाजाची मानसिकताच काही केल्या बदलत नाहीय. विकृत मनोवृत्तीच्या लोकांना कायद्याचा वचक राहिलेला नाही. अशा वेळी स्वतःच स्वतःच्या संरक्षणासाठी सिद्ध होण्याखेरीज दुसरा पर्याय राहिलेला नाही या मानसिकतेपर्यंत मुली येऊन ठेपल्या आहेत, असं मत ‘युवा कट्टा’वर व्यक्त झालं.

यावेळच्या युवा कट्टात सहभागी झालेलं मुंबई विद्यापीठ आणि संलग्न कॉलेजेस
• सेंट झेविअर्स कॉलेज (फोर्ट)
•एच. आर कॉलेज (चर्चगेट)
•सिडनहॅम कॉलेज (चर्चगेट)
•साठ्ये कॉलेज (विलेपार्ले)
•डहाणूकर कॉलेज (विलेपार्ले)
•चेतना कॉलेज (वांद्रे)
•गर्व्हमेंट पॉलिटेक्निक कॉलेज (वांद्रे)
•भवन्स कॉलेज (अंधेरी)
•राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अंधेरी)
•तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स (अंधेरी)
•के. ई .एस. श्रॉफ कॉलेज (कांदिवली)
•पाटकर कॉलेज (गोरेगाव)
•विवेक कॉलेज (गोरेगाव)
•रुपारेल कॉलेज (माहीम)
•रुईया कॉलेज (माटुंगा)
•पोदार कॉलेज (माटुंगा)
•वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (माटुंगा)
•व्हीजेटीआय कॉलेज (माटुंगा)
•गुरू नानक खालसा कॉलेज (माटुंगा)
•एस. आय. ई. एस कॉलेज (सायन)
•झुनझुनवाला कॉलेज (घाटकोपर)
•रामानंद आर्य डी. ए.व्ही कॉलेज (भांडुप)
•जोशी-बेडेकर कॉलेज (ठाणे)
•ज्ञानसाधना कॉलेज (ठाणे)
•बिर्ला कॉलेज (कल्याण)
•एम. के. कॉलेज (कल्याण)
•सीएचएम कॉलेज (उल्हासनगर)
•विवा कॉलेज (वसई)
•यादवराव तासगावकर स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (कर्जत)

स्त्री ही जगत जननी तरीही...
सध्याच्या परिस्थितीत महिला वर्गाचं बाहेर पडणं खूप धोक्याचं ठरतंय. महिलांच्या सुरक्षेसाठी स्पेशल अॅप, हेल्पलाईन नंबर इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत पण तरीही आजही महिला सुरक्षित नाहीत, असं का? असा प्रश्न सर्वांना नेहमीच पडत असतो. तर याला कारणीभूत कुठेतरी आपणही आहोत. भर बाजारात किंवा अन्य ठिकाणी एखाद्या महिलेशी छेडछाड होते आणि आपण बघत बसतो. पण अशा वेळी जर आपण त्यांच्या मदतीला धावून गेलो तर कोणत्याही महिलेला एकटं बाहेर पडण्याची भीती वाटणार नाही. सद्यस्थितीत काही महिलांना बाहेरच्या जगापेक्षा घरात जास्त असुरक्षितता वाटते. अशा नराधमांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. स्त्रियांचा आदर केला पाहिजे. कारण ती कुणाची तरी आई असते तर ती कुणाची तरी बहीण असते. स्त्री ही जगत जननी आहे, असा विचार जर सर्वांनी केला तर कुठल्याही प्रकारच्या सुरक्षेची गरज महिलांना भासणार नाही.
दर्शना पवार, बिर्ला कॉलेज

बघ्याची भूमिका पार पाडतात
गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांवरुन दिवसागणिक महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरच आलाय. महिला सुरक्षेसाठी सरकारकडून अनेक प्रयत्न होताना दिसतात. हेल्पलाईन नंबर, अनेक अॅप लाँच होतात, पण या सर्वांचा आजपर्यंत कुठेही प्रभावी परिणाम होताना दिसत नाही. याचं कारण म्हणजे जेवढ्या प्रमाणात व्हायला हवी तेवढ्या प्रमाणात या सर्वाची जनजागृती होताना दिसत नाही. त्याचबरोबर शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग तिथं होण्याऱ्या छेडछाडी विरोधात सर्व नागरिक अगदी बघ्याची भूमिका पार पाडतात. त्याशिवाय अनेक महिलासुद्धा स्वतःवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात तक्रार करायला पुढे सरसावत नाही. त्यामुळे असं कृत्य करणाऱ्यांना कसलीही जरब राहत नाही. त्याचबरोबर काही प्रमाणात आपल्या कायद्यांमध्येही थोड्या फार प्रमाणात बदल व्हायला हवे. जेणेकरून सर्वांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल. अर्थातच या सर्वांबरोबर समाजानेसुद्धा आपली मानसिकता बदलायला हवी, तेव्हाच हे चित्र कुठे तरी बदलेल असं मला तरी वाटतं.
निखिल अहिरे, सीएचएम कॉलेज

उपाययोजनांची अंमलबजावणी आवश्यक
भारतीय समाजव्यवस्थेचा स्त्री हा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतीय राज्यघटनेने स्त्रियांना स्वातंत्र्याचा, सुरक्षिततेचा हक्क दिलेले आहेत. परंतु याच हक्कांची सध्या मोठ्या प्रमाणावर गळचेपी होत आहे. स्त्रियांच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. महिलांची छेड काढणं, अश्लील चाळे करणं असे प्रकार शहरात, गावात सर्रासपणे घडत आहेत. या सर्व गोष्टींना कारणीभूत आहे ती पुरुषी मानसिकता. महिलांना त्रास देणाऱ्या, अत्याचार करणाऱ्या या पुरुषांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. सरकारी यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणावर स्त्री सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्याबाबतची माहिती स्त्रियांपर्यंत पोहोचवण्यात या यंत्रणा कमी पडते. स्त्रियांसाठी सुरू केलेल्या आपात्कालीन क्रमांक, महिला सुरक्षा गस्ती पथकांबाबत अनेक महिला अनभिज्ञ आहेत. यासाठी कायद्याची योग्यप्रकारे अंमलबजावणी केली पाहिजे.
वैभव पुरव, डहाणूकर कॉलेज

कायद्यात बदल अपेक्षित
महिलांची सुरक्षा या प्रश्नाला दिवसेंदिवस व्यापक रूप प्राप्त होतंय. चालताना, बसमध्ये, ट्रेनमध्ये कुणीही यावं आणि स्पर्श करून जावं हेच घडताना दिसतंय. माझ्या मते, कायद्याने महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाय शोधले, नवीन उपक्रम सुरू केले आहेत. आता गरज आहे, ती गुन्हा घडल्यानंतर दिल्या जाणाऱ्या शिक्षेची. एखाद्या स्त्रीचा विनयभंग हा प्रकार साधासुधा नसून तो एक गंभीर अपराध आहे. यासाठी कायद्यात काही कठोर बदल होणं अपेक्षित आहे. त्यामुळे गुन्हेगाराला सक्तीचा तुरुंगवास करायला हवा. त्यांना परिणामांची जाणीव करून द्यायला हवी. तरच, निदान कायद्याला घाबरून का होईना, पण हे प्रकार आटोक्यात येतील. एखाद्या स्त्रीचा विनयभंग होत असताना फक्त बघत न बसता तिच्या मदतीला धावून जायला हवं.
वृषाली भामरे, एच. आर कॉलेज

प्रत्येकीने पुढाकार घ्यावा
घरात जसं तिला सुरक्षित वातावरण मिळतं तसंच वातावरण तिला बाहेर आपल्या समाजात मिळतं का? आज महिलांच्या बाबतीत होणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाणही वाढत आहे. पोलीसदेखील याबाबतीत सजग राहून यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी सक्षम आहेत. तसंच महिला सुरक्षेसाठी अनेक कायदे, यंत्रणा, अॅप बनवले आहेत. तरीही महिला सुरक्षित आहेत का? हा एक प्रश्न नेहमीच आपल्याला पडतो. महिलांवर होणारे अनेक अत्याचाराचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वप्रथम प्रत्येक मुलीने पुढाकार घेतला पाहिजे. आता महिलांनीच स्वसंरक्षणासाठी सज्ज झालं पाहिजे. प्रत्येक मुलीला तिच्या स्वतःचं संरक्षण करण्याची जाण असली पाहिजे. जेणेकरून त्यांच्यावर अतिप्रसंग ओढवण्याआधीच ते टाळले जातील.
रसिका पाटील, डहाणूकर कॉलेज

अधिक जागृत होण्याची गरज
सोशल मीडियावर सर्रास अपलोड होणारे पॉर्न व्हिडीओ, फोटोज आणि अश्लील पोस्ट याबाबतीत आपण चुकतोय. या व अशा सर्व साइटस ब्लॉक कराव्यात जेणेकरून या मानसिकतेकडे लोकांचं मन वळणार नाही. माझ्या मते, महिलांची छेडछाड करणाऱ्याला, विनभंग करणाऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी. जेणेकरून अशी चूक करण्याआधी सर्व दहा वेळा विचार करतील. मला वाटतं स्त्रियांसाठी अथवा मुलींसाठी जो हेल्पलाइन नंबर आहे तो २४ तास उपलब्ध असावा. शिवाय सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेरे असावेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांनी आणि समाजाने ही याबाबत जागृत असावं. एखादी अघटीत घटना घडताना पाहिली असता लगेच पोलीसांना कळवावं आणि स्वतः ती घटना थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत.
भक्ती पालांडे, तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स

वास्तव संतापजनकच
सर्व क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत तरीही त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न अद्याप सुटलेला नाही, हे वास्तव अत्यंत संतापजनक आहे. आजपर्यंत सर्वच थरांत महिला सुरक्षेच्या प्रश्‍नांवर फक्त चर्चा होताना दिसते, मात्र ठोस पावलं उचलली जात नाहीत. महिला असुरक्षित असण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पुरुषी मानसिकता. आज कित्येक महिलांना, मुलींना रोज याच मानसिकतेचा सामना करावा लागतो. हे चित्र बदलण्यासाठी महिलांवरील अत्याचाराविरुद्ध आवाज बुलंद करून एकत्रित यायला हवं. पोलीस, रुग्णालय व इतर प्रशासनाकडून पीडितांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे सुरक्षिततेसाठी कठोर पाऊलं उचलण्याची गरज आहे, असं मला वाटतं. तसंच महिलांनी एकत्र येऊन अत्याचार कमी करण्यासाठी पुरुषी भान जागं करण्याची आवश्यकता आहे.
अरुणा रसाळ, बिर्ला कॉलेज

आत्मसंरक्षणाचे धडे गिरवावेत
आज भारत एकविसाव्या शतकात पदार्पण करत प्रगतीपथावर आहे. पण आजही स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराची बातम्यांची संख्या कमी होत नाही. आजही भारतात स्त्रियांवर विनयभंग, घरगुती हिंसा, हुंडाबळी यासारख्या घटना होतात. तसंच सरकारने महिला सुरक्षेसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. सरकारने स्त्रियांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलीस दल निर्माण केलं, त्यांना आपात्कालीन नंबर देण्यात आला तसंच विविध अॅप तयार केलं. पण त्याचा काहीही उपयोग होताना दिसत नाही. स्त्रियांच्या संरक्षणासाठी प्रथम स्त्रियांनी सक्षम होण्याची गरज आहे. मुलींना, स्त्रियांना कराटे किंवा स्वसंरक्षणाचे शिक्षण देणं गरजेचं आहे. तसंच स्त्रियांवरील अत्याचाराविरूद्ध कडक कायदे निर्माण करणं गरजेचं आहे.
रुपल पालांडे, विवेक कॉलेज

वाईट विचारसरणी कारणीभूत
शाळकरी मुलींवर बलात्कार, कधी तरुणींची छेड तर कधी महिलेचा विनयभंग या घटना घडतात. यासाठी स्त्री शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे. तरुण वर्गाने पुढाकार घेऊन गावातील, खेड्यापाड्यातील स्त्रियांना साक्षर केलं पाहिजे. तरच त्यांना त्यांच्या हक्कांची, अधिकारांची जाणीव होईल. सरकारने अनेक योजना राबवल्या, पण त्या स्त्रियांपर्यंत पोहोचल्याच नाहीत. तसंच अशा गुन्हेगारांना फाशी देण्यात यावी तरच पीडितेला योग्य न्याय मिळेल. पण आपली न्यायव्यवस्था स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यात सक्षम आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. आपल्या देशातील स्त्रियांच्या असुरक्षेसाठी पुरोगामी विचारसरणी, वाईट प्रवृती, कायद्यातील असक्षमता कारणीभूत आहे. म्हणूनच स्त्रियांच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांची पथके प्रत्येक रेल्वेस्थानकाजवळ, चौपाटीजवळ, शाळेजवळ तसेच महाविद्यालयांजवळ रुजू केले पाहिजे. शाळकरी मुली, तरुणी, महिलांना शाळेत, कामाच्या ठिकाणी स्वयंरक्षणाचे धडे दिले पाहिजेत.
अदिती भोसले, विवेक कॉलेज

कठोर शिक्षा व्हावी
सरकारने काही कठोर शिक्षा अमलात आणाव्यात जेणेकरुन वाईट प्रवृत्ती स्त्रियांपासून दूर राहिल्या पाहिजेत. तसंच अशा वाईट प्रसंगातून सावध होऊन स्त्रिया सक्षम होऊन अशा गलिच्छ विकृतींविरोधात लढत आहेत. या त्यांच्या क्षमतेला अनेक गोष्टींची जोड मिळते तरीही गुन्हेगाराला कठोर शिक्षा सुनावली पाहिजे. तेव्हा कुठे आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना आणखीन सुरक्षित वाटेल. या सगळ्यासाठी नुसतं विचार करुन उपयोग नाही तर त्यापलीकडे अमल हवा.
प्रणित समजीसकर, गर्व्हमेंट पॉलिटेक्निक कॉलेज

धाक असावा!
सध्या सरकारकडून महिलांच्या सुरक्षेसाठी नवनवीन योजना येतच असतात, पण म्हणून बलात्काराचं, स्त्रियांवरच्या अत्याचाराचं प्रमाण काही कमी होत नाही. याचं कारण म्हणजे इथल्या कायद्याचा, शिक्षेचा धाक कमी पडतोय. होय, कायदा व सुव्यवस्था जपणाऱ्या पोलीस, कोर्ट, यांसारख्या यंत्रणांनी आपला एक धाक, दरारा निर्माण करायला हवा. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या कुठल्याही आरोपीला कठोर शासन केलं पाहिजे. जर आपल्याला समाजात सुधारणा घडवून आणायची असेल तर कायदा व सुव्यवस्थेचा धाक असलाच पाहिजे. त्यासाठी स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना अशी कठोर शिक्षा व्हावी की, परत कोणीही असं वाईट कृत्य करण्याचा विचारदेखील करणार नाही.
हेमाद्री लुडबे, रुईया कॉलेज

महिला सुरक्षेबाबत अपयशीच
महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाण दिवसागणिक वाढतंय. यामागील कारण म्हणजे कोणाला त्यासाठी होणाऱ्या शिक्षेबद्दल भीतीच वाटत नाही. इथल्या यंत्रणांचा, व्यवस्थेचा धाकच कोणाला नाही. इथेच तर आपली यंत्रणा, सरकार अपयशी ठरतंय. अनेक हेल्पलाइन नंबर, विविध सुरक्षेचा अॅप्स बनवून काय कामाचे? जर इथल्या यंत्रणेचा काही धाकच लोकांच्या मनात नाही. यासाठी सरकारने अशा छेडछाड करणाऱ्या, बलात्कार या गुन्ह्यांसाठी कायदे कठोर बनवायला हवेत. शाळा किंवा कॉलेजांमध्ये महिलांसाठी कराटेचं शिक्षण देण्यात यावं, जेणेकरून त्याचा उपयोग पुढे स्वबचावासाठी होईल.
कुणाल पेडणेकर, एम. के. कॉलेज

गांभीर्य आहे कोणाला?
महिला सुरक्षतेबाबत आपण याबाबत कितपत गांभीऱ्याने विचार करतो हे पाहणं आवश्यक आहे. महिलाच्या अन्यायविरोधात कठोर कायदे आणि कडक शासन होणं गरजेचं आहे. एकीकडे आपण स्त्री-पुरुष समानतेबाबत ओरडतो आणि दुसरीकडे तिच्यावर अन्याय करतो हे योग्य नाही. अन्याय विरोधात कडक कायदे झालेच पाहिजे. अनेकदा राजकीय दबाबामुळे स्त्रीवर अन्याय करणारे समाजात ताठ मानेने जगत असतात. अन्यान विरोधात कोणी काहीच बोलत नाही. त्यामुळे अन्याय विरोधात आवाज उचलणं आवश्यक आहे. त्यामुळे स्त्रियांच्या बाबतीत कायदे हे कडकच असावेत.
अनिरूध्द गायकवाड, सेंट झेविअर्स कॉलेज

‘ती’च्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला
समाजात महिलांना सुरक्षित वातावरणाची केवळ हमी देऊन चालणार नाही तर आपण सुरक्षित असल्याचा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करायला हवा. विनयभंग, बलात्काराच्या असंख्य बातम्या वाचल्यावर मुली किंवा महिलाच काय तर कुटुंबियसुद्धा दहशतीच्या छायेखाली वावरतात. पर्यायाने त्याचं रूपांतर अतिकाळजीत होऊन साहजिकपणे त्याचा घाव महिलांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर आपोआप होतो. समाज काय म्हणेल? या गोष्टी जरी बाजूला ठेवल्या तरी एखादा अतिप्रसंगानंतर त्याचा मानसिक त्रास त्या पीडितेलाच होतो. त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्यासोबत समाजातलं भयाण वास्तवही लक्षात घ्यायला हवं. यानंतर आम्ही सरसकट समाज बदलण्याच्या मागे लागतो. पण खरंतर बदलायला हवीत ती त्या प्रत्येक माणसाची मानसिकता. याची सुरुवात आपण स्वतःपासून करायला हवी.
प्रथमेश राणे, रामानंद आर्य डी. ए. व्ही कॉलेज

नावापुरतीच मर्यादित
प्रत्येक व्यक्तीचा मनात खोलवर एका जीवनशैलीची व्याख्या बनली आहे. जिकडे स्त्री आणि पुरुष हे वेगळे आहेत असं स्पष्टपण कळतं. जीवनशैलीत बदल झाले असले तरी मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे. महिला सुरक्षा अजूनही नुसती नावापुरती मर्यादित राहिली आहे. मोबाइल अॅप्स, हेल्पलाइन नंबर, सीसीटिव्ही कॅमेरे या सगळ्या यंत्रणांचा पुरेपूर वापर होत नाही. शाळा, कॉलेजेस, ऑफिसमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे लावलेले दिसतात. घडलेल्या घटना निव्वळ कॅमेऱ्यात कैद होतात. पण घडणाऱ्या घटना घडत असतातच. ठोस असा मार्ग अजूनही अवलंबला जात नाही. मोबाइल अप्स, हेल्पलाईन नंबर या डिजिटल गोष्टी शहरी भागात थोड्याफार प्रमाणात उपयोगी पडतात. मात्र ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेचं काय? एकूणच काय तर महिला सुरक्षेसाठी उपाययोजनांसोबतच कठोर कायद्यांची तरतूद व्हावी.
शमा बुचडे, यादवराव तासगावकर स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट

आत्मसंरक्षण काळाची गरज
महिलांची सुरक्षा हा सध्याचा चर्चेतला विषय आहे. या विषयावर आपण दोन्ही बाजूंनी विचार करायला हवा. पहिली म्हणजे आपण आपल्या मुलांना दिलेली शिकवण किंवा संस्कार यांच्यामध्ये काही कमी पडत नाही ना? जर कमी पडत असलो तर आपण त्याच्यावर विचार करायलाच हवा. आता प्रश्न आला महिलांच्या सुरक्षेचा. माझं असं स्प्ष्ट मत आहे की, त्यांना स्वतःचं संरक्षण करण्याचे पूर्ण अधिकार आहेत. सरकारने कितीही योजना राबवू द्या. जर महिलांना आत्मसंरक्षणाचं ज्ञान आजच्या घडीला असायलाच हवं. महिलांना आत्मसंरक्षण शिकवणं ही आजच्या काळाची गरज आहे. सरकारने यासाठी काही कडक पाऊल उचलून योजना राबवल्या पाहिजेत. असं झालं तर येत्या काळात या घटना जवळपास नाहीशा होतील.
शुभम सोनटक्के, सेंट झेविअर्स कॉलेज

सारे मिळून प्रयत्न करु
आपण आज एकविसाव्या शतकात वावरतो. कला, विज्ञान, तंत्रज्ञान यांसारख्या अनेक क्षेत्रात आपण प्रगती केली. तरीही आपल्या देशात महिला सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवतो? महिलांची छेडछाड, विनायभंग, लैंगिक छळ यांसारख्या घटना नेहमी होताना दिसतात. याला जबाबदार कोण? महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपाय योजना राबवल्या आहेत. कायदे सुव्यवस्था यामध्ये महिलांसाठी अनेक तरतुदी आहेत, पण माहितीच्या अभावामुळे त्यांचा योग्य वापर होताना दिसत नाही. या सर्वांवर उपाय म्हणजे समाजाची मानसिकता बदलणं. महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी सर्व महिलांनी एकजूटीने पुढे येणं गरजेचं आहे. तसंच पालकांनीही आपल्या मुलांच्या मनात स्त्रियांविषयी आदरभाव निर्माण करणं गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे महिला सुरक्षितेसाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत.
अमित पाटील, डहाणूकर कॉलेज

अजूनही मानसिकता मागासलेलीच
काळ बदलला तरीही महिला सुरक्षा हा प्रश्न ऐरणीवरच आहे. नेमकं कुठे चुकतं? याचा विचार केला तर समाजाची मानसिकता आजही जुनाट आहे. समाजाची मानसिकता बदलायला हवी. प्रत्येकाला आपली जबाबदारी समजली तर हे चित्र बदलेल. पण खरं सांगतो समाजाची वाईट जास्त आणि चांगलं कमी अशीच रित आहे. चांगली माणसं एकत्र आली पाहिजेत. आणखीन किती दिवस सरकारवर अवलंबून राहणार? यासाठी आपण सामान्य जनतेनेच एकत्र येऊन ठोस पाऊलं उचलणं गरजेचं आहे.
समित साठे, एस.आय.इ.एस कॉलेज

चांगल्या मानसिकतेचा अभाव
महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर बनतोय. कारण स्त्रियांकडे बघण्याच्या मानसिकतेत अद्याप बदल घडून आलेला नाही. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात तसेच सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी महिला, मुली यांच्या छेडछाडीच्या घटना वाढू लागल्या आहेत. टवाळखोर तरुणांचे टोळके महाविद्यालयीन परिसरात मुलींची छेड काढतात. म्हणून ठिकठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवली. तरीही महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. यावर महिलांनी सजग राहणं तसंच शासकीय पातळीवर काही ठोस पाऊलं उचलण्याची गरज आहे. यावर तोडगा म्हणून मुलींच्या, महिलांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालणं हे असू शकत नाही. सध्या असंच चित्र घराघरात पाहायला मिळतंय. मुलींवर होणार अत्याचार, विनयभंग, बलात्कार होतात त्यामागे मुलींचीच चुकी आहे, असं म्हणणाऱ्यांमध्ये चांगल्या मानसिकतेचा आभाव दिसतो.
आशिष खरात, रुपारेल कॉलेज

वेळ विचारसरणी बदलण्याची
आपल्या पुरुषप्रधान देशात स्त्रियांनी खूप नाव आणि यश मिळवलंय यात काही शंकाच नाही. पण अजून वास्तव हेच आहे की, आपल्या देशात आजही महिला सुरक्षित नाहीत. दरवेळी आपण आपल्या व्यवस्थेलाच दोषी ठरवून मोकळे होतो, पण असं चालणार नाही. प्रत्येकांनी आपलं कर्तव्य योग्यप्रकारे पार पाडलं पाहिजे. प्रत्येक स्त्रीला आपण सन्मानाने वागवलंच पाहिजे. तर आणि तरच स्त्रिया सुरक्षितपणे आणि निर्भयपणे घराबाहेर पडू शकतील. तर मित्रांनो आता वेळ आहे, आपल्याला आणि आपली विचारसरणीला बदलण्याची.
मनाली साळवी, के.ई.एस.श्रॉफ कॉलेज

धाक कसा राहणार?
सतत सरकारकडून महिलांच्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या यंत्रणा, सुरक्षा पथक सुरु करण्यात येतात. पण इतक्या उपाययोजना करूनही महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण घटत नाही. याला सरकारी यंत्रणा तर जबाबदार आहेच, पण समाजाची मानसिकताही तितकीच कारणीभूत आहे. ज्यांच्याकडून संरक्षणाची हमी दिली जाते त्यांच्याकडूनच महिलांवर अत्याचार केले जातात, असं हे ऐकण्यात येतं. मग पोलीसांचा धाक कसा राहणार? नवीन उपाययोजना करण्यापेक्षा आधीच अंमलात आणलेल्या उपायांना अधिक सक्त बनवून त्याची कार्यपद्धती बदलावी. तसंच शिक्षा अधिक कठोर करण्यापेक्षा पहिले त्या कशाप्रकारे बजावल्या जातील यावर अधिक लक्ष द्यावं. त्याशिवाय सरकार आणि पोलिसांवर जास्त अवलंबून राहण्यापेक्षा महिलांनी स्वसंरक्षणावर जास्त भर दिला पाहिजे, असं मला वाटतं.
जन्मेश वर्तक, राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आहे तंत्र, तरी हवा गुरूमंत्र!

$
0
0



लेक्चरपासून अगदी संशोधनापर्यंत सगळ्या बाबतीत तंत्रज्ञान आज तरुणाईसाठी महागुरू बनलं आहे. तरीही आयुष्यातल्या वेगवेगळ्या वळणावर भेटणाऱ्या प्रत्यक्ष गुरूंचं स्थान त्यांच्या मनात आजही कायम आहे. तंत्रज्ञानाने अनेक गोष्टी सोप्या केल्या असतील. पण खांद्यावर हात ठेवून प्रसंगी कठोर होत, करिअरमध्ये ‌किंवा प्रत्यक्ष आयुष्यात मार्गदर्शन करणारा गुरू हाच आमच्या दृष्टीने वंदनीय आहे, असं मत १०० टक्के तरुणाईने युवा कट्टावर मांडलं आहे.

यावेळच्या युवा कट्टात सहभागी झालेलं मुंबई विद्यापीठ आणि संलग्न कॉलेजेस
• सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स (फोर्ट)
•एच. आर. कॉलेज (चर्चगेट)
•चेतना कॉलेज (वांद्रे)
•गर्व्हमेंट पॉलिटेक्निक कॉलेज (वांद्रे)
•डहाणूकर कॉलेज (विलेपार्ले)
•भवन्स कॉलेज (अंधेरी)
•सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अंधेरी)
•तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स (अंधेरी)
•विवेक कॉलेज (गोरगाव)
•पाटकर कॉलेज (गोरेगाव)
•एम. डी. कॉलेज (परळ)
•नवीनचंद्र मेहता इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट (दादर)
•व्हीजेटीआय (माटुंगा)
•रामानंद आर्य डी.ए.व्ही. कॉलेज (भांडुप)
•सुयश कॉलेज (मुरबाड)
•यादवराव तासगावकर स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (कर्जत)

तंत्रज्ञानाच्या आधीन
गुरु हा सुखाचा सागरु
गुरु हा दु:खाचा आगरु
गुरु हा धैर्याचा डोंगरु
कदाकाळी डळमळीन
गुरु या शब्दातच किती मोठा अर्थ लपला आहे. पण आताच्या या नवनवीन तंत्रज्ञानामुळे आत्ताची पिढी गुरु या संकल्पनेला मुकत चालले आहेत. वेगवेगळी अॅप, वेबसाइट्स हेच आपले गुरु बनलेत. आत्ताची मुलं नवीन विकसित झालेल्या तंत्रज्ञानामुळे गुरु या संकल्पनेचा अपमान करतात. तंत्रज्ञानामुळे जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील माहिती मिळवता येत असल्यामुळे मुलं त्यालाच आपले गुरु मानतात. तंत्रज्ञानाच्या व्यसनाधीन झाल्यामुळे त्यांना गुरुची किंमत कळत नाही. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. डिजिटल शिक्षणामुळे प्रत्यक्ष गुरूच्या शिकवणीतीत असलेला तो गोडवा, मोकळेपणा, विचारवृत्ती यांपासून तो वंचित राहिल.
कांचन गावस्कर, एच. आर. कॉलेज

त्यांच्याशिवाय आपण अधुरे
भविष्याला उजळा देणारा, आयुष्याला आकार देणारे गुरु असतात. असे हे गुरु सध्याच्या काळात दिसेनासे झालेत. कारण तंत्रज्ञानाने आपल्या मनात जागा केलीय. त्यांच्याशिवाय आपण अधुरे आहोत. तंत्रज्ञानामुळे आपला विकास होतोय हे चांगलंच आहे की? पण त्यांना गुरुसमान मानणं कितपत योग्य आहे, हे आपणच ठरवायला हवं. माझं उदाहरण द्यायचं झाल्यास माझ्या आयुष्यातील प्रथम गुरु माझी आई आहे. अन् करिअरच्या बाबतीत सांगायचं झाल्यास आयपीएस विश्वास नांगरे-पाटील हे माझे आदरणीय गुरु आहेत. मी त्यांच्या इतके यशस्वी नाही, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी नक्की प्रयत्न करीन. कारण खरा गुरु हाच जो आपलं जीवन घडवतो अन् आपल्या यशापर्यंत जायला मदत करतो.
विभक्ती साळवी, डहाणूकर कॉलेज

गुरुबिन ज्ञान कहासे पाऊ?
ज्ञान देणारे, योग्य मार्ग दाखवणारे गुरु असतात. जसे आई-बाबा, शिक्षक, अनुभव, निसर्ग, आधुनिक तंत्रज्ञान अशा अनेक गुरूंबरोबर आपले अखंड शिक्षण चालू असते. आज आधुनिक तंत्रज्ञानाने आपल्यासमोर ज्ञानाचं भांडार उभं केलंय. एका क्लिकसरशी आपल्याला हवी ती माहिती मिळते. त्यामुळे ऑनलाइन शिकण्याकडे मुलांचा कल वाढतोय. अनेक शाळांमध्येसुद्धा प्रोजेक्टर लावून धडे शिकवले जातात. पण मला वाटतं हे सगळे कृत्रिम उपाय आहेत, यात शिस्त नाही. त्यामुळे माझं असं मत आहे की प्रत्यक्ष गुरुमुखातून शिक्षण घेणे हीच पद्धत योग्य आहे .कारण यात समजून घेणे ही प्रक्रिया होते. शिष्य घडवणे हे सुंदर काम गुरू करतो .गुरुशिष्याची जवळीक निर्माण होते.मी संगीत क्षेत्रात असल्यामुळे गुरूच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाशिवाय वेगळे ज्ञान मिळूच शकत नाही.
सिद्धी पटवर्धन ,मुंबई विद्यापीठ

बरोबरी होऊच शकत नाही
जीवनात गुरू हे अग्रस्थानी असतात. जीवनाच्या विविध टप्प्यांवार मार्गदर्शन करण्यासाठी ते नेहमीच आपल्या पाठीशी उभे असतात. तंत्रज्ञान आणि गुरू यांची कधीही बरोबरी करता येणार नाही. कारण एखाद्या गुरूंकडून जी आपुलकी, शिस्त, अनुभव आणि मानसिक पाठबळ मिळते ते जगातलं कुठलंच तंत्रज्ञान देऊ शकणार नाही हे सर्वज्ञात आहे. तंत्रज्ञान आणि वेबसाइट हे आपल्याला फक्त ज्ञान उपलब्ध करुन देतात, पण एक गुरू अपल्या शिष्याची आवड जाणून त्याप्रमाणे त्याला निस्वार्थीपणे मार्गदर्शन करतो.
शुभम फाटक, विवेक कॉलेज

कितपत योग्य?
गुरु आपल्या आयुष्याला दिशा देतात, आपल्याला मार्गदर्शन करतात. एका मुलाच्या सर्वांगीण विकास करण्यावर त्याचा अधिक भर असतो. मुलाच्या कलागुणांना ओळखून त्यांना वाव देतात. पण आज वर्गातलत्या गुरुजींची जागा कम्प्युटरने घेतली. तंत्रज्ञानामुळे आपल्याला हवी ती माहिती मिळते. वेगवेगळ्या अॅप, वेबसाइटवर शिक्षणाचे धडे गिरवता येतात. एका क्लिकवर सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात. आधुनिक शिक्षणाच्या नावाखाली तंत्रज्ञानचा वापर करणं कितपत योग्य आहे? हा प्रश्न पडतोच. तंत्रज्ञानामुळे माणूस खूप प्रगती करू शकतो, पण शेवटी माणसाने तंत्रज्ञान निर्माण केले तंत्रज्ञाने माणसाला निर्माण नाही केलेलं. त्यामुळे तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी तो शिक्षकाची जागा घेऊ शकत नाही.
रुपल पालांडे, विवेक कॉलेज

तेच खरे ज्ञानभांडार
लहान मुलांना जगायला, चालायला आणि बोलायला जरी आई-वडिलांनी शिकवलं तरी त्यात भर घालून त्याला आकार हे गुरूच देतात. प्रत्यक्ष आयुष्यात अजूनही गुरूवर्यांनी केलेलं मार्गदर्शन, त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या ठरतात. तंत्रज्ञान गुरुसारखी माया व प्रेम नाही देऊ शकत. प्रत्येक क्षेत्रात जरी तंत्रज्ञानाने बदल घडत असला, तरी तितकेच ते घातकही आहे. वेगवेगळे अॅप, वेबसाईट्स जरी आपल्याला अफाट ज्ञान देत असले तरी गुरुची उपमा किंवा जागा ते घेऊ शकत नाही. गुरूची गरज ही प्रत्येक्ष आयुष्यात आजही आहे आणि पुढेही तितकीच किंवा त्याहून जास्त असणार. खरंच तंत्रज्ञान कितीही विकासित झालं तरी गुरूची जागा कधीच घेऊ शकत नाही हे तितकंच खरं. तंत्रज्ञान हे महागुरू कधीच होऊ शकत नाही. कारण आपुलकी, प्रेम आणि मायेचा लळा हा तंत्रज्ञान नाही तर एक गुरूच घडवून आणतो.
रसिका भोगले, चेतना कॉलेज

गुरुविना जीवन व्यर्थ
गुरु हा शब्द ऐकल्यावर अनेक कथा आठवतात, अगदी रामायण-महाभारतातल्या काळापासून मानवाच्या आयुष्यात गुरूचा महत्त्वाचा वाट आहे. गुरू शिवाय जन्माला काही अर्थ नाही असं आपण अनेक कथांमध्ये ऐकलंय. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, मानवाने अनेक क्षेत्रात प्रगती केली, अगदी चंद्रावर पाऊल ठेवण्यापर्यंत मोठी कामगिरी केली. तंत्रज्ञान जलद गतीने बदलत असलं तरी गुरुची जागा ते घेऊ शकत नाही, असं मला वाटतं. आपण तंत्रज्ञानाने जरी प्रगती केली असली तरी त्याचे अनेक दुष्परिणाम त्याला भोगावे लागतात. तंत्रज्ञान जरी प्रगत असलं तरी तो एक गुरु म्हणून आपल्या भावना कधीच समजू शकत नाही. मानवी आयुष्य तंत्रज्ञानाने गुरफटले असले तरी तो आपल्या आयुष्यात आपल्या गुरुची जागा कधीच घेऊ शकणार नाही. कारण गुरुविना मानवाचे जीवन व्यर्थ आहे.
देवल महाडिक, सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स

आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी...
प्रत्येक क्षेत्रात पाऊल टाकताना गरज असते ती फक्त एका मार्गदर्शनाची व आधाराची. ही भूमिका गुरूच उत्तमप्रकारे वठवतात. जरी आज टेक्नोसॅव्ही युग आहे तरी ऑनलाइन आणि व्हर्च्युअल जगात वावरताना सोशल मीडिया काही वेळा आपला गुरू होऊन जातो. अनादी काळापासून ते आजच्या दिवसापर्यंतची माहिती ताबडतोब जरी समजण्यात आज तंत्रज्ञान यशस्वी झालं असलं तरी त्यात व्यक्तीगत गोष्ट समजवण्याची योग्यता नाही. व्हर्च्युअल क्लासरूम किंवा ऑनलाइन ट्युशन असो, दोन्हीकडे शिक्षण हे मिळणार. पण प्रत्यक्षात एखाद्या समस्येची उकल प्रत्यक्षात शिकवणारे गुरुच करु शकतात. तंत्रज्ञान हे भविष्याकडे एक नाहीतर शंभर पाऊल पुढे नेणारा महागुरू असला तरी आयुष्याच्या प्रवासात हजारो पावले पुढे नेणारा मानवी गुरू हाच खरा तत्वमसि होय.
ओमकार विलणकर, नवीनचंद्र मेहता इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट

नि:स्वार्थीपणे ज्ञानदान
जगजाहीर एक उत्कृष्ट गुरुजी म्हणून सानेगुरुजी यांची ओळख आहे. ज्या व्यक्तींकडून, वस्तूकडून, निसर्गातील घटकांकडून आपल्याला जे काही चांगलं शिकायला मिळतं ते सर्वच आपले गुरू असतात. आता मात्र या गुरूंची जागा अॅप आणि वेबसाइटने घेतलीय. मला वाटतं गुरु ही एकमेव अशी गोष्ट आहे जी निस्वार्थी बुद्धीने, मनाने, विचाराने आपल्या शिष्याला त्यांच्याकडे असलेली प्रत्येक गोष्ट देत असते. गुरूंची जागा कोणतीही ऑप अथवा वेबसाइट घेऊ शकत नाही. 'चिकाटी असली की असाध्य ते साध्य होतंच', ही शिकवण आपल्याला कोळ्याकडून मिळते तर 'वळूचे कण रगडिता, तेल ही गळे' ही शिकवण मुंग्यांकडून मिळते, या व अशा कितीतरी गोष्टी कोणतीही वेबसाइट अथवा अॅप आपल्याला शिकवू शकत नाही. जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरूची साथ गरजेची असते.
भक्ती पालांडे, तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स

योगदान अमूल्य
व्यक्तीच्या जडणघडणीत आणि त्याच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारी व्यक्ती म्हणजे गुरू. जीवनाच्या विविध टप्प्यात व्यक्तीला वेगवेगळ्या रूपात गुरूंचं दर्शन होत असतं, मार्गदर्शन लाभत असतं. आजचं जग हे तंत्रज्ञानाचं जग आहे. सर्व क्षेत्रात तंत्रज्ञानाने महत्त्वाचे बदल घडवलेत. विविध वेबसाइट्स, अॅप्सद्वारे लोकांना विविध गोष्टींचं ज्ञान मिळतंय. एकूणच गुरूंप्रमाणे तंत्रज्ञानसुद्धा ज्ञानदानाचं कार्य करत आहे. पण त्यामुळे गुरूंचे महत्त्व कमी होत नाही. तंत्रज्ञान जरी माहिती देत असलं तरी गुरूंची जागा ते कधी घेऊ शकत नाही. तंत्रज्ञान हे जीवनाच्या विविध टप्प्यात ज्ञान देण्याचं काम करत असतं, पण एक उत्तम नागरिक घडवण्याचं कार्य मात्र गुरू करत असतात.
वैभव पुरव, डहाणूकर कॉलेज

तंत्रज्ञानाला महागुरू मानणं चुकीचंच
प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान एक पाऊल पुढेच आहे. तंत्रज्ञानाने सर्वच कामे सोपी आणि सुरळीत होतात. वेगवेगळी अॅप्स, वेबसाइट एकप्रकारे शिक्षणाचे भांडार आहेत. प्रगतशील जीवनासाठी यांचा वापर करणं गरजेचं आहे, पण याच तंत्रज्ञानाला महागुरू म्हणणं चुकीचं वाटतं. गुंतागुंतीच्या तसंच व्यस्त आयुष्यात तंत्रज्ञान महत्त्व मोलाचं आहे. पण खरं पाहता ज्यांनी आपल्याला वाढवलं, आपल्याला विविध गोष्टींची तसंच तंत्रज्ञानाची ओळख करून दिली ते आपले आई-बाबा, शिक्षक आणि वडीलधारी माणसं हेच आपले महागुरू आहेत. प्रत्येक क्षणी त्यांचा आदर करणं म्हणजेच गुरुपौर्णिमा रोज साजरी करण्यासारखं आहे. तंत्रज्ञान कितीही विकसित झालं तरीही गुरूंची शिकवण प्रत्येक क्षणी कामी येते आणि मौल्यवान ठरते. त्यामुळे आपल्या गुरूंचा आदर करणं हे प्रत्येक शिष्याचं कर्तव्य आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यातील आपल्या गुरूंची जागा तंत्रज्ञान घेऊ शकत नाही.
स्वेता सकपाळ, डहाणूकर कॉलेज

फरक जमीन-आसमानाचा
आज प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाने बाजी मारली आहे. विद्यार्थी वर्गात कमी आणि मोबाइल, संगणक यासोबत जास्तवेळ घालवतात. वर्गात प्राध्यापक, गुरुजी कितीही मन लावून शिकवत असले तरी विद्यार्थ्यांचे मन त्याकडे वळत नाही. काही गोष्टी विद्यार्थी तंत्रज्ञांनाने आत्मसात करतात, हे चांगलीच बाब आहे. विस्तृत माहितीचा साठा, सखोल विश्लेषण, नवीन सुधारित माहिती यामुळे तंत्रज्ञानालाच गुरू मानतात. तंत्रज्ञान जरी महागुरू वाटत असेल, तरी एका गुरूमध्ये आणि तंत्रज्ञानात खूप फरक आहे. गुरु आपल्याला ज्ञात आणि अज्ञात अशा दोन्ही गोष्टींची माहिती करून देतो. पण आज तंत्रज्ञान कितीही विकसित झालं असलं तरी प्रत्यक्षात मात्र खऱ्या जिवंत गुरुची गरज आहेच; कारण तंत्रज्ञानाला मन, भावना, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, शिस्त या गोष्टी माहीत नाहीत. ते गुरुकडूनच मिळत असल्याने तंत्रज्ञान हे आपल्या गुरुची जागा कधीच घेऊ शकत नाही.
सुजय निंबरे, पाटकर कॉलेज

तंत्रज्ञान वापराला मर्यादा
आजच्या धावत्या जगात तंत्रज्ञानाने शिक्षण क्षेत्रातही महत्त्वपूर्ण बदल घडवलेत यात तीळ मात्र शंका नाही. नवीन अॅप्स, वेबसाइट्स हे सध्या मार्गदर्शनाचं काम करतात. पण रोजच्या जडघडणीत आपल्या गुरूची नितांत गरज आहे. फक्त तंत्रज्ञान हे आपले महागुरू आहे, अस मला वाटत नाही. तंत्रज्ञान कितीही विकसित होऊ दे, तो या गुरूची जागा नाहीच घेऊ शकत. कारण प्रत्येक अडचणीवर तंत्रज्ञान आपल्याला मदत, मार्गदर्शन करेलच असं नाही. तंत्रज्ञानाशिवाय प्रगती साधू शकत नाही, तसंच गुरूशिवाय आपली प्रगती होणं अशक्यच आहे.

खरंच गुरु काय असतो?
गुरु एक जप असतो,
गुरु एक तप असतं,
गुरु एक व्रत असतं,
आयुष्यभर जपायचं असतं...
गुरु एक ज्वलन असतं,
जळणाऱ्या ज्योतीचं,
अन् शिक्षक एक मिलन असतं,
परमेश्वर प्राप्तीचं...
सागर दिनकर, सुयश कॉलेज

ज्ञानाचा अखंड झरा
खरंच तंत्रज्ञानाने खूप महत्त्वपूर्ण बदल घडवले आहेत आणि त्याचा उपयोग ही मोठ्या प्रमाणावर आजचे विद्यार्थी करताना दिसतात. ज्ञानाचा भांडार खुलं झाल्यामुळे बसल्या जागी हवं ते उपलब्ध होतं. त्यामुळे आजच्या विद्यार्थांनाही याची इतकी सवय झाली आहे की, त्यांना गुरूची गरजच भासत नाही. पण खरंच फक्त तंत्रज्ञानाने आपली गरज भागते का? तर नक्कीच नाही. आपल्या खऱ्या आयुष्याची योग्य जडणघडण करायची असेल तर गरज लागते ती परिपूर्ण गुरूचींच. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर शिष्याला गुरूची गरज भासतेच. आपल्याला प्रोत्साहन, पाठिंबा पदोपदी देतात तसंच ज्ञानाचा झरा अखंड वाहता ठेवतात. गुगल किंवा वेबसाइट्सवर भले तुम्हाला हवी ती माहिती मिळत असेल. पण जे ज्ञान गुरू देतात ते ज्ञान तुम्हाला नक्कीच गुगल किंवा इतर केणीच देऊ शकत नाही. योग्य आणि अयोग्य काय आहे याची उकल एक गुरूच करू शकतो.
प्रतिक्षा शिंदे, विवेक कॉलेज

गुरू-शिष्याचं नातं अतूट
सध्याच्या आधुनिक काळातल्या शिष्यांनी इंटरनेट आणि तंत्रज्ञानालाच आपला गुरू मानलंय. त्यामुळे या पिढीतला शिष्य हा एका अंगठ्याच्या जोरावर म्हणजेच एका क्लिकवर ज्ञानाचं ग्रहण करण्यात व्यग्र आहे. शालेय शिक्षणापासून अगदी महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत आणि प्रत्यक्ष नोकरी-व्यवसायाला लागल्यावरही प्रत्येकाला अशा मार्गदर्शकाची गरज भासते. आजच्या संघर्षमय आणि स्पर्धेच्या युगात आपल्याला टिकायचं असेल तर कोणीतरी सल्लागार व योग्य मार्गदर्शक मिळण्याची गरज आहे. आपल्या शिष्याच्या प्रगतीचा चढ-उतार, येणाऱ्या समस्या आणि केलेल्या चुकांची जाणीव करून देण्याचं काम हे तंत्रज्ञान न करता एक उत्तम गुरूच करू शकतो. एक उत्तम नागरिक म्हणून जगण्यासाठी गुरू व शिष्याचं नाते हे अतूट असावं.
विश्रांती शिंदे, विवेक कॉलेज

जिंवतपणाची सर तंत्रज्ञानाला नाहीच
तंत्रज्ञान अधिक जोमाने जुन्याची जागा नव्याने घेतंय. पण 'गुरू' ची जागा घेण्यास हे तंत्रज्ञान पात्र नाही. कारण गुरू हा काही त्याच्या विद्यार्थ्यांना फक्त ज्ञान देण्याचं काम करत नाही, तर गुरू त्याच्या शिष्याला घडवत असतो. तसंच त्या शिक्षकाचा आपल्या आयुष्याच्या जडणघडणीवर मोलाचा प्रभाव असतो. अनेकदा नकळत बरेचसे संस्कार विद्यार्थ्यांवर होत असतात. त्या नीतीमूल्यांचा वापर वर्तमानात व भविष्यात होतो. याच शिक्षकांकडून त्यांचे शिष्य चुकल्यावर बोल ऐकून घेतात व गुरूच्या या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलते. आपुलकीचे, कौतुकाचे शब्द हे फक्त गुरुच देऊ शकतो. या अशा आयुष्यातील जिवंतपणाची सर तंत्रज्ञानाला नाही.
सायली शिंदे, भवन्स कॉलेज

अनुभवाचे बोल अधिक महत्त्वाचे
जे आपल्याला ज्ञानार्जन करतात ते आपले गुरू असतात. या युगात तंत्रज्ञान आपणास ज्ञान देण्याचं काम करतं. तरीही तंत्रज्ञान कितीही विकसित झालं तरी आपल्या 'गुरूची' जागा घेणं अशक्य आहे. विद्या आत्मसात करण्यासाठी मानवाने तयार केलेल्या या 'तांत्रिकरूपी विद्येला' अर्थात तंत्रज्ञानाला 'महागुरु'ची उपमा देणं चुकीचं ठरेल. प्रत्यक्ष आयुष्यात 'गुरू' आपणास अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तंत्रज्ञान विकसित असले, ते ज्ञान देत असले तरीही ते आपणास योग्य 'मार्गदर्शन' करू शकत नाही. शिष्याला ज्ञानापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे 'अनुभव' आणि हा अनुभव प्रत्यक्ष गुरूच देऊ शकतो. त्यांचे अनुभवाचे बोल हे खरं मार्गदर्शन आणि हेच मार्गदर्शन यशापर्यंत पोहोचण्यास मदत करतं.
प्रणित समजीसकर, गर्व्हमेंट पॉलिटेक्निक कॉलेज

दुजाभाव करत नाही

गुरु वही जो जिना सिखादे
आपकी आपसे पहचान करादे,
तराश दे हिरे की तरहा तुमको
दुनिया की रस्ते पर चलना सिखादे
आयुष्यात प्रत्येक वळणावर नेहमीच एका प्रेरणेची गरज असते आणि ती प्रेरणा आपल्याला गुरूंकडून मिळते. मला ही प्रेरणा मिळाली मुंबईकडून. मुंबईतील अथांग समुद्र आपल्याला मोठी स्वप्न बघायला शिकवतो. न थकता न झोपता मेहनत करून स्वप्न पूर्ण करायचं बळ देतो. एखादा गुरू कोणताही दुजाभाव न बाळगता जशी आपल्या शिष्याला शिकवण देतो, तसंच मुंबई गरीब किंवा श्रीमंत असा फरक करत नाही. वेळेचे व्यवस्थापन मुंबई शिकवते, लोकल ट्रेनची गर्दी जागेचं नियोजन आणि संयम पाळायला शिकवते. जे कोणतंही मोबाइल अॅप नाही शिकवू शकत. मुंबईत आलेली प्रत्येक व्यक्ती स्वतः सोबत काही ना काही घेऊन जाते. कोणत्याही गुरूदक्षिणेची अपेक्षा न ठेवता निस्वार्थी पणे मुंबई सतत देतच असते.
शमा बुचडे, यादवराव तासगावकर स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट

...तोच खरा गुरू
अंधकाराचा नाश करून ज्ञानाची ज्योत लावणारा गुरू असतो. त्याप्रमाणे आई-वडील हेच आपले पहिले गुरु असतात. बाल मनावर संस्कार करण्याचे आणि त्यांना घडवण्याचं काम आई-वडील करतात. आई-वडिलांनंतर आपले दुसरे गुरू ते म्हणजे आपले शिक्षक! शिष्याच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा असतो. आजकाल मुलं कम्पुटर आणि मोबाइलच्या सहाय्याने ज्ञान मिळवतात. त्यामुळे तंत्रज्ञानही गुरू झाले आहे. पण तंत्रज्ञान कितीही विकसित झालं तरीही ते गुरूची जागा घेऊच शकत नाही. कारण मंत्र, तंत्र, उपदेश देणारे भरपूर गुरू मिळतील, पण आपल्याला ज्ञान देऊन विचार करायला प्रवृत्त करतो तोच खरा गुरू!
धनंजय काटकर, डहाणूकर कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 189 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>